पोस्ट्स

सत्तेपलीकडचे नेतृत्व लोकनेते बाळासाहेब थोरात...!

इमेज
सत्तेपलीकडचे नेतृत्व लोकनेते बाळासाहेब थोरात...! काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या पल्याड जाऊन समाजाच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. शब्दांपेक्षा कृतीतून बोलणारे, सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणारे आणि राजकारणात ही माणुसकी जपणारे असे नेतृत्व म्हणजे लोकनेते बाळासाहेब थोरात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मन नकळत आदर, कृतज्ञता आणि अभिमानाने भरून येते. संयमी नेतृत्व, दूरदृष्टी आणि विकासाभिमुख कार्यशैली ही थोरात साहेबांची खरी ओळख आहे. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत महसूल, कृषी आणि सहकार यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून जनतेचा विश्वास संपादन केला.शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे दिसून येतो. विशेषतः सहकार क्षेत्रात संगमनेर तालुक्याने राज्यपातळीवर आदर्श निर्माण केला आहे. सहकार म्हणजे केवळ संस्था नव्हे, तर एक सामाजिक चळवळ आहे.ही जाणीव त्यांनी कृतीतून दाखवून दिली. विश्वास, पारदर्शकता आणि लोकसहभाग या मूल्यांवर उभा असलेला संगमनेरचा सहकार आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरण...

मराठी गझल एक समृद्ध प्रवाह....!

इमेज
शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ व रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त  हा लेख. ------------------------------------------------- अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरेश भट एक महान गझल सम्राट मराठी गझल एक समृद्ध प्रवाह            शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ व रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त हा लेख प्रपंच .      या अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या गझलकरांचे हार्दिक अभिनंदन ॥ आणि या अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा ॥        मराठी साहित्याच्या प्रांतात 'गझलसम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट हे केवळ एक कवी नव्हते, तर ते मराठी गझलेला घराघरात पोहोचवणारे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होते. त्यांनी उर्दूत...

जो पर्यंत काड्या करणारे लोक आहेत, तो पर्यंत महाभारत थांबणार नाही…..!

इमेज
जो पर्यंत काड्या करणारे लोक आहेत, तो पर्यंत महाभारत थांबणार नाही…..! महाभारत एखाद्या ग्रंथापुरतं मर्यादित नाही. ते एका काळात घडलेलं युद्ध नसून, मानवी स्वभावात खोलवर रुजलेली एक शोकांतिका आहे. आज रणभूमी नाही, धनुष्यबाण नाहीत; पण तरीही युद्ध सुरूच आहे. कारण आजही आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत, जी भांडण लावतात… आणि भांडण झाल्यावर ते कधीच मिटू नये यासाठी सतत काड्या करत राहतात.दोन माणसांमधील नातं म्हणजे काचेसारखं असतं. नाजूक, पारदर्शक, आणि जपून हाताळावं लागणारं. पण काही लोक मुद्दाम त्या काचेला तडा जाईल अशी वाक्यं कानात घालतात. “तो तुझा अपमान करतोय”, “ती तुला कमी लेखतेय”, “गप्प बसलास तर तू हरशील” ही वाक्यं म्हणजे शब्दांत लपवलेली शस्त्रं असतात. स्वतः शांत राहून इतरांच्या नात्यांत वादळ निर्माण करणारी ही माणसं, नकळत का होईना, पण महाभारताची बीजं पेरत असतात. खरं तर बहुतांश भांडणं गैरसमजातून होतात. थोडा संवाद, थोडं ऐकून घेणं, आणि थोडी माफी एवढ्याने अनेक नाती वाचू शकतात. पण जेव्हा मधे येऊन कोणी म्हणतं, “आता मागे हटू नकोस”, “माफी मागणं म्हणजे कमजोरी”, “याला धडा शिकवायलाच हवा” तेव्हा समेट...

त्यागमूर्ती माता रमाई...!

इमेज
दि.७ फेब्रुवारी २०२६ ला असलेल्या त्यागमूर्ती रमाबाई भीमरावजी आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त लेख.         त्यागमूर्ती माता रमाई             माता रमाबाई भीमराव आंबेडकर,ज्यांना आपण प्रेमाने 'रमाई' म्हणतो, त्यांचे जीवन म्हणजे त्याग, सोशिकपणा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्याला दिलेला खंबीर आधार होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जे 'विश्वभूषण' बनले, त्यामागे रमाईंचे अढळ धैर्य उभे होते.                        मातोश्री रमाईंचा १८९८ सालातील फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद ग्रामात झाला.भिकाजी धुत्रे (वलंगकर) आणि रखुमाबाई त्यांच्या पोटी जन्मलेल्या रमाचे बालपण गरिबीत गेले आणि लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. १९०६ सालातील एप्रिल महिन्याच्या चार तारखेला मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब) यांच्याशी झाला. लग्नानंतर भीमरावांनी त्यांचे नाव 'रमा' ठेवले.  ...

