पोस्ट्स

बांभोरीच्या माणसांच्या मनाचा राजा मा. सरपंच शिवदासभाऊ पाटील....!

इमेज
बांभोरीच्या माणसांच्या मनाचा राजा मा. सरपंच शिवदासभाऊ पाटील....! धरणगाव तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात ज्यांनी आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण केली, असे भाजपाचे युवा नेतृत्व आणि बांभोरी गावाचे मा. सरपंच शिवदासभाऊ पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! शिवदासभाऊ म्हणजे फक्त एक पद नाही, तर विश्वासाचं आणि माणुसकीचं नाव आहे. दिलदार मनाचे, हसतमुख, प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणारे, लोकांसाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व आज असंख्य लोकांच्या हृदयात घर करून आहे. त्यांच्या साध्या स्मितात आणि माणुसकीतून व्यक्त होणाऱ्या प्रेमात त्यांची खरी ताकद दडलेली आहे. बांभोरी गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेली अथक मेहनत आणि दाखवलेली दूरदृष्टी वास्तवात कौतुकास्पद आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व सामाजिक उपक्रम अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान गावासाठी मोलाचे आहे. पण या सर्व कामांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी जपलेली माणसे. प्रत्येक घराशी जुळलेला स्नेहबंध, प्रत्येक नागरिकाशी असलेली आत्मीयता यामुळे ते सर्वांचे लाडके झाले आहेत....

गरज पडल्यावर आठवण येणारी मेणबत्ती....!

इमेज
गरज पडल्यावर आठवण येणारी मेणबत्ती....! मनुष्यस्वभाव अत्यंत नाजूक असतो. आपल्याला कोणीतरी विनाकारण आठवण ठेवावी, आपल्यासाठी वेळ काढावा, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा मनापासून होते. पण वास्तव मात्र वेगळे असते. अनेकदा काही लोक आपली आठवण फक्त त्यांना गरज असते तेव्हाच घेतात. त्या क्षणी मनाला वेदना होतात वाटते, “मी इतकाच का? फक्त गरजेपुरताच?”जरा शांतपणे विचार केला, तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला एका साध्या उदाहरणात मिळते मेणबत्तीमध्ये. मेणबत्ती दिवसभर कुठल्या तरी कोपऱ्यात पडून असते. सूर्यप्रकाशात तिला गरज नसते; कोणाचेही लक्ष तिच्याकडे जात नाही. पण अंधार दाटल्यावर, वीज गेल्यावर, संकट आलेले असताना.तेंव्हा सर्वांना मेणबत्तीची आठवण येते. कारण तिच्यात अंधार दूर करण्याची ताकद असते. ती स्वतः जळते, वितळते, पण इतरांना प्रकाश देते. ती कधी तक्रार करत नाही. “दिवसभर मला का आठवलं नाही?” ती फक्त आपलं काम करते अंधार दूर करण्याचं. आपणही अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशीच मेणबत्ती असतो. लोक आपली आठवण तेव्हाच घेतात, जेव्हा त्यांना आधार हवा असतो, मदत हवी असते, किंवा सल्ला हवं असतो. ...

दुसऱ्याचे वाईट चिंतिणाऱ्याचे कधीही चांगले होत नाही…!

इमेज
दुसऱ्याचे वाईट चिंतिणाऱ्याचे कधीही चांगले होत नाही…! या जगात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याची वाट चालत असतो.कोणी वेगाने, कोणी सावकाश; कोणी प्रकाशात, तर कोणी अंधारातून वाट काढत. पण या सगळ्या प्रवासामागे एक अदृश्य सूत्र कार्यरत असते कर्माचे. हे सूत्र नजरेला दिसत नाही, पण जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याची जाणीव होत राहते. कधी कधी मनात मत्सराची एक हलकीशी ठिणगी पडते. दुसऱ्याचे यश डोळ्यांना खुपते, त्याचे हसू अस्वस्थ करते. आणि मग नकळत आपण त्याच्या वाटेवर काटे टाकायला सुरुवात करतो. शब्दांनी, कृतींनी किंवा विचारांनी त्याच्या आयुष्यात दुःखाचे ढग जमवतो. त्या क्षणी वाटते.“आता मी वरचढ ठरलो.” पण खरेच का? दुसऱ्याच्या पायाखालची जमीन सरकवून आपण स्वतः आकाशाला स्पर्श करू शकत नाही. कारण ज्याच्या मनात द्वेष भरलेला आहे, त्याच्या आयुष्यात शांती कशी नांदेल? दुसऱ्याला रडवून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो.जणू वाळवंटात दिसणारे पाण्याचे मृगजळ. ते जवळ गेल्यावर केवळ रिकामेपणाच हातात येतो. द्वेषाची आग इतरांना जाळण्याआधी स्वतःच्या मनाला भस्म करते. अशा माणसाच्या चेहऱ्यावर हास्य असले तरी ते मनापासून नसते. कारण अ...

