पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिरस्कार कितीही वाढू दे….!

इमेज
तिरस्कार कितीही वाढू दे….! जीवनाच्या प्रवासात कधी ना कधी असे क्षण येतात, जेव्हा आपली नितीमत्ता, आपलं चांगुलपण, आपली प्रामाणिकता आणि आपलं कर्तव्य यांच्याच कसोटीला उभं केलं जातं.कधी एखाद्या चुकीच्या आरोपांनी, कधी अनपेक्षित गैरसमजांनी,कधी अचानक वाढलेल्या तिरस्काराने. पण तरीही मनामध्ये एक आवाज पुन्हा पुन्हा फुलतो— “तिरस्कार कितीही वाढू दे… आपण आपलं कर्तव्य करावं.”कारण कर्तव्य हे फक्त काम नसतं;ते आपली ओळख असतं,आपला स्वभाव असतो,आपलं व्यक्तिमत्त्व असतं. धुरानं क्षणभर आकाश झाकतं,काळवंडून टाकतं… पण त्यानंतर?वारा हलका सुटला तरी तो धूर विरतो. आणि मग आकाश पुन्हा तसंच निळं, शांत, विशाल आणि सत्यासारखं स्थिर. माणसांच्या मनातला तिरस्कारही तसाच असतो.तो फक्त धूर असतो.क्षणिक, दिशाहीन, आणि कायम टिकणारा कधीच नाही. खरं तर, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालते,जेव्हा ती भले मोठ्याने न बोलता, पण मन लावून काम करत राहते,तेव्हा तिला थांबवण्यासाठी जग काही ना काही धूर निर्माण करतंच. कधी बोलण्यातून,कधी नजरांमधून,कधी अफवांमधून. पण आपण काय करायचं?थांबायचं? नाही.आपण फक्त आपल्या मार्गावर ...

अपमानाचे उत्तर यशाने द्या...!

इमेज
अपमानाचे उत्तर यशाने द्या...! तुमचा अपमान…ही भावना शब्दांत मावत नाही. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं, तुमच्यावर हसतं, तुमचं स्वप्न छोटं मानतं तेव्हा मनात एक असह्य टीस उठते. त्या क्षणी काय बोलावं, कसं उत्तर द्यावं हे सुचत ही नाही. पण खरी गोष्ट हीच आहे.अपमानाचं उत्तर त्वरित शब्दांनी दिलं, तर ते क्षणापुरतंच राहतं; पण शांतपणे, संयमाने दिलेलं यशाचं उत्तर आयुष्यभर लक्षात राहतं. लोकांनी केलेला अपमान मनात ठेवायचा, पण राग म्हणून नाही.जिद्द म्हणून.कारण जेव्हा लोक तुमच्यावर हसतात, तेव्हा ते तुम्हाला थांबवू पाहत नाहीत… ते तुमच्याकडून भीती बाळगतात. तुमच्या क्षमतेची त्यांना जाणीव असते; म्हणूनच ते त्यावर सावली टाकण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही मात्र शांत राहा.शब्दांनी नाही, कृतीने उत्तर द्या. त्यांच्या हसण्याला मनात साठवा, पण दुखापत म्हणून नाही.तर इंधन म्हणून.आपलं ध्येय ठरवा,आणि त्या दिशेने चालत राहा. हळूहळू, सातत्याने, संयमानं. कारण जिंकणाऱ्यांचा आवाज कधी मोठा नसतो.तो प्रभावी असतो. एक दिवस असा येतो, जेव्हा तुम्ही यशाच्या उंचीवर उभे असता.आणि त्याच लोकांची नजर तुमच्याकडे बदललेली दिसते काल...

विश्वास तुटला की बोलणं नव्हे,दूर जाणंच योग्य....!

