शुद्ध विचारांची मशाल ‘बा, तथागता!’ आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म.....!
शुद्ध विचारांची मशाल ‘बा, तथागता!’ आणि मानवमूल्यांचा पुनर्जन्म.....! माणूस म्हणजे केवळ हाडामांसांचे, डोळे-कान-हात-पाय असलेले जैविक अस्तित्व नव्हे. माणूस खरा माणूस ठरतो तो त्याच्या विचारांच्या पवित्रतेतून आणि आचरणाच्या उजेडातून. ज्याच्या अंतःकरणात करुणा, विवेक, न्याय, समता, बंधुभाव आणि प्रेम यांचा अखंड दीप तेवत असतो, तोच माणूस खऱ्या अर्थाने मानव ठरतो. माणसाचे माणूसपण त्याच्या अंतर्मनातून झळकते हेच मूलभूत, कालातीत आणि सार्वत्रिक सत्य अत्यंत प्रभावी शब्दांतून सुप्रसिद्ध मानवतावादी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक व कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी आपल्या चिंतनातून अधोरेखित केले. दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ, एरंडोल येथे आयोजित झालेला कार्यक्रम केवळ ग्रंथप्रकाशनाचा सोहळा नव्हता; तो मानवी मनाच्या परिष्करणाचा, आत्मशुद्धीचा आणि मानवतावादी विचारांच्या पुनर्जागरणाचा एक पवित्र वैचारिक उत्सव होता. या दिवशी प्रा. वा. ना. आंधळे यांनी अहिराणी बोलीत अनुवादित केलेल्या ‘बा, तथागता!’ या विशाल काव्यग्रंथाचे तसेच त्यावर आधारित ‘विवेकी जाणिवांचा प्रज्ञा प्रवाह’ या समीक्षा ग...