शब्दांत न मावणारे कर्तृत्व प्रा. भगवान महाजन सर....!

इमेज
शब्दांत न मावणारे कर्तृत्व प्रा. भगवान महाजन सर....! जांभोरे, ता. धरणगाव येथील एका अगदी साध्या, सर्वसामान्य कुटुंबात सेवानिवृत्त प्रा. भगवान महाजन सर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शेती करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. दैनंदिन जीवनात गरिबी, कष्ट, ताणतणाव आणि अनेक मर्यादा यांचा सामना करावा लागत होता. जीवनाची सुरुवातच संघर्षाने भरलेली होती. बालपणीच आई-वडिलांचे अविरत कष्ट, त्याग आणि दुःख जवळून पाहताना त्यांच्या मनात एक ठाम विचार खोलवर रुजला“घरची परिस्थिती बदलायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.”हा विचार केवळ वाक्य न राहता त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनला, जीवनाचा दीपस्तंभ ठरला. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. अनेक अडचणी, अभाव आणि संकटांवर मात करत, स्वकर्तृत्वावर, प्रामाणिक परिश्रमावर आणि अखंड चिकाटीवर विश्वास ठेवून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण हेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला अंधारातून प्रकाशाकडे नेईल, या श्रद्धेने ते अखंड झटत राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पडघे येथे शिक्षक म्हणून रुजू झाल...

परक्यांची गर्दी आणि आपल्या माणसांची पोकळी....!

इमेज
परक्यांची गर्दी आणि आपल्या माणसांची पोकळी....! काही माणसांच्या स्वभावात खोटं बोलण्याची एक अद्भुत कला असते. शब्दांची जादू, गोड बोलण्या मागची सफाई, बनावट भावनांचं आवरण आणि वेळे पुरतं दाखवलेलं प्रेम या सगळ्याच्या जोरावर ते आयुष्यभर परक्यांना खुश ठेवत राहतात. त्यांच्या आजूबाजूला नेहमीच माणसांची गर्दी असते.  परके लोक त्यांना समजूतदार, प्रेमळ आणि परिपूर्ण मानतात. त्यांच्या बोलण्यात इतकी मोहकता असते की क्षणभर तरी समोरच्याला ते अगदी आपलेसे वाटतात. पण ही आपुलकी क्षणिक असते. ही परिपूर्णता केवळ बाह्य असते.दिसणारी, चमकणारी, पण आतून पोकळ आणि अस्थिर. आपली माणसं मात्र वेगळी असतात. त्यांना शब्दांची गरज नसते; त्यांना भावनांची भाषा कळते. डोळ्यांत साचलेलं न बोललेलं दुःख, आवाजातली हलकीशी थरथर, आणि हसण्यामागचं गूढ मौन ते क्षणात ओळखतात. त्यांच्या नजरेतून खोटं कधीच सुटत नाही.  कारण त्यांनी आपल्यावर मनापासून विश्वास ठेवलेला असतो, मनात अनेक अपेक्षा जपलेल्या असतात. म्हणूनच खोटं त्यांना अधिक खोलवर जखम करून जातं. परक्यांसमोर सहज निभावलेली अभिनयाची भूमिका आपल्या माणसांसमोर हळूहळू गळून पडते, आण...

पदाच्या तोऱ्यात हरवलेलं आयुष्य....!

