पोस्ट्स

प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....!

इमेज
प्रामाणिक मनाची निडर वाटचाल....! माणसाच्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याचे मन. मन जर स्वच्छ, निर्मळ आणि प्रामाणिक असेल, तर माणूस जगात कुठेही उभा राहू शकतो. त्याला कोणाची भीती वाटत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात कोणताही खोटेपणा किंवा अपराधाची सावली नसते. आजची दुनिया फार विचित्र आहे. इथे लोकांना सत्यापेक्षा अफवा जास्त आवडतात, आणि चांगुलपणापेक्षा दोष काढण्यातच जास्त आनंद मिळतो. कधी कधी तर परिस्थिती अशी होते की लोक देवालाही दोष देतात. आयुष्यात एखादी अडचण आली, स्वप्न अपूर्ण राहिले किंवा काहीतरी आपल्या मनासारखे झाले नाही, की लगेच लोक म्हणतात “देवाने असे का केले?” जणू प्रत्येक वेदनेचे उत्तर देवाकडेच आहे. पण खरे पाहिले तर देवावर दोष ठेवणारी ही दुनिया माणसाच्या मनातील अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या चुका स्वीकारत नाही, तेव्हा तो दोष दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतो.कधी परिस्थितीवर, कधी नशिबावर आणि कधी देवावर. म्हणूनच जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची शुद्धता जपणे. जर आपले विचार स्वच्छ असतील, हेतू चांगले असतील आणि आपण कु...

खोट्या गप्पांमागील सावली आणि सत्याचा प्रकाश...!

इमेज
खोट्या गप्पांमागील सावली आणि सत्याचा प्रकाश...! जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात जिथे काही लोक स्वतःला योग्य दाखवण्यासाठी दुसऱ्यांबद्दल खोट्या गोष्टी पसरवतात. अफवा पेरतात, गैरसमज निर्माण करतात, आणि समोरच्या व्यक्तीची प्रतिमा धुसर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की हे करून ते स्वतःला वर उभे करू शकतात. पण ते विसरतात एक अत्यंत साधी पण शक्तिशाली गोष्ट सत्याचा प्रकाश नेहमी येतो. खोटं कितीही काळ लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते टिकत नाही. विश्वास हे खोट्या गोष्टींवर टिकत नाही, आणि मनाच्या खोलवर बसलेले प्रेम व निष्ठा खोट्या अफवांपेक्षा जास्त मजबूत असतात. जेव्हा सत्य उजेडात येतं, तेव्हा खोट्या गोष्टींचा आधार घेतलेली नाती हळूहळू ढासळू लागतात. ज्या नात्यांची पायाभरणी खोटेपणावर आहे, ती नाती वरून कितीही मजबूत दिसली तरी आतून हळूहळू कमकुवत होत जातात. खोट्या शब्दांचा घाला, गुप्त गैरसमज, आणि ढोंगी छटा हळूहळू नात्यांच्या मुळे ज्या ठिकाणी जीवनरस ओतला जातो, तिथून शोषून घेतात. काळाच्या पडद्याआड दिसलेले हे खोटे नाती वेळोवेळी उघड होतात; आणि ज्या नात्यांनी खरी मर्मळीक न दाखवता फक्त बाह्य छटा ...

फक्त तेच लोक वाईट बोलतात….!

इमेज
फक्त तेच लोक वाईट बोलतात….! जीवन हा एक अनोखा प्रवास आहे. त्या प्रवासात आपल्याला अनेक लोक भेटतात.काही आपल्याला हसवतात, काही आपल्याला प्रेरणा देतात, तर काही आपल्यावर टीका करतात. पण लक्षात ठेवा, फक्त तेच लोक आपल्याविषयी वाईट बोलतात, ज्यांची आपल्यासमोर बोलायची ‘लायकी’ नसते. जे लोक आपल्यावर टीका करतात, त्यांचे शब्द फक्त त्यांच्या स्वतःच्या अपयश, असमर्थता किंवा भीतीतून येतात. त्यांच्याकडे धैर्य, आत्मविश्वास किंवा प्रयत्नांची ताकद नसते; त्यामुळे ते आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वाईट शब्दांमागे हताशा, तिरस्कार आणि आपल्या यशाची भीती दडलेली असते. पण लक्षात ठेवा. त्यांचे वाईट बोलणे आपल्याला कमी करीत नाही; ते फक्त त्यांची मर्यादा दाखवते. जगात खरे यशस्वी लोक तेच असतात जे शब्दांवर थांबत नाहीत, तर कृतीतून आपली उंची दाखवतात. विरोधकांचे शब्द फक्त निरीक्षण असतात; त्यांना आपल्या प्रयत्नांवर, धैर्यावर आणि मेहनतीवर परिणाम करता येत नाही. आपले यश, आपली उंची आणि आपली किंमत फक्त आपल्या प्रयत्नांची आणि आत्मविश्वासाची फळे आहेत. हृदयात एक गोष्ट ठेवा. ज्यांना आपल्यावर बोलायची लायकी न...

