पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....!
पैशांच्या झगमगाटात हरवलेले मूल्य.....! रंग बदलणाऱ्या माणसांत राहणे म्हणजे दररोज होळी खेळण्यासारखेच असते… पण ही होळी रंगांची नसते, ती भावनांची असते. इथे गुलाल उधळला जात नाही, तर विश्वास उधळला जातो. इथे पाण्याने रंग धुतले जात नाहीत, तर स्वार्थाने नाती धुऊन निघून जातात. प्रत्येक सकाळी आपण मनात आशेचा एक नवा रंग भरतो, आणि संध्याकाळी तोच रंग कुणाच्या खोटेपणामुळे फिका पडलेला दिसतो. आजकाल माणसं परिस्थितीनुसार रंग बदलतात. समोर गोड बोलणारे लोक मागे कटू सत्य विणत असतात. चेहऱ्यावर मैत्रीचा मुखवटा, पण मनात स्वार्थाची गणितं. अशा वातावरणात जगताना मन कायम सावध राहतं. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणापासून अंतर राखावं, हेच कळेनासं होतं.आपण मात्र नात्यांचा, प्रामाणिकपणाचा, आपुलकीचा रंग जपत राहतो.कारण आपल्याला रंग बदलता येत नाही; आपल्याला मन बदलता येत नाही. बुद्धिमान व्यक्तीच्या वाटेला पराभव तेव्हाच येतो, जेव्हा पैशांच्या जोरावर गाढवं पुढे जातात. जेव्हा गुणवत्तेपेक्षा पैशाची किंमत जास्त ठरते, जेव्हा कर्तृत्वापेक्षा ओळखींचं वजन जड ठरतं, तेव्हा खऱ्या अर्थाने मेहनत करणारा माणूस क्षणभर थांबतो. त्याच...