इमेज
पदाच्या तोऱ्यात हरवलेलं आयुष्य....! कितीही मोठा अधिकारी असो, कितीही प्रसिद्ध समाजसेवक असो पदावर असताना त्याचं जगणं वेगळंच असतं. नावापुढची पदवी, खुर्चीभोवतीचं वलय, लोकांच्या नजरा, शब्दांतली आदराची कंपने… सगळं काही त्याच्यासोबत असतं. पण त्या सगळ्याचा केंद्रबिंदू तो माणूस नसतो, तर त्याचं पद असतं.हे सत्य अनेकांना फार उशिरा उमगतं. एक दिवस येतो, जेव्हा पद सुटतं. कायमचं. फाइल्स, दालनं, शिपाई, गाडीचा ताफा सगळं मागे राहतं. आणि तेव्हाच आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण तेव्हा समाज माणसाकडे पाहतो, पदाकडे नाही. पण जर त्या क्षणानंतर ही तो माणूस “मी काय होतो” या अहंकाराच्या ओझ्याखाली वागत राहिला, माजी पदाच्या तोऱ्यातच बोलू-वागू लागला,तर समाज त्याच्यापासून दूर सरकतो.हळूच, शांतपणे, पण ठामपणे. समाजाला गर्व सहन होत नाही, विशेषतः तो गर्व भूतकाळावर आधारलेला असेल तर. पद गेल्यावर ही जो माणूस अपेक्षा करतो की लोकांनी तसाच मान द्यावा, तशीच भीती बाळगावी, त्याला समजून घ्यायला हवं की तो मान कधीच त्याचा नव्हता. तो पदाचा होता. आणि पदासोबत तो ही निघून गेला. खरं सांगायचं तर, पद हे तात्पुरतं असतं; पण म...

बायकोची साथ आयुष्याचा खरा आधार....!

इमेज
बायकोची साथ आयुष्याचा खरा आधार....! आयुष्य हा एक अनिश्चित प्रवास आहे. काही क्षण सुखाने भरलेले असतात, तर काही अडचणींनी, संकटांनी आणि धैर्याच्या परीक्षांनी भरलेले असतात. अशा वेळेस माणूस अनेकदा एकटेपणाचा सामना करतो. अनेकवेळा वाटचाल कठीण वाटते, मार्ग गोंधळलेला दिसतो आणि सगळेच माघार घेतात. अशा क्षणांत खरी साथ कोण देतो? खरी साथ म्हणजे फक्त हात धरून चालणे नाही; ती साथ संकटात आधार बनून उभी राहणे, समजून घेणे आणि धीर देणे होय. आणि ती साथ बहुतेक वेळा आपल्या बायकोच्या रूपात दिसते. जिथे सगळे माघार घेतात, तिथे ती शांतपणे पण खंबीरपणे उभी राहते. तिच्या शांत उपस्थितीत एक अविचल विश्वास असतो, एक आधार असतो, जो प्रत्येक अडचणीच्या वळणावर उभा राहतो. ती फक्त सोबत चालत नाही; ती अडचणीच्या वाटेवर हात धरून, मनाचा आधार बनून उभी राहते. प्रत्येक कठीण क्षणात तिचा धीर, प्रत्येक निर्णयात तिचा समज, आणि प्रत्येक यशात तिचा आनंद असतो. तिच्या सहवासात, माणूस स्वतःला अधिक बळवान आणि सक्षम अनुभवतो. अशा साथीची किंमत शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. ही साथ नशिबानेच मिळते, आणि ती जपायला माणूसही तितकाच मोठा असावा लागतो. खर...

विचारशील नेतृत्वाचा विश्वासार्ह चेहरा विनायकभाऊ महाजन....!

