जिंकलो तरी इतिहास हरलो तरी इतिहास....!
जिंकलो तरी इतिहास हरलो तरी इतिहास....! स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा आत्मसन्मान ही माणसाच्या आयुष्याची खरी ओळख असते.माणूस किती श्रीमंत आहे, किती यशस्वी आहे, किती लोक त्याच्या भोवती आहेत… यापेक्षा तो स्वतःच्या नजरेत किती उंच आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण जग आपल्याला आपल्या कर्तृत्वाने ओळखतं; पण आपण स्वतःला आपल्या स्वाभिमानाने ओळखतो. स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही.स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव.आत्मसन्मान म्हणजे स्वतःवर ठेवलेला विश्वास. जीवनाच्या वाटेवर चालताना अनेक अडचणी येतात. कधी परिस्थिती आपल्याला गुडघ्यावर आणते, कधी माणसं शब्दांनी जखमा करतात, कधी अपयश मनाचा कणा मोडून टाकतं. पण त्या क्षणी जर आपण स्वतःला विसरलो, स्वतःचाच आदर करायला सोडलं. तर खरी हार तिथेच होते. जिद्दीने उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नाही. जिद्दीने उभं राहणं म्हणजे पडून ही पुन्हा उभं राहण्याची तयारी ठेवणं.जगातील कुठलीही अडचण तुम्हाला हरवू शकत नाही,जो पर्यंत तुम्ही स्वतःला हरू देत नाही. आयुष्यात स्वतःला कधीही "उध्वस्त" होऊ देऊ नका. कारण जग खूप व्यावहारिक आहे.ढासळलेल्या घराच्य...