इमेज
विश्वास तुटला की बोलणं नव्हे,दूर जाणंच योग्य....! विश्वास हा कोणत्याही नात्याचा आत्मा असतो.तो असेल तर नातं जगतं, फुलतं; आणि तो तुटला की नातं केवळ नावापुरतंच उरतं. कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवावा, आपल्याशी प्रामाणिक राहावं,ही माणसांची नैसर्गिक अपेक्षा असते.पण जेव्हा एखादी व्यक्ती त्या अपेक्षेवर पाय देऊन चालते, तेव्हा मनाच्या आत खोलवर एक वेदना उमटते.अगदी न सांगता आढळणाऱ्या जखमे प्रमाणे. विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीकडून जाब विचारणं हे अनेकदा आपल्यालाच पुन्हा जखमी करणं ठरतं. कारण अशा लोकांकडे स्पष्टीकरणांच्या मोठ्या गोष्टी असतात. ते शब्दांच्या नुसत्या चकव्यात आपल्याला अडकवतात, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा आटापिटा करतात आणि पुन्हा वेळी येईल तेव्हा तोच घाव घालतात. त्यांच्यासाठी विश्वास हा केवळ वापरण्याचं साधन असतं.मनापासून निभावण्याचं मूल्य त्यांना कधीच कळलेलं नसतं. म्हणूनच अशा लोकांकडे एकही प्रश्न विचारू नये. कुणी आपल्याला वारंवार दुखावणारं असो, तर त्यांना दोष सांगून थांबवता येत नाही.त्यांना फक्त दूर ठेवलं जातं. आणि तेच खरं धैर्य असतं. रागाने नाही, आरडाओरड करून नाही… शांतपणे. क...

“शिस्त,सेवा आणि नेतृत्वाची जिवंत शाळा साळवे इंग्रजी विद्यालयातील स्काऊट गाईड कॅम्प अविस्मरणीय”

इमेज
“शिस्त,सेवा आणि नेतृत्वाची जिवंत शाळा साळवे इंग्रजी विद्यालयातील स्काऊट गाईड कॅम्प अविस्मरणीय” “शिस्त, सेवा आणि नेतृत्व  स्काऊट गाईड कॅमद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास ठरतो !” असे मुख्याध्यापक एस. डी. मोरे यांनी सांगितलेल्या शब्दांमध्ये या संपूर्ण शिबिराचे आत्मस्वर सामावलेले होते. साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे यांच्या वतीने आयोजित स्काऊट गाईड कॅम्पने यंदाही उत्साह, ऊर्जा आणि शिस्तबद्ध वातावरणाची सुंदर मेजवानी विद्यार्थ्यांना दिली. कॅम्पचा समारोप मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गिरीश नारखेडे, चेअरमन, ग्राम सुधारणा मंडळ, तसेच डॉ. चंद्रकांत नारखेडे, खजिनदार, ग्राम सुधारणा मंडळ हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने समारोपाला विशेष ऊर्जादायी तेज लाभले. कॅम्पमधील प्रत्येक क्षण विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा, जाणण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा उत्सवच बनला होता. सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मांडणी, कॅम्प परिसराची रंगतदार सजावट, तंबू उभारणीतील कौशल्य आणि स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी अत...

प्रेमाची सुरुवात स्वतःपासून.....!

इमेज
प्रेमाची सुरुवात स्वतःपासून.....! खरंच… आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करावं, आपली काळजी घ्यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण प्रेम हे मागून मिळत नाही.ते देऊन मिळतं.कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्या जखमा पाहाव्या, आपल्या आनंदाला मिठी मारावी, ही अपेक्षा जशी खरी आहे, तशीच एक सत्य गोष्ट आपण विसरतो जगाला तुम्ही काय देता, तेच जग तुम्हाला परत देतं. आपल्याकडून इतरांना जेव्हा खरी आपुलकी मिळते… नुसती शब्दांची नाही, तर मनातून आलेली ऊब… तेव्हा एखाद्या माणसाच्या डोळ्यात अचानक विश्वास उगवतो. कोणी तुमच्यात स्वतःसाठी जागा पाहू लागतो.कोणी तुमच्या जवळ राहताना सुरक्षित वाटू लागतो.हीच तर प्रेमाची सुरुवात असते. आपण प्रेमाची वाट बघतो, पण स्वतःच्या मनात कधी झरा वाहू देत नाही.आपुलकीचा नुसता आव आणला की ते दिसून येतं;कारण खोट्या ऊबेचा स्पर्श कधीही हृदयापर्यंत पोचत नाही.मात्र, मनातून ओसंडून आलेली माया शब्दांशिवाय ही जाणवते,दूरूनही स्पर्श करते, आणि एकटा असलेल्या जीवाला जगण्याची नवीन उमेद देते. इतरांची काळजी घेणं म्हणजे स्वतःला नेहमी मागे ठेवणं नाही.तर, मन मोठं करणं आहे.एखाद्याच्या दुःखात हात ध...

