पोस्ट्स

khandesh majha लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दिलदार मनाचा दिलदार माणूस – अशोक भाऊ मोरे

इमेज
दिलदार मनाचा दिलदार माणूस – अशोक भाऊ मोरे कधी कधी माणसाच्या चेहऱ्यावरच आपुलकीचं तेज असतं, त्याच्या शब्दांमध्ये मायेचा स्पर्श असतो आणि त्याच्या वागणुकीत एक असा विश्वास असतो की जो प्रत्येक ह्रदयाला भिडतो. अशोक भाऊ मोरे हे त्याच दिलदार मनाच्या, प्रेमळ स्वभावाच्या माणसांचं सुंदर उदाहरण आहेत. त्यांच्या हास्यात एक निरागसता आहे, त्यांच्या डोळ्यात माणुसकीचं खोल समुद्र आहे आणि त्यांच्या मनात प्रत्येकासाठी आपुलकीचा अथांग सागर आहे. कोणत्याही संकटात धीर देणारा, प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहणारा आणि कायम मदतीला धावून जाणारा हा माणूस म्हणजे आपल्या गावाचा, आपल्या समाजाचा खरा हिरा. कधी कुणी काही मागितलं नाही तरी पुढे येऊन मदतीचा हात देणं, कोणाचं दु:ख पाहिलं की ते स्वतःचं मानून दूर करण्याची तळमळ, आणि कोणाच्या आनंदात जीव ओतून सहभागी होणं… अशोक भाऊंच्या रक्तात माणुसकीचं जिवंत नातं वाहतंय. त्यांचा प्रत्येक दिवस दुसऱ्यांसाठी जगण्यात जातो. प्रत्येक भेटीत ते एक हसरी आठवण सोडून जातात, आणि प्रत्येक क्षणी त्यांची सज्जनता मनाला भावून जाते. अशा माणसांसोबत वेळ घालवणं म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर आठवणीचा...

संघर्षातून यशाकडे उंच भरारी — तेजश्री आणि यश यांची प्रेरणादायी गाथा

इमेज
संघर्षातून यशाकडे उंच भरारी — तेजश्री आणि यश यांची प्रेरणादायी गाथा कधी कधी आयुष्य एका क्षणात बदलून टाकतं… काहीजण त्या बदलासमोर झुकतात तर काही जण त्या बदलाला संधी बनवतात. आज आपल्यासमोर उभे राहिलेले दोन तेजस्वी चेहरे म्हणजे तेजश्री बिर्‍हाडे आणि यश गौतम सोनवणे… त्यांनी आयुष्याच्या अडथळ्यांवर स्वप्नांची पताका रोवली आहे. गरिबी ही त्यांच्या आयुष्यात अडथळा ठरली नाही, उलट तीच त्यांच्या संघर्षाची खरी मशाल ठरली. तेजश्री… ज्याच्या बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं… गरिबीचा तडाखा असह्य होता, पण तिच्या आईने हार मानली नाही. दिवसाला दहा ठिकाणी धुणीभांडी करून पोट भरत होती आणि मुलीच्या स्वप्नांचंही पोषण करत होती. एका आईच्या डोळ्यात असलेली आशा तेजश्रीच्या डोळ्यात स्वप्न बनून झळकत होती. आईच्या तुटपुंज्या कमाईतून शिकणं… हे एक दिवास्वप्नच वाटलं असतं, पण तेजश्रीने ते प्रत्यक्षात आणलं. आज ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली आहे. तिच्या प्रत्येक यशामागे तिच्या आईचे घामाचे थेंब आहेत, तिच्या संघर्षाच्या जिद्दीची शिदोरी आहे.  दुसरीकडे… यश गौतम सोनवणे. वडील रिक्षा चालवत, सकाळपासून रात्रीपर्यंत रस...

एक मुलगी, एक स्वप्न, आणि यशाची उंची....!

इमेज
एक मुलगी, एक स्वप्न, आणि यशाची उंची....! कधी कधी एखादं यश केवळ एक परीक्षा पास केल्याने नव्हे, तर त्यामागे दडलेल्या झगड्यामुळे, संयमामुळे आणि न डगमगता उभं राहण्याच्या वृत्तीमुळे मोठं वाटतं. अशाच एका यशोगाथेची नायिका म्हणजे वृषाली ललित ललवाणी. श्रीरामपूर येथील मूळची आणि सध्या जळगावमध्ये स्थायिक झालेली वृषाली ही श्रीमती मदनबाई कचरदास ललवाणी यांची नात आणि श्री. ललित ललवाणी व सौ. सविता ललवाणी यांची गुणवंत कन्या. तिच्या यशामागे कितीतरी वर्षांचा संघर्ष, न थांबता केलेली मेहनत, आणि प्रत्येक अडचणीला संधीमध्ये बदलण्याची मानसिकता आहे. चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही परीक्षा केवळ अभ्यास करून पास होणारी नसते. ती मानसिक ताकद, वेळेचं व्यवस्थापन, अपयशातून उभं राहण्याची तयारी आणि सातत्याची कसोटी असते. वृषालीने हे सगळं लीलया पेललं आणि आज ती एक प्रमाणित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपल्यासमोर उभी आहे. या प्रवासात तिच्या आयुष्यात काही ठराविक व्यक्तींचे योगदान मोलाचे ठरले. सीए अनिल कोठारी, सीए रविंद्र पाटील आणि श्री. एस. आर. गोहिल या तज्ञ मार्गदर्शकांनी केवळ विषय शिकवला नाही, तर आत्मविश्वास दिला, संकटांवर...

मनातला नेता – निलेशआबा......!

इमेज
मनातला नेता – निलेशआबा......! धरणगाव नगरीतील राजकारण, जनसामान्यांचे भावविश्व आणि युवकांच्या मनातील प्रेरणास्थान म्हणजे निलेशआबा चौधरी. एक असे नाव, ज्याचा उच्चार होताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपुलकीचे, विश्वासाचे आणि प्रेमाचे हास्य फुलते. एक असे व्यक्तिमत्त्व, जे केवळ राजकीय पदांपुरते मर्यादित नाही, तर हक्काने जनतेच्या अंतःकरणात स्थान मिळवून बसले आहे. आज त्यांचा वाढदिवस... ही एक साधी तारीख नाही, तर त्यांच्याच कार्याची, तळमळीची, माणुसकीच्या वाटेवर चाललेल्या त्यांच्या झिजेची एक जिवंत आठवण आहे. हा दिवस म्हणजे संघर्ष, कर्तृत्व आणि लोकसेवेच्या निखळ भावनेला वंदन करण्याचा दिवस आहे. त्यांनी नगराध्यक्षपद भूषवताना केलेली कर्तव्यनिष्ठ कामगिरी, घेतलेले दूरदृष्टीचे निर्णय आणि राबवलेली उपक्रमशील योजना आज ही धरणगावच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मनात जिवंत आहे. त्यांच्या लोकप्रियतेचं खरं कारण हे केवळ पद नव्हे, तर त्यांच्या मनात असलेली जनतेविषयीची अपार आपुलकी, सेवाभाव आणि माणुसकीची भावना आहे. "आरोळी मारताच होकारा देणारा नेता" ही उपाधी त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. व्यासपीठावर उभं...

