पोस्ट्स

डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात माणुसकी...!

इमेज
डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात माणुसकी...! काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या विचारांमुळे, वागणुकीमुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे त्या आपोआप उंचावतात. आदरणीय सारंग जैन सर हे अशाच व्यक्तिमत्त्वाचं जिवंत आणि सुंदर उदाहरण आहेत. शांतता आणि कुशाग्र बुद्धी यांचा दुर्मिळ संगम म्हणजे सर. नेहमी डोक्यावर बर्फ ठेवून निर्णय घेण्याची समज, तोंडात साखर ठेवून संवाद साधण्याची कला आणि मनात माणुसकी जपण्याची संवेदनशीलता हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे नांदताना दिसतं.फाइल असो वा फंडाचा हिशोब, प्रत्येक कामात स्पष्टता, काटेकोरपणा आणि विश्वासार्हता दिसते. आकड्यांमागे केवळ गणित नसतं, तर त्यामागे जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी असते.हे सरांच्या कामातून नेहमी जाणवतं. बजेट कमी असो वा अपेक्षा प्रचंड, तक्रारींचा बोजा न वाढवता, हसत-हसत सगळं सांभाळण्याची ताकद फार थोड्या लोकांकडे असते, आणि सर त्यातलेच एक आहेत. अडचणींवर ताण न देता, उपायांमध्ये माणुसकी मिसळण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. धरणगाव ऑफिसचे सर्वेसर्वा असतानाही, सरांचा साधेपणा आणि आपुलकी कधीच बदललेली नाही. कुणा...

वेळ येतेच…आणि तेव्हा कळतं....!

इमेज
वेळ येतेच…आणि तेव्हा कळतं....! माणुसकी तिथेच मरते, जिथे दुसऱ्याच्या दुःखाचा लोकांना खेळ वाटतो. जिथे अश्रूंना किंमत नसते, वेदनांवर हसले जाते आणि कोसळणाऱ्या माणसाकडे मदतीचा हात न देता तमाशा पाहिला जातो. माणूस प्रगती करत गेला, पण त्याच वेगाने त्याच्या मनातून संवेदनशीलता हरवत गेली. आज एखादा माणूस दुःखात असला की लोक विचारतात.“काय झालं?” मदतीसाठी नाही, तर चर्चेसाठी. त्याच्या वेदना चहाच्या कपात ओतून गप्पांचा विषय बनवल्या जातात. कोणाच्या अपयशावर समाधान मानलं जातं, तर कोणाच्या अश्रूंवर टोमणे मारले जातात. माणसाचं दुःख हे आज मनोरंजनाचं साधन झालं आहे. पण वेळ… वेळ फार निर्दयी नसते, ती फक्त न्याय्य असते. ती कुणाला वाचवत नाही, कुणालाही वगळत नाही. आज जो दुसऱ्याच्या वेदनेवर हसतो, उद्या त्याच वेदनेत अडकलेला असू शकतो. आज जो सुरक्षित वाटतो, उद्या तोच असहाय्य उभा असू शकतो. आयुष्य प्रत्येकाला शिकवतं, फक्त धडा कधी मिळतो याचा फरक असतो. तेव्हा कळतं की दुःखात शब्द नको असतात, फक्त समजून घेणारी नजर पुरेशी असते. टीका नको असते, तर आधार हवा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी तरी आपल्यासोबत उभं आहे,...

जिवंतपणीची साथ हीच खरी श्रद्धांजली.....!

इमेज
जिवंतपणीची साथ हीच खरी श्रद्धांजली.....! आपल्या आयुष्यात माणसं येतात… काही काळासाठी, तर काही आयुष्यभरासाठी. ती आपल्या सोबत चालतात, आपले सुख-दुःख वाटून घेतात, कधी शब्दांनी तर कधी फक्त शांत उपस्थितीने आपल्याला आधार देतात. पण दुर्दैवाने, ही माणसं आपल्या सोबत असतानाच आपण त्यांचे महत्त्व ओळखू शकत नाही. “आहेतच की…” या गृहितकात आपण त्यांना गृहीत धरतो. आज नाही तर उद्या भेटू, वेळ मिळेल तेव्हा बोलू, असं म्हणत आपण आजचा क्षण पुढे ढकलतो. पण वेळ कधी थांबत नाही. आणि माणूस गेल्यावर उरते ती फक्त पोकळी… जी कोणत्याही शब्दांनी भरून निघत नाही. माणूस जोपर्यंत हयात आहे, श्वास घेत आहे, आपल्याशी बोलू शकतो, तोपर्यंत त्याला दिलेलं प्रेम, आदर आणि साथ यालाच खरी किंमत असते. तो गेल्यावर त्याच्या मोठेपणाची, कर्तृत्वाची जाणीव होऊन काय उपयोग? त्या वेळी त्याच्या डोळ्यांत पाहून “तू आमच्यासाठी किती महत्त्वाचा होतास” असं सांगण्याची संधीच उरलेली नसते. थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ अतिशय मार्मिकपणे म्हणायच्या “माणूस किती चांगला आहे, हे समजण्यासाठी त्याला मरावं लागतं.”ही ओळ आपल्या समाजावरचं कटू सत्य उघड करते. जिवं...

एक दिलदार मनाचा दिलदार माणूस… कायमचा हरपला...!

इमेज
एक दिलदार मनाचा दिलदार माणूस… कायमचा हरपला...! एरंडोल येथील प्रा. आर. एस. पाटील सर यांचे आज रात्री हृदयविकाराने दुःखद निधन झाले आणि क्षणात एरंडोलच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनातील एक उजळ प्रकाश मावळला. ही बातमी केवळ दुःखद नाही, तर मन सुन्न करणारी आहे. काही व्यक्ती केवळ त्यांच्या नावामुळे ओळखल्या जात नाहीत, तर त्यांच्या माणुसकीमुळे, कार्यामुळे आणि जिवंत आठवणींमुळे कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. प्रा.पाटील सर हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख सर्वदूर होती; मात्र ते फक्त शिक्षक नव्हते.ते विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि “आपणही काही तरी करू शकतो” ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजवली. वर्गात ते शिक्षक होते, तर वर्गाबाहेर विद्यार्थ्यांसाठी पालक, मार्गदर्शक आणि अनेकांसाठी तर खरे आधारवड होते. गरिबीमुळे कोणाच्या ही शिक्षणात खंड पडू नये, ही त्यांची आंतरिक तळमळ होती. अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांनी स्वतः भरली; परंतु कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. “मदत के...

साधेपणातून साधनेपर्यंत जयेश वाघ यांची गोसेवेची कथा....!

इमेज
साधेपणातून साधनेपर्यंत जयेश वाघ यांची गोसेवेची कथा....! चाळीसगाव तालुक्यातील दहिवदसारख्या लहानशा गावात, एका सर्वसामान्य कुटुंबात जयेश संभाजी वाघ यांचा जन्म झाला. वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, तर घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. आयुष्याची सुरुवातच संघर्षांनी वेढलेली होती; परंतु या प्रतिकूल परिस्थितीत ही एका लहान मुलाच्या मनात एक वेगळे स्वप्न फुलत होतं.गोमातेच्या निःस्वार्थ प्रेमाची आणि सेवा करण्याची उत्कट इच्छा. बालपणापासूनच गायींकडे पाहताना जयेश यांचे डोळे काहीतरी वेगळ्या चमकाने भरलेले दिसायचे. इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना, जयेश मात्र गायींच्या सान्निध्यात शांतता आणि समाधान शोधत असे. त्यांच्या हृदयात गायींबद्दलची आपुलकी होती, मनात सेवाभाव होता, आणि बालवयातच गोसेवेची बीजं रुजली होती.  जणू काही त्यांच्यासाठी ही साधना जन्मजात होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी शिक्षणाचा मार्ग कधीही सोडला नाही. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी फार्मसीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.  स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर अनेक जण सुरक्षित नो...

मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...!

इमेज
मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...! आकाशातील ग्रह माणसाच्या नशिबावर परिणाम करतात की नाही, यावर आजही चर्चा होत राहते. कोणी त्यावर श्रद्धा ठेवतो, कोणी त्याकडे केवळ एक समज म्हणून पाहतो. पण एक सत्य मात्र निर्विवाद आहे. पृथ्वीवर राहणारी माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते माणसाच्या आयुष्याला खोलवर स्पर्श करून जातात. माणसाचं आयुष्य आकाशातील ताऱ्यांपेक्षा अधिक उजळतं किंवा काळोखात जातं, ते इतर माणसांच्या नजरेतून. एखाद्या बद्दल मनात तयार झालेला ग्रह हा कधी प्रेमाचा असतो, कधी संशयाचा, तर कधी नकळत रुजलेला पूर्वग्रह असतो. हा ग्रह शब्दांशिवाय बोलतो, पण त्याचे परिणाम मात्र फार बोलके असतात. एखाद्या माणसाकडे आपण संशयाने पाहू लागलो, की त्याचं हसणं ही आपल्याला खोटं वाटतं. त्याची शांतता आपल्याला कपटाची भासते. तो कितीही प्रामाणिक असला, तरी आपल्या मनात बसलेला ग्रह त्याचं खरं रूप पाहू देत नाही. अशा वेळी नाती हळूहळू कोमेजतात, विश्वास गळून पडतो, आणि माणसं एकमेकांच्या अगदी जवळ असून ही फार दूर जातात. पण जिथे मनात विश्वासाचा, आपुलकीचा ग्रह असतो, तिथे नात्यांना वेगळीच उंची मिळते. छोट्या चुका माफ ...

धाग्यांत गुंफलेली नाती....!

इमेज
धाग्यांत गुंफलेली नाती....! मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात.डोळ्यांना दिसणारही नाहीत इतके नाजूक. एखादा शब्द जरा जास्त झाला, एखादी भावना न बोलता मनात साचली, की त्या धाग्यांवर ताण पडतो. खरंच, तुटायचंच असेल तर श्वासाएवढाही झोत पुरेसा असतो. एक दुर्लक्ष, एक “नंतर बोलू” म्हणत टाळलेला क्षण, आणि मैत्रीच्या विणीत नकळत भेग पडते. पण हेच धागे जेव्हा विश्वासाने विणलेले असतात, तेव्हा ते लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत ठरतात. आयुष्य कितीही बदललं, अंतर कितीही वाढलं, संकटं कितीही कोसळली.तरीही ते धागे तुटत नाहीत. वज्राघात झाला तरी ते सहन करतात, कारण त्यात फक्त आठवणी नसतात, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची शांत तयारी असते. मैत्री म्हणजे रोज बोलणं नव्हे, तर वर्षांनंतर भेटून ही तेच जुने हसू ओठांवर येणं. ती मोठ्या आश्वासनांत नसते, तर साध्या “मी आहे” या वाक्यात असते.यशात आनंदाने टाळ्या वाजवणं आणि अपयशात शब्दांशिवाय सोबत करणं.हीच खरी मैत्री. ती कधी आवाज करते, तर कधी फक्त शांतपणे शेजारी बसून राहते. तुटलेली मैत्री पुन्हा जुळू शकते, पण त्यावरची गाठ मनाला बोचत राहते. म्हणूनच या धाग्य...

नाती जपायची असतील तर मोठं मन हवं...!

इमेज
नाती जपायची असतील तर मोठं मन हवं...! एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.तेव्हाच नाती कायम जपली जातात. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही आपले असतात जन्माने, काही आपले होतात प्रेमाने, तर काही न सांगता मनात घर करतात. या सगळ्या नात्यांचा एक समान धागा असतो भावना. पण या भावनाच कधी कधी चुकीच्या शब्दांत व्यक्त होतात आणि तिथेच नात्यांची परीक्षा सुरू होते. एखादा शब्द चुकतो… पण तो शब्द बोलणारा माणूस आयुष्यभर चुकाच करत नसतो. एका क्षणात निघालेला शब्द हा रागाचा, वेदनेचा किंवा थकव्याचा परिणाम असू शकतो. पण त्या एका चुकीच्या शब्दासाठी जर आपण त्या माणसाने आपल्यासाठी केलेल्या हजार चांगल्या गोष्टी विसरलो, तर नातं तुटायला वेळ लागत नाही. आई-वडिलांचं प्रेम कधी कठोर शब्दांत दिसतं, पण त्यांच्या मनात असलेली काळजी शब्दांपेक्षा कितीतरी मोठी असते. मित्र कधी टोचून बोलतो, पण संकटात तोच पहिला उभा राहतो. जोडीदार कधी मन दुखावतो, पण आयुष्यभर तुमचा हात सोडत नाही.या सगळ्या नात्यांमध्ये चुका होतात, पण त्या चुका झाकून टाकणारा प्रेमाचा मोठा साठा अ...

हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....!

इमेज
हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....! जीवनात सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मुखवट्यांमागचे चेहरे ओळखणे. कारण आजच्या धावपळीच्या, स्वार्थी जगात माणसं स्वतःपेक्षा भूमिका जास्त जगत आहेत. बाहेरून हसणारे चेहरे, गोड बोलणारी माणसं आणि आपुलकीचे शब्द… पण त्या सगळ्यामागे दडलेली भावना मात्र नेहमीच खरी असेल असं नाही. जो माणूस मुखवट्यामागचा खरा चेहरा ओळखतो, तो सावध होतो. तो कुणावरही लगेच विश्वास ठेवत नाही, शब्दांपेक्षा कृतीकडे पाहतो आणि स्वतःच्या मनाला जपतो. पण जो हे ओळखू शकत नाही, तो मात्र नात्यांमध्ये जास्त गुंततो, अपेक्षा वाढवतो आणि शेवटी फसवणूक, वेदना व निराशा यांचाच सामना करतो. आज अनेक नाती गरजेवर टिकलेली असतात. गरज संपली की आपुलकीचा मुखवटा आपोआप गळून पडतो. तेव्हा कळतं की आपण ज्या माणसाला आपलं मानत होतो, तो प्रत्यक्षात फक्त सोबत निभावत होता. अशा अनुभवातून माणूस आतून तुटतो, पण त्याच वेळी तो अधिक शहाणा ही होतो. माणसं ओळखता येणं ही जन्मजात मिळालेली देणगी नसते, ती अनुभवातून मिळते. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून, फसवणूक सहन करून, आणि अश्रूंनी धडे घेत आपण ही कला शिकतो. प्रत्येक वेदना...

घर उभं ठेवणारा माणूस.....!

इमेज
घर उभं ठेवणारा माणूस.....! घर चालवणारा माणूस कधीच हिरो नसतो. कारण हिरो होण्यासाठी क्षण पुरतो, पण घर चालवण्यासाठी अख्खं आयुष्य लागतं. तो फक्त जबाबदार असतो… आणि ही जबाबदारीच हळूहळू त्याची ओळख बनते.नाव, कौतुक, प्रसिद्धी यापेक्षा त्याला जास्त ओळख असते ती “सगळं सांभाळणारा माणूस” अशी. रोजच्या गरजांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं त्याच्या सवयीचं होतं. नवीन कपडे, छंद, स्वप्नं, थोडा आराम सगळं तो उद्यासाठी ढकलत राहतो. पण तो उद्या कधीच येत नाही. कारण घरासाठी आजच सगळं द्यावं लागतं. हळूहळू तो स्वतःसाठी काही मागणंच विसरतो. त्याचं आयुष्य म्हणजे त्यागांची न संपणारी यादी असते, जी तो कुणाला दाखवत नाही. कुणी त्याच्या कष्टांचं कौतुक करत नाही.कारण समाजाने ते कर्तव्य म्हणून गृहीत धरलेलं असतं.“तो तर करणारच” असं सहज म्हणून टाकलं जातं. लोक हसतात, टोमणे मारतात, कारण जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर नसतं. त्याची शांतता लोकांना कमजोरी वाटते, पण त्यांना कळत नाही की हीच शांतता घराला सावरून ठेवत असते. तो गप्प राहतो, कारण त्याला माहीत असतं शब्दांनी नाही, स्थैर्याने घर टिकतं. तो थकतो. शरीर थकतं, मनही थ...

निंबा कुंभार समाजसेवा,साहित्य आणि समर्पणाची अमिट छाप...!

इमेज
निंबा कुंभार समाजसेवा,साहित्य आणि समर्पणाची अमिट छाप...!  राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार’ प्राप्ती आणि  वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा..! एरंडोलचे गुरुकुल कॉलनीतील रहिवासी निंबा पुंडलीक कुंभार हे समाजसेवेतील अनमोल उदाहरण आहेत. समाजाप्रती असलेली निष्ठा, सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा आणि साहित्यातून होणारे प्रबोधन यांची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ कार्याचा, समाजप्रतीच्या समर्पणाचा आणि ज्ञान प्रसारासाठीच्या प्रयत्नांचा मान्यताप्राप्त गौरव आहे. १९८६ पासून गटसचिव म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातील काम सुरू केले. निव्वळ नोकरी न करता, समाजासाठी स्वतःला वाहून देणे हा त्यांचा जीवनध्येय राहिला. सोनवद ता. धरणगाव येथील ‘कुंभार काम औद्योगिक संस्था’ मध्ये ते विनावेतन सचिव म्हणून कार्यरत आहेत, जे त्यांच्या निःस्वार्थी वृत्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सामाजिक सेवेइतकेच, निंबा कुंभार यांनी २००७ मध्ये हिंगोणे ता. धरणगाव येथे आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ‘कै सखुबाई पुंडलीक कुंभार वाचनालय’ स्थापन केले. य...

इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....!

इमेज
इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....! विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक सहल म्हणजे केवळ प्रवास नसून तो ज्ञान, संस्कार आणि अनुभवांचा आनंदोत्सव असतो.हाच आनंदोत्सव साळवे ता.धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल यशस्वीपणे आणि उत्साहात पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी कालीमठ, घृष्णेश्वर, वेरूळ येथील कैलास मंदिर, देवगिरी किल्ला, सिद्धार्थ गार्डन, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय, बीबी का मकबरा तसेच पैठण येथील कारंजा या ऐतिहासिक, भौगोलिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पुस्तकात वाचलेली इतिहासाची पाने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उलगडताना विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, आनंद आणि अभिमान दाटून आला. किल्ल्यांचे घाट, प्राचीन वास्तूंची भव्यता आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य अनुभवताना इतिहास जणू जिवंत झाल्याचा भास होत होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे सरांना व भौगोलिक स्थळांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांची माहिती नोंदवली. प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास व संस्कृतीचे सखोल ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी अत्यंत उत्साही आणि भारावून गेले...

पडल्यावर हात देणारे मोजकेच...!

इमेज
पडल्यावर हात देणारे मोजकेच...! या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालण्याचं धाडस मात्र आपल्यालाच करावं लागतं. आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर सल्ले मिळतात, सूचना मिळतात, अनुभव सांगणारे लोक भेटतात. “असं कर”, “तसं करू नकोस”, “हा मार्ग योग्य आहे” असं सांगणारे अनेकजण असतात. पण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे एक कठोर सत्य दडलेलं असतं.त्या वाटेवर पडायचं,थकायचं, घसरायचं आणि पुन्हा उभं राहायचं काम आपल्यालाच करावं लागतं. कारण आयुष्य कोणाच्याही शब्दांवर नाही, तर आपल्या पावलांवर चालत असतं. चालताना आपण एकटेच असतो. आजूबाजूला गर्दी असते, ओळखीचे चेहरे असतात, पण तरीही मनाच्या आत एक एकटेपणाची शांत जाणीव असते. कारण प्रत्येकाचं दु:ख वेगळं असतं, प्रत्येकाची लढाई वेगळी असते. कुणालाही आपल्या मनातल्या वेदना पूर्णपणे समजत नाहीत. म्हणूनच वाट दाखवणारे असले, तरी चालणं आपल्यालाच शिकावं लागतं. पडायचं भीती न बाळगता पुढे जाण्याचं धाडस स्वतःमध्येच शोधावं लागतं. आयुष्याच्या या प्रवासात पडणं अपरिहार्य आहे. कधी अपेक्षांवर पाणी फिरतं, कधी स्वप्नं तुटतात, कधी विश्वासाला तडा जातो. अशा क...

सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...!

इमेज
सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...! उजेडणारी प्रत्येक सकाळ आपल्यासमोर दोन दरवाजे उघडून ठेवते.एक, गोड झोपेत हरवून स्वप्न पाहण्याचा, आणि दुसरा, धैर्याने उभे राहून त्या स्वप्नांच्या मागे पाऊल टाकण्याचा. स्वप्नं मोहक असतात. त्या रंगीत, सुंदर जगात आपण कोणताही त्रास, कोणताही अपयश अनुभवत नाही. आपल्याला वाटतं, “थोडं झोपून राहू, उद्याचं दिवस बघू…” पण खरं तर प्रत्येक उशिरा घालवलेली सकाळ आपल्याला आपल्या स्वप्नांपासून थोडं दूर नेत असते. उठण्याचा निर्णय सोपा नसतो. रस्ता कठीण असतो.  अपयशाची भीती, थकवा, जगाची टिंगल सर्व काही डोक्यावर येतं. पण हा तोच रस्ता आहे जो आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेतो. पायरी-पायरी चढत जाताना आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही, तर स्वतःच घडत जातो. आपण अधिक मजबूत होतो, अधिक धैर्यवान होतो, आणि जगण्याची खरी कला शिकतो. सकाळची किरणं आपल्याला हे सांगतात.तुम्ही निवड करू शकता. तुमच्या हातात आहे की तुम्ही पुन्हा झोपेत हरवाल की स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी उठाल. स्वप्न पाहणे सोयीचे आहे, पण स्वप्न पूर्ण करणे.अद्भुत. त्या एक पावलाही विसरू नका, जे तुम्हाला स्वप्ना...

कामातून उमटवलेले नाव....!

इमेज
कामातून उमटवलेले नाव....! संधी ही आपल्याला हवेतून मिळणारी वरदानासारखी नसते. ती कुणी देणार नाही, ती कुणी बांधणार नाही. संधी ही आपणच निर्माण करतो. आपल्या कष्टाने, आपल्या जिद्दीने, आपल्या धैर्याने. जीवनात जे लोक फक्त वाट पाहतात, ते वेळ गमावतात; पण जे लोक प्रत्येक क्षणाला संधी समजून त्यावर काम करतात, तेच खरे यश मिळवतात. आपलं नाव इतिहासात नसेल तरी चालतं. पण जेव्हा आपण केलेलं काम इतकं प्रभावी, इतकं अर्थपूर्ण असतं की लोक ते पाहून आपल्याला आठवतात, तेच खरे यश असतं. लोक आपल्याला नावानं नव्हे, तर कर्मानं आठवतात. आपली मेहनत, आपलं धैर्य, आपली निष्ठा हेच आपल्या अस्तित्वाचं खरे प्रतिक आहे. संधी मिळणे ही अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक अपयश, प्रत्येक अडचण ही नवीन संधी आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न आपल्याला आपली स्वतंत्र वाट तयार करण्याची संधी देतो. आपलं काम असे करा की ते लोकांच्या हृदयाला भिडेल, त्यांना प्रेरणा देईल, आणि ते आपल्याला आपल्या नावाशिवाय ही आठवतील. खरे नाव ते नाही जे कागदावर लिहिलं जातं; खरे नाव ते आहे जे आपल्या कार्याने जगात सोडले जाते. जगाला बदलण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण...