पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेळ गेल्यावर उमजणारी माणसांची किंमत...!

इमेज
वेळ गेल्यावर उमजणारी माणसांची किंमत...! आयुष्य म्हणजे एक अनोखा प्रवास. या प्रवासात आपण अनेक चढ-उतार पाहतो, अनेक वळणे घेतो, आणि या प्रत्येक वळणावर आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. काही अनुभव गोड असतात, काही कडू, पण प्रत्येक अनुभवात जीवनाचं एक गूढ दडलं असतं.आणि त्या अनुभवांतूनच आपल्याला जाणवतं की जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला एक वेगळं महत्त्व असतं. शिळी भाकरी आणि तुटकी चप्पल दिसायला अगदी साध्या गोष्टी, पण या दोन गोष्टींच्या उदाहरणातून आयुष्याचं एक महान तत्त्व शिकायला मिळतं. भाकरी आज शिळी झाली आहे, म्हणून आपण तिला फेकून देतो, पण काल तीच भाकरी आपल्या पोटाची भूक भागवून गेली होती. तिने आपल्याला श्रम करण्याची ताकद दिली होती. तिच्या कणाकणात आपल्या श्रमाचं सार होतं. आज ती शिळी झाली म्हणून तिचं मोल संपत नाही. तसंच, चप्पल आज तुटली आहे, म्हणून आपण तिची किंमत कमी करतो. पण कालपर्यंत तीच चप्पल आपल्या पायांना काट्यांपासून, दगडांपासून, गरम वाळूतून वाचवत होती. तीच आपल्या प्रवासाची सोबती होती. आज ती तुटली, पण तिचं कार्य महानच होतं. या दोन्ही उदाहरणांतून जीवनाचं एक गहन सत्य ...

साहित्य सम्राटची शब्द गोड दिवाळी कला काव्य फराळाने बहरली.

इमेज
साहित्य सम्राटची शब्द गोड दिवाळी  कला काव्य फराळाने बहरली. सौ.मंदाताई नाईक,प्रा.अरुण बुंदेले,दादासाहेब  सोनवणे,सौ.अर्चना अष्टूळ,राजेंद्र सगर श्री विनोद अष्टूळ यांची प्रमुख उपस्थिती. अमरावती (प्रतिनिधी)          " साहित्य सम्राट, पुणे ही संस्था शब्द गोड दिवाळी हा नावीन्यपूर्ण उपक्रम चौदा वर्षापासून साजरा करते.शब्द जोडतात आणि तोडतातही त्यामुळे आपण शब्द जपूनच वापरले पाहिजे.दिवाळीच्या फराळामध्ये जसे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात. त्याप्रमाणे आज सर्व निमंत्रित कवींनी वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या.चांगलंच करायचं हे उद्दिष्ट ठेवून अष्टुळ मनापासून सातत्याने हा उपक्रम राबवितात. त्यांना व सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद." असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री मंदाताई नाईक यांनी केले.       त्या साहित्य सम्राट संस्था पुणे आयोजित " कला काव्य फराळाची शब्द गोड दिवाळी " या उपक्रमांतर्गत २११ वे कवी संमेलन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था, सारसबाग, नेहरू स्टेडियम,पुणे येथे दि.२९ ऑक्टोबर २०२५ ला आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्या अध्...

निष्ठा,विचार आणि माणुसकीचा संगम मा. गुलाबरावजी वाघ साहेब...!

इमेज
निष्ठा,विचार आणि माणुसकीचा संगम मा. गुलाबरावजी वाघ साहेब...! धरणगाव ही केवळ एक नगरी नाही, तर ती परंपरेचा, निष्ठेचा आणि कार्यतत्परतेचा जीवंत श्वास आहे. या भूमीत ज्या मातेनं असंख्य समाजसेवक घडवले, त्या मातीतूनच जन्माला आले आहेत शिवसेनेचे उपनेते, उबाठा गटाचे दृढ नेतृत्व करणारे, जनतेच्या मनावर राज्य करणारे माननीय गुलाबरावजी वाघ साहेब. गुलाबरावजी वाघ हे नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती एक ऊर्जावान, निष्ठावंत, आपुलकीनं ओतप्रोत भरलेली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर जगणारी व्यक्ती.त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे कणखरतेचं आणि करुणेचं सुंदर संगम आहे.राजकारणात पद मिळवण्यासाठी नव्हे, तर लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी झटणारे, आणि आपल्या मातीच्या माणसांसाठी जगणारे हे नेतृत्व म्हणजेच गुलाबरावजी वाघ. बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेल्या विचारांचा त्यांनी आपल्या मनाशी पक्का पाया बांधला आहे.“शिवसेना ही केवळ पक्ष नाही, ती विचारधारा आहे, ती महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे” हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा त्यांचा स्नेह, निष्ठा आणि विश्वास हे इतके अखंड...

“श्रमातून साधलेले ईश्वरदर्शन स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन”

इमेज
“श्रमातून साधलेले ईश्वरदर्शन स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन” (धानोरा, तालुका चोपडा) धानोरा या मातीत जन्मलेले, कष्टाची आणि साधेपणाची शिदोरी घेऊन आयुष्यभर श्रमाचा आणि भक्तीचा संगम साधणारे, सदगुरू भक्त, संतस्वभावी, आणि खरे कर्मयोगी स्वर्गीय नानासाहेब गोकुळ वामन महाजन. सामान्य कुटुंबात जन्मलेले नाना यांनी आपल्या परिश्रमाच्या आणि निश्चयाच्या बळावर असामान्य उंची गाठली. वडिलोपार्जित दोन एकर जमिनीपासून त्यांनी, कुटुंबाच्या सहकार्याने, अखंड कष्टाच्या आणि नियोजनाच्या बळावर शंभर एकर बागायती शेती उभी केली.हे केवळ आर्थिक यश नव्हते तर ते होते एका शेतकऱ्याच्या अध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक. नाना यांचं आयुष्य हे “परिश्रम, प्रपंच आणि परमेश्वर” या त्रिसूत्रीवर आधारलेलं होतं. त्यांच्या दृष्टीने शेती म्हणजे केवळ धंदा नव्हता, तर तीच होती ईश्वरसेवा.माती नांगरताना, झाडांना पाणी घालताना, पिके वाढताना त्यांना प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाचं रूप दिसायचं. त्यांच्या हातात नांगर आणि मनात नामस्मरण हीच त्यांची खरी ओळख होती. संत सावता माळींच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन नाना नेहमी म्हणायचे“कांदा मुळा भाजी, अवघ...

वाईट दिवसांत दडलेले चांगले क्षण....!

इमेज
वाईट दिवसांत दडलेले चांगले क्षण....! जीवन ही एक प्रवाही नदी आहे कधी शांत, तर कधी प्रचंड वेगाने वाहणारी. या प्रवासात काही दिवस सुखाचे असतात, काही दुःखाचे. पण चार दिवस वाईट आले म्हणून खचून जायचं नाही. कारण हेच वाईट दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान शिकवण घेऊन येतात. या काळातच आपली खरी ताकद आणि आपल्या नात्यांची खरी ओळख पटते. जोडीदार म्हणजे फक्त आनंदाच्या क्षणी सोबत चालणारा नव्हे, तर दुःखाच्या वादळातही आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणारा सखा सुखात सगळे सोबत असतात, पण संकटाच्या क्षणी फक्त आपला जीवाभावाचा साथीदारच आपल्याला साथ देतो. आणि तिथेच समजतं हा फक्त आयुष्याचा सहप्रवासी नाही, तर सात जन्मांचा सखा आहे. जेव्हा आयुष्य अवघड वाटू लागतं, जेव्हा प्रत्येक दिशा अंधारलेली दिसते, तेव्हा जर आपल्या जोडीदाराचा हात हातात असेल, तर अंधारही प्रकाशमान वाटतो. वाईट दिवसांत दोघांनी मिळून घेतलेली झुंज ही नात्याला अधिक मजबूत करते. कारण खरी नाती संकटातूनच फुलतात. जेव्हा एकाचं मन खचतं, तेव्हा दुसरं त्याला आधार देतं, आणि हीच परस्परांची साथ जीवनाचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरते. वाईट दिवस हे...

शब्दांच्या पलीकडचं नातं....!

इमेज
शब्दांच्या पलीकडचं नातं....! एक गोष्ट मात्र नक्की आहे.जिथे प्रेम नसतं, तिथे गरजा वाढतात;आणि जिथे खरं प्रेम असतं, तिथे कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही.कारण प्रेम असलं की जीवन आपोआप पूर्ण वाटतं.एकमेकांच्या सहवासात राहणं, त्या क्षणात जगणं हेच खरं सुख असतं; बाकी सर्व गोष्टी गौण ठरतात. प्रेम असलं की झोपडीसुद्धा राजमहालासारखी भासते. कारण त्या चार भिंतींमध्ये सोनं नसतं,पण मनाचं ऊबदारपण भरलेलं असतं.जेव्हा दोन मनं एकमेकांशी घट्ट जोडली जातात,तेव्हा वस्तूंचं, पैशाचं किंवा बाह्य सौंदर्याचं काहीच महत्त्व राहत नाही.पण प्रेम नसेल, तर माणूस क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकतो.कपडे कसे आहेत, चेहरा कसा दिसतो, घर किती मोठं आहे,आणि लोक काय म्हणतील या विचारांनीच मन अस्थिर होतं. आजच्या या झगमगाटाच्या जगात लोक प्रेम दाखवतात, पण अनुभवत नाहीत.सोशल मीडियावरचे फोटो, स्टेटस, रील्स जणू आता प्रेमाचं अस्तित्व लाईक्स आणि कमेंट्समध्ये मोजलं जातं.पण खरं प्रेम कधीच प्रदर्शन मागत नाही.ते शांत असतं, आतून जाणवतं,आणि त्याची गोडी फक्त अनुभवणाऱ्यालाच उमगते. प्रेम हे दाखवण्याची नव्हे, तर जाणवण्याची आणि जगण्याची भावना आहे....

धरणगाव सायकलीस्ट ग्रुप तर्फे चि.तनिष्क देशमुख याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !....

इमेज
धरणगाव सायकलीस्ट ग्रुप तर्फे चि.तनिष्क देशमुख याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !.... चि. तनिष्कची बुलढाणा ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल मोहीम !.... धरणगांव प्रतिनिधी : धरणगांव - धरणगाव सायकलिस्ट ग्रुप तर्फे बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर शाळेचा इ.५ वी चा विद्यार्थी तनिष्क माधव देशमुख व त्याच्या परिवाराचे धरणगाव शहरात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ स्वागत सत्कार करण्यात आला.            बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी बुलढाणा व सहकार विद्या मंदिर स्कूल बुलढाणाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर निमित्त बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर ते गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत सायकल मोहीम आयोजित केली आहे. ही मोहीम कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी यांच्या अक्कलनीय नेतृत्व आणि प्रेरित होऊन ऑपरेशन सिंदूर नारी शक्ती या थीमवर आधारित या प्रवासाची उद्दिष्ट २२ एप्रिल २०२५ च्या आतंकी हमल्यांमध्ये मृत पावलेले २६ भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणे. महिला सक्षमीकरण लवचिकता तंदुरुस्ती आणि शिस्त यांना प्र...

