आयुष्याची खरी तृप्ती.....!
आयुष्याची खरी तृप्ती.....! या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो कोणी पैसा, कोणी यश, कोणी प्रेम… पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट असते तृप्ती. आणि ही तृप्ती नेमकी कशात आहे, हे अनेकांना आयुष्यभर कळत नाही. काही जण आयुष्यभर साठवतात. पैसा, संपत्ती, वस्तू… अगदी नातीसुद्धा. पण त्यांचं साठवणं हे देण्यासाठी नसतं, तर स्वतःपुरतं ठेवण्यासाठी असतं. त्यांच्या मनात एक भीती असते. “काही कमी पडू नये.” आणि या भीतीतूनच जन्म घेतो लोभ. लोभ माणसाला हळूहळू आतून रिकामं करत जातो. तो दुसऱ्याचा हक्क पाहत नाही, त्याला फक्त स्वतःचं पोट दिसतं. पण या पोटाची भूक विचित्र असते. जितकं भराल, तितकी वाढत जाते. अशा लोकांच्या घरात भरपूर अन्न असतं, पण जेवताना समाधान नसतं. त्यांच्या आजूबाजूला माणसं असतात, पण नात्यांमध्ये ऊब नसते. कारण त्यांनी घेतलं खूप, पण दिलं काहीच नाही. आणि दुसऱ्या बाजूला असतात काही साधे, निरागस माणसं… ज्यांच्याकडे फारसं काही नसतं, पण “नसतानाही देणं” ही त्यांची सवय असते. त्यांच्या हातात कदाचित एकच भाकरी असते, पण ती दोन तुकड्यांत तोडताना त्यांना आनंद होतो. कारण त्यांना माहीत असतं. वाटल...