पोस्ट्स

अपयशाच्या सावलीत उमललेली आशा....!

इमेज
अपयशाच्या सावलीत उमललेली आशा....! अपयश… एक असा शब्द, जो ऐकतानाच मन थोडंसं खचतं. डोळ्यांसमोर तुटलेली स्वप्नं, अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा आणि स्वतःवरच आलेला राग उभा राहतो. पण खरं सांगायचं झालं, तर ह्याच अपयशाच्या राखेतून संघर्षाची ज्वाला पेटते. कारण ज्याने कधी हरायचं दुःख अनुभवलंय, त्यालाच जिंकण्याची खरी किंमत कळते. अपयश आपल्याला थांबवत नाही; ते आपल्याला थोडं मागे खेचतं, स्वतःकडे पाहायला लावतं. “नेमकं कुठे चुकलो?” हा प्रश्न विचारायला भाग पाडतं. आणि हाच प्रश्न पुढील प्रवासाची दिशा ठरवतो. यश सहज मिळालं, तर त्याची नशा असते; पण संघर्षातून मिळालेलं यश आत्म्याला भिडतं. कारण त्या यशामागे अश्रूंचे थेंब, झोप न लागलेल्या रात्री आणि स्वतःशी केलेली शांत लढाई दडलेली असते. ज्याच्या पाठीशी अपयशाची कथा असते, त्याची लेखणी अधिक प्रामाणिक होते. शब्दांमध्ये अनुभवाचा भार असतो. प्रत्येक ओळीत वेदनेची आठवण असते, पण त्याचबरोबर आशेची ठिणगीही असते. अशा माणसाला माहीत असतं.आजचा अंधार कायमचा नसतो. कारण तो आधीही कोसळलाय आणि पुन्हा उभाही राहिलाय. संघर्षाची गाथा लिहिताना तो स्वतःलाच धीर देतो. “मी अपयशी ठरलो ह...

विश्वासाचं फळ....!

इमेज
विश्वासाचं फळ....! विश्वास म्हणजे नुसता शब्द नाही, तो मनाचा एक नाजूक धागा असतो. हा धागा आपण कोणाच्या तरी हातात देतो तेव्हा त्यामागे अपेक्षा नसते,तर एक शांत विश्वास असतो.की समोरची व्यक्ती आपली भावना जपेल. शंका न करता दिलेला विश्वास हा सहज दिला जात नाही; तो मनाच्या खोल पातळीवरून येतो. आणि म्हणूनच तो आपली परीक्षा घेतो. ही परीक्षा कठोर असते, पण अन्यायकारक कधीच नसते. कारण तिचा निकाल दोनच मार्गांनी समोर येतो. कधी आयुष्यभरासाठी सोबत करणारी,मन ओळखणारी, आपल्याला आपलंसं मानणारी एक चांगली व्यक्ती भेटते. आणि कधी असा अनुभव मिळतो, जो मनाला दुखावतो, डोळ्यांत पाणी आणतो, पण आयुष्यभरासाठी एक अमूल्य धडा देऊन जातो. विश्वास ठेवणं ही कमजोरी नाही; ती धाडसाची, प्रामाणिकपणाची आणि माणुसकीची खूण आहे. फसवणूक झाली म्हणून विश्वास चुकीचा ठरत नाही. उलट, त्या क्षणी समोरच्याच व्यक्तीचा खरा चेहरा दिसून येतो. आपण कोणावर विश्वास ठेवला, यासाठी स्वतःला दोष देणं म्हणजे आपल्या निर्मळ मनालाच शिक्षा देणं ठरतं. चांगली व्यक्ती मिळाली तर आयुष्य समृद्ध होतं. नात्यांना अर्थ मिळतो, मनाला आधार मिळतो, आणि जग थोडं अधिक आपुलक...

उधार यशाची व्याजासकट परतफेड....!

