पोस्ट्स

पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....!

इमेज
पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....! रंग बदलणाऱ्या माणसांत राहणे म्हणजे दररोज होळी खेळण्यासारखेच असते… पण ही होळी रंगांची नसते, ती भावनांची असते. इथे गुलाल उधळला जात नाही, तर विश्वास उधळला जातो. इथे पाण्याने रंग धुतले जात नाहीत, तर स्वार्थाने नाती धुऊन निघून जातात. प्रत्येक सकाळी आपण मनात आशेचा एक नवा रंग भरतो, आणि संध्याकाळी तोच रंग कुणाच्या खोटेपणामुळे फिका पडलेला दिसतो. आजकाल माणसं परिस्थितीनुसार रंग बदलतात. समोर गोड बोलणारे लोक मागे कटू सत्य विणत असतात. चेहऱ्यावर मैत्रीचा मुखवटा, पण मनात स्वार्थाची गणितं. अशा वातावरणात जगताना मन कायम सावध राहतं. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणापासून अंतर राखावं, हेच कळेनासं होतं.आपण मात्र नात्यांचा, प्रामाणिकपणाचा, आपुलकीचा रंग जपत राहतो.कारण आपल्याला रंग बदलता येत नाही; आपल्याला मन बदलता येत नाही. बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो, जेव्हा पैशांच्या जोरावर गाढवं पुढे जातात. जेव्हा गुणवत्तेपेक्षा पैशाची किंमत जास्त ठरते, जेव्हा कर्तृत्वापेक्षा ओळखींचं वजन जड ठरतं, तेव्हा खऱ्या अर्थाने मेहनत करणारा माणूस क्षणभर थांबतो. त्याच...

गैरसमजांच्या सावलीतलं सत्य....!

इमेज
गैरसमजांच्या सावलीतलं सत्य....! “आपण कुणासाठी कितीही केलं, तरी कुठेतरी कमीच पडतो… कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत, खोटं गावभर हिंडून आलेलं असतं.” ही ओळ केवळ शब्दांची मांडणी नाही; ती आयुष्याच्या कटू पण निर्विवाद वास्तवाची जाणीव करून देणारी अनुभूती आहे. अनेक नाती, विश्वास, गैरसमज आणि तुटलेल्या मनांचा इतिहास या एका वाक्यात सामावलेला आहे. मनुष्य जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, तेव्हा तो हिशोब ठेवत नाही. तो आपल्या माणसासाठी झटतो, त्याच्या अडचणी स्वतःच्या मानतो, त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो, स्वतःचे दुःख लपवतो, रात्री उशिरापर्यंत जागून त्याला साथ देतो. हे सर्व करताना त्याच्या मनात परतफेडीची अपेक्षा नसते; कारण आपुलकीला तोल नसतो आणि प्रेमाला अट नसते. परंतु जगाचा स्वभाव वेगळा आहे. जग ऐकलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवते; पाहिलेल्या सत्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करते. खोटं आकर्षक असतं. त्यात रंगत असते, चटकदारपणा असतो, थोडी अतिशयोक्ती असते. एका कानातून दुसऱ्या कानात जाताना ते अधिक सजतं, अधिक फुगतं आणि लोकांच्या मनात पटकन घर करून बसतं. स...

चारित्र्यावरचा डाग आयुष्याची न पुसणारी वेदना....!

