पोस्ट्स

मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...!

इमेज
मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...! आकाशातील ग्रह माणसाच्या नशिबावर परिणाम करतात की नाही, यावर आजही चर्चा होत राहते. कोणी त्यावर श्रद्धा ठेवतो, कोणी त्याकडे केवळ एक समज म्हणून पाहतो. पण एक सत्य मात्र निर्विवाद आहे. पृथ्वीवर राहणारी माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते माणसाच्या आयुष्याला खोलवर स्पर्श करून जातात. माणसाचं आयुष्य आकाशातील ताऱ्यांपेक्षा अधिक उजळतं किंवा काळोखात जातं, ते इतर माणसांच्या नजरेतून. एखाद्या बद्दल मनात तयार झालेला ग्रह हा कधी प्रेमाचा असतो, कधी संशयाचा, तर कधी नकळत रुजलेला पूर्वग्रह असतो. हा ग्रह शब्दांशिवाय बोलतो, पण त्याचे परिणाम मात्र फार बोलके असतात. एखाद्या माणसाकडे आपण संशयाने पाहू लागलो, की त्याचं हसणं ही आपल्याला खोटं वाटतं. त्याची शांतता आपल्याला कपटाची भासते. तो कितीही प्रामाणिक असला, तरी आपल्या मनात बसलेला ग्रह त्याचं खरं रूप पाहू देत नाही. अशा वेळी नाती हळूहळू कोमेजतात, विश्वास गळून पडतो, आणि माणसं एकमेकांच्या अगदी जवळ असून ही फार दूर जातात. पण जिथे मनात विश्वासाचा, आपुलकीचा ग्रह असतो, तिथे नात्यांना वेगळीच उंची मिळते. छोट्या चुका माफ ...

धाग्यांत गुंफलेली नाती....!

इमेज
धाग्यांत गुंफलेली नाती....! मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात.डोळ्यांना दिसणारही नाहीत इतके नाजूक. एखादा शब्द जरा जास्त झाला, एखादी भावना न बोलता मनात साचली, की त्या धाग्यांवर ताण पडतो. खरंच, तुटायचंच असेल तर श्वासाएवढाही झोत पुरेसा असतो. एक दुर्लक्ष, एक “नंतर बोलू” म्हणत टाळलेला क्षण, आणि मैत्रीच्या विणीत नकळत भेग पडते. पण हेच धागे जेव्हा विश्वासाने विणलेले असतात, तेव्हा ते लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत ठरतात. आयुष्य कितीही बदललं, अंतर कितीही वाढलं, संकटं कितीही कोसळली.तरीही ते धागे तुटत नाहीत. वज्राघात झाला तरी ते सहन करतात, कारण त्यात फक्त आठवणी नसतात, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची शांत तयारी असते. मैत्री म्हणजे रोज बोलणं नव्हे, तर वर्षांनंतर भेटून ही तेच जुने हसू ओठांवर येणं. ती मोठ्या आश्वासनांत नसते, तर साध्या “मी आहे” या वाक्यात असते.यशात आनंदाने टाळ्या वाजवणं आणि अपयशात शब्दांशिवाय सोबत करणं.हीच खरी मैत्री. ती कधी आवाज करते, तर कधी फक्त शांतपणे शेजारी बसून राहते. तुटलेली मैत्री पुन्हा जुळू शकते, पण त्यावरची गाठ मनाला बोचत राहते. म्हणूनच या धाग्य...

नाती जपायची असतील तर मोठं मन हवं...!

इमेज
नाती जपायची असतील तर मोठं मन हवं...! एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.तेव्हाच नाती कायम जपली जातात. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही आपले असतात जन्माने, काही आपले होतात प्रेमाने, तर काही न सांगता मनात घर करतात. या सगळ्या नात्यांचा एक समान धागा असतो भावना. पण या भावनाच कधी कधी चुकीच्या शब्दांत व्यक्त होतात आणि तिथेच नात्यांची परीक्षा सुरू होते. एखादा शब्द चुकतो… पण तो शब्द बोलणारा माणूस आयुष्यभर चुकाच करत नसतो. एका क्षणात निघालेला शब्द हा रागाचा, वेदनेचा किंवा थकव्याचा परिणाम असू शकतो. पण त्या एका चुकीच्या शब्दासाठी जर आपण त्या माणसाने आपल्यासाठी केलेल्या हजार चांगल्या गोष्टी विसरलो, तर नातं तुटायला वेळ लागत नाही. आई-वडिलांचं प्रेम कधी कठोर शब्दांत दिसतं, पण त्यांच्या मनात असलेली काळजी शब्दांपेक्षा कितीतरी मोठी असते. मित्र कधी टोचून बोलतो, पण संकटात तोच पहिला उभा राहतो. जोडीदार कधी मन दुखावतो, पण आयुष्यभर तुमचा हात सोडत नाही.या सगळ्या नात्यांमध्ये चुका होतात, पण त्या चुका झाकून टाकणारा प्रेमाचा मोठा साठा अ...

हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....!

इमेज
हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....! जीवनात सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मुखवट्यांमागचे चेहरे ओळखणे. कारण आजच्या धावपळीच्या, स्वार्थी जगात माणसं स्वतःपेक्षा भूमिका जास्त जगत आहेत. बाहेरून हसणारे चेहरे, गोड बोलणारी माणसं आणि आपुलकीचे शब्द… पण त्या सगळ्यामागे दडलेली भावना मात्र नेहमीच खरी असेल असं नाही. जो माणूस मुखवट्यामागचा खरा चेहरा ओळखतो, तो सावध होतो. तो कुणावरही लगेच विश्वास ठेवत नाही, शब्दांपेक्षा कृतीकडे पाहतो आणि स्वतःच्या मनाला जपतो. पण जो हे ओळखू शकत नाही, तो मात्र नात्यांमध्ये जास्त गुंततो, अपेक्षा वाढवतो आणि शेवटी फसवणूक, वेदना व निराशा यांचाच सामना करतो. आज अनेक नाती गरजेवर टिकलेली असतात. गरज संपली की आपुलकीचा मुखवटा आपोआप गळून पडतो. तेव्हा कळतं की आपण ज्या माणसाला आपलं मानत होतो, तो प्रत्यक्षात फक्त सोबत निभावत होता. अशा अनुभवातून माणूस आतून तुटतो, पण त्याच वेळी तो अधिक शहाणा ही होतो. माणसं ओळखता येणं ही जन्मजात मिळालेली देणगी नसते, ती अनुभवातून मिळते. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून, फसवणूक सहन करून, आणि अश्रूंनी धडे घेत आपण ही कला शिकतो. प्रत्येक वेदना...

घर उभं ठेवणारा माणूस.....!

इमेज
घर उभं ठेवणारा माणूस.....! घर चालवणारा माणूस कधीच हिरो नसतो. कारण हिरो होण्यासाठी क्षण पुरतो, पण घर चालवण्यासाठी अख्खं आयुष्य लागतं. तो फक्त जबाबदार असतो… आणि ही जबाबदारीच हळूहळू त्याची ओळख बनते.नाव, कौतुक, प्रसिद्धी यापेक्षा त्याला जास्त ओळख असते ती “सगळं सांभाळणारा माणूस” अशी. रोजच्या गरजांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं त्याच्या सवयीचं होतं. नवीन कपडे, छंद, स्वप्नं, थोडा आराम सगळं तो उद्यासाठी ढकलत राहतो. पण तो उद्या कधीच येत नाही. कारण घरासाठी आजच सगळं द्यावं लागतं. हळूहळू तो स्वतःसाठी काही मागणंच विसरतो. त्याचं आयुष्य म्हणजे त्यागांची न संपणारी यादी असते, जी तो कुणाला दाखवत नाही. कुणी त्याच्या कष्टांचं कौतुक करत नाही.कारण समाजाने ते कर्तव्य म्हणून गृहीत धरलेलं असतं.“तो तर करणारच” असं सहज म्हणून टाकलं जातं. लोक हसतात, टोमणे मारतात, कारण जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर नसतं. त्याची शांतता लोकांना कमजोरी वाटते, पण त्यांना कळत नाही की हीच शांतता घराला सावरून ठेवत असते. तो गप्प राहतो, कारण त्याला माहीत असतं शब्दांनी नाही, स्थैर्याने घर टिकतं. तो थकतो. शरीर थकतं, मनही थ...

निंबा कुंभार समाजसेवा,साहित्य आणि समर्पणाची अमिट छाप...!

इमेज
निंबा कुंभार समाजसेवा,साहित्य आणि समर्पणाची अमिट छाप...!  राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार’ प्राप्ती आणि  वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा..! एरंडोलचे गुरुकुल कॉलनीतील रहिवासी निंबा पुंडलीक कुंभार हे समाजसेवेतील अनमोल उदाहरण आहेत. समाजाप्रती असलेली निष्ठा, सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा आणि साहित्यातून होणारे प्रबोधन यांची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ कार्याचा, समाजप्रतीच्या समर्पणाचा आणि ज्ञान प्रसारासाठीच्या प्रयत्नांचा मान्यताप्राप्त गौरव आहे. १९८६ पासून गटसचिव म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातील काम सुरू केले. निव्वळ नोकरी न करता, समाजासाठी स्वतःला वाहून देणे हा त्यांचा जीवनध्येय राहिला. सोनवद ता. धरणगाव येथील ‘कुंभार काम औद्योगिक संस्था’ मध्ये ते विनावेतन सचिव म्हणून कार्यरत आहेत, जे त्यांच्या निःस्वार्थी वृत्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सामाजिक सेवेइतकेच, निंबा कुंभार यांनी २००७ मध्ये हिंगोणे ता. धरणगाव येथे आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ‘कै सखुबाई पुंडलीक कुंभार वाचनालय’ स्थापन केले. य...

इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....!

इमेज
इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....! विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक सहल म्हणजे केवळ प्रवास नसून तो ज्ञान, संस्कार आणि अनुभवांचा आनंदोत्सव असतो.हाच आनंदोत्सव साळवे ता.धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल यशस्वीपणे आणि उत्साहात पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी कालीमठ, घृष्णेश्वर, वेरूळ येथील कैलास मंदिर, देवगिरी किल्ला, सिद्धार्थ गार्डन, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय, बीबी का मकबरा तसेच पैठण येथील कारंजा या ऐतिहासिक, भौगोलिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पुस्तकात वाचलेली इतिहासाची पाने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उलगडताना विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, आनंद आणि अभिमान दाटून आला. किल्ल्यांचे घाट, प्राचीन वास्तूंची भव्यता आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य अनुभवताना इतिहास जणू जिवंत झाल्याचा भास होत होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे सरांना व भौगोलिक स्थळांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांची माहिती नोंदवली. प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास व संस्कृतीचे सखोल ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी अत्यंत उत्साही आणि भारावून गेले...

पडल्यावर हात देणारे मोजकेच...!

इमेज
पडल्यावर हात देणारे मोजकेच...! या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालण्याचं धाडस मात्र आपल्यालाच करावं लागतं. आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर सल्ले मिळतात, सूचना मिळतात, अनुभव सांगणारे लोक भेटतात. “असं कर”, “तसं करू नकोस”, “हा मार्ग योग्य आहे” असं सांगणारे अनेकजण असतात. पण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे एक कठोर सत्य दडलेलं असतं.त्या वाटेवर पडायचं,थकायचं, घसरायचं आणि पुन्हा उभं राहायचं काम आपल्यालाच करावं लागतं. कारण आयुष्य कोणाच्याही शब्दांवर नाही, तर आपल्या पावलांवर चालत असतं. चालताना आपण एकटेच असतो. आजूबाजूला गर्दी असते, ओळखीचे चेहरे असतात, पण तरीही मनाच्या आत एक एकटेपणाची शांत जाणीव असते. कारण प्रत्येकाचं दु:ख वेगळं असतं, प्रत्येकाची लढाई वेगळी असते. कुणालाही आपल्या मनातल्या वेदना पूर्णपणे समजत नाहीत. म्हणूनच वाट दाखवणारे असले, तरी चालणं आपल्यालाच शिकावं लागतं. पडायचं भीती न बाळगता पुढे जाण्याचं धाडस स्वतःमध्येच शोधावं लागतं. आयुष्याच्या या प्रवासात पडणं अपरिहार्य आहे. कधी अपेक्षांवर पाणी फिरतं, कधी स्वप्नं तुटतात, कधी विश्वासाला तडा जातो. अशा क...

सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...!

इमेज
सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...! उजेडणारी प्रत्येक सकाळ आपल्यासमोर दोन दरवाजे उघडून ठेवते.एक, गोड झोपेत हरवून स्वप्न पाहण्याचा, आणि दुसरा, धैर्याने उभे राहून त्या स्वप्नांच्या मागे पाऊल टाकण्याचा. स्वप्नं मोहक असतात. त्या रंगीत, सुंदर जगात आपण कोणताही त्रास, कोणताही अपयश अनुभवत नाही. आपल्याला वाटतं, “थोडं झोपून राहू, उद्याचं दिवस बघू…” पण खरं तर प्रत्येक उशिरा घालवलेली सकाळ आपल्याला आपल्या स्वप्नांपासून थोडं दूर नेत असते. उठण्याचा निर्णय सोपा नसतो. रस्ता कठीण असतो.  अपयशाची भीती, थकवा, जगाची टिंगल सर्व काही डोक्यावर येतं. पण हा तोच रस्ता आहे जो आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेतो. पायरी-पायरी चढत जाताना आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही, तर स्वतःच घडत जातो. आपण अधिक मजबूत होतो, अधिक धैर्यवान होतो, आणि जगण्याची खरी कला शिकतो. सकाळची किरणं आपल्याला हे सांगतात.तुम्ही निवड करू शकता. तुमच्या हातात आहे की तुम्ही पुन्हा झोपेत हरवाल की स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी उठाल. स्वप्न पाहणे सोयीचे आहे, पण स्वप्न पूर्ण करणे.अद्भुत. त्या एक पावलाही विसरू नका, जे तुम्हाला स्वप्ना...

कामातून उमटवलेले नाव....!

इमेज
कामातून उमटवलेले नाव....! संधी ही आपल्याला हवेतून मिळणारी वरदानासारखी नसते. ती कुणी देणार नाही, ती कुणी बांधणार नाही. संधी ही आपणच निर्माण करतो. आपल्या कष्टाने, आपल्या जिद्दीने, आपल्या धैर्याने. जीवनात जे लोक फक्त वाट पाहतात, ते वेळ गमावतात; पण जे लोक प्रत्येक क्षणाला संधी समजून त्यावर काम करतात, तेच खरे यश मिळवतात. आपलं नाव इतिहासात नसेल तरी चालतं. पण जेव्हा आपण केलेलं काम इतकं प्रभावी, इतकं अर्थपूर्ण असतं की लोक ते पाहून आपल्याला आठवतात, तेच खरे यश असतं. लोक आपल्याला नावानं नव्हे, तर कर्मानं आठवतात. आपली मेहनत, आपलं धैर्य, आपली निष्ठा हेच आपल्या अस्तित्वाचं खरे प्रतिक आहे. संधी मिळणे ही अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक अपयश, प्रत्येक अडचण ही नवीन संधी आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न आपल्याला आपली स्वतंत्र वाट तयार करण्याची संधी देतो. आपलं काम असे करा की ते लोकांच्या हृदयाला भिडेल, त्यांना प्रेरणा देईल, आणि ते आपल्याला आपल्या नावाशिवाय ही आठवतील. खरे नाव ते नाही जे कागदावर लिहिलं जातं; खरे नाव ते आहे जे आपल्या कार्याने जगात सोडले जाते. जगाला बदलण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण...

शब्द कमी,सामर्थ्य जास्त....!

इमेज
शब्द कमी,सामर्थ्य जास्त....! नम्रतेने वागणारा माणूस अनेकदा या जगात गैरसमजांचा बळी ठरतो. त्याच्या शांत शब्दांना कमजोरीचं लेबल लावलं जातं, त्याच्या संयमाला असहायतेची छाया दिली जाते. लोकांना वाटतं, जो माणूस मोठ्याने बोलतो, उद्धटपणे वागतो, समोरच्याला दबवतो तोच खरा हिम्मतवान. पण हे चित्र खरंच इतकं सोपं असतं का? नम्रता ही भीतीतून येत नाही, ती येते आत्मभानातून. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, रागाच्या भरातही चुकीचं न बोलणं, दुखावलं गेलं तरीही मर्यादा न सोडणं हे सगळं प्रत्येकाला जमत नाही. ओरडणं सोपं असतं, अपमान करणं सोपं असतं; पण शांत राहून स्वतःला सावरून घेणं ही खरी कसोटी असते. कारण ज्याचं मन अस्थिर असतं, तोच माणूस सतत बाहेर गोंधळ निर्माण करतो. उद्धटपणामागे बहुतेक वेळा असुरक्षितता लपलेली असते. “मी कमजोर दिसू नये” या भीतीपोटी माणूस कडक मुखवटा चढवतो. पण नम्र माणूस मुखवट्यां शिवाय जगतो. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची घाई नसते, कारण त्याचं मन स्वतःशी शांततेत असतं. खरं तर, सगळे संघर्ष बाहेर नसतात. अनेक लढाया आपल्या मनातच चालू असतात. आणि ज्याला स्वतःचं मन शांत करता आलं, त्याच्यासाठी ब...

जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....!

इमेज
जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....! दिवसभराच्या धावपळीच्या प्रवासात, शरीर थकते, आणि मनही नकळत शांततेचा शोध घेते. अविरत जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसण्याचे क्षण कधी कधी हरवून जातात, आणि आपल्याला वाटते की फक्त पुढे चालत राहणे म्हणजेच जीवन. पण अशा वेळी विरंगुळा हा फक्त विश्रांतीचा क्षण नसतो; तो आपल्याला आपल्या अंतर्मनाशी बोलण्याची संधी देतो. विरंगुळा म्हणजे शांत चहा घेताना, आवडत्या पुस्तकात हरवताना, किंवा फक्त शांतपणे बसून आपल्या विचारांना वेळ देताना अनुभवलेला एक हळवा संवाद आहे. तो आपल्या थकव्याला सामोरे जातो, आपल्याला पुन्हा उर्जा देतो, आणि प्रत्येक श्वासात आशेचा प्रकाश भरतो. ही छोटीशी विश्रांतीच आपल्याला आठवण करून देते. की जीवन फक्त जबाबदाऱ्या आणि धावपळीपुरते मर्यादित नाही. विरंगुळा आपल्याला पुन्हा हसण्याची, पुन्हा मनमोकळेपणाने जगण्याची, आणि नव्या उमेदीनं पुढे जाण्याची ताकद देतो. थकलेल्या शरीराला जसा विश्रांतीची गरज असते, तसाच मनालाही विरंगुळ्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण पुन्हा जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा जाणवते की विरंगुळा फक्त थकलेल्या क्षणाचा आधा...

क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....!

इमेज
क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....! आयुष्य म्हणजे असंख्य भेटींची गुंफण. काही माणसं आपल्यासोबत चालत राहतात, तर काही फक्त क्षणभरच भेटतात. पण या क्षणभरच्या भेटीतही जर आपल्या स्वभावाचा सुगंध दरवळला, तर ती भेट काळाच्या ओघातही पुसली जात नाही. कारण माणूस चेहरा नाही आठवत, तो आठवतो तो भाव. स्वभाव म्हणजे केवळ बोलण्याची शैली नव्हे, तर तो आपल्या मनाचा आरसा असतो. एखाद्याशी दोन शब्द बोलताना त्याला दिलेला मान, त्याच्या डोळ्यांत पाहून केलेलं संवाद, आणि त्याच्या भावनांना दिलेली किंमत यातूनच आपला स्वभाव उमटतो. क्षणभर भेटलेला माणूसही जर आपल्या वागण्यात आपलेपणा अनुभवला, तर तो आपल्याला आयुष्यभर विसरू शकत नाही. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या डोळ्यांत दुःख दिसतं, आणि आपण त्याला फक्त “काही हरकत नाही, सगळं ठीक होईल” एवढंच म्हणतो. पण त्या एका वाक्याने त्याच्या मनाला आधार मिळतो. अशा छोट्या शब्दांतून, छोट्या कृतीतून आपण नकळत कुणाच्या आयुष्यात आशेचा दिवा लावतो. स्वभाव सुंदर असणे म्हणजे नेहमीच गोड बोलणे नव्हे. कधी कधी शांतपणे ऐकणे, वेळेवर मदतीचा हात पुढे करणे, किंवा कुणाला कमी न लेखता समजून घेणे.हेच खरे सौं...

‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...!

इमेज
‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...! अति स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता असते.ती आत्मविश्वासाची नसते, तर अहंकाराची असते. त्यांना वाटतं, जगातलं सगळं ज्ञान त्यांनीच मिळवलं आहे. त्यांच्यापेक्षा शहाणं कुणीच नाही, अनुभवी कुणीच नाही. त्यामुळे दुसऱ्याचं मत ऐकणं त्यांना अपमानासारखं वाटतं, आणि प्रेमाने दिलेला सल्ला हस्तक्षेपासारखा भासतो. अशा लोकांचं मन हळूहळू बंद होत जातं. शिकण्याचे दरवाजे आपोआप बंद होतात. अनुभव सांगणारी माणसं मागे पडतात, चुका दाखवणारी माणसं शत्रू वाटू लागतात. वास्तव समोर असून ही ते मान्य केलं जात नाही. कारण अहंकार डोळ्यांवर असा पडदा टाकतो की योग्य-अयोग्य यातला फरकच अस्पष्ट होतो. स्वतःच्या बुद्धीवरचा अति विश्वास माणसाला एकटा करतो. कारण नात्यांना ‘बरोबर-चूक’पेक्षा ‘समजून घेणं’ जास्त गरजेचं असतं. सतत “मीच बरोबर” म्हणणाऱ्या माणसासोबत चालताना माणसं थकतात. हळूहळू संवाद कमी होतो, माणसं दूर जातात, आणि शेवटी भोवती गर्दी असूनही तो माणूस एकटा राहतो. आयुष्य मात्र कुणाच्याही अहंकाराला थांबवत नाही. ते आपली गती चालूच ठेवतं. वेळोवेळी थांबवून, अडवून, वाकवू...

मीच आहे ना,माझ्यासोबत....!

इमेज
मीच आहे ना,माझ्यासोबत....! आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रत्येकाला कुणाच्या तरी सोबतीची गरज असते. लहानपणापासूनच आपण हात धरून चालायला शिकतो.आईचा, वडिलांचा, मित्रांचा, प्रिय व्यक्तीचा. त्या हातात सुरक्षितता असते, विश्वास असतो, आणि “मी एकटा नाही” ही भावना असते. पण आयुष्य जसजसं पुढे सरकतं, तसतसं एक कठोर सत्य समोर येतं.प्रत्येक हात कायमचा धरून राहीलच असं नाही. कधी परिस्थिती बदलते, कधी माणसं बदलतात, तर कधी नातीच बदलून जातात. ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, तोच हात अचानक सुटतो. त्या क्षणी मन कोलमडतं, पाय थरथरतात, आणि वाटतं की आता पुढे चालणं अशक्य आहे. पण अशाच क्षणी आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं.स्वतःचा हात स्वतःच धरायला शिक. स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर स्वावलंबी होणं आहे. म्हणजे इतरांपासून दूर जाणं नव्हे, तर स्वतःच्या आतल्या ताकदीशी ओळख करून घेणं आहे. कारण बाहेरचा आधार कधीही निघून जाऊ शकतो, पण आतली हिंमत जर जागी असेल, तर कोणतीही साथ सुटली तरी पाय घसरत नाहीत. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक धक्के बसतात. अपयश, नाकारलं जाणं, वि...