शास्त्री फार्मसीतील ‘युफोरिया 2K26’ आठवणी, स्वप्ने आणि भावनांचा अविस्मरणीय सोहळा....!

इमेज
शास्त्री फार्मसीतील ‘युफोरिया 2K26’ आठवणी, स्वप्ने आणि भावनांचा अविस्मरणीय सोहळा....! एरंडोल येथील शास्त्री फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणात १४ मार्चचा दिवस काहीसा वेगळाच उजाडला होता. वातावरणात एक अनोखी उत्सुकता होती, चेहऱ्यांवर आनंदाची झळाळी होती आणि मनात असंख्य आठवणींची चाहूल लागली होती. कारण त्या दिवशी महाविद्यालयात ‘युफोरिया 2K26’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा रंगणार होता. हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उत्सव नव्हता, तर तो विद्यार्थ्यांच्या भावना, स्वप्ने, मैत्री आणि आठवणींचा एक हृदयस्पर्शी संगम ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री होते. त्यांच्यासोबत सचिव सौ. रूपा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल बोरसे यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष मानाचे स्वरूप देत होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जणू त्या तेजस्वी प्रकाशाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही उजाळा मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनु...

काही चेहरे आनंद देतात काही आग लावतात....!

इमेज
काही चेहरे आनंद देतात काही आग लावतात....! मुंगूसचं तोंड पाहिलं की दिवस चांगला जातो, अशी एक जुनी समजूत आपल्या गावाकडच्या लोकांमध्ये आजही ऐकायला मिळते. पहाटेच्या धूसर प्रकाशात जर मुंगूस दिसलं, तर मनात नकळत एक आशा जागते.आज काहीतरी चांगलं घडेल. कारण मुंगूस म्हणजे चपळाई, धैर्य आणि संकटावर मात करण्याचं प्रतीक मानलं जातं. पण आयुष्याचं गणित मात्र इतकं सोपं नसतं. काही वेळा आपल्या आयुष्यात अशीही काही “मुंगूस तोंडची” माणसं येतात की, त्यांचं तोंड पाहिलं की मनात विचित्र कळ उठते. नकळत तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, नजरेत एक अशी कडवटपणा असतो की आपला शांत दिवसही अस्वस्थ करून टाकतो. ही माणसं कधी आपलेच असतात नातेवाईक, शेजारी, कधी मित्रही. त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं, माणूस म्हणून इतकी कटुता मनात कशी साठवता येते? दुसऱ्याच्या आनंदावर पाणी फेरणं, प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधणं, आणि दुसऱ्याच्या मनाला नकळत जखम करणं.जणू त्यांचं रोजचं कामच असतं. पण खरं सांगायचं तर, अशा माणसांमुळेच आपल्याला चांगल्या माणसांची किंमत कळते. जसं अंधारामुळे दिव्याचा प्रकाश अधिक तेजस्वी वाटतो,...

शब्दांविना मिळणारा आधार....!

इमेज
शब्दांविना मिळणारा आधार....!  कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. मन खूप थकलेलं असतं, भावनांचा पूर आत उसळत असतो, आणि अशा वेळी एखादी व्यक्ती शांतपणे येते… तुमच्या जवळ बसते… आणि नकळत तुमच्या खांद्यावर डोकं टेकवते. त्या क्षणी ती काही बोलत नाही, पण तिच्या त्या एका कृतीत विश्वास, आपलेपणा आणि सुरक्षिततेची भावना भरलेली असते. खरं सांगायचं तर, यापेक्षा मोठं प्रमाणपत्र माणसाच्या चांगुलपणाचं दुसरं कोणतं असू शकतं? या जगात अनेक लोक भेटतात काही ओळखीचे, काही जवळचे, काही फक्त नावापुरते. पण काही माणसं अशी असतात ज्यांच्याजवळ गेलं की मनाला शांतता मिळते. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच सुगंध असतो.माणुसकीचा, समजुतीचा आणि निरपेक्ष आपलेपणाचा. अशी माणसं स्वतःचं चांगुलपण कधीच मिरवत नाहीत. ते मोठमोठ्या गोष्टी करत नाहीत, मोठे दावे करत नाहीत. पण त्यांच्या साध्या उपस्थितीतही लोकांना आधार मिळतो. कारण ते ऐकून घेतात, समजून घेतात आणि कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याच्या वेदनेला थोडीशी जागा देतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे भ...

