कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....!
कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....! “कोणाचं वाईट करून आपलं भलं होईल हा विचार कधीच करू नका; कारण निसर्ग नेहमी व्याजासह परत करतो… चांगुलपणाची बीजे पेरा, आयुष्यात सुख नक्कीच उगवेल. कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.” ही वचने केवळ उपदेश नसून जीवनाचा गूढ आणि गाभा उलगडणारा शाश्वत नियम आहेत. मानवी जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा तात्पुरत्या लाभाच्या मोहात अडकतो. यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या धावपळीत कधी नकळत इतरांच्या भावनांना ठेच पोहोचवतो, कुणाला कमी लेखतो, तर कुणाच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. त्या क्षणी आपल्याला वाटते की आपण जिंकलो; परंतु हे आपण विसरतो की प्रत्येक कृतीची सावली आपल्यामागेच असते. निसर्गाच्या लेखावहीत प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती नोंदली जाते. त्या वहीत पुसण्याची सोय नसते; तेथे बदलाची शाई नसते. आज आपण जे पेरतो, तेच उद्या आपल्या आयुष्यात उगवते.फरक फक्त काळाचा असतो. शेतकरी जसा बी पेरताना जागरूक असतो, तसाच विवेक आपल्या कृतीत असणे आवश्यक आहे. तो कधीच काटेरी झाडाचे बी पेरून गोड फळांची अपेक्षा करत नाही. मग आपण मत्सर, द्वेष, कपट आणि फसवणूक यांची बीज...