जखमी पावलांतून उमललेली इमानदारी....!
जखमी पावलांतून उमललेली इमानदारी....! काटे त्यांच्याच पायात रुततात जे अनवाणी चालतात. कारण त्यांनी खोट्याचं पादत्राण घातलेलं नसतं. त्यांच्या पावलांना संरक्षण नसतं, पण त्यांच्या मनाला खोटेपणाचं ओझंही नसतं. ते चालतात उघड्या जमिनीवर, वेदना सहन करत, पण मान खाली न घालता. कारण त्यांना माहीत असतं.जखमा शरीरावर होतात, पण खोटेपणा आत्म्याला जखमी करतो. इमानदारीनं वागणारा माणूस नेहमीच सोप्या वाटेवर नसतो. त्याचा मार्ग काट्यांनी भरलेला असतो. तो प्रत्येक टोचणी अनुभवतो, प्रत्येक वेदना सहन करतो. कारण त्याच्याकडे लपवण्यासाठी काहीच नसतं. त्याचं आयुष्य उघडं असतं.मनासारखंच पारदर्शक. म्हणूनच त्रास त्यालाच होतो, आरोप त्याच्यावरच येतात, आणि प्रश्नही त्यालाच विचारले जातात. सरळ माणूस सगळं सहन करतो. तो गप्प राहतो, कारण त्याला भांडण नको असतं. तो माघार घेतो, कारण त्याला कोणाला दुखवायचं नसतं. पण त्याचा हा संयम कमकुवतपणाचं लक्षण नसतं; ती त्याच्या अंतःकरणातली ताकद असते. फसवणूक करणारे सुखात चालतात, मऊ चपलांतून, पण त्यांची पावलं कधीच ठाम नसतात. कारण त्यांना माहीत असतं.ही जमीन आपली नाही. प्रामाणिक माणूस मात्र ज...