खऱ्या ओळखीचा भाव....!

इमेज
खऱ्या ओळखीचा भाव....! जो माणूस प्रामाणिक राहतो, त्याचे जीवन नेहमीच सुसंगततेने आणि शिस्तीने भरलेले असते. प्रामाणिकपणा हा असा गुणधर्म आहे, जो कुठल्याही बनावटपणा किंवा चमकधमकीशिवाय व्यक्तीच्या अस्तित्वाला उजाळा देतो. आजच्या समाजात जिथे लोकप्रियतेला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते, तिथे प्रामाणिकतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अनेकदा आपण पाहतो की जे लोक बोलण्यात कुशल असतात, जे माणसांना गोंधळात टाकण्यात आणि त्यांच्या भावनांवर खेळ करण्यात पारंगत असतात, तेच लोक समाजात प्रिय ठरतात. परंतु हे आकर्षण फक्त तात्पुरते असते; सत्य आणि प्रामाणिकपणा कधीही हरत नाहीत. सत्य नेहमी कटू असते, आणि त्याचा स्वीकार प्रारंभी कठीण वाटतो. परंतु काळाच्या ओघात हे सत्य उघडतेच, आणि लोक त्याचे महत्त्व ओळखतात. जेव्हा आपण आपल्या विचारांशी आणि कृतींशी प्रामाणिक राहतो, तेव्हा आपली खरी ओळख निर्माण होते, जी काळाच्या कसोटीवर टिकते. लोकप्रियतेसाठी किंवा सन्मान मिळवण्यासाठी बनावट वर्तन करणे केवळ तात्पुरते फळ देते. लबाडी ही एक आखूड चादर आहे; ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. ही चादर कि...

राजा तोच ज्याच्या राणीच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं...!

इमेज
राजा तोच ज्याच्या राणीच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं...! आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येक पुरुष स्वतःला यशस्वी, सक्षम आणि आदर्श मानतो. कुणी आपल्या व्यवसायावर अभिमान बाळगतो, कुणी आपल्या संपत्तीवर, तर कुणी आपल्या व्यक्तिमत्त्वावर गर्व करतो. परंतु खरं सांगायचं झालं, तर एखाद्या पुरुषाची खरी पात्रता, त्याचा खरा दर्जा त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यातच दिसतो. बायको जर हसरी, आनंदी, खेळती आणि निर्धास्त असेल,तर हे निश्चित समजावं त्या घरात एक खरा राजा माणूस राहतो. कारण स्त्रीच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फक्त सौंदर्याचं प्रतीक नसतं,ते तिच्या मनःशांतीचं, विश्वासाचं, आणि आनंदाचं दर्शन असतं.आणि ते हास्य टिकून राहतं कारण तिच्या सोबत असतो एक समजूतदार नवरा जो तिला ऐकतो, समजतो आणि तिच्या अस्तित्वाचा सन्मान राखतो. ज्या पुरुषाने आपल्या बायकोला राणीप्रमाणे वागवलं, तिच्या भावना, तिची स्वप्नं आणि तिच्या मनातील छोट्या छोट्या इच्छा समजून घेतल्या,आणि तिला त्या पूर्ण करण्याचं धैर्य दिलं.तोच खरा राजा असतो.राजेपण हे पदावर, पैशावर किंवा प्रतिष्ठेवर नसतं,ते वागण्यात, शब्दांत आणि मनातील प्रेमात अस...

जिवंत असताना समजून घेणे..!

इमेज
जिवंत असताना समजून घेणे..! जगात हजारो लोक एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासमोर रडतात, श्रद्धांजली अर्पित करतात; पण तोच माणूस जिवंत असताना त्याच्या वेदना समजून घेणारे फारच कमी असतात. आपण मृत्यूला मोठे महत्त्व देतो, पण जिवंत असलेल्या माणसाच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करतो. हे दुःखद वास्तव आपल्या रोजच्या आयुष्यात सहज दिसून येते. आपण कधी विचारतो का, “तू खरंच ठिक आहेस का?” किंवा “तुला काही त्रास तर नाही ना?” असे साधे प्रश्न ज्यात खरी काळजी दडलेली असते? आपले सभोवतालचे लोक हसतात, बोलतात, उत्साही दिसतात; पण त्यांच्या हसण्या मागील वेदना, त्यांच्या शब्दांमागील प्रश्न आपण ओळखत नाही. आपण फक्त त्यांचे हसणे आणि आनंद पाहतो, परंतु त्यांचा आंतरिक वेदना पाहत नाही. अनेकदा आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण जवळच्या लोकांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि जेव्हा तो माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो, तेव्हा आठवणींच्या नावाखाली अश्रू ओघात येतात. जिवंत असताना आपण एकमेकांच्या वेदना समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या माणसाला त्याच्या वेदना व्यक्त करण्याची संधी देणे, त्याला ऐकणे, त्याला आधा...

हृदयापासून हृदयापर्यंत...!