इमेज
चारित्र्यावरचा डाग आयुष्याची न पुसणारी वेदना....! “दाग” हा शब्द किती छोटा… पण त्याचा अर्थ किती खोल!कपड्यावर लागला तर कपडा बेकार होतो, आणि चारित्र्यावर लागला तर आयुष्यच बेकार होतं. कपड्यावरील डाग आपण साबणाने, पाण्याने, कष्टाने घालवू शकतो. नवीन कपडा घेऊ शकतो. वेळ गेली की तो विसरूनही जातो. पण मनावर, चारित्र्यावर लागलेला डाग? तो ना साबणाने निघतो, ना काळाने सहज पुसला जातो. तो कायम मनाच्या आरशावर उमटलेला राहतो. कपड्याचा डाग दिसतो बाहेरून; चारित्र्याचा डाग दिसतो नजरेतून. लोकांच्या नजरेत एकदा शंका निर्माण झाली की विश्वासाचं नातं तुटायला वेळ लागत नाही. आणि विश्वास… तो एकदा तुटला की त्याला जोडायला आयुष्य अपुरं पडतं. एखाद्या शुभ्र पांढऱ्या कपड्यावर काळा ठिपका किती उठून दिसतो ना? तसंच, आयुष्यभर चांगुलपणाने जगलेल्या माणसाच्या आयुष्यात एक चुकीची गोष्ट झाली, की तीच सगळ्यांना दिसते. त्याच्या हजारो चांगल्या कृतींचं मोल कमी होतं.समाजाला चांगुलपणापेक्षा चूक जास्त लवकर दिसते. चारित्र्य म्हणजे माणसाचं खरं वैभव. पैसा, प्रतिष्ठा, सौंदर्य हे सगळं क्षणभंगुर आहे. पण स्वच्छ चारित्र्य हे आयुष्यभराची क...

सेवेच्या तेजाने उजळलेले एरंडोल त्यागातून निर्मित नेतृत्वाची कहाणी.....!

इमेज
सेवेच्या तेजाने उजळलेले एरंडोल त्यागातून निर्मित नेतृत्वाची कहाणी.....! एरंडोलसारख्या छोट्याशा शहरात घडलेली एक घटना आज केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेली नाही; ती प्रत्येक संवेदनशील मनाला स्पर्श करणारी ठरली आहे. सत्तेच्या, मानधनाच्या आणि प्रतिष्ठेच्या चर्चांनी गजबजलेल्या या काळात काही व्यक्ती आपल्या शांत, निःस्वार्थ कृतीतून समाजासमोर एक जिवंत आदर्श ठेवतात. डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर आणि डॉ. गीतांजली नरेंद्र ठाकूर या दांपत्याने आपल्या वैवाहिक आयुष्याच्या वाढदिवशी घेतलेला संकल्प हा असाच एक तेजस्वी दीप आहे, जो लोकसेवेची खरी दिशा दाखवतो. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दरमहा मिळणारे पंधरा हजार रुपये शासकीय मानधन आणि बैठक भत्ता, तसेच नगरसेविका म्हणून मिळणारा बैठक भत्ता हे सर्व स्वतःकडे न ठेवता संपूर्ण पाच वर्षे समाजकार्यासाठी अर्पण करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा केवळ आर्थिक त्याग नाही; तो त्यांच्या अंतःकरणातील समाजप्रेमाचा साक्षात पुरावा आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी सहज वापरता येईल अशी रक्कम त्यांनी निःसंकोचपणे समाजाच्या सेवेसाठी अर्पण केली. हा निर्णय घेताना त्यांनी लाभ-हानीचा ...

अपेक्षांच्या ओझ्यात दबलेली स्वप्नं....!

इमेज
अपेक्षांच्या ओझ्यात दबलेली स्वप्नं....! असं म्हणतात की सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने पुढे जात नाही. कारण तो स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने चालत नसतो; तो लोकांच्या अपेक्षांच्या मागे धावत असतो. त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू स्वतः नसतो, तर इतरांच्या भावना, त्यांची मते आणि त्यांचा आनंद असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावं यासाठी तो झटत राहतो, पण त्याच वेळी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू मात्र शांतपणे लपवत राहतो. अशा माणसाला “नाही” म्हणणं जमत नाही. त्याला भीती वाटते.कुणी रुसू नये, कुणी दूर जाऊ नये, कुणाला वाईट वाटू नये. तो नात्यांना जपण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच विसरतो. सुरुवातीला त्याची ही सवय सगळ्यांना आवडते. लोक त्याचं कौतुक करतात. “किती समजूतदार आहेस!”, “तू नसतास तर काय झालं असतं!”, “तुझ्यासारखा कोणी नाही!” असे शब्द त्याच्या मनाला समाधान देतात. त्याला वाटतं की तो खरोखरच महत्त्वाचा आहे. परंतु हळूहळू हेच कौतुक अपेक्षांमध्ये बदलतं. अपेक्षा हक्कांमध्ये रूपांतरित होतात. लोकांना त्याचा होकार सवयीचा होतो. त्याची उपलब्धता गृहीत धरली जाते. त्याच्या वेळेची, त्याच्या भा...