दि.२८ नोव्हेंबर २०२५ क्रांतिसूर्य महात्मा जांतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख

इमेज
दि.२८ नोव्हेंबर २०२५ क्रांतिसूर्य महात्मा जांतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख ------------------------------------------------------- महात्मा फुले : सर्वकष गुलामगिरीवर हल्ला करणारे थोर समाजक्रांतिकारक महात्मा फुलेंच्या । कार्याला नमन । करांनी वंदन । स्मृतिदिनी ॥        थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ,स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा आणि सत्यशोधनासाठी समर्पित करणारे महान व्यक्तिमत्त्व,भारतातील सामाजिक गुलामगिरीच्या विरूद्ध बंड पुकारणारे आणि सर्वंकष गुलामगिरीवर हल्ला करणारे क्रांतिकारक, बहुजनांचे मुक्तिदाता,  स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक,कृषितज्ज्ञ,अर्थतज्ज्ञ,आधुनिक नाटककार,निबंधकार, आद्य शिवचरित्रकार,पुणे नगरीचे आयुक्त,सत्यशोधक क्रांतिपूर्य महात्मा जोतीराव फुले यांना आज दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥           महात्मा फुले यांचा जन्म पुणे येथे सन : १८२७ सालातील एप्रिल महिन्याच्या ११ तारखेला झाला.समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय होते.स्त्री...

धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन

इमेज
धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन धरणगाव प्रतिनिधी - धरणगाव : समानतेची मशाल पेटवणारे, समाजातील अंधश्रद्धा-दांभिकतेला निरंतर लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त सकल माळी समाजातर्फे लहान माळी वाडा येथून संत सावतोबा, संत तुकोब्बाराय यांच्या स्मारकास माल्यार्पण करून तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला बैलगाडीवर ठेवून अभिवादन रॅली काढण्यात आली. तात्यासाहेब महात्मा फुले यांच्या स्मारकाजवळ उपस्थितांनी माल्यार्पण केले. समाजएकता आणि वैचारिक जागृतीचे दर्शन घडवणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तात्यासाहेब महात्मा फुले स्मारकाजवळ “सत्यशोधक समाज संघ निर्मित दिनदर्शिका-२०२६” चे प्रकाशन विविध समाजातील अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. “जेथे समानता नाही, तेथे मानवता नाही” या फुलेंच्या विचारांना नव्याने उजाळा देत हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती ऐतिहासिक ठरली.       प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक हेमंत माळी यांनी सांगितले की, ही दिनदर्शिका फक्त द...

स्व.आप्पासाहेब जुलाल चुनीलाल पवार यांचे स्मरण...!

इमेज
स्व.आप्पासाहेब जुलाल चुनीलाल पवार यांचे स्मरण...! जांभोरे गावात स्व. आप्पासाहेब जुलाल चुनीलाल पवार हे अशी व्यक्ती होते की, त्यांची साधेपणा, नम्रता आणि दयाळूपणा गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवायची. एका सर्वसामान्य घरातून आलेले, तरी त्यांच्या मनातील महानतेची छाया प्रचंड होती. त्यांनी आपले आयुष्य सातत्याने समाजासाठी, धर्मासाठी आणि गुरुभक्तीसाठी समर्पित केले. आप्पासाहेबांचा जीवनप्रवास अत्यंत साधा होता, पण त्यांच्या कृतींमुळे त्यांनी गावातील प्रत्येकाच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने जांभोरे गावात बारा गाड्या ओढल्या जातात. या उत्सवात आप्पासाहेब स्वतः घरापासून महादेव मंदिरापर्यंत रस्ता झाडत जात. गावात कुणीही व्यस्त असले तरी, बोडावन घेण्यासाठी ते तालुक्याच्या गावातही पोहोचत. त्यांचे गुरुभक्तीसाठीचे समर्पण अवर्णनीय होते. मंदिरात कोणतीही पूजा असो, ते नेहमी प्रथम पोहोचत. त्यांच्या हृदयात खऱ्या अर्थाने भक्ती आणि मानवतेची भावना होती. त्यांनी कधीही प्रतिष्ठा किंवा स्वार्थासाठी काही केले नाही; त्यांचे जीवन म्हणजे सेवा, साधेपणा आणि प्रेमाची शिकवण. द...