इमेज
हृदयापासून हृदयापर्यंत...! आजच्या गतिमान, ताणतणावाच्या आणि स्वकेंद्रित जगात प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी, अनुभवांची व्याप्ती आणि स्वभावाची छटा वेगळी आहे. त्यामुळे मतभेद होणं हे स्वाभाविक आहे; उलट, तेच जीवनाचं सौंदर्य आहे. पण या मतभेदांतून जर मनभेद निर्माण झाले, तर नात्यांतील ऊब हरवते आणि हृदयातील आपुलकीचा ओलावा सुकतो. मतभेद असावेत, ते विचारांना दिशा देतात, दृष्टिकोन विस्तारतात; पण भेदभाव असू नये कारण भेदभाव माणुसकीचा नाश करतो. वाद घालणं चुकीचं नाही, पण त्या वादाचा शेवट सुसंवादात व्हायला हवा. शब्दांनी मन दुखावणं सहज शक्य असतं, पण त्याच शब्दांनी कुणाचं मन जिंकणं हीच खरी कला आहे. वादातून अहं निर्माण होतो, पण सुसंवादातून माणुसकी वाढते. या सर्व संघर्षाचं मूळ एका शब्दात दडलेलं आहे. “अहंकार.” अहंकार हा माणसाच्या अंतःकरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो माणसाला इतरांपासून नव्हे, तर स्वतःपासून दूर नेतो. अहंकार म्हणजे रिकाम्या भांड्याचा आवाज जो मोठा असतो, पण आत मात्र शून्य असतं. नम्रता हीच खरी सजावट आहे, कारण जिथे नम्रता असते तिथे सौंदर्य फुलतं; आणि जिथे माणुसकी असते, तिथे देव वास्तव्यास...

वाट लावू नका, वाट दाखवा....!

इमेज
  वाट लावू नका, वाट दाखवा....! माणसाचं आयुष्य हा एक अखंड प्रवास आहे.कधी काट्यांनी व्यापलेला, तर कधी सुगंधी फुलांनी सजलेला. या प्रवासात अनेक वळणे, अनेक चढ-उतार येतात.परंतु या साऱ्या प्रवासात माणूस सर्वात मोठी चूक तेव्हाच करतो,जेव्हा तो दुसऱ्याला खाली खेचण्यात, त्याला हरविण्यात,किंवा त्याची वाट लावण्यात आपला वेळ आणि उर्जा वाया घालवतो. जो इतरांना संपविण्याची तयारी करतो,तो स्वतःला वाचवण्यात कायम कमी पडतो.कारण द्वेषाची आग कधीही फक्त दुसऱ्यालाच जाळत नाही,ती आपल्यालाही भस्म करून टाकते.आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो,जो दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालतो,त्याचं स्वतःचं आयुष्य कधीच संपत नाही.त्याचा प्रकाश काळाच्या ओघातही झाकोळला जात नाही हीच जीवनाची खरी नियती,हीच अस्तित्वाची खरी शाश्वतता आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावताना,स्वतःची वाट केव्हा लागते हे त्याला समजतही नाही.मत्सर, राग, सूड आणि वैर या भावना क्षणभराचं समाधान देतात,पण आयुष्यभराची पोकळी निर्माण करतात.अशा भावनांतून सुख कधीच जन्मत नाही.त्या फक्त अंतःकरणातील शांतता हिरावून घेतात. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्या...

आपलेपणाचा मुखवटा...!

इमेज
आपलेपणाचा मुखवटा...! माणूस स्वभावतः भावनिक असतो. नात्यांची उब, आपुलकीची भावना, आणि आपल्यासाठी कोणीतरी आहे हा विश्वास या गोष्टी त्याच्या आयुष्याला अर्थ देतात. कोणी आपल्याशी सौम्य, प्रेमळ वागलं, एकटेपणी साथ दिली, काळजी घेतली. की आपलं मन त्यांच्याकडे आपोआप ओढलं जातं. आपलेपणाच्या या भावनेनं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ते आपलेच आहेत, असं वाटायला लागतं. या विश्वासाच्या आधारे आपण हळूहळू मन उघडू लागतो. आतल्या खोल कप्प्यांत जपलेली दुःखं, जुन्या आठवणींच्या जखमा, अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे तुकडे  सगळं त्यांच्यापुढे उघडं करत जातो. कारण, त्या व्यक्तीला आपण “आपली” समजतो. पण इथेच आयुष्याची खरी शोकांतिका सुरू होते. जे आपल्याला समजून घेतात असं वाटतं,तेच आपल्याच भावना इतरांसमोर चर्चेचा किंवा मनोरंजनाचा विषय बनवतात.ज्या गोष्टी आपण काळजात दडवून ठेवलेल्या असतात,त्या साऱ्यांची वेशीपलीकडून वाऱ्यासारखी चर्चा सुरू होते.आणि जेव्हा हे वास्तव आपल्यासमोर उभं राहतं,तेव्हा मनात एक विचित्र शांतता पसरते.न रडणं येतं, न कुठे तक्रार करता येते.फक्त आत खोलवर जळजळ करणारा एकच प्रश्न मनात घुमत राहतो.“मी इ...

घराच्या कोपऱ्यात हरवलेला बाप....!

इमेज
घराच्या कोपऱ्यात हरवलेला बाप....! जसजसं मूल मोठं होतं, तसतसं बापापासूनचं अंतर नकळत वाढत जातं.कधी त्याच्या बोटाला धरून चालायला शिकलेलं तेच लेकरू,आज त्याच्याकडे नजर मिळवायला ही वेळ काढू शकत नाही.बापाचं अस्तित्व, त्याचं महत्त्व, त्याचं कर्तृत्व हे सगळं मुलांच्या आयुष्यात कुठे तरी धूसर होत चाललेलं असतं. बापाची आठवण आता केवळ तेव्हाच येते,जेव्हा काही गरज असते. काही मागायचं असतं,किंवा एखादं काम अडलेलं असतं.एक काळ होता, जेव्हा बापाशिवाय घर अपुरं वाटायचं;पण आज तोच बाप घरात असूनही एकटा पडतो.त्याच्या आजूबाजूला लोक असतात, पण त्याच्या गप्पा हरवतात,त्याचं हास्य विरून जातं, आणि त्याच्या अस्तित्वाभोवती शांततेची जाड भिंत उभी राहते. मुलांच्या लग्नानंतर तर त्याचं स्थान घरात आणखीनच मागे सरकतं.कधी ज्याच्याभोवती सगळं घर फिरायचं, तोच आता हळूहळू घराच्या गोंगाटापासून दूर ढकलला जातो.घरातले निर्णय त्याच्या अनुपस्थितीत घेतले जातात,त्याचं मत विचारणं आता कुणालाच आवश्यक वाटत नाही.ज्याच्या अनुभवावर आणि मार्गदर्शनावर हे कुटुंब उभं राहिलं,त्याचं मत “जुनं”, “असंबद्ध” म्हणून दुर्लक्षित केलं जातं. ...