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या प्रवासाचा भावनिक उत्सव

इमेज
७५ वर्षांची उज्ज्वल परंपरा साळवे इंग्रजी विद्यालय व ग्राम सुधारणा मंडळाचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेच्या प्रवासाचा भावनिक उत्सव साळवे इंग्रजी विद्यालय व ग्राम सुधारणा मंडळाच्या ७५ वर्षांच्या उज्ज्वल प्रवासाचा साक्षीदार ठरलेला अमृत महोत्सवी समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. अनेक पिढ्यांना शिक्षणाचे संस्कार देत समाजात सक्षम नागरिक घडविणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी परिसरातील मान्यवर, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि संस्थेच्या कार्याबद्दल अभिमानाची भावना सर्वांच्या मनात दाटून आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जी. एन. पाटील यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे तसेच सर्व संचालक मंडळ आणि मान्यवर अतिथी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण ठरला. कार्यक्रमाची सुरुवात म...

मराठी गझलचे जनक गझल सम्राट सुरेश भट

इमेज
गझल सम्राट सुरेश भट यांच्या दि.14 मार्च 2026 रोजी असलेल्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त लेख . मराठी गझलचे जनक  गझल सम्राट सुरेश भट                  दि.१४ मार्च २०२६ असलेल्या मराठी साहित्यातील महान कवी गझल सम्राट सुरेश भट यांना २३ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥       मराठी साहित्यातील 'गझल सम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट यांनी मराठी गझलेला घराघरात पोहोचविले.गझल सम्राट सुरेश श्रीधर भट त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला साहित्याची आणि कवितेची प्रचंड आवड होती, ज्याचा प्रभाव सुरेश भट यांच्यावर बालपणापासूनच पडला.सुरेश भट यांचे बालपण इतर मुलांसारखे साधे नव्हते; त्यात शारीरिक आणि मानसिक संघर्षाचे पदर होते.लहानपणी त्यांना पोलिओ झाला होता. यामुळे त्यांचा उजवा पाय अधू झाला. या शारीरिक व्याधीमुळे त्यांना बालपणात बराच मानसिक त्रास सहन करावा लागला, पण याच वेदनेने त्यांच्यातील कवीला अधिक प्रगल्भ केले. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अमरावतीतच झाले. त्यांना अभ्यासापेक्षा कविता आणि ...

स्वतःच्या मनगटावरचा विश्वास...!

इमेज
स्वतःच्या मनगटावरचा विश्वास...! स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेल्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही… जीवनाच्या प्रवासात माणसाला अनेक प्रकारच्या अडचणी, संकटे आणि आव्हाने भेटत असतात. काही वेळा समोरची परिस्थिती इतकी कठीण असते की ती पाहून मन घाबरून जाते. पण काही माणसं अशी असतात की जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी डगमगत नाहीत. कारण त्यांचा विश्वास दुसऱ्यांच्या ताकदीवर नसतो, तर स्वतःच्या मनगटावर असतो. स्वतःच्या मनगटावर विश्वास असलेला माणूस कधीही दुसऱ्याच्या सामर्थ्याला घाबरत नाही. त्याला माहित असते की खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द या तीन गोष्टी ज्या माणसाच्या आयुष्यात असतात, त्याला कुणीही सहज हरवू शकत नाही. कारण तो प्रत्येक संकटाला घाबरून मागे हटत नाही, तर त्याला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतो. अशा माणसांच्या डोळ्यांत स्वप्नं असतात, पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्दही असते. त्यांच्या मनात अपयशाची भीती नसते, कारण त्यांना माहित असते की प्रत्येक अपयश ही यशाकडे नेणारी एक पायरी असते. म्हणूनच ते पडले तरी पुन्हा उभे राहतात, हारले तरी...

दि.१५ मार्च २०२६ ला असलेल्या मान्यवर कांशिराम साहेबांच्या ९२ व्या जयंती निमित्त लेख .

