मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...!
मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...! आकाशातील ग्रह माणसाच्या नशिबावर परिणाम करतात की नाही, यावर आजही चर्चा होत राहते. कोणी त्यावर श्रद्धा ठेवतो, कोणी त्याकडे केवळ एक समज म्हणून पाहतो. पण एक सत्य मात्र निर्विवाद आहे. पृथ्वीवर राहणारी माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते माणसाच्या आयुष्याला खोलवर स्पर्श करून जातात. माणसाचं आयुष्य आकाशातील ताऱ्यांपेक्षा अधिक उजळतं किंवा काळोखात जातं, ते इतर माणसांच्या नजरेतून. एखाद्या बद्दल मनात तयार झालेला ग्रह हा कधी प्रेमाचा असतो, कधी संशयाचा, तर कधी नकळत रुजलेला पूर्वग्रह असतो. हा ग्रह शब्दांशिवाय बोलतो, पण त्याचे परिणाम मात्र फार बोलके असतात. एखाद्या माणसाकडे आपण संशयाने पाहू लागलो, की त्याचं हसणं ही आपल्याला खोटं वाटतं. त्याची शांतता आपल्याला कपटाची भासते. तो कितीही प्रामाणिक असला, तरी आपल्या मनात बसलेला ग्रह त्याचं खरं रूप पाहू देत नाही. अशा वेळी नाती हळूहळू कोमेजतात, विश्वास गळून पडतो, आणि माणसं एकमेकांच्या अगदी जवळ असून ही फार दूर जातात. पण जिथे मनात विश्वासाचा, आपुलकीचा ग्रह असतो, तिथे नात्यांना वेगळीच उंची मिळते. छोट्या चुका माफ ...