वृद्धांच्या नजरेतला देव...!

इमेज
वृद्धांच्या नजरेतला देव...! आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणूस प्रगतीच्या नावाखाली दिवसेंदिवस धावू लागला आहे. त्याच्याकडे गाडी आहे, घर आहे, मोबाईल आहे, पद आहे. पण मनःशांती मात्र हरवली आहे.आधुनिक जीवनशैलीत विश्रांती म्हणजे आता एक कप कॉफी, मोबाईलचा प्रकाशमान पडदा आणि काही तास बाहेरचा सत्संग इतकंच उरलं आहे.परंतु कधी आपण स्वतःला विचारलं आहे का खरा सत्संग नेमका कुठे आहे? तो मोठ्या प्रवचनांमध्ये नाही, तो मंदिराच्या घंटानादातही नाही…तो आपल्या घरातच आहे.आपल्या वृद्धांच्या सान्निध्यात. वृद्धापकाळ म्हणजे दुर्बलतेचा काळ नाही,तर तो आयुष्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि संयमाचा सुवर्णकाळ आहे.त्यांच्या केसांतील पांढऱ्या रेषा या वयाच्या नव्हे, तर आयुष्यभराच्या संघर्षांच्या, त्यागाच्या आणि प्रेमाच्या ओळी आहेत.त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली प्रत्येक सुरकुती म्हणजे एक अनुभवाची नोंद आहे.आणि आपण मात्र म्हणतो. “आमच्याकडे वेळ नाही.” पण त्यांच्या दृष्टीने आपला तो “थोडासा वेळ” म्हणजे आयुष्याचा प्रसाद असतो.आपण त्यांच्याशी काही क्षण जरी बसलो, तरी त्या क्षणांत त्यांना आयुष्याचे सारे दुःख विसरायला होत...

जनतेचा भोलाभाऊ महाले......!

इमेज
जनतेचा भोलाभाऊ महाले......! एरंडोलच्या पवित्र मातीत अनेक रत्नं दडलेली आहेत. त्यापैकीच एक तेजस्वी रत्न म्हणजे भोलानाथ नामदेवराव महाले सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, परंतु असामान्य विचार आणि दूरदृष्टी असलेले एक जनतेचे खरे नेतृत्व! घरची परिस्थिती साधी असली तरी त्यांचे मन विशाल आणि ध्येय उंच आहे. लहानपणापासूनच संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा सोबती राहिला. मात्र त्या संघर्षातून त्यांनी एकच ध्यास घेतला.  “आपल्या एरंडोलसाठी काहीतरी करून दाखवायचं!” गरिबीतून उभं राहून, प्रामाणिकपणाच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आज ते एरंडोलवासीयांच्या प्रेमाने आणि विश्वासाने अधिक बळकट झाले आहेत. भोलाभाऊंनी कधीच स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगायचं ठरवलं. गरिबाचा हात धरायचा, दुःखात असणाऱ्याला आधार द्यायचा आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आशेची ज्योत पेटवायची. हेच त्यांचं जीवनधर्म बनलं आहे. त्यांना पदाचा मोह नाही, कारण त्यांच्याकडे मनं जिंकण्याची ताकद आहे. म्हणूनच आज जेव्हा ते एरंडोलच्या रस्त्यावरून चालतात, तेव्हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एकच म्हणतात.  “हा आहे आपला भो...

स्वतःपुरतं जगणं ही लोकांना खटकतं...!

इमेज
स्वतःपुरतं जगणं ही लोकांना खटकतं...! आपल्या आयुष्यात आपण एकच गोष्ट जपण्याचा प्रयत्न करतो शांतता.ना कुणावर ओरडायचं, ना कुणाच्या वाटेत जायचं.ना कुणाचं वाईट चिंतन करायचं, ना कुणाला दोष देत बसायचं.फक्त स्वतःची वाट निवांतपणे चालायची, आपली माणसं जपायची, आणि आपल्या स्वप्नांसोबत प्रामाणिक राहायचं. एवढंच! पण हेच साधेपण, ही शांतता, काही लोकांना सहन होत नाही.आपण कुणाच्याही अध्यात-मध्यात नसताना ही, लोकांना आपली उचापत वाटते.आपण गप्प राहिलो, तर म्हणतात, “घमेंडखोर आहे.”हसलो, तर म्हणतात, “दांभिक आहे.” सहन केलं, तर “कमकुवत” म्हणतात, आणि जर उत्तर दिलं, तर “उद्धट” ठरवतात. एखाद्याचं संयमी वागणं, त्याचं स्वतःपुरतं मर्यादित राहणं, ही गोष्ट अस्वस्थ मनांना बनावटी वाटते. त्यांना माणूस गोंधळात सापडलेला, बोलघेवडा, वरवरचा वाटतो. तोच ‘सामान्य’ भासतो.पण जो त्यांच्या साच्यात बसत नाही, त्यांच्या अपेक्षांप्रमाणे वागत नाही.तो त्यांच्या दृष्टीने लगेच संशयास्पद ठरतो. अशा वेळी मनात प्रश्न उभे राहतात.असं काय आहे त्यांच्या मनात, की दुसऱ्याच्या शांततेत त्यांना अस्वस्थता वाटावी?एखादा माणूस मनमोकळं हसतो, तर त्यांच्...