मान्यतेपेक्षा महत्त्वाचा आत्मसन्मान....!

इमेज
मान्यतेपेक्षा महत्त्वाचा आत्मसन्मान....! “तुमची किंमत तुम्हाला स्वतःला माहिती असली की जगाकडून मान मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही…”मान, सन्मान, कौतुक या सगळ्यांच्या शोधात माणूस आयुष्यभर धावत असतो. कुणीतरी आपल्याला ओळखावं, आपल्या कष्टांची दखल घ्यावी, आपल्याला योग्य तो सन्मान मिळावा, अशी एक हळवी अपेक्षा मनात सतत दाटून आलेली असते. परंतु कधी शांतपणे स्वतःलाच विचारलं आहे का ? जर आपल्यालाच आपल्या किंमतीची जाणीव नसेल, तर जगाकडून ती कशी अपेक्षित करणार? जगाचं मोजमाप सतत बदलत राहतं. आज कौतुक, उद्या टीका. आज टाळ्यांचा कडकडाट, तर उद्या पूर्ण शांतता. लोकांचे मतप्रवाह ऋतूंप्रमाणे बदलतात. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्थिर असते.ती म्हणजे आपल्या मनातील आवाज. तो जर ठामपणे सांगत असेल, “मी पुरेसा आहे… मी सक्षम आहे… मी मौल्यवान आहे,” तर बाहेरच्या मान्यतेची गरज उरत नाही. स्वतःची किंमत ओळखणं म्हणजे अहंकार नव्हे; तो आत्मसन्मान असतो. आत्मसन्मान ही एक शांत ताकद आहे. तो दिखावा करत नाही, मोठ्याने घोषणा देत नाही; परंतु संकटांच्या क्षणी खंबीरपणे उभा राहतो. जेव्हा जग शंकेच्या नजरेने पाहतं, तेव्...

समाजसेवेतील समर्पणाचे प्रतीक अशोक मोरे...!

इमेज
समाजसेवेतील समर्पणाचे प्रतीक अशोक मोरे...! जळगाव – समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणे ही केवळ एक कर्तव्य नाही, तर एक जीवनशैली आहे, जी समाजाच्या प्रत्येक सदस्याला प्रेरित करते. अशाच समर्पित व्यक्तिमत्त्वाला जळगावच्या भोई समाज फाउंडेशनने विशेष सन्मान दिला आहे. एरंडोल येथील नगरपालिकेचे लिपिक, पण हृदयाने समाजसेवक अशोक मोरे, यांचा हा गौरव त्यांच्या अथक समाजकार्याचे कौतुक आहे. उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक विशाल भोळे, किरण शिवदे, अतुलभाऊ बारी, श्री सोनवणे, छोटूभाऊ भोई आणि भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष एस. ए. भोई यांच्या हस्ते अशोक मोरे यांचा सन्मान करण्यात आला. हा गौरव फक्त त्यांच्या वैयक्तिक योगदानासाठी नाही, तर भोई समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ प्रयत्नांचा आदर आहे. अशोक मोरे हे फक्त नगरपालिकेतील निष्ठावंत कर्मचारी नाहीत; ते समाजाच्या प्रगतीसाठी सदैव पुढाकार घेणारे कार्यकर्ते आहेत. गरजू व्यक्तींना मदत करण्याची तत्परता, समाजातील उपक्रमांमध्ये सहभाग, आणि सामाजिक न्याय व समतेसाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहेत. अशा निष्ठावंत आणि हृदयस्पर...

मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....!