इमेज
उधार यशाची व्याजासकट परतफेड....! नियती कुणालाच सोडत नाही मित्रा…हे वाक्य ऐकायला कठोर वाटतं, पण आयुष्याच्या प्रवासात त्याचं सत्य हळूहळू उलगडत जातं. कारण नियती आरडाओरडा करत नाही, ती शांतपणे पाहत राहते.माणसाची वागणूक, त्याचे शब्द, आणि त्याने दिलेल्या जखमा. काही लोक नाती विसरतात, भावना पायदळी तुडवतात, विश्वास घातालाच शहाणपण समजतात. क्षणभर ते यशस्वी दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या आयुष्याचा झगमगाट लोकांना भुरळ घालतो. पण ते हसू खोलवर पोहोचत नाही. कारण ते बाहेरचं असतं… आत मात्र अस्वस्थतेचा कोलाहल सुरू असतो. आयुष्याचा हिशोब लगेच होत नाही. तो वेळ घेतो. कारण वेळच खरी न्यायाधीश असते.निःपक्षपाती, न चुकणारी. आज ज्या भावना दुर्लक्षित केल्या जातात, त्याच उद्या जखम बनून उभ्या राहतात. आज ज्या शब्दांना किंमत दिली जात नाही, तेच उद्या आठवणींमध्ये टोचत राहतात. माणूस ज्या वर्तनाने जगतो, त्याच वर्तनाची सावली त्याच्या मागे चालत असते. ती सावली कधी उजेडात दिसत नाही, पण अंधारात ती अधिक ठळक होते. कुणाचं मन दुखावून पुढे गेलेला माणूस किती ही पुढे गेला, किती ही मोठा झाला, तरी आतून तो कधीच पू...

शब्दांविना बोलणारी माणुसकी.....!

इमेज
शब्दांविना बोलणारी माणुसकी.....! या जगात असे अनेक जीव आहेत, ज्यांना शब्दांची देणगी मिळालेली नाही; पण त्यांचे दुःख, वेदना आणि प्रेम मात्र बोलके असते. हीच आहेत मूक दया ज्या आवाजाविना आपल्याला माणुसकीची जाणीव करून देतात. माणूस आपल्या वेदना शब्दांत मांडू शकतो, मदतीसाठी हाक मारू शकतो. पण मूक जीवांना ते शक्य नसते. भुकेने व्याकुळ झालेले पिल्लू, अपघातात जखमी झालेला प्राणी, पावसात कुडकुडणारा पक्षी हे सर्व आपल्याकडे मदतीची याचना करत असतात, पण न बोलता. त्यांच्या डोळ्यांत प्रश्न असतो.“माझे ही या जगात स्थान नाही का?” मूक दयांवर होणारी क्रूरता मन सुन्न करणारी आहे. त्यांना मारहाण करणे, हाकलून देणे, जखमी अवस्थेत सोडून देणे.हे सगळे आपण पाहतो, पण अनेकदा दुर्लक्ष करतो. त्यांची वेदना न बोलता सहन करण्याची ताकद आपल्याला आरसा दाखवते. आपण स्वतःला सुजाण म्हणवतो, पण मूक दयांकडे पाहताना आपल्या संवेदना कुठे हरवतात? मूक दयांचे प्रेम अतिशय निर्मळ असते. ते स्वार्थ ओळखत नाही, फसवणूक जाणत नाही. तुम्ही दिलेल्या एका क्षणाच्या मायेवर ते आयुष्यभर विश्वास ठेवतात. त्यांच्या नजरेतला आधार, शेपटी हलवणार...

उत्तरे प्रत्येकाकडे असतात.....!

इमेज
उत्तरे प्रत्येकाकडे असतात.....! उत्तरे ही प्रत्येकाकडे असतात, पण ती नेहमी शब्दांत मांडली जातीलच असं नाही. काही उत्तरं आवाजात नसतात, ती माणसाच्या जगण्यात उतरलेली असतात. म्हणूनच काही लोक गप्प असतात.कमतरतेमुळे नाही, तर परिपक्वतेमुळे. शांत माणूस अनेकदा गैरसमजाचा बळी ठरतो. त्याच्या शांततेला दुर्बलता समजली जाते, त्याच्या मौनाला अपुरेपणाचं लेबल लावलं जातं. पण खरं पाहिलं तर शांतता ही कमकुवतांची ढाल नसते; ती स्वतःची दिशा ठाऊक असणाऱ्यांची ओळख असते. ज्यांना आपण कुठे उभे आहोत हे माहीत असतं, त्यांना प्रत्येक वळणावर घोषणा करावी लागत नाही. प्रत्येक वादाला उत्तर देणं ही बुद्धिमत्ता नसते. कधी कधी ते आतल्या असुरक्षिततेचं द्योतक असतं. स्वतःवर विश्वास असेल, तर प्रत्येक प्रश्नाला लगेच प्रत्युत्तर द्यावंसं वाटत नाही. काही वेळा मौन हेच सर्वात ठोस उत्तर ठरतं. कारण शब्द जिंकवू शकतात, पण मूल्येच माणसाला उभं ठेवतात. जे तत्वांवर जगतात त्यांना सतत स्पष्टीकरण देण्याची घाई नसते. त्यांना माहीत असतं.वेळच सर्वात प्रामाणिक साक्षीदार आहे. आज न समजलेली भूमिका उद्या आपोआप स्पष्ट होते. आज दुर्लक्षित झालेली शांतत...