माणुसकीचा चेहरा पप्पूभाऊ भावे....!

इमेज
माणुसकीचा चेहरा पप्पूभाऊ भावे....! धरणगावच्या मातीत माणुसकीचा जादूई सुगंध आहे, आणि त्या सुगंधाला गोडवा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पप्पूभाऊ भावे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विशाल हृदय असलेले पप्पूभाऊ, राजकारणाच्या गजबजलेल्या रस्त्यांवर ही नेहमीच आपुलकी, सेवा आणि माणुसकीची झळाळी घेऊन चालले आहेत. त्यांच्या वागण्यातले सौजन्य आणि कार्यातील प्रामाणिकता यांनी त्यांना धरणगावकरांच्या मनात विशेष स्थान मिळवून दिले आहे. धरणगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि गटनेते म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही शब्दांपेक्षा जास्त लोकांच्या मनात कोरलेले आहे. पद असो वा नसो, पप्पूभाऊंनी नेहमी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. लोकांचा विश्वास आणि आपुलकी हेच त्यांचे खरे राजकीय भांडवल आहे. पप्पूभाऊ हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. श्रीमंत वा गरीब, ओळखीचा वा अनोळखी  त्यांच्यासाठी फरक नाही. त्यांच्या घराचा दरवाजा आणि मनाचा दरवाजा दोन्ही नेहमी सर्वांसाठी उघडे असतात. “सरळ हातांनी मदत करणारे पप्पूभाऊ भावे” ही त्यांची खरी ओळख आहे, जी आज ही धरणगावच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात दृढपणे रुजलेली आहे. ...

दिपकभाऊ महाले श्रम, समर्पण आणि सद्भावनेचा सुगंध...!

इमेज
दिपकभाऊ महाले श्रम, समर्पण आणि सद्भावनेचा सुगंध...! धरणगाव शहर म्हटलं की असंख्य चेहरे डोळ्यांसमोर येतात. परंतु त्यांपैकी एक नाव प्रत्येकाच्या मनात आदराने उमटतं.दिपकभाऊ महाले.भाजीपाल्याचे व्यापारी म्हणून त्यांची ओळख असली, तरी दिपकभाऊंचं व्यक्तिमत्त्व केवळ व्यापारापुरतं मर्यादित नाही; ते मानवी मूल्यांचं, प्रामाणिकतेचं आणि आत्मीयतेचं जिवंत प्रतीक आहेत. पहाटेचा पहिला किरण फुटण्याआधीच ते बाजारपेठेत हजर असतात. ताज्या भाज्यांच्या सुगंधात त्यांचा दिवस सुरू होतो. प्रत्येक ग्राहकाला हसतमुखाने भेटणं, विनम्रतेने वागणं आणि माणुसकीचा हात पुढे करणं ही त्यांची खास ओळख आहे.त्यांचं यश केवळ पैशात नाही, तर लोकांच्या मनात जिंकलेल्या विश्वासात आहे. दिपकभाऊंनी आपल्या अथक मेहनतीने केवळ व्यवसाय वृद्धिंगत केला नाही, तर शहरातील अनेकांना रोजगार, मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली आहे.“काम किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसून, ते किती मनापासून केलं जातं हे अधिक महत्त्वाचं असतं,” हे त्यांचं आयुष्यभराचं ब्रीदवाक्य जणू प्रत्येकाला शिकवतं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण धरणगाव शहर त्यांच्या कार्याचा अभिमान बाळग...

समर्पणाची सावली मीराबाई वना कोळी....!

इमेज
समर्पणाची सावली मीराबाई वना कोळी....! जांभोरे हे गाव लहान असलं तरी तिथं एक मोठं मन धडधडतं ते म्हणजे मीराबाई वना कोळी यांचं. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाच्या संचालिका म्हणून त्या फक्त धान्य वाटत नाहीत, तर त्या गावात प्रामाणिकतेचा आणि सेवाभावाचा सुगंध पसरवत आहेत. थम मशीन बंद पडलं, नेटवर्क गेलं, वीज गेली तरी मीराताईंच्या कामाचा जोम कधीच कमी होत नाही. लोकांना हक्काचं धान्य मिळावं, कुणी उपाशी राहू नये हीच त्यांची खरी पूजा आहे. म्हणूनच कधी कधी त्या रात्री ९ वाजेपर्यंत दुकानात उभ्या राहून धान्य वितरीत करत असतात. थकवा असतो, पण चेहऱ्यावर मात्र सदैव प्रसन्न हास्य आणि सेवाभावाचा तेज उजळलेला असतो. मीराताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कधीच कुणाला अपशब्द बोलत नाहीत. रांगेत उभे असलेले गावकरीही म्हणतात  “मीराताई म्हणजे आपुलकीची सावली.” त्या प्रत्येकाला आदराने, प्रेमाने, आणि हक्काने धान्य देतात. कोणाची अडचण आली तर त्या स्वतः मदत करतात, मशीन पुन्हा चालू करतात, कार्ड पुन्हा स्कॅन करतात.जो पर्यंत हक्काचं धान्य मिळत नाही तो पर्यंत थांबत नाहीत. आणि ही सगळी सेवा त्या स्वतःच्या लहान ...

मनातील देव हरवू नये...!