इमेज
मातीच्या सुगंधातून उभा राहिलेला सुवर्णवीर नीरज दिलीप चौधरी....! धुळे जिल्ह्यातील वलवाडी या छोट्याशा गावात जन्मलेले नीरज दिलीप चौधरी हे नावाने साधे, पण कर्तृत्वाने विलक्षण आहेत. गरीब व शेतकरी कुटुंबात वाढताना त्यांनी कष्टांचे मोल लहानपणापासूनच जाणले. उन्हातान्हात शेतात राबणारे आई-वडील, मर्यादित साधनसामग्री आणि साधे राहणीमान परंतु मनात मात्र मोठी स्वप्ने आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची अढळ जिद्द होती. लहानपणापासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी मैदानात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राज्यस्तरावर खेळताना त्यांनी तब्बल दहा पदके मिळवली. प्रत्येक पदक हे त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि कुटुंबाच्या त्यागाचे प्रतीक होते. गावच्या मातीत वाढलेला हा खेळाडू स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यशाची शिखरे सर करू लागला. त्यांची झेप केवळ राज्यापुरती मर्यादित राहिली नाही. देशाचे प्रतिनिधित्व करत परदेशात खेळताना त्यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आणि पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्या ऐतिहासिक क्षणी वलवाडी गाव, धुळे जिल्हा आणि संपूर्ण समाज अभि...

गणवेशातून घरापर्यंत साध्या कुटुंबातील देशभक्ताचे जीवन....!

इमेज
गणवेशातून घरापर्यंत साध्या कुटुंबातील देशभक्ताचे जीवन....! साकरे, तालुका धरणगाव या साध्या, शांत गावात जन्मलेले ज्ञानेश्वर साहेबराव बाविस्कर (पाटील) हे नाव आज गावासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं आहे. घरची परिस्थिती अत्यंत साधी, साधनसंपत्ती मर्यादित, पण मनात स्वप्नं मोठी. वडिलांची दूध विकास फेडरेशनमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी असली तरी घर चालवताना अनेकदा आर्थिक तुटवडा भासत असे. या सर्व अडचणींमध्ये ही ज्ञानेश्वर यांच्या डोळ्यातील देशभक्तीची ज्योत कधीच मिटली नाही. बालपणापासूनच त्यांना एकच ध्यास होता देशसेवा. गावातील सैनिकांच्या शौर्यकथा ऐकताना त्यांचे डोळे चमकायचे. गणवेशात सैनिक पाहिले की मनात फक्त एक विचार येई."एक दिवस मीही हा गणवेश अभिमानाने परिधान करीन." वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी हा ध्यास प्रत्यक्षात आणला. भारतीय सैन्यात भरती होऊन शिपाई पदावरून कारकिर्दीची सुरुवात केली. कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवन, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ त्याग या सर्वाने त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजस्वी बनवले. २४ वर्षांचा प्रामाणिक सेवा प्रवास…असंख्य आठवणी, कठीण परिस्थिती, विविध पोस्टिंग्स  परंतु...

एरंडोलमध्ये महाबीज पीक प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांचा वाढवला आत्मविश्वास...!

इमेज
एरंडोलमध्ये महाबीज पीक प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांचा वाढवला आत्मविश्वास...! एरंडोलच्या सुपीक मातीत पुन्हा एकदा आशेची हिरवी पालवी डोलू लागली होती. सकाळच्या मंद वाऱ्यात गव्हाच्या कणसांची सळसळ आणि हरभऱ्याच्या टवटवीत पानांची झुळूक जणू शेतकऱ्यांच्या कष्टांना प्रणाम करत होती. त्या कष्टांत घाम होता, संघर्ष होता; पण त्याचबरोबर होता अढळ विश्वास “शेती टिकली तर आपण टिकू.” एरंडोल येथील शेतकरी शेतीनिष्ठ, मेहनती आणि आधुनिक पद्धतीने शेती करणारे आहेत. परंपरेची माती हातात घेऊन त्यांनी विज्ञानाची कास धरली आहे. पहाटेच्या दवात भिजलेले पाय आणि संध्याकाळच्या थकव्यावर मात करणारे हृदय हीच त्यांची ओळख. त्यांच्या या जिद्दीला बळ देण्यासाठी महाबीजतर्फे आयोजित पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाने एरंडोलच्या शिवारात नव्या आत्मविश्वासाची पेरणी केली. शरद किसन पाटील यांच्या शेतावर महाबीज गहू फुले सात्विक (NIAW-3170) या वाणाचे, तर आकाश रामचंद्र पाटील यांच्या शेतावर फुले विक्रम या हरभरा वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. हिरव्यागार शेतात उभ्या पिकांकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांत समाधानाची चमक होती. भरदार कणसं हातात...