टीकेच्या जखमांतून जन्मते ताकद.....!

इमेज
टीकेच्या जखमांतून जन्मते ताकद.....! निंदक… हे शब्द मनाला दुखावतात, पण आयुष्याचा खोल अर्थ समजून घेतला तर लक्षात येतं की निंदकांशिवाय आपली वाटचाल कधीही मजबूत होऊ शकत नाही. त्यांच्या कटू बोलण्यात, त्यांच्या टोमण्यांमध्ये आणि त्यांच्या नजरेत दडलेला हेवा हे सगळं आपल्याला थांबवण्यासाठी नसतं, तर उलट आपली गती वाढवण्यासाठी असतं. आपल्याविषयी कुणी चुकीचं बोलतं, उगाच दोष लावतो, पाठिमागे कुजबुजतो तेव्हा मनात सल निर्माण होते. पण खरी गोष्ट अशी आहे की त्या सलच आपल्याला बदलायला लावते.माणूस जिथे जखमी होतो, तिथूनच तो ताकद उभी करतो.निंदकांचे शब्द जरी विषारी असले तरी त्या विषातूनच आपल्या जगण्याची प्रतिकारशक्ती तयार होते. जसं गल्लीतील दोन-चार डुकरांशिवाय गल्लीची स्वच्छता ध्यानातच येत नाही.कारण ती घाणच आपल्याला साफसफाई करण्यास भाग पाडते… तसंच जीवनात दोन-चार निंदक नसतील तर आपण स्वतःकडे पाहायला, स्वतःला सुधारायला, स्वतःला उभं करायला कधी शिकणारच नाही. त्यांचे शब्द म्हणजे आरसा कधी वाकडा, कधी तिरपा, पण तरीही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग त्यात आपल्याला दिसतोच.कधी त्यांच्या टोमण्यांतून आपला अहंकार त...

सत्तेच्या सावलीत हरवलेला गावाचा उजेड....!

इमेज
सत्तेच्या सावलीत हरवलेला गावाचा उजेड....! गाव… मातीचा गंध, शेतांचा श्वास, श्रमाची पूजा आणि मनाची निरागसता. पण या निरागसतेच्या आकाशावर काळ्या ढगांसारखी काही मुठभर माणसांची स्वार्थाची सत्ता झाक बसवून बसली आहे. विकासाच्या आशेने स्वप्नं उभी करणाऱ्या या गावांमध्ये आज एक अदृश्य जखम दिवसेंदिवस खोल होत चालली आहे. गावासाठी मिळणारा प्रत्येक निधी, प्रत्येक योजना, प्रत्येक आश्वासन गावकऱ्यांसाठी नसून काही “विशेष” घरांसाठी आरक्षित असल्याचा अनुभव सर्वत्र जाणवू लागला आहे. कारण या योजना गावाला नव्हे… तर “मी आमदाराचा माणूस” अशा नावाने गर्वाने मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खिशात प्रथम पोहोचतात. उरलेलं गावासाठी ते ही फक्त कागदावर. गावात एखादं सरकारी काम आलं की त्याच्या पहिल्याच दिवशी ठेकेदाराला घरी बोलावून कमिशन ठरवला जातो. विकासाचं काम सुरू होण्याआधीच पैशांचा हिशेब पूर्ण होतो… आणि म्हणूनच गावात उभे राहतात.अर्धवट गटारी, दोन पावसात वाहून जाणारे रस्ते, पाण्याच्या अपूर्ण योजना आणि सांगायला लाज वाटावी असा दर्जाहीन सरकारी कारभार. गावात मात्र या ढिसाळ कामांची किंमत गावकरी भरत असतात.मुलांना शाळेत जाता...

नगरसेवक हे पद नाही,सेवा आहे....!

इमेज
नगरसेवक हे पद नाही,सेवा आहे....! आजकाल सोशल मीडियावर काही मिनिटांत लोक लोकप्रिय होतात. फोटो, स्टेटस, लाइक, शेअर… आणि काही लोक स्वतःला नेता समजायला लागतात. पण सत्य हे आहे की, काही लोकांचा काही पोस्ट किंवा स्टेटस टाकल्याने कोणी नगरसेवक होत नाही. नगरसेवक होणे म्हणजे पदावर बसणे किंवा फोटो काढणे नाही. खरा नगरसेवक तो आहे जो आपल्या शब्दांपेक्षा कृतीतून ओळखला जातो. तो तोच आहे जो लोकांच्या गल्ल्यांमध्ये फिरतो, त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या दुःखात सामील होतो, आणि प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वतः पुढे येतो. रस्ते दुरुस्त करणे, पाणी पुरवठा सुनिश्चित करणे, आरोग्य सुविधा पोहोचवणे, शाळा, वृद्धाश्रम आणि सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेणे—हेच खरे काम आहे. हे सोपे नाही, हे धैर्य, संयम आणि निष्ठा मागते. प्रत्येक नागरिकाची समस्या त्याच्या मनात धरून ती सोडवण्यासाठी स्वतः सज्ज राहणे.हीच खऱ्या नगरसेवकाची ओळख आहे. लोक फक्त कृतीवर विश्वास ठेवतात, शब्दांवर नाहीत. स्टेटस किंवा फोटो कधीही काम करून दाखवू शकत नाहीत. एखाद्या गावात पाणी नसताना, रस्ते खड्ड्यांनी भरलेले असताना, वयोवृद्ध नागरिकांना आधा...

समरसतेची दीपशिखा डॉ.मनिषा महाजन....!

इमेज
समरसतेची दीपशिखा डॉ.मनिषा महाजन....! समाजात वाढणारी दुरावलेली नाती, स्पर्धेच्या वेगात हरवणारी मानवी संवेदना आणि ताणतणावांच्या गर्दीत हरवू लागलेली माणुसकी या सगळ्यातून वाट काढत एखादी व्यक्ती समाजासाठी आशेचा दीप पेटवते, तेव्हा त्या प्रकाशाचा तेजस्वी झोत दूरवर पसरतो. जळगाव जिल्ह्यातील वराड गावातील श्री व सौ दयाबाई रघुनाथ महाजन यांची कन्या, आणि विखरण गावातील कै. दगडू लक्ष्मण महाजन व ग. भा. मनकर्णाबाई दगडू महाजन यांची सून, तसेच विलास दगडू माळी यांची पत्नी असलेल्या मनिषा महाजन यांनी मिळवलेली विद्यावाचस्पती पदवी हा असाच एक प्रेरणादायी प्रकाशपुंज आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे हिंदी विषयात विद्यावाचस्पती म्हणजेच पीएचडी हा मान प्राप्त करून मनिषा महाजन यांनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर दोन गावांचा अभिमान उंचावला आहे. “राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की काव्य मे अभिव्यक्त समरसता बोध: तुलनात्मक अध्ययन (भारत-भारती एवं ग्रामगीता के विशेष परिप्रेक्ष्य में)” या गंभीर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी केलेले संश...

आजचा जिवलग,उद्याचा विरोधक....!

इमेज
आजचा जिवलग,उद्याचा विरोधक....! जीवनात काही माणसं आपल्यासोबत असतात,हसतात, रडतात, आणि आपल्या सुख-दुःखात भागीदार होतात. आपल्याला वाटतं की त्यांच्या बरोबर आपण आपलं सगळं उघडून सांगू शकतो.आपले स्वप्ने, भीती, चिंता आणि गुपितं. पण सत्य हे आहे की, प्रत्येक माणूस कायमसाठी आपल्यासोबत राहणार नाही. आज जो जिवलग आहे, उद्या तोच परिस्थितीनुसार आपला विरोधकही ठरू शकतो. आपले मन उघडणे, सर्व काही सांगणे हे एक नाजूक काम आहे. कारण आपले गुपित, आपली दुर्बलता, आपले मनातले विचार हे सर्व काही योग्य वेळ आणि योग्य व्यक्तीसोबतच सामायिक करणे सुरक्षित असते. जर आपण सर्व काही उघडून सांगितले, तर कधी कधी ती माहिती आपल्याच हानीस कारणीभूत ठरते. जिवलग असणाऱ्या माणसाशी आपली नाळ जरी घट्ट असली, तरी प्रत्येक संबंधात एक मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडल्यास विश्वासाचा तुटणे, गैरसमज किंवा मनःशांती गमावणे शक्य आहे. म्हणून आपले काही विचार, भावना आणि गुपितं हृदयात जपून ठेवणं हीच शहाणपणाची कला आहे. आज आपल्यासोबत असलेला माणूस उद्या वेगळा मार्ग धरू शकतो, वेगळ्या दिशेने जाऊ शकतो.आपली सर्व माहिती त्याच्यासोबत असल्यास, ती कधी कधी ...

भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे संविधान

इमेज
दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी असलेल्या संविधान दिनानिमित्त लेख. ----------------------------------------------       भारतीय संविधान जगातील           सर्वात मोठे संविधान               भारतीय संविधान हे लिखित स्वरूपातील जगातील सर्वात मोठे संविधान आहे.ते भारताला एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित करते.भारतीय संविधानाला दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ते स्वीकारले,म्हणून या दिवसाला 'संविधान दिन' (Constitution Day) म्हणून ओळखले जाते.सविधान दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ॥         भारतीय संविधानाच्याअंमलबजावणीची तारीख दि . २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली .ज्याला आपण 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) म्हणून साजरा करतो. .          भारतीय संविधानाची निर्मिती संविधान सभेने केली. डॉ.राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते,संविध...

मायाजालात हरवलेली माणुसकी....!

इमेज
मायाजालात हरवलेली माणुसकी....! या जगात अनेक गोष्टी पैशाच्या चमकांनी ढकलल्या जातात. पैसा जवळ असेल तर सगळे आपल्यासाठी हसतात, मदत करतात, आपली साथ देतात. पण पैसा नसेल, तर अचानकच सगळे दूर जातात; नाते, प्रेम, विश्वास  सगळं हरवून जातं, जणू काही ते कधी अस्तित्वातच नव्हते. मनाला हे विचार करताना दुःख वाटतं. का आपुलकी, प्रेम, आणि नाते पैशावर अवलंबून असते? का माणूस माणसापेक्षा अधिक पैशाला महत्त्व देतो? जगात किती सुंदरता आहे, किती निसर्गाची गोडी आहे, किती माणुसकीची ओढ आहे. तरी अनेकांना फक्त पैशाची चमक दिसते. हो, पैसा आयुष्य सुलभ करतो. गरजा भागवतो, जीवन सुलभ करतो. पण खरे सुख, माणुसकी, प्रेम, निस्वार्थ नाते हे पैशाने मिळत नाहीत. जे नाते पैशावर टिकते, ते खोटं असतं; आणि जे नाते पैशाशिवाय टिकतं, तेच खरी माणुसकी आहे. जगातील खऱ्या रंगांची, खऱ्या ओढांची किंमत पैशात नाही. ती माणुसकीत, नात्यात, हसण्यात, प्रेमात आहे. पैशाशिवाय जे नाते टिकतं, तेच खरे नाते आहे; जे पैशावर टिकतं, ते फक्त बाहुल्याचं सौंदर्य आहे. पैशाची चमक अनेकांना मोहात टाकते, पण खऱ्या प्रकाशाची किंमत माणुसकीत आहे. आपल्या हृदयाची ...

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण..

इमेज
आधनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण यांच्या दि.२५ नोव्हेंबर २०२५ ला ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त लेख . ---------------------------------------------- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार         यशवंतराव चव्हाण            एक थोर स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांना दि.२५ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या ४१ व्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥              यशवंतराव चव्हाण यांचे निधन दि.२५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली येथे झाले. तेव्हा ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे समाधीस्थळ प्रीतीसंगम कराड येथे आहे.         महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सन १९१३ सालातील मार्च महिन्याच्या १२ तारखेला सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे त्यांच्या बालपणीच निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण संघर्षमय गेले.शिक्षण घेत असतानाच त्यांनी भार...