इमेज
मनातील देव हरवू नये...! आपण देवासमोर उभे राहतो तेव्हा अनेकदा मागणी करतो सुख, शांती, आरोग्य, यश. पण खरी भक्ती ही फक्त मागण्यात नसते, तर त्या मागणीनंतर आपल्या वागणुकीत असते. देवळात जाऊन नमस्कार करून आपण देवासमोर नतमस्तक होतो, पण देवळाबाहेर येताच मनातली नम्रता टिकते का? आपण किती वेळा स्वतःला विचारतो. देवाकडे पाहताना मी कसा वागत आहे? हीच खरी चाचणी आहे. आपल्या श्रद्धेची, आपल्या अंतर्मनातील देवपणाची.कारण माणूस फक्त शब्दांनी ओळखला जात नाही, त्याचे वर्तनच त्याचा खरा परिचय सांगते. आपण काय बोलतो, लोक विसरतात, पण आपण कसे वागतो, ते लक्षात राहते. चांगले विचार आणि चांगली कर्म हीच खरी पूजा आहे. ती केली की तुम्ही मंदिरात गेलो नाही तरी चालेल. पण मनात अंधार, द्वेष, खोटेपणा, स्वार्थ असेल, तर जगातील कितीही भव्य मंदिरे असली तरी काही उपयोग नाही.कारण देव दगडात नसतो... देव असतो आपल्या अंतःकरणात.पण जर अंतःकरण गढूळ आणि अहंकाराने भरलेले असेल, तर देव तिथे कसा टिकेल? आपले खरेपण फक्त आपल्या अंतरात्म्यालाच माहिती असते. लोकांसमोर आपण कितीही छान रूप दाखवले तरी आतली खोटेपणाची सळकळी आपल्याला आणि परमात्म्याला...

संघर्षातून प्रगतीकडे साहेबराव दामू पाटील यांचा प्रवास...!

इमेज
संघर्षातून प्रगतीकडे साहेबराव दामू पाटील यांचा प्रवास...! धरणगाव तालुक्यातील साकरे या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य पण मूल्यांनी समृद्ध अशा कुटुंबात साहेबराव दामू पाटील यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती. त्यांचे वडील शेती करत आणि घर चालवण्यासाठी राबत असत. लहान वयातच साहेबराव यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहिले, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष जवळून अनुभवले. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक विचार खोलवर रुजला आयुष्यात आणि घराच्या प्रगतीसाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. घरात मोठे असल्यामुळे लहान वयातच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. घर चालवताना त्यांनी आई-वडिलांना शेतीकामात मदत केली आणि त्याचबरोबर स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणतीही शैक्षणिक सोय नसतानाही त्यांनी जिद्द, आत्मविश्वास आणि कष्ट यांच्या बळावर आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते तालुका दूध संघ, एरंडोल येथे सुपरवायझर म्हणून रुजू झाले. कामातील प्रामाणिकपणा, निष्ठा आणि शिस्त या गुणांमुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांची नियुक्ती जळगाव येथील ...

नात्यांच्या गर्दीत हरवलेलं मन....!

इमेज
नात्यांच्या गर्दीत हरवलेलं मन....! आजच्या काळात भावना म्हणजे जणू एक बाजारच बनला आहे. कोणी किती हसावे, किती रडावे, कुणाशी किती जवळीक साधावी याची किंमत आता दुसरेच ठरवतात. आपण मनापासून प्रामाणिक असतो. म्हणूनच प्रत्येक नातं आपलंसं वाटतं, प्रत्येक व्यक्तीत आपलेपणा शोधतो. आपण मन मोकळं करतो, आपली खरं परिस्थिती सांगतो… पण आपल्या भावनांचं मोल ठरवण्याचा अधिकार दुसऱ्यांकडेच असतो.“हे जास्तच झालं”, “काय उगाचच भावनिक होतोस”, “याला इतकं का वाटतं?” कधीकधी आपण एखाद्यासाठी वेळ देतो, समजून घेतो, त्यांच्यासाठी झटतो. परंतु हळूहळू त्यांना त्याची सवय होते.किंमत मात्र लागत नाही.आणि जेव्हा आपण आपल्या वेदना स्पष्ट शब्दांत सांगू लागतो, तेव्हा समोरचं व्यक्ती ऐकतेही, पण समजून घेत नाही. आपल्या भावना त्यांच्या दृष्टीने "ओव्हर रिऍक्शन" वाटतात.त्यांना गरज असेपर्यंत आपण “आपले” असतो. एकदा गरज संपली की, त्या नात्यांचं तेज हरवतं… आणि चेहऱ्यावर लावलेला माणुसकीचा मुखवटा सहज गळून पडतो. तेव्हाच उमगतं की,जिथे आपण मन उघडलं, तिथेच आपल्याला उघडं पाडण्यात आलं.जिथे आपुलकीची अपेक्षा ठेवली, तिथे उपेक्षा मिळाली.आ...

जखम शब्दांची....!