स्वतःचा निर्णय…..!

इमेज
स्वतःचा निर्णय…..! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सल्ले देणारे अनेकजण भेटतात.कोणी आपुलकीने,कोणी अनुभवाच्या जोरावर, तर कोणी केवळ बोलण्यापुरते. सल्ला देणं खूप सोपं असतं, कारण त्या मागे जबाबदारी नसते. पण जेव्हा त्या सल्ल्याचे परिणाम भोगायची वेळ येते, तेव्हा मात्र सगळेच मागे हटतात. कारण त्या निर्णयाचं ओझं,त्या चुकांची वेदना आणि त्या यशाचं वजन शेवटी आपल्यालाच वाहावं लागतं. प्रत्येक माणूस आपापल्या अनुभवाच्या चष्म्यातूनच आपल्याला जग दाखवत असतो. त्याचा अनुभव चुकीचा नसतो, पण तो आपला अनुभव ही नसतो. आपली परिस्थिती, आपली वेदना, आपली स्वप्नं आणि आपली मर्यादा हे सगळं वेगळं असतं. म्हणूनच कोणाला ही पूर्णपणे आपली जागा घेता येत नाही. आपण काय सहन करतोय, काय गमावतोय किंवा काय मिळवू शकतोय हे खरं तर आपल्यालाच माहीत असतं. निर्णय घेताना चूक होण्याची भीती सगळ्यांनाच वाटते. पण चूक न करता शिकलेला धडा फार काळ टिकत नाही. चुकून शिकलेला धडा मात्र आयुष्यभर साथ देतो. धाडसा शिवाय यश मिळत नाही, आणि अपयशा शिवाय अनुभव येत नाही. जे कधीच धोका घेत नाहीत,ते कधीच स्वतःला ओळखू शकत नाहीत. लोक आज सल्ला देतील, उद...

अहंकारात हरवलेली माणुसकी....!

इमेज
अहंकारात हरवलेली माणुसकी....! कपटी माणसाचा मार्ग सुरुवातीपासूनच घाणेरडा असतो. तो चालतो तेव्हा पायाखालची मातीच नव्हे, तर आजूबाजूची नातीही मळकट होतात. बाहेरून हसरा, गोड बोलणारा, पण आतून स्वार्थाच्या विळख्यात अडकलेला असा हा माणूस सत्याशी कधीच प्रामाणिक नसतो. त्याच्या प्रत्येक पावलामागे एखादा डाव, एखादी लपलेली अपेक्षा असते. विश्वास त्याच्यासाठी साधन असतो, मूल्य नव्हे. अहंकाराच्या आंधळेपणात त्याला स्वतःची चूक कधीच दिसत नाही. कारण चूक पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा मन स्वच्छ असावं लागतं. “मीच योग्य” या गर्वाच्या कवचात तो इतका गुरफटतो की समोर उभं असलेलं सत्य ही त्याला धूसर दिसतं. कोणी आरसा दाखवला तर तो आरसा फोडतो; पण चेहऱ्यावरची मळ पुसण्याचा विचार करत नाही. सल्ला त्याला अपमान वाटतो, आणि सुधारणा त्याला कमजोरी वाटते. कपटी माणूस इतरांसाठी खड्डे खोदताना थकत नाही. कधी शब्दांनी, कधी डावपेचांनी, तर कधी खोट्या कथा रचून तो इतरांना अडचणीत आणतो. त्याला वाटतं आपण फार हुशार आहोत, आपली खेळी कुणालाच कळणार नाही. पण काळ हा सर्वांत मोठा साक्षीदार असतो. तो शांतपणे पाहत राहतो आणि योग्य क्षणी सत्य उघडं करत...

नियतीचा अटळ हिशोब......!