इमेज
विचारशील नेतृत्वाचा विश्वासार्ह चेहरा विनायकभाऊ महाजन....! धरणगावच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात विनायकभाऊ महाजन हे नाव केवळ एका पदापुरते मर्यादित नसून ते सेवेचा, संयमाचा आणि विचारशील नेतृत्वाचा आदर्श आहे. समस्त मोठा माळीवाडा समाज पंच मंडळाचे सहसचिव म्हणून समाजहित जपताना असो, संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष म्हणून युवकांना योग्य दिशा देताना असो, शेतकरी सेना शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम उभे राहताना असो, किंवा अखिल भारतीय ग्राहक पंचायत व समता परिषदेमधील जबाबदाऱ्या पार पाडताना असो प्रत्येक ठिकाणी विनायकभाऊंनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवा या मूल्यांचा ठसा उमटवला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू आहे. कठीण प्रसंगातही घाईघाईने प्रतिक्रिया न देता, विचारपूर्वक निर्णय घेणे ही त्यांची खासियत. कमी बोलून जास्त काम करणे, स्वतः पुढे न येता इतरांना पुढे नेणे, आणि सत्तेपेक्षा सत्याला महत्त्व देणे. हे गुण आजच्या काळात दुर्मिळच म्हणावे लागतील. विनायकभाऊंचे बोलणे साधे असते, पण त्यामागील विचा...

प्रसिद्धीचा प्रवास संघर्षाशिवाय मिळत नाही....!

इमेज
प्रसिद्धीचा प्रवास संघर्षाशिवाय मिळत नाही....! प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठीचा अखंड संघर्ष प्रसिद्ध व्यक्ती होणं म्हणजे एका दिवसात मिळालेलं यश नाही.. त्यामागे असतो आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दिलेला संघर्ष,प्रत्येक श्वासाबरोबर जपलेलं स्वप्न,आणि कोणत्यातरी एका क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची तयारी.आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला परीक्षा घेतो. इतर लोक थांबतात, विश्रांती घेतात,पण स्वप्न पाहणारा माणूस मात्र सातत्याने उगळत राहतो.कारण त्याला माहीत असतं.आज थांबलो, तर उद्याचं स्वप्न दूर जाईल.क्षण न क्षण उगळणं म्हणजे केवळ मेहनत नाही,ती असते स्वतःवरची निष्ठा. अपयश आलं तरी न खचता,त्यातून शिकत पुढे जाण्याची जिद्द राखणं,लोकांच्या टोमण्यांपेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज मोठा ठेवणं हेच खऱ्या यशाचं लक्षण आहे. आयुष्य आपल्याला थांबायला अनेक कारणं देतं थकवा, अपयश, लोकांची मतं, परिस्थिती…पण जो माणूस या सगळ्यांवर मात करून पुन्हा उभा राहतो,तोच खऱ्या अर्थाने स्वतःचं भविष्य घडवतो.कारण यशाला वेग नाही,ते सातत्य मागतं. क्षण न क्षण उगळणं म्हणजे केवळ मेहनतीचा भार नाही, ती असते स्वप्नांशी केलेली...

शुद्ध विचारांची मशाल ‘बा, तथागता!’ आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म.....!

इमेज
शुद्ध विचारांची मशाल ‘बा, तथागता!’ आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म.....! माणूस म्हणजे केवळ हाडामांसांचे, डोळे-कान-हात-पाय असलेले जैविक अस्तित्व नव्हे. माणूस खरा माणूस ठरतो तो त्याच्या विचारांच्या पवित्रतेतून आणि आचरणाच्या उजेडातून. ज्याच्या अंतःकरणात करुणा, विवेक, न्याय, समता, बंधुभाव आणि प्रेम यांचा अखंड दीप तेवत असतो, तोच माणूस खऱ्या अर्थाने मानव ठरतो. माणसाचे माणूसपण त्याच्या अंतर्मनातून झळकते हेच मूलभूत, कालातीत आणि सार्वत्रिक सत्य अत्यंत प्रभावी शब्दांतून सुप्रसिद्ध मानवतावादी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक व कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या चिंतनातून अधोरेखित केले. दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ, एरंडोल येथे आयोजित झालेला कार्यक्रम केवळ ग्रंथप्रकाशनाचा सोहळा नव्हता; तो मानवी मनाच्या परिष्करणाचा, आत्मशुद्धीचा आणि मानवतावादी विचारांच्या पुनर्जागरणाचा एक पवित्र वैचारिक उत्सव होता. या दिवशी प्रा. वा. ना. आंधळे यांनी अहिराणी बोलीत अनुवादित केलेल्या ‘बा, तथागता!’ या विशाल काव्यग्रंथाचे तसेच त्यावर आधारित ‘विवेकी जाणिवांचा प्रज्ञा प्रवाह’ या समीक्षा ग...

मातीशी नाते जपणाऱ्या सेवेचा गौरवसोहळा....!

इमेज
मातीशी नाते जपणाऱ्या सेवेचा गौरवसोहळा....! शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती संपूर्ण जीवनपद्धती आहे. या मातीत घाम गाळणारा शेतकरी म्हणजे बळीराजा… आणि त्या बळीराजाच्या कष्टांना दिशा देणारे, त्याच्या प्रत्येक संकटात सावलीसारखे उभे राहणारे हात म्हणजे कृषी सेवेतील निष्ठावान अधिकारी व कर्मचारी. त्यांच्या समर्पित सेवेमुळेच समाजसेवेचा खरा अर्थ अधोरेखित होतो. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित खान्देश कृषी संस्कृती व पशु प्रदर्शन हा केवळ एक महोत्सव नव्हता, तर तो शेतकरी, शेती आणि त्यांच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. या महोत्सवात धरणगाव तालुक्यात तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आत्मा यंत्रणेमार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM – आत्मा) दिपक पुष्पा एकनाथ नागपुरे यांचा सन्मान करण्यात आला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. दिपक नागपुरे यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम ...

कुणाच्या ताटात ढवळाढवळ करू नये….!

इमेज
कुणाच्या ताटात ढवळाढवळ करू नये….! कुणाच्या ताटात जाऊन ढवळाढवळ करू नये, कारण प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे त्याचं स्वतःचं ताट असतं.त्या ताटात त्याने आयुष्यभर गोळा केलेले अनुभव असतात. कष्टांनी मिळवलेले घास असतात.कधी समाधानाची भाजी असते,तर कधी अपयशाची कडू चवही असते. भाकर्‍या, मीठ-भाजी, गोड-कडू क्षण हे सगळं त्याने स्वतःच्या श्रमांनी, चुका करून, पडत-उठत कमावलेलं असतं. अशा ताटात परवानगी शिवाय हात घालणं म्हणजे फक्त हस्तक्षेप नव्हे,तर त्या माणसाच्या आत्मसन्मानावर, स्वाभिमानावर दिलेली ठेच असते.कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं,आणि प्रत्येकाच्या संघर्षाची खोली त्यालाच ठाऊक असते. सहकार्य म्हणजे समोरच्याचं ताट हिसकावून घेणं नाही. सहकार्य म्हणजे त्याला जेवू न देता आपण पुढे निघून जाणंही नाही.खरं सहकार्य म्हणजे तो घास नीट पकडू शकत नसेल, तर त्याचा हात घट्ट पकडणं.तो पडत असेल, तर त्याला सावरण्यासाठी खांद्यावर हात ठेवणं. तो हरवला असेल, तर वाट दाखवणं.वाट चोरणं नव्हे. आजच्या जगात एखाद्याला शिकायची संधी न देता त्याच्या चुका मोठ्या करून दाखवणं फार सोपं झालं आहे.चार शब्द, दोन आरोप आणि एक शिक्का...

गुणदोष दाखवणारे मित्र दैवाची देणगी.....!

