दि.२१ मार्च २०२६ ला असलेल्या जागतिक कविता दिना निमित्त लेख


दि.२१ मार्च २०२६ ला असलेल्या जागतिक कविता दिना निमित्त लेख

   २१ मार्च जागतिक कविता दिन

         दरवर्षी २१ मार्च हा दिवस जगभरात 'जागतिक कविता दिन' म्हणून साजरा केला जातो .युनेस्कोने (UNESCO) १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३० व्या परिषदेत हा दिवस साजरा करण्याचे घोषित केले.मानवी मनातील भावनांना वाट करून देण्याचे कविता हे एक प्रभावी माध्यम आहे. भाषिक वैविध्य जपण्यासाठी आणि लुप्त होत चाललेल्या भाषांना कवितेद्वारे जिवंत ठेवण्यासाठी हा दिवस साजरा होतो.कवितेच्या माध्यमातून मानवी मूल्यांचा प्रसार करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.जागतिक कविता दिन कवींच्या कल्पनाशक्तीचा आणि त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान करतो. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि साहित्य संस्थांमध्ये कविता वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.कविता ही केवळ शब्दरचना नसून ती संस्कृती आणि इतिहासाचा आरसा असते.हा दिवस कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीला साहित्याकडे वळवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मौखिक परंपरेतील कवितांचे जतन करणे ही काळाची गरज असून हा दिवस त्याचे स्मरण करून देतो.कविता ही हृदयाला भिडणारी कला असून ती कोणत्याही सीमा मानत नाही. साहित्यातील इतर प्रकारांच्या तुलनेत कविता कमी शब्दात अधिक सखोल अर्थ सांगत असते.जागतिक शांतता आणि बंधुभाव जोपासण्यासाठी अनेक कवींनी आपल्या लेखणीचा वापर केलेला आहे.
        जागतिक शांतता हा पिढ्यानपिढ्या कवींच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. युद्ध, हिंसा आणि द्वेषाच्या काळात माणुसकीची ज्योत पेटवून ठेवण्याचे काम अनेक जागतिक आणि भारतीय कवींनी केले आहे.जागतिक शांतता आणि मानवतेचा संदेश स्वतःच्या कवितून देणारे अनेक कवी आहेत.या कवितांमधून युद्ध नको तर प्रेम आणि एकोपा हवा, हाच सूर उमटतो.मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी कुसुमाग्रज यांनी कवितेतून नेहमीच माणुसकीचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश दिला.रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्यातून नेहमीच 'वसुधैव कुटुंबकम्' (संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे) ही भावना मांडली. शांततेचे कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहिर लुधियानवी यांनी युद्धाच्या निरर्थकतेवर मार्मिक भाष्य केले आहे .
"ए शरीफ इंसानो, जंग टलती रहे तो बेहतर है,
आप और हम सभी के आँगन में, शमा जलती रहे तो बेहतर है।"(हे सज्जन माणसांनो, युद्ध टाळलेलेच बरे, तुमच्या-आमच्या अंगणात शांततेचा दिवा जळत राहिलेलाच बरा.)जॉन लेनन यांचे जागतिक शांततेसाठी 'Imagine' हे गाणे आजही प्रेरणादायी ठरते.
"Imagine all the people
Living life in peace..."
(कल्पना करा, जगातील सर्व माणसे शांततेत जीवन जगत आहेत.), कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितांमधून प्रेम आणि शांततेचा एक वेगळाच माधुर्यपूर्ण पैलू उलगडतो"सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?
तुम्हीच ठरायचं!"शांतता निर्माण करण्यासाठी कवितेचा वाटा मोठा असतो.बदलत्या काळात आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कविता घराघरात पोहोचत आहे.मराठी साहित्यातही अनेक दिग्गज कवींनी मोलाचे योगदान दिले आहे.चित्रकला, नृत्य आणि संगीत यांसारख्या इतर कलांशी कवितेचे अतूट नाते आहे. कविता माणसाला दुःख विसरण्यास आणि जीवनात नवी उमेद निर्माण करण्यास मदत करते .आजच्या धावपळीच्या युगात मनाला शांतता देण्यासाठी कविता वाचणे हा एक उत्तम छंद आहे.
जगातील प्रत्येक भाषेचे सौंदर्य तिच्या कवितेत दडलेले असते. 'शब्द' हेच शस्त्र आणि 'भाव' हेच सामर्थ्य असलेल्या या काव्यसंस्कृतीला वंदन करण्याचा हा दिवस आहे.
   जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥

संत कबीर कवीराज पुरस्कार प्राप्त 
        कवी व साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
 अमरावती .८०८७७४८६०९.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !