जळणाऱ्यांना जळू द्या....!
जळणाऱ्यांना जळू द्या....! काही लोकांच्या आयुष्यात एक विलक्षण सवय दडलेली असते.त्यांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडत आहे, याचीच अधिक उत्सुकता असते. कोण कुठे जात आहे, कोणाशी बोलत आहे, कोण किती पुढे जात आहे, कोणाच्या आयुष्यात किती आनंद आहे किंवा किती दुःख आहे, कोण किती कमावत आहे.जणू काही इतरांच्या जीवनाचा लेखाजोखा ठेवणे हीच त्यांची जबाबदारी आहे. समाज अशा वृत्तीला “घुबडासारखं लक्ष ठेवणं” असे म्हणतो. आणि त्यासाठी एक जुनी म्हणही प्रचलित आहे.“स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.” या म्हणीतला टोमणा साधा वाटला तरी त्यात खोल वास्तव दडलेले आहे. अनेकदा ज्यांच्याकडे स्वतःचे स्पष्ट ध्येय नसते, स्वतःची स्वप्ने साकार करण्याची जिद्द नसते, तेच इतरांच्या प्रवासात डोकावतात. ते दुसऱ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेतात, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या यशामागील कारणांचा शोध घेत राहतात. परंतु हे करताना ते एक महत्त्वाची गोष्ट विसरतात.प्रत्येक यशामागे संघर्षांची सावली असते. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे अश्रूंचा इतिहास असतो. प्रत्येक उंच भरारीमागे अप...