इमेज
नियतीचा अटळ हिशोब......! नियती कुणालाच वाचवत नाही.हे वाक्य ऐकायला जरी कठोर वाटत असलं, तरी आयुष्याच्या प्रवासात त्याची सत्यता वारंवार सिद्ध होत जाते. माणूस कितीही हुशार असो, कितीही यशस्वी दिसत असो, पण कर्माच्या पलीकडे जाण्याची ताकद कुणातच नाही. कारण नियती पाहत असते.शांतपणे, संयमाने आणि अचूकपणे. आयुष्यात काही लोक पुढे जाताना नाती मागे सोडतात. भावना ओझं वाटू लागतात, विश्वास अडथळा वाटतो. अशा वेळी ते यशस्वी झाल्यासारखे भासतात. चेहऱ्यावरचं बनावटी हसू, समाजात मिळणारी प्रतिष्ठा आणि वरवरचं सुख पाहून अनेक जण त्यांच्यावर विश्वास ठेवतात. पण हे सगळं फक्त बाह्य आवरण असतं. आतमध्ये मात्र आत्मा अस्वस्थ असतो, कारण ज्याने कुणाचं मन दुखावलं आहे तो माणूस स्वतःशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही. आयुष्याचा हिशोब लगेच मांडला जात नाही. कारण वेळ हीच खरी न्यायाधीश आहे. ती कुणाच्या बाजूने उभी राहत नाही, तर सत्याच्या बाजूने उभी राहते. आज ज्या भावना दुर्लक्षित केल्या जातात, त्याच भावना उद्या जखम बनून उभ्या राहतात. आज पायदळी तुडवलेला विश्वास उद्या प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं कारणांनी देता येत ...

मनातली जागा…...!

इमेज
मनातली जागा…...! मनातली जागा ही माणसाच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान जागा असते. ती दिसत नाही, मोजता येत नाही, पण तिचं अस्तित्व प्रत्येक श्वासात जाणवतं. पैसा माणसाला घर देऊ शकतो, गाडी देऊ शकतो, मोठं पद आणि नाव देऊ शकतो; पण कुणाच्या मनातली जागा मात्र विकत घेता येत नाही.ती मिळते फक्त माणुसकीतून, प्रामाणिकपणातून आणि निखळ भावनांतून. एखाद्याच्या मनात घर बांधायचं असेल तर भिंती शब्दांच्या नसतात, तर त्या विश्वासाच्या असतात. छप्पर दिखाव्याचं नसतं, तर आपुलकीचं असतं. तिथे वावरण्यासाठी श्रीमंती लागत नाही; लागतं ते फक्त “आपलं” असणं. दोन प्रेमळ शब्द, वेळेवर दिलेली साथ, अडचणीत धरलेला हात एवढंच पुरेसं असतं मनात खोलवर उतरायला. आजच्या धावपळीच्या जगात सगळेच काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत आहेत. पैसा, प्रतिष्ठा, यश यांची यादी संपतच नाही. पण या सगळ्या गर्दीत एक गोष्ट मात्र नकळत मागे पडते भावना. आणि गंमत अशी की आयुष्याच्या शेवटी जे उरतं, ते हेच भावनिक ऋणानुबंध असतात.लोक तुमचं काय बोलणं विसरतील, तुम्ही काय दिलं तेही विसरतील, पण तुम्ही त्यांना कसं वाटू दिलं, ही जाणीव मात्र आयुष्यभर सोबत राहते. दिखाव...

ओठांवर हसू, पोटात काळजी जपायचे कोण....?

इमेज
ओठांवर हसू, पोटात काळजी जपायचे कोण....? नवीन वर्ष… नव्या आशा, नव्या स्वप्नांची चाहूल घेऊन येतं. पण या नव्या सुरुवातीला एक शांत, पण महत्त्वाचा संकल्प करायला हवा स्वतःच्या मनाच्या सुरक्षिततेचा. जग अनुभवातून शिकतं, फसवणुकीतून शहाणं होतं. पण आपण मात्र विश्वास ठेवत ठेवत अनेकदा स्वतःलाच दुखावत राहतो. कारण आपल्याला वाटतं.आपल्या आजूबाजूची सगळी माणसं आपलीच आहेत. पण सत्य तितकंसं सोपं नसतं. इतिहास साक्षी आहे.घात हा नेहमी शत्रूकडून नाही, तर जवळच्या माणसाकडूनच होतो. जिथे डोळे मिटून विश्वास ठेवला जातो, तिथेच विश्वासघाताची शक्यता सर्वाधिक असते. काही लोकांचे शब्द गोड असतात, पण हेतू कडू. ओठांवर हसू असतं, पण पोटात मात्र वेगळंच काही शिजत असतं. समोर पाठ थोपटणारी हीच माणसं मागे तुमच्याच पायाखाली खड्डे खोदत असतात. त्यांच्या “आपुलकी”त स्वार्थाची धार लपलेली असते, आणि त्यांच्या “सल्ल्या”त तुमच्या अपयशाची चाहूल असते. आपण चुकतो तेव्हा, जेव्हा वारंवार दुखावलं जाऊनही “कदाचित यावेळी नाही” असं म्हणून पुन्हा विश्वास ठेवतो. मनाचं हृदय फार मोठं असणं ही कमजोरी नाही; पण सगळ्यांसाठी दार उघडं ठेवणं ही नक्कीच चू...

गरज संपली की माणसं बदलतात…..!

इमेज
गरज संपली की माणसं बदलतात…..! “गरज संपली की माणसं बदलतात” हे वाक्य आपण ऐकलेलं असतं; पण जोपर्यंत आयुष्य स्वतः ते शिकवत नाही, तोपर्यंत त्यामागची खोल वेदना उमगत नाही. अनुभवाच्या वाटेवर चालताना कळतं की हे शब्द केवळ वाक्य नसून, वास्तवाचं एक बोचणारं सत्य आहे. आणि जेव्हा हे सत्य आपल्याच जवळच्या माणसांकडून समोर येतं, तेव्हा वेदना अधिक तीव्र होतात, कारण अपेक्षांची मुळे तिथेच खोलवर रुजलेली असतात. उपयोग असे पर्यंत मायेची भाषा, हक्काची वागणूक आणि आपुलकीची उब लाभते. मात्र गरज संपताच तेच नाते थंड होतं, आणि अंतर नकळत वाढू लागतं. कोणी थेट दुखावत नाही, शब्दांनी जखम करत नाही; पण दुर्लक्षाची शांतता असंख्य वेदना बोलून दाखवते. तेव्हा जाणवतं की माणसं बदलली नाहीत, तर वेळेने त्यांच्या खऱ्या स्वभावावरचा पडदा दूर केला आहे. नात्यांची किंमत केवळ गरजेनुसार ठरवणारी माणसं कधीच आपली नसतात. ती आपल्या आयुष्यातील एखाद्या टप्प्यापुरतीच सोबत असतात. विश्वास तुटतो तेव्हा कुठला ही आवाज होत नाही.ना रडणं,ना ओरडणं. मात्र मनाच्या आत काहीतरी कोसळतं; एक आधार, एक आपुलकी, एक भ्रम.त्या तुटलेल्या विश्वासाच्या अवशेषांतून स्...

शिक्षण, सत्य आणि समाजसेवेचे आदर्श व्यक्तिमत्त्व...!

इमेज
शिक्षण, सत्य आणि समाजसेवेचे आदर्श व्यक्तिमत्त्व...! आदरणीय श्री. मंगल बी. पाटील सर सेवानिवृत्त प्राचार्य, क्राइम बुलेट न्यूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच वीर गुर्जर सेनेचे कर्तव्यनिष्ठ सचिव हे नाव समाजात केवळ ओळखीपुरते मर्यादित नसून, ते प्रेरणा, नेतृत्व आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनले आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या मंगलमय क्षणी मन भरून येते. कारण आपण आयुष्यभर ज्या निष्ठेने शिक्षण, पत्रकारिता आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रांत कार्य केले, त्याने असंख्य जीवनांना दिशा दिली. प्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कार, शिस्त आणि जबाबदारीची भावना रुजवण्याचे महान कार्य आपण केले. अनेक विद्यार्थी आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्यामागे आपल्या मार्गदर्शनाची छाया आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात क्राइम बुलेट न्यूजच्या माध्यमातून आपण सत्य, निर्भयता आणि प्रामाणिकपणाचा आवाज बनलात. समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहताना, दुर्बलांच्या बाजूने ठामपणे बोलताना आपण कधीही आपली मूल्ये सोडली नाहीत. हीच नितळ भूमिका आपल्याला लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवून देते. वीर गुर्जर सेनेच्य...

अपमानाच्या सावलीत गमावलेलं स्वतःपण....!