दिसायला ‘सुंदर’ असण्यापेक्षा, मन ‘स्वच्छ’ असणारी व्यक्ती शोधा…!

इमेज
दिसायला ‘सुंदर’ असण्यापेक्षा, मन ‘स्वच्छ’ असणारी व्यक्ती शोधा…! आजच्या जगात माणसाची किंमत त्याच्या चेहऱ्यावर, रंगावर, कपड्यांवर किंवा बाह्य आकर्षणावर ठरवली जाते. पहिल्या नजरेत भुरळ घालणारे सौंदर्य अनेकदा आपल्याला थांबवते, गुंतवते… पण प्रश्न असा आहे की, ते सौंदर्य किती काळ टिकते? काळाच्या ओघात केस पांढरे होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या उमटतात, डोळ्यांची चमक मंदावते. आरशात दिसणारे ते सौंदर्य हळूहळू कमी होते. पण मनाचं काय? मन जर स्वच्छ असेल, तर ते वयासोबत अधिकच सुंदर होत जातं. स्वच्छ मनाची व्यक्ती लहानसहान गोष्टींमध्ये आनंद शोधते. ती तुमच्या यशात आनंदी होते, तुमच्या दुःखात शांतपणे शेजारी बसते. तिला दिखावा माहीत नसतो, फक्त आपुलकी माहीत असते. अशा माणसाचं बोलणं जरी साधं असलं, तरी त्यात प्रामाणिकपणा असतो; वागणं जरी साधं असलं, तरी त्यात माणुसकी असते. दिसायला सुंदर असणारी व्यक्ती तुम्हाला समाजात मिरवता येते,पण मनाने सुंदर असणारी व्यक्ती तुम्हाला आयुष्य जगायला शिकवते. स्वच्छ मनाची माणसं फार मोठी आश्वासनं देत नाहीत, पण दिलेला शब्द पाळतात. ती ओरडून प्रेम दाखवत नाहीत, पण शांतपणे आयुष्यभर साथ...

सेवेच्या प्रकाशवाटेवरचा रत्नदीप प्रथम भरत सूर्यवंशी यांचा राज्यस्तरीय गौरव....!

इमेज
सेवेच्या प्रकाशवाटेवरचा रत्नदीप प्रथम भरत सूर्यवंशी यांचा राज्यस्तरीय गौरव....! समाजसेवेचा खरा अर्थ, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि निस्वार्थ कार्याची उज्ज्वल परंपरा यांचा सुंदर संगम म्हणजे ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य–२०२५ पुरस्कार. संविधान दिनाच्या पावन औचित्यावर भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने प्रदान करण्यात आलेला हा प्रतिष्ठित सन्मान म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या हातांना दिलेली कृतज्ञतेची मानवंदना होय. हा मानाचा पुरस्कार धरणगाव येथील करणी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रथम भरत सूर्यवंशी यांना प्रदान करून त्यांच्या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्याची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली. हा सन्मान केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या प्रत्येक सेवाव्रती मनाचा गौरव ठरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अवघ्या २१ मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्या निवडक मान्यवरांच्या यादीत प्रथम सूर्यवंशी यांचे ...

अमोलदादा जनतेच्या हृदयात रुजलेले नेतृत्व....!

इमेज
अमोलदादा जनतेच्या हृदयात रुजलेले नेतृत्व....! एरंडोल पारोळा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. अमोल चिमणरावजी पाटील नवतरुण, तडफदार आणि ऊर्जेने ओथंबलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार श्री.अमोलजी चिमणराव पाटील. राजकारणाकडे त्यांनी कधीही केवळ सत्तेचे साधन म्हणून पाहिले नाही; ते त्यांनी समाजसेवेची साधना मानली. माणूस म्हणून ते जितके दिलदार, आपुलकीचे आणि माणुसकी जपणारे आहेत, तितकेच नेतृत्व म्हणून ठाम, विचारशील, दूरदृष्टी असणारे आणि लोकाभिमुख आहेत. सर्वांवर जीवापाड प्रेम करणारा स्वभाव आणि प्रत्येकाशी आपलेपणाने वागण्याची वृत्ती हीच त्यांची खरी ओळख आहे. मोठ्या समाजसेवेचा ध्यास मनाशी बाळगून त्यांनी गावोगावी फिरत जनतेचा सखोल अभ्यास केला. प्रत्येक घर, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक वेदना त्यांनी मनापासून समजून घेतली. लोकांच्या अडचणींना स्वतःच्या मानणारा हा नेता आज जनतेच्या आशेचा किरण ठरला आहे.  आबासाहेबांच्या विचारांचे मार्गदर्शन सदैव डोळ्यांसमोर ठेवत, अमोलदादांनी विकासाच्या वाटेवर सातत्याने आणि निर्धाराने चालण्याचा संकल्प केला आहे. म्हणूनच त्यांच्या पाठीशी केवळ एखादा...

डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात माणुसकी...!

इमेज
डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात माणुसकी...! काही व्यक्ती पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर त्यांच्या विचारांमुळे, वागणुकीमुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे त्या आपोआप उंचावतात. आदरणीय सारंग जैन सर हे अशाच व्यक्तिमत्त्वाचं जिवंत आणि सुंदर उदाहरण आहेत. शांतता आणि कुशाग्र बुद्धी यांचा दुर्मिळ संगम म्हणजे सर. नेहमी डोक्यावर बर्फ ठेवून निर्णय घेण्याची समज, तोंडात साखर ठेवून संवाद साधण्याची कला आणि मनात माणुसकी जपण्याची संवेदनशीलता हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सहजपणे नांदताना दिसतं.फाइल असो वा फंडाचा हिशोब, प्रत्येक कामात स्पष्टता, काटेकोरपणा आणि विश्वासार्हता दिसते. आकड्यांमागे केवळ गणित नसतं, तर त्यामागे जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी असते.हे सरांच्या कामातून नेहमी जाणवतं. बजेट कमी असो वा अपेक्षा प्रचंड, तक्रारींचा बोजा न वाढवता, हसत-हसत सगळं सांभाळण्याची ताकद फार थोड्या लोकांकडे असते, आणि सर त्यातलेच एक आहेत. अडचणींवर ताण न देता, उपायांमध्ये माणुसकी मिसळण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. धरणगाव ऑफिसचे सर्वेसर्वा असतानाही, सरांचा साधेपणा आणि आपुलकी कधीच बदललेली नाही. कुणा...

वेळ येतेच…आणि तेव्हा कळतं....!

इमेज
वेळ येतेच…आणि तेव्हा कळतं....! माणुसकी तिथेच मरते, जिथे दुसऱ्याच्या दुःखाचा लोकांना खेळ वाटतो. जिथे अश्रूंना किंमत नसते, वेदनांवर हसले जाते आणि कोसळणाऱ्या माणसाकडे मदतीचा हात न देता तमाशा पाहिला जातो. माणूस प्रगती करत गेला, पण त्याच वेगाने त्याच्या मनातून संवेदनशीलता हरवत गेली. आज एखादा माणूस दुःखात असला की लोक विचारतात.“काय झालं?” मदतीसाठी नाही, तर चर्चेसाठी. त्याच्या वेदना चहाच्या कपात ओतून गप्पांचा विषय बनवल्या जातात. कोणाच्या अपयशावर समाधान मानलं जातं, तर कोणाच्या अश्रूंवर टोमणे मारले जातात. माणसाचं दुःख हे आज मनोरंजनाचं साधन झालं आहे. पण वेळ… वेळ फार निर्दयी नसते, ती फक्त न्याय्य असते. ती कुणाला वाचवत नाही, कुणालाही वगळत नाही. आज जो दुसऱ्याच्या वेदनेवर हसतो, उद्या त्याच वेदनेत अडकलेला असू शकतो. आज जो सुरक्षित वाटतो, उद्या तोच असहाय्य उभा असू शकतो. आयुष्य प्रत्येकाला शिकवतं, फक्त धडा कधी मिळतो याचा फरक असतो. तेव्हा कळतं की दुःखात शब्द नको असतात, फक्त समजून घेणारी नजर पुरेशी असते. टीका नको असते, तर आधार हवा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी तरी आपल्यासोबत उभं आहे,...

जिवंतपणीची साथ हीच खरी श्रद्धांजली.....!