इमेज
दि.१५ मार्च २०२६ ला असलेल्या मान्यवर कांशिराम साहेबांच्या ९२ व्या जयंती निमित्त लेख . -------------------------------------------------- बहुजन सत्तेचे शिल्पकार मान्यवर कांशीरामजी             शोषितांना सत्तेची स्वप्ने पाहायला शिकविणारे बहुजन नायक,शून्यातून विश्व निर्माण करणारे महामानव,वोट आमचा, राज तुमचे नाही चालणार! या घोषणेचे निर्माता,राजकीय क्रांतीचे प्रणेते,बहुजन सत्तेचे शिल्पकार,सायकलवरून सत्तेपर्यंत पोहोचणारे राजकारणी,एक अकल्पनीय राजकीय संघर्ष करणारे 'चाणक्य',कोट्यवधी लोकांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, "ज्याची जेवढी संख्या भारी, त्याची तेवढी हिस्सेदारी"  हा प्रेरणादायी विचार बहुजन समाजाला देणारे मान्यवर कांशीराम साहेबांना ९२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥             सन - १९३४ सालातील मार्च मासाच्या १५ तारखेला जन्मलेल्या कांशीरामजींचे नाव त्यांच्या स्वकर्तृत्वाने बहुजन समाजातील बहुजन रत्न समाजरत्न,बहुजन नायक म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेले. त्यांचा जन्म पंजाबमधील रोपड जिल्ह्...

मागे बोलणाऱ्यांपेक्षा सोबत उभे राहणारेच खरे...!

इमेज
मागे बोलणाऱ्यांपेक्षा सोबत उभे राहणारेच खरे...! आयुष्यात एक गोष्ट खूप लवकर समजून घ्यावी लागते. जगाचं काम आहे बोलणं. आपण काही केलं तरी लोक बोलतात, आणि काही केलं नाही तरीही लोक बोलतात. म्हणून आपल्या मागे कोण काय बोलतं याचा विचार करत बसलो, तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. खरं तर आपल्या मागे बोलणाऱ्यांची हिम्मत इतकीच असते की ते फक्त पाठीमागे बोलू शकतात; समोर येऊन सत्य बोलण्याचं धैर्य मात्र त्यांच्यात नसतं. म्हणूनच जेव्हा लोक आपल्या मागे बोलतात आणि समोर येऊन काही बोलू शकत नाहीत, तेव्हाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा खरा विजय झालेला असतो. या जगात प्रत्येक जण सल्ला देण्यासाठी तयार असतो. “असं कर, तसं करू नको,” “ही वाट सोपी आहे,” “तो मार्ग योग्य नाही” अशा असंख्य गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालायचं काम मात्र आपल्यालाच करावं लागतं. कारण आपल्या स्वप्नांचा भार दुसरं कोणी उचलत नाही, आपल्या संघर्षाचं ओझंही आपल्यालाच वाहावं लागतं. आयुष्याचा प्रवास कितीही लोकांमध्ये सुरू झाला तरी शेवटी तो प्रवास अनेकदा एकट्यालाच पूर्ण करावा लागतो. ...

संस्कारांचा वारसा आणि लोकसेवेची नवी दिशा....!

इमेज
संस्कारांचा वारसा आणि लोकसेवेची नवी दिशा....! एरंडोलच्या भूमीत अनेक साधी, परंतु प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे जन्माला आली आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे मयूर दिलीप महाजन लोकांच्या विश्वासावर निवडून आलेले एक तरुण नगरसेवक. साध्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण आज समाजसेवेच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे आणि त्यामागे आहे एका महान वारशाची प्रेरणा. एरंडोल येथील मध्यमवर्गीय कुटुंबात मयूर महाजन यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम असली, तरी घरात मिळालेल्या संस्कारांची श्रीमंती मात्र अपार होती. त्यांच्या घरात कायम आदराने उच्चारले जाणारे एक नाव होते.स्वर्गीय आत्माराम सयाजी महाजन. हे नाव केवळ कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर एरंडोलच्या जनतेच्या मनातही अत्यंत सन्मानाने घेतले जात असे. स्व. आत्माराम सयाजी महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांनी सलग पाच पंचवार्षिक काळ बिनविरोध नगरसेवक म्हणून सेवा बजावली होती आणि उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारीही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली होती.साधेपणा,प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी अखंड झटण्याची वृत्ती हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय...

जगाच्या गोंधळात मनाचा खरा आधार...!