स्वार्थी आणि निस्वार्थतेची खरी किंमत...!

इमेज
स्वार्थी आणि निस्वार्थतेची खरी किंमत...! आयुष्यात अनेक माणसं येतात. काही लोक आपल्या आयुष्यात निस्वार्थ प्रेमाने भरभरून देतात, तर काही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी येतात.स्वार्थी माणसं. आणि हे स्वार्थी माणसं येणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्याशिवाय आपण खऱ्या निस्वार्थ माणसांची खरी किंमत कधीच जाणून घेऊ शकत नाही. कल्पना करा, भिंतीवर एक सुंदर फोटो लावलेला आहे. फोटोची सुंदरता सर्वांना दिसते, त्याचे रंग, छटा आणि रूप पाहून सर्वजण कौतुक करतात. पण तो फोटो भिंतीवर टिकवणारा खिळा? त्याचा भार, त्याचे कष्ट, त्याचे समर्पण याचा कुणालाच आभास नसतो.आयुष्यही तसंच आहे. आपले प्रयत्न, आपली मेहनत, आपला वेळ हे सर्व अनेकदा दिसत नाही; फक्त परिणाम दिसतो. आणि या परिणामामागचा संघर्ष, झोप न सोडणारी रात्र, अपार समर्पण हे क्वचितच कुणालाच जाणवतं. कधीकधी केलेल्या कामाचे श्रेय मिळत नाही. अनेकदा आपले प्रयत्न अनदेखे राहतात, आणि हे आपल्याला दुखावतात. पण या अनुभवांमुळेच आपण खंबीर होतो, शिस्तीत आणि संयमात शिकतो. जेव्हा एखादा निस्वार्थ माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो, आपल्यासाठी काही करतो, तेव्हा आपल्याला कळते की खरी मा...

कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....!

इमेज
कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.....! “कोणाचं वाईट करून आपलं भलं होईल हा विचार कधीच करू नका; कारण निसर्ग नेहमी व्याजासह परत करतो… चांगुलपणाची बीजे पेरा, आयुष्यात सुख नक्कीच उगवेल. कर्माची पाटी कधीच कोरी राहत नाही.” ही वचने केवळ उपदेश नसून जीवनाचा गूढ आणि गाभा उलगडणारा शाश्वत नियम आहेत. मानवी जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा तात्पुरत्या लाभाच्या मोहात अडकतो. यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या धावपळीत कधी नकळत इतरांच्या भावनांना ठेच पोहोचवतो, कुणाला कमी लेखतो, तर कुणाच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. त्या क्षणी आपल्याला वाटते की आपण जिंकलो; परंतु हे आपण विसरतो की प्रत्येक कृतीची सावली आपल्यामागेच असते. निसर्गाच्या लेखावहीत प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती नोंदली जाते. त्या वहीत पुसण्याची सोय नसते; तेथे बदलाची शाई नसते. आज आपण जे पेरतो, तेच उद्या आपल्या आयुष्यात उगवते.फरक फक्त काळाचा असतो. शेतकरी जसा बी पेरताना जागरूक असतो, तसाच विवेक आपल्या कृतीत असणे आवश्यक आहे. तो कधीच काटेरी झाडाचे बी पेरून गोड फळांची अपेक्षा करत नाही. मग आपण मत्सर, द्वेष, कपट आणि फसवणूक यांची बीज...

दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी...!