आपला वार्डातील नगरसेवक कसा असावा ?

इमेज
आपला वार्डातील नगरसेवक कसा असावा ? निवडणुकीचा माहोल सुरू झाला की प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आणि प्रत्येक घरात एकच चर्चा रंगू लागते या वेळेस आपल्या वार्डातील नगरसेवक कसा असावा? कारण नगरसेवक हा केवळ पद धारण करणारा नेता नसतो; तो आपल्या परिसरातील प्रत्येक कुटुंबाचा आश्रय,प्रत्येक स्वप्नांचा रक्षक आणि प्रत्येक अडचणीच्या क्षणी धावून येणारा घरचा माणूस असतो.लोकांच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या अपेक्षा शब्दांत सांगण्याइतक्या साध्या नसतात; त्या अनुभूतीतून, विश्वासातून आणि रोजच्या जीवनातील अनुभवातून जन्म घेतात. खरा नगरसेवक तोच, जो निवडणुकीच्या काळात नव्हे तर वर्षभर लोकांच्या सोबत राहतो. ज्याच्या पावलांना आपल्या गल्लीतील मातीची ओळख असते, ज्याच्या कानांनी लोकांच्या वेदना ऐकण्याची सवय केलेली असते, आणि ज्याच्या हृदयात प्रत्येक नागरिकाच्या समस्येबद्दलची खरी काळजी असते.अशा व्यक्तीला जनता मनापासून स्वीकारते. आकर्षक भाषणांपेक्षा संकटाच्या क्षणी दिलेला हात अधिक मौल्यवान ठरतो. शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त होणारी माणुसकी लोकांच्या मनात खोलवर घर करते. नगरसेवक म्हणजे आपल्या घरातीलच एक व्यक्...

सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान पूर्वाचा प्रामाणिकपणा.....!

इमेज
सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान पूर्वाचा प्रामाणिकपणा.....! धरणगाव तालुक्यातील जांभोरे हे एक लहान, शांत आणि साधेपणाची ओळख जपणारं गाव आहे. या गावाची खरी श्रीमंती दागिन्यांत किंवा रुपयापैशांत नाही; ती दडलेली आहे गावातील लोकांच्या स्वभावात, त्यांच्या स्वच्छ मनात आणि संस्कारांमध्ये. जांभोरे गावात सोन्याची किंमत त्याच्या वजनाने नाही, तर प्रामाणिकपणा, निस्वार्थपणा आणि चांगुलपणाच्या तेजाने मोजली जाते. याच गावातील अकरावीमध्ये शिकणारी कु.पूर्वा निरंजित गुजर हिने अलीकडेच दाखवलेला प्रामाणिकपणाचा आदर्श संपूर्ण गावासाठी अभिमानाची नवीन शिदोरी ठरली. जांभोरे गावातील गल्लीतील रहिवासी सौ.शोभा दीपक महाजन यांच्या कानातील दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल हरवले होते. हे टोंगल हरवल्यामुळे त्यांच्या मनात काळजीचं सावट दाटलेलं होतं. सोनं हरवलं म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नाही, तर मनातील अस्वस्थता, धाकधूक आणि सतत छळणारी चिंता हाच अनुभव त्यांच्या जीवनात आला होता. अचानक नियतीने सुंदर वळण दिलं. घरी जाताना पूर्वाला रस्त्यावर हे सोन्याचे टोंगल सापडलं. त्या क्षणी तिच्या मनात कोणताही मोह, शंका किंवा स्वार्थ आले ना...

आयुष्य अनिश्चित आहे आहे तोवर त्याला जपा....!

