जगाच्या गोंधळात मनाचा खरा आधार...!
जगाच्या गोंधळात मनाचा खरा आधार...! समाजाला नष्ट करणारी शक्ती नेहमीच वाईट माणसांच्या रूपात दिसते, असे आपण सहज मानतो. पण वास्तव थोडं वेगळं असतं. अनेकदा समाजाचं खरं नुकसान वाईट लोकांमुळे नाही, तर चांगल्या माणसांच्या शांततेमुळे होतं. कारण वाईट माणसं अन्याय करतात, पण जेव्हा चांगली माणसं ते पाहून ही गप्प बसतात, तेव्हा त्या अन्यायाला एक न बोललेली परवानगी मिळते. वाईटपणाची ताकद त्याच्या आवाजात नसते; ती चांगुलपणाच्या शांततेत असते. जेव्हा सत्य माहीत असूनही कोणी बोलत नाही, तेव्हा खोटं अधिक बळकट होतं. म्हणूनच समाजाला बदलायचं असेल तर फक्त वाईटपणाला दोष देऊन चालत नाही, तर चांगुलपणाला आवाज द्यावा लागतो. देवाने आपल्या हातावर नशिबाच्या रेषा काढल्या, पण त्याच हाताला बोटेसुद्धा दिली. या गोष्टीत एक खोल अर्थ दडलेला आहे. नशीब आपल्याला दिशा देतं, पण त्या दिशेने चालण्याची ताकद मेहनतीत असते. केवळ नशिबाची वाट पाहत बसलो तर आयुष्य पुढे सरकत नाही. प्रयत्न, संघर्ष आणि सातत्य यांच्या साथीनेच नशीब उजळतं. आयुष्यात काही प्रश्न असे असतात, की ते कितीही प्रयत्न केले तरी लगेच सुटत नाहीत. त्या क्षणी मन अस्वस्थ हो...