इमेज
दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी...! दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या लोकांनी आधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहावे. दुसऱ्याच्या आयुष्यातील चुका शोधताना आपले हात किती मळलेले आहेत, याची त्यांना अनेकदा जाणीव नसते. आजच्या जगात दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, अफवा पसरवणे, किंवा त्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणे इतके सोपे झाले आहे.  एक चुकीचा शब्द, एक तिरकस टिपण किंवा दुर्भावनाशील नजर दुसऱ्याच्या जीवनात खोल जखम करू शकते, पण आपण स्वतःच्या मनातील कटूता, द्वेष आणि मत्सर याची जाणीव ठेवतो का? बहुतेक वेळा आपण हे विसरतो. चारित्र्य म्हणजे फक्त बाह्य वर्तन नव्हे; ते मनाची शुद्धता, विचारांची प्रामाणिकता आणि कृतीची सातत्यता आहे. जेव्हा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात दोष शोधतो, तेव्हा आपण स्वतःच्या कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याच्या चुका मोजण्यात रमल्यावर, स्वतःच्या चुका मान्य करण्याचे धैर्य आपण गमावतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीची शांतता ही कमजोरी नव्हे, तर संस्कृती असते. तो प्रत्युत्तर देत नाही म्हणून दोषी ठरत नाही. उलट, न बोलता सहन करणाऱ्या मनाची वेदना शब्दांपेक्षा अधिक तीव्र ...

दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....!

इमेज
दुसऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले यश....! दुसऱ्यांच्या पराभवाची वाट लावण्यात काही लोकांना एक विचित्र समाधान मिळते. जणू दुसऱ्याला खाली खेचले की आपण आपोआप उंचावतो, अशी त्यांची समजूत असते. परंतु जीवनाचा एक साधा, शांत आणि अटळ नियम आहे.दुसऱ्याची वाट लावताना आपण नकळत स्वतःचीच वाट लावत असतो. दुसऱ्यांच्या अपयशावर टाळ्या वाजवणारे हात कधीतरी स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू पुसताना थरथरतात. कारण नियती अत्यंत शांतपणे आपला हिशेब ठेवत असते. आपण कोणाच्या पायात अडथळे टाकतो, कोणाच्या स्वप्नांवर निर्दयपणे पाय देतो, कोणाच्या विश्वासाला तडा देतो. याची प्रत्येक नोंद वेळ आपल्या वहीत करत असते. त्या नोंदी कधी पुसल्या जात नाहीत; त्या योग्य वेळी परतफेडीच्या रूपाने समोर येतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरवणाऱ्याला क्षणभर वाटते.“मी जिंकलो!” परंतु तो हे विसरतो की अंधार पसरवण्यासाठी आधी स्वतःच्या मनात अंधार साठवावा लागतो. आणि ज्या मनात अंधार साचतो, तेथे शांतता, समाधान आणि आनंद हळूहळू नष्ट होऊ लागतात. बाहेरून विजयाचे हास्य असते, पण अंतर्मनात पराभवाची पोकळी दाटलेली असते. कुणाच्या अपयशाची खिल्ली उडवताना आपण...

संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार

इमेज
संतोष शेंडे एक आदर्श ग्रामीण पत्रकार                   ग्रामीण भागातील पत्रकारिता ही शहरातील पत्रकारितेपेक्षा अधिक आव्हानात्मक आणि थेट लोकांशी निगडित असते.एका आदर्श ग्रामीण पत्रकाराकडे केवळ लेखणीचे कौशल्य असून चालत नाही, तर त्याला सामाजिक भान आणि ध्येयवाद असणेही तितकेच महत्त्वाचे असते.जे टाकरखेडा संभू,ता. भातकुली,जि.अमरावतीचे धडाडीचे पत्रकार संतोष शेंडे यांच्याकडे आहे.        ​ग्रामीण भागातील आदर्श पत्रकाराला स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असली पाहिजे . ग्रामीण पत्रकाराला आपल्या परिसरातील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते.शेती, पाणीप्रश्न,आरोग्य सेवा आणि स्थानिक प्रशासकीय त्रुटी यांवर त्याची पकड असणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टी पत्रकार संतोष शेंडे जवळ असल्यामुळेच ते आज पत्रकारितेच्या क्षेत्रात  नावारुपास आलेले आहेत.       ​तटस्थता आणि निर्भीडपणा ग्रामीण पत्रकाराच्या अंगी असणे आवश्यक असते.​ग्रामीण भागात अनेकदा राजकीय दबाव किंवा गटबाजी असते.अशा वेळी कोणत्याही पक्...