इमेज
गुणदोष दाखवणारे मित्र दैवाची देणगी.....! मित्र केवळ अलंकाराप्रमाणे आयुष्याच्या गळ्यात शोभून दिसणारे नसावेत. केवळ उपस्थितीने सौंदर्य वाढवणारे, प्रत्येक वेळी आपल्याच बाजूने उभे राहणारे, आपल्या प्रत्येक कृतीला होकार देणारे मित्र खरेच मित्र असतात का, असा प्रश्न कधी तरी मनात डोकावतो. कारण स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतात; पण आरशाप्रमाणे निर्भीडपणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र मात्र दैवानेच लाभतात. आपल्या यशावर आनंद मानणारे, आपली प्रशंसा करणारे लोक आयुष्यात कमी नसतात. आपल्या शब्दांना टाळ्या मिळतात, आपल्या चुकीला ही समर्थन मिळते. त्या क्षणी मन सुखावते, अहंकार फुलतो. पण हे सुख क्षणभंगुर असते. कारण अशा स्तुतीच्या गर्दीत आपल्याला स्वतःची खरी ओळख होत नाही. आपली चूक, आपली मर्यादा, आपली कमकुवत बाजू अंधारातच राहते. खरा मित्र मात्र आरशासारखा असतो. आरसा आपल्याला सुंदर दाखवतो, पण चेहऱ्यावरची मळ ही लपवत नाही. तसाच मित्र आपल्यातले चांगले गुण मनापासून कौतुकाने स्वीकारतो, पण दोषही प्रामाणिकपणे दाखवतो. त्याचे शब्द कधी कधी कठोर वाटतात, मनाला बोचतात, पण त्या शब्दांमागे असते निखळ प्रेम आणि आप...

खरं बोलणारा माणूस कुठेच फिट बसत नाही…..!

इमेज
खरं बोलणारा माणूस कुठेच फिट बसत नाही…..! आजच्या काळात खरं बोलणं ही साधी गोष्ट उरलेली नाही. ते धाडसाचं, आणि अनेकदा मोठी किंमत मोजून मिळणारं मूल्य झालं आहे. कारण खरं बोलणारा माणूस कुठेच फिट बसत नाही. तो लोकांच्या सवयीच्या चौकटीत अडकत नाही, त्यांच्या सोयीच्या शांततेला प्रश्न विचारतो, आणि म्हणूनच नेहमी अस्वस्थता निर्माण करतो. घरात असा माणूस अनेकदा उद्धट वाटतो.तो ओरडत नाही, आवाज वाढवत नाही, पण त्याचे शब्द स्पष्ट आणि थेट असतात.तो गोड खोट्यांपेक्षा कडू सत्याला महत्त्व देतो.तो चुका लपवत नाही; तो आरसा दाखवतो… आणि आरसा पाहणं कुणालाच सोपं वाटत नाही. घरात बहुतेकदा प्रेमापेक्षा शांततेला अधिक महत्त्व दिलं जातं. सत्य बोललं की नात्यांमधील दडवलेल्या वेदना वर येतात,अधूरे प्रश्न उघड होतात.मग सत्य सांगणारा “चूक दाखवणारा” ठरतो,“प्रामाणिक” नसून “आगाऊ” ठरतो. शांत राहणं शहाणपण मानलं जातं,आणि खरं बोलणं गैरसमजाचं कारण बनतं. ऑफिसमध्ये तर असा माणूस आणखीच धोकादायक वाटतो.कारण तो चापलुसी करत नाही.तो माणसांबद्दल नाही, तर कामाबद्दल बोलतो.तो फायद्यांपेक्षा नीतीला महत्त्व देतो.तो अन्याय पाहून गप्प बसत नाही, ...

सत्तेपलीकडचे नेतृत्व लोकनेते बाळासाहेब थोरात...!

इमेज
सत्तेपलीकडचे नेतृत्व लोकनेते बाळासाहेब थोरात...! काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या पल्याड जाऊन समाजाच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. शब्दांपेक्षा कृतीतून बोलणारे, सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणारे आणि राजकारणात ही माणुसकी जपणारे असे नेतृत्व म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मन नकळत आदर, कृतज्ञता आणि अभिमानाने भरून येते. संयमी नेतृत्व, दूरदृष्टी आणि विकासाभिमुख कार्यशैली ही थोरात साहेबांची खरी ओळख आहे. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत महसूल, कृषी आणि सहकार यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून जनतेचा विश्वास संपादन केला.शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे दिसून येतो. विशेषतः सहकार क्षेत्रात संगमनेर तालुक्याने राज्यपातळीवर आदर्श निर्माण केला आहे. सहकार म्हणजे केवळ संस्था नव्हे, तर एक सामाजिक चळवळ आहे.ही जाणीव त्यांनी कृतीतून दाखवून दिली. विश्वास, पारदर्शकता आणि लोकसहभाग या मूल्यांवर उभा असलेला संगमनेरचा सहकार आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरण...