प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....!
प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....! माणसाच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याचे मन. मन जर स्वच्छ, निर्मळ आणि प्रामाणिक असेल, तर माणूस जगात कुठेही उभा राहू शकतो. त्याला कोणाची भीती वाटत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात कोणताही खोटेपणा किंवा अपराधाची सावली नसते. आजची दुनिया फार विचित्र आहे. इथे लोकांना सत्यापेक्षा अफवा जास्त आवडतात, आणि चांगुलपणापेक्षा दोष काढण्यातच जास्त आनंद मिळतो. कधी कधी तर परिस्थिती अशी होते की लोक देवालाही दोष देतात. आयुष्यात एखादी अडचण आली, स्वप्न अपूर्ण राहिले किंवा काहीतरी आपल्या मनासारखे झाले नाही, की लगेच लोक म्हणतात “देवाने असे का केले?” जणू प्रत्येक वेदनेचे उत्तर देवाकडेच आहे. पण खरे पाहिले तर देवावर दोष ठेवणारी ही दुनिया माणसाच्या मनातील अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा तो दोष दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतो.कधी परिस्थितीवर, कधी नशिबावर आणि कधी देवावर. म्हणूनच जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची शुद्धता जपणे. जर आपले विचार स्वच्छ असतील, हेतू चांगले असतील आणि आपण कु...