इमेज
जखम शब्दांची....! कधीकधी असं वाटतं की आपण काही वेळा खूप बोलून जातो. अनावश्यक राग व्यक्त करतो. अनाठायी अपेक्षा ठेवतो. आणि फारच लवकर मनाला लावून घेतो. आजकाल नाती टिकवणं अवघड वाटायला लागलंय. पण खरंच नाती एवढी कठीण असतात का?की आपणच ती अवघड करून बसतो? राग येणं हे मानवी स्वभावधर्म आहे. मात्र तो राग व्यक्त करताना आपण कोणत्या शब्दांत, कोणत्या पद्धतीने व्यक्त होतो, हे महत्त्वाचं असतं.कारण रागातून बोललेले शब्द कधी कधी इतके खोलवर जाऊन बसतात, की ते मनावर जखमा करून जातात.शरीरावरच्या जखमा भरून येतात, पण मनावर झालेल्या जखमा मात्र काळ ही विसरू शकत नाही. भांडणात उच्चारलेले काही शब्द रात्री अपरात्री पुन्हा आठवून टोचतात. "आपण असं का बोललो?"आणि मग समजतं भांडण करणं सोपं असतं, पण शांत राहणं, हेच खरं सामर्थ्य आहे. एखाद्याचा अपमान करणं फार सोपं आहे. दोन कठोर शब्द बोलायचे आणि समोरच्याला खाली दाखवायचं. पण एखाद्याचा सन्मान करायचा, त्यातली चांगुलपणाची बाजू पाहायची यासाठी मन मोठं लागतो. त्यासाठी आपल्याकडे मूल्यं, संस्कार, आणि सहृदयता असावी लागते.आणि हीच गोष्ट आजकाल दुर्मिळ होत चालली आहे. आपल्...

निष्ठा संघर्ष आणि विश्वासाचा चेहरा रवींद्र कंखरे...!

इमेज
निष्ठा संघर्ष आणि विश्वासाचा चेहरा रवींद्र कंखरे...! धरणगाव – जळगाव जिल्ह्यातील एक साधं पण तेजस्वी गाव, ज्याच्या मातीत कष्टांची परंपरा आणि जिद्दीचा वारसा लाभलेला आहे. या मातीतच घडलेला एक मेहनती, कर्तृत्ववान आणि निष्ठावान तरुण म्हणजे रवींद्र गोकुळ कंखरे. शून्यातून स्वतःचं स्वतंत्र विश्व उभं करत, आज ते अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. रवींद्र कंखरे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील शेतीत राबणारे, तर आईने कष्टाची सवय लावणारी. गरिबीची परिस्थिती असली तरी मनात मोठी स्वप्नं आणि ती पूर्ण करण्याची जिद्द नेहमी जागी होती. लहान वयातच आयुष्याच्या कठोर वास्तवाला सामोरं जात त्यांनी ठरवलं की परिस्थिती बदलायची असेल, तर कष्टाशिवाय पर्याय नाही. आई-वडिलांसोबत शेतीकाम करत करत त्यांनी शिक्षणाची वाट धरली. अभावाच्या काळात कुठली ही तक्रार न करता, प्रामाणिकपणे आणि सातत्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या या प्रवासात चिकाटी, संयम आणि जिद्द यांचाच मोठा वाटा होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्य केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता, गावातील तरुणांसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा निर...

राजीवदादा देशमुख जनसेवेचा अमोल नायक...!

इमेज
राजीवदादा देशमुख जनसेवेचा अमोल नायक...! आज चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, चाळीसगाव मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष आणि एक लोभस व्यक्तिमत्त्व असलेले राजीव दादा देशमुख आज आपल्यातून अखेरच्या प्रवासाला रवाना झाले. दादांचा जीवनप्रवास संघर्ष, सेवा आणि समर्पणाने नटलेला होता. त्यांच्या वडिलांकडून स्वर्गवासी अनिल दादा देशमुख यांच्या कडून त्यांना मिळालेली मूल्यं, कार्यक्षमतेची शिकवण आणि जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ त्यांनी आयुष्यभर जपली. राजकारण हे केवळ पदासाठी नसते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. नगराध्यक्ष पद असो वा आमदारकीची जबाबदारी, दादांनी प्रत्येक पदाचा आदर राखून ते समाजसेवेचे साधन मानले. गरीब, कष्टकरी, वंचित यांच्यासाठी नेहमीच त्यांचे दरवाजे खुले होते. कुणीही अडचणीत असो, राजीव दादांना भेटण्यासाठी कोणताही वेळी बंदिस्त नव्हता, कारण त्यांच्यासाठी माणूस आणि माणुसकी यांना सर्वोच्च स्थान होते. कुस्ती हा त्यांचा जीव होता. जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या पारंपरिक खेळाला नवसंज...

प्रत्येक दिवस एक शिकवण....!

इमेज
प्रत्येक दिवस एक शिकवण....! आयुष्य म्हणजे एक गूढ आणि अनुभवांनी भरलेला प्रवास आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काहीतरी वेगळं घेऊन आपल्या जीवनात प्रवेश करतो. काही दिवस इतके आनंददायी असतात की केवळ त्यांची आठवणसुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवते. काही दिवस मात्र मनाच्या खोल कप्प्यात जाऊन बसतात, आणि पुन्हा आठवले की डोळ्यांत नकळत अश्रू येतात. परंतु या सर्व दिवसांमध्ये एक गोष्ट समान असते. प्रत्येक दिवस काही ना काही शिकवण देऊनच जातो. कधी आपण म्हणतो, "हा दिवस फारच खराब गेला", "आज काहीच चांगलं वाटलं नाही", किंवा "हे असंच माझ्याच बाबतीत का घडलं?" पण जर थोडा वेळ थांबून शांतपणे विचार केला, तर लक्षात येतं की अशा कठीण दिवसांनीही आपल्याला काहीतरी शिकवलं असतं. कदाचित संयम, कधी आत्मनियंत्रण, तर कधी आत्मपरीक्षण. जेव्हा आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखं घडतं, तेव्हा आपण त्या क्षणांचा मनमुराद आनंद घेतो. त्या वेळी वाटतं की हेच खरं जीवन आहे. मात्र, हे क्षण क्षणिक असतात. ते निघून जातात आणि मागे उरतात फक्त आठवणी प्रेमळ, आनंददायी, हास्याने भरलेल्या. हेच क्षण आणि आठवणी ...