इमेज
जगाच्या गोंधळात मनाचा खरा आधार...! समाजाला नष्ट करणारी शक्ती नेहमीच वाईट माणसांच्या रूपात दिसते, असे आपण सहज मानतो. पण वास्तव थोडं वेगळं असतं. अनेकदा समाजाचं खरं नुकसान वाईट लोकांमुळे नाही, तर चांगल्या माणसांच्या शांततेमुळे होतं. कारण वाईट माणसं अन्याय करतात, पण जेव्हा चांगली माणसं ते पाहून ही गप्प बसतात, तेव्हा त्या अन्यायाला एक न बोललेली परवानगी मिळते. वाईटपणाची ताकद त्याच्या आवाजात नसते; ती चांगुलपणाच्या शांततेत असते. जेव्हा सत्य माहीत असूनही कोणी बोलत नाही, तेव्हा खोटं अधिक बळकट होतं. म्हणूनच समाजाला बदलायचं असेल तर फक्त वाईटपणाला दोष देऊन चालत नाही, तर चांगुलपणाला आवाज द्यावा लागतो. देवाने आपल्या हातावर नशिबाच्या रेषा काढल्या, पण त्याच हाताला बोटेसुद्धा दिली. या गोष्टीत एक खोल अर्थ दडलेला आहे. नशीब आपल्याला दिशा देतं, पण त्या दिशेने चालण्याची ताकद मेहनतीत असते. केवळ नशिबाची वाट पाहत बसलो तर आयुष्य पुढे सरकत नाही. प्रयत्न, संघर्ष आणि सातत्य यांच्या साथीनेच नशीब उजळतं. आयुष्यात काही प्रश्न असे असतात, की ते कितीही प्रयत्न केले तरी लगेच सुटत नाहीत. त्या क्षणी मन अस्वस्थ हो...

कडू शब्द पण स्वच्छ मन....!

इमेज
कडू शब्द पण स्वच्छ मन....! “फक्त तोंडापुरते गोड बोलणे किंवा शांत राहणे कधीच जमले नाही, म्हणून फटकळ स्वभावच अंतःकरण स्वच्छ ठेवतो.” प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक शब्दांमध्ये साखर मिसळून बोलतात, तर काही लोक मनात जे असते ते सरळ ओठांवर आणतात. काहींना समोरच्याला खुश ठेवण्यासाठी गोड बोलणे सहज जमतं, तर काहींना ते कधीच जमत नाही. कारण त्यांच्यासाठी शब्दांपेक्षा सत्य अधिक महत्त्वाचं असतं. अशा लोकांना अनेकदा “फटकळ” म्हटलं जातं. पण खरं पाहिलं तर त्या फटकळ स्वभावाच्या मागे एक वेगळीच प्रामाणिकता आणि अंतःकरणाची स्वच्छता दडलेली असते. फटकळ स्वभाव म्हणजे कठोरपणा नव्हे; तो मनात काहीही न साठवण्याची सवय असते. जे वाटतं ते स्पष्टपणे बोलून टाकण्याचं धाडस असतं. कधी कधी ते शब्द थोडे कडू वाटतात, काहींना त्यातून त्रासही होतो, पण त्या शब्दांमध्ये कपट नसतं. कारण त्या बोलण्यात बनावटपणा नसतो.फक्त मनाची पारदर्शकता असते. आजच्या जगात अनेक लोक समोर गोड बोलतात, पण मनात वेगळेच विचार ठेवतात. चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात मत्सर, स्पर्धा किंवा दिखावा दडलेला असतो. शब्द गोड असतात, पण भावना मात्र तितक्या ...

आयुष्यातील देवाची भेट अनमोल माणसं....!

इमेज
आयुष्यातील देवाची भेट अनमोल माणसं....! देव कधी कधी आपल्या आयुष्यात काही खास माणसं पाठवतो… अगदी शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता. त्यांची येण्याची एंट्री जोरात नसते, कोणताही इशारा मिळत नाही; पण अचानकच ती माणसं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. जणू देवानेच आपल्या प्रवासासाठी योग्य सोबती, योग्य मार्गदर्शक निवडून पाठवलेले असतात. ही माणसं आपल्या आयुष्यात “योगायोग” म्हणून येतात, पण नंतर कळतं.तो योगायोग नसतो… तो देवाचा नियोजन असतो. आपण हरवलो असतो तेव्हा त्यांचा एक शब्द आपल्याला सावरतो. आपण चुकीच्या वाटेवर वळतो तेव्हा त्यांची शांत समज आपल्याला योग्य मार्गावर आणते. त्यांच्या विश्वासामुळे आणि आपल्या क्षमतेवर असलेल्या श्रद्धेमुळे ती माणसं आपल्या आयुष्याची खरी ताकद बनतात. ही माणसं मोठ्या शब्दांत शिकवत नाहीत; पण त्यांच्या साध्या वागण्यातून, कृतीतून, आणि नजरेतील विश्वासातून आपल्याला दिशा मिळते. आपण खचलेलो असतो, ते हात धरून उभे राहतात; आपण चुकलो, तर रागावतात पण सोडत नाहीत. आपले यश साजरे करतात, अपयशात खंबीरपणे साथ देतात. पण आयुष्याची वेदनादायी गोष्ट अशी आहे की, आपण अनेकदा या माणसांची कि...