इमेज
अपमानाच्या सावलीत गमावलेलं स्वतःपण....! जिथे मान राखला जात नाही, तिथे थांबणं म्हणजे हळूहळू स्वतःला मिटवत जाणं असतं. सुरुवातीला ते फक्त शब्द असतात, कधी दुर्लक्ष, कधी उपहास, कधी शांतपणे केलेला अपमान. पण काळ जसजसा पुढे सरकतो, तसं ते शब्द मनावर ओरखडे काढू लागतात. माणूस हसत राहतो, वागत राहतो; पण आत कुठेतरी तो रोज थोडासा तुटत असतो. आदर मागून मिळत नाही. तो कुणाच्या कृपेनं दिले जाणारे दान नाही.आदर हा वागण्यातून उमटतो. डोळ्यांतल्या सन्मानातून, शब्दांच्या सौम्यतेतून, आणि ऐकून घेण्याच्या तयारीतून. जिथे शब्दांपेक्षा आवाज मोठा असतो, तिथे मन कायम दबलेलं राहतं. तिथे स्वतःचं मत मांडताना धडधड वाढते, चूक नसताना ही अपराधी वाटू लागतं. अपमान जर सवय बनली, तर आत्मसन्मान नकळत गळून पडतो. सुरुवातीला आपण स्वतःलाच समजावतो “चालतंय”, “त्यांचा स्वभावच असा आहे”, “मीच adjust करतो”. पण adjust करत करत एक दिवस लक्षात येतं की आपण स्वतःपासूनच दूर गेलो आहोत. नातं असो, कामाची जागा असो किंवा मैत्री मान नसेल, तर ते नातं आधार न राहता ओझं बनतं. सहनशीलता ही मोठी गुणवैशिष्ट्य आहे; पण स्वतःला गमावणं ही त्याची किंमत असू ...

संघर्ष, सेवा आणि नेतृत्वाची नवी ओळख प्रदीपभाऊ गुजर...!

इमेज
संघर्ष, सेवा आणि नेतृत्वाची नवी ओळख प्रदीपभाऊ गुजर...! भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका पश्चिम विभाग ओबीसी आघाडी तालुकाध्यक्षपदी श्री. प्रदीपभाऊ गुजर यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! समाजकारणात काही व्यक्ती अशा असतात की ज्या केवळ पदासाठी नव्हे, तर लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी काम करतात. त्यांच्या कार्यातून विश्वास निर्माण होतो, त्यांच्या शब्दांत आपुलकी असते आणि त्यांच्या कृतीत समाजासाठीची निष्ठा दिसून येते. अशाच कर्तृत्ववान आणि संवेदनशील नेतृत्वाचा गौरव म्हणजे श्री. प्रदीपभाऊ गुजर यांची भारतीय जनता पार्टीच्या जामनेर तालुका पश्चिम विभाग ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी झालेली निवड होय. ही निवड केवळ एका पदाची नाही, तर त्यांच्या प्रामाणिक कार्याची, संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाची पोचपावती आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी नातं जपणारे, प्रत्येकाच्या अडचणी आपल्यासारख्या समजून घेणारे आणि नेहमी सकारात्मक मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणून प्रदीपभाऊंची ओळख आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी, न्यायासाठी आणि सन्मान...

संघर्षातून घडलेले कर्तृत्व शिक्षक आदरणीय श्री. बुधाकर देवलाल गुजर...!

इमेज
संघर्षातून घडलेले कर्तृत्व शिक्षक आदरणीय श्री. बुधाकर देवलाल गुजर...! आजचा दिवस हा केवळ एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा नसून, संघर्षातून घडलेल्या यशाचा, कर्तृत्वाचा, संस्कारांचा आणि समाजासाठी अर्पण केलेल्या आयुष्याचा गौरव करणारा दिवस आहे. आदरणीय श्री. बुधाकर (सर) देवलाल गुजर यांनी आपल्या आयुष्याची ७५ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा केला आहे. या मंगलप्रसंगी त्यांना मनःपूर्वक अभिनंदन व कोटी कोटी शुभेच्छा! जांभोरे येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या जिद्दी व्यक्तिमत्त्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि शिक्षणावरील निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी शिक्षक म्हणून समाजात आपला ठसा उमटवला. माध्यमिक शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी केवळ धडे शिकवले नाहीत,तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, संस्कार आणि स्वप्ने रोवली. निवृत्तीनंतर शांत बसणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. समाजासाठी काहीतरी देण्याची तळमळ त्यांच्या मनात कायम होती. याच भावनेतून त्यांनी धानोरा गावात स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. ग्रामीण भा...