अशी कमवा ओळख की नाव आपोआप मोठं होईल.....!
अशी कमवा ओळख की नाव आपोआप मोठं होईल.....! माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला दोन गोष्टी सहज मिळतात.रूप आणि नाव. रूप हे निसर्गाची देणगी असते, तर नाव आई-वडिलांनी प्रेमाने दिलेली ओळख असते. परंतु या दोन्ही गोष्टी माणसाला जन्मतः मिळालेल्या असल्या, तरी त्या त्याची खरी ओळख बनत नाहीत. माणसाची खरी ओळख घडते ती त्याच्या कष्टातून, त्याच्या स्वभावातून आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याने आयुष्यात केलेल्या कर्मातून. रूप हे क्षणभंगुर असतं. काळाच्या प्रवाहात ते बदलत जातं. आज सुंदर वाटणारा चेहरा उद्या सुरकुत्यांनी झाकला जाऊ शकतो. शरीराची ताकदही काळाबरोबर कमी होत जाते. पण माणसाने केलेली चांगली कर्मं मात्र काळाच्या ओघात कधीच नष्ट होत नाहीत. ती लोकांच्या मनात, आठवणींमध्ये आणि इतिहासात कायमची कोरली जातात. म्हणूनच म्हणतात रूपाने नाही, तर कर्माने सुंदर व्हावं. खऱ्या अर्थाने मोठा तोच ठरतो, ज्याची ओळख त्याच्या कामातून निर्माण होते. अशा लोकांना स्वतःची स्तुती करण्याची गरज पडत नाही. कारण त्यांच्या कार्याची साक्ष समाज स्वतः देत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं काम बोलू लागतं, तेव्हा त्याला स्वतःची ओळख करू...