एक दिलदार मनाचा दोस्त – गजेंद्रभाऊ परदेशी

इमेज
एक दिलदार मनाचा दोस्त – गजेंद्रभाऊ परदेशी मित्र म्हटलं की डोळ्यांसमोर काही ठराविक चेहरे येतात… पण काही चेहरे असतात, जे हृदयात घर करून राहतात. अशाच एक दिलदार मनाच्या, शब्दाला जागणाऱ्या, वेळप्रसंगी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माणसाचं नाव म्हणजे गजेंद्रभाऊ परदेशी. गजेंद्रभाऊ हे नाव घेताच अनेक आठवणींनी मनात गर्दी होते. एखाद्याचं दु:ख समजलं की तो स्वतःच्या मनात ते सामावून घेतो, एखाद्याच्या डोळ्यात अश्रू दिसले की स्वतःच्या डोळ्यांत ओल घेऊन त्या अश्रूंना शब्द देतो. कोणी मदतीसाठी हाक मारली की "माझं आहे" म्हणत पहिला उभा राहतो. तो फक्त मदतीला धावून येणारा नाही, तर मनात कायम चांगुलपणा बाळगणारा "भला माणूस" आहे. शब्द दिला की त्याला प्राणपणाने पाळतो. आणि प्रसंगास अनुसरून जशाला तसं उत्तर द्यायला मागे पुढे न पाहणारा पण तरीही मनात कुठलाही अहंकार नसलेला, नम्र पण ठाम असा व्यक्तीमत्व! त्याचं हसणं देखील मनात शांतता देतं. आणि रागावला तर समोरच्याला ही आरसा दाखवतो.पण त्याच्या रागामागेही खूप प्रेम असतं, आपलेपणाची चीड असते. आज गजेंद्रभाऊ परदेशी यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे, पण खरं...

लोकशाहीत जनतेचा आवाज एवढा दुर्लक्षित का?

इमेज
लोकशाहीत जनतेचा आवाज एवढा दुर्लक्षित का? गावाच्या चौकात विस्मरणात गेलेली ती निवडणुकीची पोस्टर्स आज ही तशीच लटकलेली आहेत. त्या वरील रंग उडालेला आहे, पण आशा मात्र अजून ही कोपऱ्यात कुठे तरी टिकून आहे.गहिरी, थकलेली आणि खिन्न झालेली. त्या भिंतींवर लिहिलेली वचने उतरून गेली आहेत, पण त्यांची आठवण डोळ्यासमोरून जात नाही. "तुमच्यासाठी काम करणार", "सर्वांना न्याय मिळेल"हे शब्द होते, पण आज न्याय कोणाला ही मिळतो का, हा प्रश्न विचारायला ही लोक घाबरू लागले आहेत. शाळेत शिकवतात, लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनी चालवलेली सत्ता. पण दिवसागणिक एक प्रश्न मनात खोलवर रुतत जातो.जर लोकशाही खरोखरच लोकांसाठी असेल, तर त्या लोकांचाच आवाज इतका क्षीण का भासतो? तो कुठेच पोहोचत नाही, की केवळ ऐकल्यासारखं दाखवून दुर्लक्षित केला जातो? गावातले सखाराम अण्णा आज ही सकाळी रेडिओ लावतात, सरकारबद्दलच्या बातम्या ऐकतात. डोकं हलवत एकच वाक्य उच्चारतात, “आता तरी काहीतरी सुधारेल.” पण त्यांचं घर आज ही पूर्वीचंच घरा समोरचं गटार तसंच वाहतं, रात्री वीज नसते, आणि हातात असते एकच जुनी, फाटकी वहि. हीच त...

विठ्ठलनामात रंगले धरणगाव – आषाढी एकादशी निमित्त भक्तीमय फराळ सेवा!