इमेज
जिवंतपणीची साथ हीच खरी श्रद्धांजली.....! आपल्या आयुष्यात माणसं येतात… काही काळासाठी, तर काही आयुष्यभरासाठी. ती आपल्या सोबत चालतात, आपले सुख-दुःख वाटून घेतात, कधी शब्दांनी तर कधी फक्त शांत उपस्थितीने आपल्याला आधार देतात. पण दुर्दैवाने, ही माणसं आपल्या सोबत असतानाच आपण त्यांचे महत्त्व ओळखू शकत नाही. “आहेतच की…” या गृहितकात आपण त्यांना गृहीत धरतो. आज नाही तर उद्या भेटू, वेळ मिळेल तेव्हा बोलू, असं म्हणत आपण आजचा क्षण पुढे ढकलतो. पण वेळ कधी थांबत नाही. आणि माणूस गेल्यावर उरते ती फक्त पोकळी… जी कोणत्याही शब्दांनी भरून निघत नाही. माणूस जोपर्यंत हयात आहे, श्वास घेत आहे, आपल्याशी बोलू शकतो, तोपर्यंत त्याला दिलेलं प्रेम, आदर आणि साथ यालाच खरी किंमत असते. तो गेल्यावर त्याच्या मोठेपणाची, कर्तृत्वाची जाणीव होऊन काय उपयोग? त्या वेळी त्याच्या डोळ्यांत पाहून “तू आमच्यासाठी किती महत्त्वाचा होतास” असं सांगण्याची संधीच उरलेली नसते. थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ अतिशय मार्मिकपणे म्हणायच्या “माणूस किती चांगला आहे, हे समजण्यासाठी त्याला मरावं लागतं.”ही ओळ आपल्या समाजावरचं कटू सत्य उघड करते. जिवं...

एक दिलदार मनाचा दिलदार माणूस… कायमचा हरपला...!

इमेज
एक दिलदार मनाचा दिलदार माणूस… कायमचा हरपला...! एरंडोल येथील प्रा. आर. एस. पाटील सर यांचे आज रात्री हृदयविकाराने दुःखद निधन झाले आणि क्षणात एरंडोलच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनातील एक उजळ प्रकाश मावळला. ही बातमी केवळ दुःखद नाही, तर मन सुन्न करणारी आहे. काही व्यक्ती केवळ त्यांच्या नावामुळे ओळखल्या जात नाहीत, तर त्यांच्या माणुसकीमुळे, कार्यामुळे आणि जिवंत आठवणींमुळे कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. प्रा.पाटील सर हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख सर्वदूर होती; मात्र ते फक्त शिक्षक नव्हते.ते विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि “आपणही काही तरी करू शकतो” ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजवली. वर्गात ते शिक्षक होते, तर वर्गाबाहेर विद्यार्थ्यांसाठी पालक, मार्गदर्शक आणि अनेकांसाठी तर खरे आधारवड होते. गरिबीमुळे कोणाच्या ही शिक्षणात खंड पडू नये, ही त्यांची आंतरिक तळमळ होती. अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी त्यांनी स्वतः भरली; परंतु कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. “मदत के...

साधेपणातून साधनेपर्यंत जयेश वाघ यांची गोसेवेची कथा....!

इमेज
साधेपणातून साधनेपर्यंत जयेश वाघ यांची गोसेवेची कथा....! चाळीसगाव तालुक्यातील दहिवदसारख्या लहानशा गावात, एका सर्वसामान्य कुटुंबात जयेश संभाजी वाघ यांचा जन्म झाला. वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, तर घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. आयुष्याची सुरुवातच संघर्षांनी वेढलेली होती; परंतु या प्रतिकूल परिस्थितीत ही एका लहान मुलाच्या मनात एक वेगळे स्वप्न फुलत होतं.गोमातेच्या निःस्वार्थ प्रेमाची आणि सेवा करण्याची उत्कट इच्छा. बालपणापासूनच गायींकडे पाहताना जयेश यांचे डोळे काहीतरी वेगळ्या चमकाने भरलेले दिसायचे. इतर मुलं खेळण्यात रमलेली असताना, जयेश मात्र गायींच्या सान्निध्यात शांतता आणि समाधान शोधत असे. त्यांच्या हृदयात गायींबद्दलची आपुलकी होती, मनात सेवाभाव होता, आणि बालवयातच गोसेवेची बीजं रुजली होती.  जणू काही त्यांच्यासाठी ही साधना जन्मजात होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी शिक्षणाचा मार्ग कधीही सोडला नाही. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी फार्मसीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.  स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर अनेक जण सुरक्षित नो...

मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...!