इमेज
विठ्ठलनामात रंगले धरणगाव – आषाढी एकादशी निमित्त भक्तीमय फराळ सेवा! धरणगाव प्रतिनिधी – आषाढी एकादशी... पंढरपूरच्या वारीचा दिवस, विठुरायाच्या दर्शनाची ओढ, भक्तीने न्हालेलं वातावरण आणि मनात साचलेली श्रद्धा. अशा पावन दिवशी धरणगावातील मोठा माळी वाडा परिसरातील मढी येथील स्वयंभू महादेव मंदिरात, भक्तिभाव व सेवाभाव यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. पंचक्रोशीतील श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात, यंदा ही आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ वाटपाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिपूर्वक व सेवाभावी वातावरणात पार पडला. जे भक्त प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी येथेच 'विठ्ठल-विठ्ठल' चा गजर, विठ्ठलनामाचा अखंड जयघोष, आणि भावनांच्या लाटा उसळत होत्या. या वातावरणामुळे उपस्थित भाविकांना पंढरपूरच्या वारीचीच अनुभूती लाभली. दिवंगत शांताबाई व जगन्नाथ खंडू वाघ यांच्या पुण्यस्मरणार्थ, श्री. योगेश व राहुल रमेश वाघ यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. हा उपक्रम केवळ धार्मिक नव्हता, तर एक सामाजिक जबाबदारी आणि भावनेतून साकारलेली सेवा...

राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात… दारू आणि तो…

इमेज
राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात… दारू आणि तो… गावाच्या वेशीवरून आत पाऊल टाकलं की एक वेगळीच शांतता आपल्याला कुशीत घेते. ती शांतता निसर्गाची नसते, ती असते एका हरवलेल्या आयुष्याची, एका अबोल वेदनेची, आणि एका चेहर्‍यामागे लपलेल्या अंधाराची… गावातल्या त्या बोळातून चालत गेलं की दिसतं एक कुजलेलं घर, भिंती झडलेल्या, खिडक्या अधांतरी, आणि दरवाज्यावर कुणीच टकटक करत नाही… कारण तिथे राहतो तो. कधी काळी अंगावर जरीचा शर्ट घालणारा, गावातल्या भोंडल्यात तबला वाजवणारा, वडाच्या पारावर कविता वाचणारा तो… आता फक्त एक सावली झालाय. त्याच्या चेहर्‍यावरच्या रेषा सांगतात की एक काळ होता, जेव्हा तो घरातल्या सगळ्यांचा आधार होता. पण आता त्याच्या नजरेत फक्त रिकामी पोकळी आहे… आणि हातात कायमची एक काचेची बाटली. दारू ही गावात कधी आली, कशी आली, कुणी आणली हे कोणीच लक्षात ठेवत नाही. पण तो बदलला, हे सगळ्यांना दिसलं. आधी तो संकोचायचा, दारू पीत असल्याचं लपवायचा. पण जसजसे दिवस गेले, लपवणं थांबलं आणि नशा वाढली. त्याच्या हसण्यातली सहजता गेली. त्याच्या मुलीच्या शाळेची फी बाकी राहिली. त्याच्या आईचे हळुवार शब्द अबोल झ...

रिमा देसले यांचा जिल्हास्तरीय मुकुट – एक शेतकरी महिलेची प्रेरणादायी वाटचाल

इमेज
रिमा देसले यांचा जिल्हास्तरीय मुकुट – एक शेतकरी महिलेची प्रेरणादायी वाटचाल जळगाव – जगाला अन्न पुरवणाऱ्या हातांना समाजात मान मिळतो, तेव्हाच खरी कृषीसंस्कृती फुलत असते. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये मुग पीक उत्पादनाच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील रिमा किरण देसले या कष्टकरी शेतकरी महिलेने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे. ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर दररोज मातीला नमस्कार करणाऱ्या, जमिनीशी मनापासून नातं जपणाऱ्या एका स्त्रीच्या श्रद्धेची आणि निष्ठेची परीक्षा होती. ही परीक्षा रिमा ताईंनी आत्मविश्वास, समर्पण आणि स्पष्ट नियोजनाच्या बळावर यशस्वीपणे पार केली. या विशेष कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांच्या हस्ते रिमा देसले यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कृषी विभागाचे मा. जिल्हा कृषि अधिकारी तडवी साहेब व इतर मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिमा देसले यांचं शेतीशी असलेलं नातं केवळ व्यवसायापुरतं मर्यादित नाही, तर ते त्यांच्या श्वासात मिसळलेलं आहे. त्यांनी पारंपरिक अनुभवात आधुनिक ज्ञा...

गर्व ओसरतो, कायदा बोलतो !

इमेज
गर्व ओसरतो, कायदा बोलतो ! गावाकडच्या मातीत वाढलेली माणसं साधी, सरळ, पण काही वेळा भुलवली गेलेली असतात. विशेषतः जेव्हा त्यांच्या हातात थोडा पैसा येतो, किंवा एखाद्या राजकीय पक्षात पद मिळतं, तेव्हा त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि नजरेत एक वेगळीच मस्ती झळकते. "आता माझं कोणी काही ही वाकडं करू शकत नाही," अशी भावना त्यांच्या मनात खोलवर रुजते. त्यांच्या डोळ्यात तुच्छतेची झाक दिसते, आणि चालण्यात एक अहंकाराचे सावट स्पष्ट जाणवतं. ते स्वतःला सत्तेचं सूर्य समजू लागतात आणि वाटू लागतं  "सगळे माझ्या समोर झुकले पाहिजेत." पण या विचारांचं मूळ अज्ञानात असतं.चार चांगले दिवस मिळाले, एखादं स्थानिक पद लाभलं, किंवा एखाद्या पुढाऱ्याची ओळख मिळाली की काही जण इतके भारावून जातात की त्यांना कायदाही क्षुल्लक वाटू लागतो. "तो गबाळा मला न्याय देणार?""माझ्याकडे ओळखी आहेत." "पोलिससुद्धा माझ्या शब्दात वागतं." अशा गर्विष्ठ भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात.पण… कायद्याचं नाव घेणाऱ्यांना धमकावता येतं, पण कायद्या स्वतःला झाकून ठेवता येत नाही. पैसा, पक्ष, ओळ...

मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’

इमेज
मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’ गावाकडच्या मातीमध्ये रुजलेली स्वप्नं जेव्हा अंकुरतात, तेव्हा ती केवळ शेती पुरती मर्यादित राहत नाहीत, तर समाजासाठी आशेचा किरण ठरतात. धानोरा या छोट्याशा गावातून असेच एक स्वप्न आकाराला आलं – श्री.संदीप युवराज गुजर यांचं. आज या स्वप्नाला यशाची उंच भरारी लाभली असून, त्याला ‘कृषीगौरव पुरस्कार’ रूपी सन्मान प्राप्त झाला आहे. चोपडा येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. तहसीलदार साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराथी आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने संदीपभाऊंचा गौरव करण्यात आला. हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नसून, एका विचाराचा, अथक परिश्रमाचा आणि मातीशी असलेल्या घट्ट नात्याचा आहे. संदीपभाऊंनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून, नाविन्यपूर्ण प्रयोग करत शेती पूरक व्यवसायांचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. विशेषतः त्यांनी विकसित केलेल्या पेरूच्या बागा आज जळगाव जिल्ह्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या आहेत. एखाद्या फळबागेचा सुगंध इतक्या दूरवर पोहोचेल, याची पूर्वी कल्पना ही कोणी केली नव्हती. या यशामागे संद...

"शांततेच्या वाटेवरचा योद्धा – शालिग्रामभाऊ गायकवाड"

इमेज
"शांततेच्या वाटेवरचा योद्धा – शालिग्रामभाऊ गायकवाड" शांतपणे, कोणता ही गवगवा न करता समाजासाठी अखंडपणे कार्य करणारी काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात. त्यांच्या कार्याचा आवाज कधी ढोल-ताशांतून ऐकू येत नाही, पण त्यांच्या कृतींचा ठसा समाजाच्या मनावर खोलवर उमटलेला असतो. एरंडोल शहरात गेली चार दशके सामाजिक सलोखा, धार्मिक शांतता आणि जनहितासाठी अविरत झटणारे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी बाजार समितीचे सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी साहेब यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर त्यांच्या माध्यमातून उभ्या समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव होता. श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड यांनी गेल्या चाळीसहून अधिक वर्षांपासून पोलीस प्रशासनाला अत्यंत संवेदनशील प्रसंगांमध्ये, विविध धार्मिक उत्सवांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल शहराने अनेकदा शांततेत आणि समतेत विव...

जगाचा पोशिंदा उपाशीच का ?

इमेज
जगाचा पोशिंदा उपाशीच का ? रात्रभर गडद काळसर आभाळ पसरलेलं असतं, पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते, वाऱ्याचा रुतून वाहणारा आवाज अंगावर काटा आणतो आणि कुठे तरी दूर कावळा ओरडतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या मनात एकच विचार सतत डोकावत राहतो. "आपणच जगाला पोसतो, पण आपल्यासाठी कोण?" एखाद्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक घासामागे एक हात असतो.तो म्हणजे शेतकऱ्याचा. जसा आई आपल्या लेकराला दूध देते, तसाच शेतकरी आपल्या श्रमांनी जगाला अन्न पुरवतो. फरक एवढाच, की लेकराच्या डोळ्यांतील दुःख आईला दिसतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यांतील वेदना कोणालाच जाणवत नाहीत. शेती म्हणजे केवळ माती नाही, ती शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आई आहे. त्या मातीत तो नुसते बियाणे नव्हे, तर आशा पेरतो. एका दाण्यात पोटभर अन्न होईल, या विश्वासाने तो आभाळाकडे डोळे लावून बसतो. परंतु आभाळ ही अनेकदा रुसून राहतं, आणि मग डोळे पाणावतात. अखेर, माती आणि घाम एकरूप होतात... अनेकदा रक्त देखील त्यात सामावून जातं. शहरातल्या माणसांसाठी शेती ही केवळ नकाशावर दाखवलेली जमीन असते. त्यांना पिकांचे भाव समजतात, पण त्या भावांसाठी जीव तोडण...

स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी !

इमेज
स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी ! धरणगाव या पवित्र मातीमध्ये, १ जून १९३७ रोजी जन्मलेल्या स्वर्गीय वैजंताताई शिवदास भोलाणे या एक अत्यंत साध्या, शिस्तप्रिय, शांत स्वभावाच्या आणि अंतःकरणाने समृद्ध अशा मातृरूप होत्या. त्या काळात मुलींसाठी शिक्षणाची संधी मर्यादित असताना ही त्यांनी सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर आयुष्याचे मर्म समजून घेतले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सुसंस्कृत मृदुता होती. जी त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला सहज अनुभवता येई. त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही धरणगाव या गावी असल्यामुळे त्या गावाच्या मातीशी घट्टपणे जोडलेल्या होत्या. त्या नात्याला त्यांनी आपल्या कर्तव्यपरायणतेने, संयमाने, प्रेमाने आणि मायेच्या अपार सागराने अधिकच पवित्र करून टाकले. संसाराची सुरुवात आर्थिक चणचणीमध्ये झाली. त्यांचा  पतींची परिस्थिती गरिबीची  होती. परंतु, त्या परिस्थितीकडे त्यांनी कधी ही तक्रारीच्या नजरेने पाहिले नाही. उलट, त्या परिस्थितीत ही त्यांनी प्रत्येक दिवस मायेने, कष्टाने, आणि समाधानी वृत्तीने फुलवला. त्यांच्या सहवासात ...

कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन

इमेज
कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन  काही माणसं शांत असतात, पण त्यांचं कार्य मात्र मोठ्यानं बोलतं. ना कधी स्वतःची जाहिरात, ना आत्मप्रशंसा… तरी ही त्यांच्या निष्ठेने, प्रामाणिकतेने आणि सातत्याने केलेल्या कामातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी ओळख म्हणजे – १३२ के.व्ही. उपकेंद्र शिरपूरचे उपकार्यकारी अभियंता, श्री. नितीन गजानन महाजन. महापारेषण कंपनीच्या नाशिक येथे पार पडलेल्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्यस्तरीय फील्ड अवॉर्ड २०२४-२५ त्यांना प्रदान करण्यात आली. हा पुरस्कार केवळ एक प्रमाणपत्र नव्हे, तर त्यांच्या अखंड सेवाभावाची, झिजणाऱ्या प्रयत्नांची आणि न थकता केलेल्या कार्याची अधिकृत पावती आहे. वीजपुरवठ्यासारखी अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची व्यवस्था हाताळणं हे केवळ तांत्रिक ज्ञानाचं काम नसून, ती एक मोठी सामाजिक जबाबदारी ही असते. लाखो घरांमध्ये प्रकाशाची एकसंधता टिकून राहावी, कोणी ही अंधारात अडकू नये, यासाठी कुणीतरी आपला वेळ, श्रम, झोप आणि आयुष्यही या कार्याला...

धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल

इमेज
धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल धानोरा – एका छोट्याशा गावात वसलेली, पण मोठ्या स्वप्नांनी उजळलेली एक शाळा. शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, ती जीवनशैली असते हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारी प्रेरणादायी कहाणी म्हणजे झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा. दि. २९ जून रोजी जैन हिल्स, जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात धानोरा विद्यालयाने आपल्या कर्तृत्वाचा एक सुवर्णक्षण गाठत राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार केवळ एक सन्मान नव्हता, तर शाळेच्या स्वच्छतेबाबत घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि सुसंस्कारित शिक्षणपद्धतीची अधिकृत पोचपावती होती. या गौरवशाली पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी कस्तुरबा सभागृहात विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य बी.एस. महाजन, योगेश पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, पंकज महाजन, समन्वयक वासुदेव महाजन, प्रा. मिलिंद बडगुजर, डिगंबर सोनवणे आणि मच्छिंद्र महाजन...

गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य !

इमेज
गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य ! ती फक्त एक मुलगी होती जिवंत, हसरी, मनापासून स्वप्नं जपणारी, आयुष्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणारी. NEET परीक्षेच्या सराव चाचणीत तिचे अपेक्षे प्रमाणे गुण आले नाहीत... इतकंच. ती नापास झाली नव्हती, तिने हार मानलेली नव्हती, ती अजून ही प्रयत्नशील होती. पण तिचा वडील एक शिक्षक, एक मुख्याध्यापक जो इतर विद्यार्थ्यांना अपयशातून मार्ग दाखवतो, त्याच्याच घरात त्याने आपल्या स्वतःच्या लेकीला समजून न घेता अमानुष शिक्षा केली. ती शिक्षा इतकी क्रूर आणि असह्य होती की, तिचा शेवट तिच्या जीवनावर झाला. आज ही मन सुन्न होतं, अंगावर काटा येतो. एका निष्पाप मुलीने केवळ काही गुण कमी मिळाल्यामुळे प्राण गमावावा, ही केवळ एका कुटुंबातील शोकांतिका नाही; ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील, समाजातील आणि पालकत्वातील चुकीच्या समजुतींची भीषण परिणती आहे. जेव्हा आपण यश म्हणजे केवळ गुण, टक्केवारी आणि वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी प्रवेश मानतो, तेव्हा आपण आपल्या मुलांचं बालपण, त्यांची स्वप्नं, आणि त्यांचं आयुष्य हळूहळू हरवत जातो. त्या वडिलांनी एक क्षण विचार केला असता, की ज्या शाळेत ते मु...

हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील !

इमेज
हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील ! माणूस मोठा असतो त्याच्या पदाने, पैशाने नाही… तो मोठा असतो त्याच्या मनाने, त्याच्या स्वभावाने, त्याच्या दिलदारीने… आणि हाच आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे – पंकज पाटील! कासोदा येथील कारखाना परिसरात लहानपणापासून वाढलेला पंकज, आज अनेकांच्या मनात एक हसरा, प्रेमळ आणि दिलदार माणूस म्हणून ओळखला जातो. त्याचे वडील त्या कारखान्यात काम करत होते. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सचोटी हेच त्यांच्या घरातील संस्कारांचे मूळ. तेच संस्कार पंकजभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात आज ही जिवंत आहेत. कारखाना बंद झाला… परिस्थिती बदलली… पंकजने आपला गाव गाठल पण त्याची हसरी मुद्रा, मनातली माणुसकी, आणि साऱ्यांना हासवण्याची ताकद तशीच टिकून राहिली. त्याने कधी ही परिस्थितीवर रडणं शिकलं नाही, तर ती हसत-हसत झेलणं शिकवलं. कोणी दुःखी असेल, चिंतेत असेल तर पंकज पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, “चिंता करू नको मित्रा, आपण आहोत ना!” अशा या सर्वांचा लाडका, हास्यविनोदात रमणारा, मनमिळावू, आणि लोकांच्या मनात घर करून राहणाऱ्या पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त हे फक्त एक औपचारि...

“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान”

इमेज
“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान” विद्येचे गगन गाठण्यासाठी जिद्द, कष्ट आणि योग्य संस्कारांची साथ मिळाली तर लहानग्यांची झेप राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, हेच पुन्हा एकदा सिध्द झाले आहे! अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचे साक्षीदार आपण सध्या एरंडोल न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मधून झाले आहे. या शाळेतील अत्यंत हुशार, जिद्दी आणि गुणी विद्यार्थिनी कु. आराध्या कृष्णा महाजन हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षा 2024/25 मध्ये आपली चमकदार छाप उमटवली आहे. या लेकीने राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक पटकावत केवळ आपल्या शाळेचंच नव्हे तर कुटुंबाचे आणि गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळवले आहे. कालिकत, केरळ येथे आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत कु. आराध्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि अखंड प्रयत्नांच्या जोरावर मेरिटमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या घवघवीत यशाचा सन्मान म्हणून तिला प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि रोख रक्कम अशा सन्मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या लेकीचं हे मोठं यश साजरं करताना शाळेचे आदरणीय प्रिन्सिपल श्...

चांदोबाच्या घराचा जादुई मेळावा !

इमेज
चांदोबाच्या घराचा जादुई मेळावा ! विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघनगर जळगाव येथे नुकताच ‘गोष्टी कवितेचा’ सुंदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमामुळे शाळेचे वातावरण जणू लहानग्यांच्या हास्याने आणि कवितेच्या जादूनेच भरून गेले होते. इयत्ता पहिलीच्या बालभारतीतील कवी विलास मोरे लिखित ‘चांदोबाच घर’ या कवितेला शाळेच्या संगीत शिक्षिकेने जिव्हाळ्याचा स्वर आणि मधुर तालाचा साज चढवून जणू नवचैतन्य दिले. लहानग्यांच्या गोड आवाजात साकारलेली ही कविता ऐकून उपस्थितांच्या चेहऱ्यांवरील हास्य खुलून आलेच, शिवाय त्यांच्या काळजाच्या कोपऱ्यात लहानपणाच्या रम्य आठवणींचा गोड हुंगार ही जागवून गेला. विद्यार्थ्यांच्या लहानशा सुमधुर आवाजात सादर झालेली ही कविता जणू चंद्राच्या अलवार प्रकाशासारखीच साऱ्या वातावरणात विसरून गेली. शाळेचे मुख्याध्यापक, समस्त शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंददायी क्षणाचे साक्षीदार झाले. लहानग्यां प्रति आपुलकीने भरलेले प्रत्येक डोळे, त्यांच्या स्वरांतून साकारलेली कविता, त्यांच्या सहजरंगात जपलेली निर्मळता जणू...