इमेज
मनातले ग्रह आणि माणसाचं आयुष्य...! आकाशातील ग्रह माणसाच्या नशिबावर परिणाम करतात की नाही, यावर आजही चर्चा होत राहते. कोणी त्यावर श्रद्धा ठेवतो, कोणी त्याकडे केवळ एक समज म्हणून पाहतो. पण एक सत्य मात्र निर्विवाद आहे. पृथ्वीवर राहणारी माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते माणसाच्या आयुष्याला खोलवर स्पर्श करून जातात. माणसाचं आयुष्य आकाशातील ताऱ्यांपेक्षा अधिक उजळतं किंवा काळोखात जातं, ते इतर माणसांच्या नजरेतून. एखाद्या बद्दल मनात तयार झालेला ग्रह हा कधी प्रेमाचा असतो, कधी संशयाचा, तर कधी नकळत रुजलेला पूर्वग्रह असतो. हा ग्रह शब्दांशिवाय बोलतो, पण त्याचे परिणाम मात्र फार बोलके असतात. एखाद्या माणसाकडे आपण संशयाने पाहू लागलो, की त्याचं हसणं ही आपल्याला खोटं वाटतं. त्याची शांतता आपल्याला कपटाची भासते. तो कितीही प्रामाणिक असला, तरी आपल्या मनात बसलेला ग्रह त्याचं खरं रूप पाहू देत नाही. अशा वेळी नाती हळूहळू कोमेजतात, विश्वास गळून पडतो, आणि माणसं एकमेकांच्या अगदी जवळ असून ही फार दूर जातात. पण जिथे मनात विश्वासाचा, आपुलकीचा ग्रह असतो, तिथे नात्यांना वेगळीच उंची मिळते. छोट्या चुका माफ ...

धाग्यांत गुंफलेली नाती....!

इमेज
धाग्यांत गुंफलेली नाती....! मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात.डोळ्यांना दिसणारही नाहीत इतके नाजूक. एखादा शब्द जरा जास्त झाला, एखादी भावना न बोलता मनात साचली, की त्या धाग्यांवर ताण पडतो. खरंच, तुटायचंच असेल तर श्वासाएवढाही झोत पुरेसा असतो. एक दुर्लक्ष, एक “नंतर बोलू” म्हणत टाळलेला क्षण, आणि मैत्रीच्या विणीत नकळत भेग पडते. पण हेच धागे जेव्हा विश्वासाने विणलेले असतात, तेव्हा ते लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत ठरतात. आयुष्य कितीही बदललं, अंतर कितीही वाढलं, संकटं कितीही कोसळली.तरीही ते धागे तुटत नाहीत. वज्राघात झाला तरी ते सहन करतात, कारण त्यात फक्त आठवणी नसतात, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होण्याची शांत तयारी असते. मैत्री म्हणजे रोज बोलणं नव्हे, तर वर्षांनंतर भेटून ही तेच जुने हसू ओठांवर येणं. ती मोठ्या आश्वासनांत नसते, तर साध्या “मी आहे” या वाक्यात असते.यशात आनंदाने टाळ्या वाजवणं आणि अपयशात शब्दांशिवाय सोबत करणं.हीच खरी मैत्री. ती कधी आवाज करते, तर कधी फक्त शांतपणे शेजारी बसून राहते. तुटलेली मैत्री पुन्हा जुळू शकते, पण त्यावरची गाठ मनाला बोचत राहते. म्हणूनच या धाग्य...

नाती जपायची असतील तर मोठं मन हवं...!

इमेज
नाती जपायची असतील तर मोठं मन हवं...! एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.तेव्हाच नाती कायम जपली जातात. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही आपले असतात जन्माने, काही आपले होतात प्रेमाने, तर काही न सांगता मनात घर करतात. या सगळ्या नात्यांचा एक समान धागा असतो भावना. पण या भावनाच कधी कधी चुकीच्या शब्दांत व्यक्त होतात आणि तिथेच नात्यांची परीक्षा सुरू होते. एखादा शब्द चुकतो… पण तो शब्द बोलणारा माणूस आयुष्यभर चुकाच करत नसतो. एका क्षणात निघालेला शब्द हा रागाचा, वेदनेचा किंवा थकव्याचा परिणाम असू शकतो. पण त्या एका चुकीच्या शब्दासाठी जर आपण त्या माणसाने आपल्यासाठी केलेल्या हजार चांगल्या गोष्टी विसरलो, तर नातं तुटायला वेळ लागत नाही. आई-वडिलांचं प्रेम कधी कठोर शब्दांत दिसतं, पण त्यांच्या मनात असलेली काळजी शब्दांपेक्षा कितीतरी मोठी असते. मित्र कधी टोचून बोलतो, पण संकटात तोच पहिला उभा राहतो. जोडीदार कधी मन दुखावतो, पण आयुष्यभर तुमचा हात सोडत नाही.या सगळ्या नात्यांमध्ये चुका होतात, पण त्या चुका झाकून टाकणारा प्रेमाचा मोठा साठा अ...