इमेज
आयुष्य अनिश्चित आहे आहे तोवर त्याला जपा....! आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल असतो आणि प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात येतो, त्याचं महत्त्व आपण कधी कधी समजू शकत नाही. आज आपल्यासोबत असलेला माणूस उद्या डोळ्यांसमोर असेल याची खात्री नसते. आज तो आपल्याला हसवतो, आपल्याला बोलतो, आपल्याला आधार देतो आणि आपल्याला समजतो, पण उद्याचं काहीही ठरलेलं नसतं. आयुष्य कधीही आपल्या अपेक्षांनुसार चालत नाही; ते अचानक बदलतं, आपले जगचं क्षणात उलथवून टाकतं आणि आपण फक्त रिकाम्या जागेकडे पाहत राहतो. कधी कधी अचानक अशी परिस्थिती येते की आपल्याला समजतही नाही, की तो माणूस आपल्यापासून दूर गेला आणि परत येण्याची शक्यता अगदी कमी आहे.आपण गाळलेले प्रत्येक अश्रू त्याला दिसतील का,आपण केलेला हंबरडा त्याच्या कानावर पोहोचेल का, हे आपल्याला माहीत नसतं. पण इतकं नक्की की, एकदा तो निघून गेला, तो परत कधीही आपल्यासोबत राहणार नाही. आपला हा क्षण,आजची आपली ओळख, आजचं आपलं प्रेम आणि काळजी,हे सर्व परत मिळणार नाहीत. म्हणून आहे तोवर त्याला जपायला हवे. त्याच्या छोट्या चुका हसून विसरायला हव्यात, त्याला वेळ द्यायला हवा, त्याच्याशी मायेन...

" मनोरुग्णांसाठी दानशूर व्यक्तींची आवश्यकता " - मनोरुग्ण सेवक मा.संदीप शिंदे

इमेज
" कै.बाबारावजी बुंदेले स्मृती मनोरुग्ण सेवा पुरस्काराने शिंदे दांम्पत्य सन्मानित " " मनोरुग्णांसाठी दानशूर  व्यक्तींची आवश्यकता "                       - मनोरुग्ण सेवक मा.संदीप शिंदे “नंददीप फाऊंडेशन: शिंदे दांपत्याच्या सेवेतून मनोरुग्णांना नवजन्म” अमरावती (प्रतिनिधी) मानवी जीवनात काही वेदना अशा असतात की त्या माणसाला खचवतात, पण त्याच वेदना एखाद्याच्या आयुष्याला नवा दिशा देण्याचे सामर्थ्यही ठेवतात. मा. संदीप शिंदे यांच्या आयुष्यातील वेदनादायी क्षणाला असेच परिवर्तन घडवणारे रूप लाभले. सलूनचे दुकान चालवत लहान भाऊ राजेशचे शिक्षण पूर्ण केले, त्याला नोकरी मिळवून दिली; परंतु अचानक झालेल्या अपघातात राजेशचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संदीपजींच्या जीवनात प्रचंड अंधार दाटला. या अंधारातून सुटका मिळवण्यासाठी ते भटकू लागले. या भटकंतीतच त्यांना रस्त्याच्या कडेला, बसस्थानकावर, रेल्वे स्टेशनवर, फाटक्या कपड्यांत, विस्कटलेल्या केसांसह, भुकेने व्याकुळ झालेले आणि समाजाने वाळीत टाकलेले बेघर मनोरुग्ण दिसू लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेदना...

मनःशांती ते मनोबल धरणगावात घडलेला रूपांतराचा क्षण...!

इमेज
  मनःशांती ते मनोबल धरणगावात घडलेला रूपांतराचा क्षण...! धरणगावच्या विश्वकल्याणी भवनात २१ तारखेला एक असा क्षण उगवला, ज्याने शेकडो युवकांच्या मनामध्ये धैर्याचा दिवा पुन्हा प्रज्वलित केला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, धरणगाव आणि युवा प्रभाग, माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Fear Less, Live More  डर के आगे जीत है” हा प्रेरणादायी कार्यक्रम म्हणजे भीतीच्या पलीकडे असलेल्या अनोख्या शक्तीचा अनुभव प्रत्येकाला देणारा एक आध्यात्मिक सोहळा होता. सकाळच्या प्रकाशाप्रमाणे शांत पण ऊर्जा देणारे वातावरण सभागृहात पसरले, जेव्हा मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रह्माकुमार रूपेशभाई (माउंट आबू), ब्रह्माकुमारी नीता दिदी (धरणगाव सेवाकेंद्र), दीपक जाधव (चेअरमन, लिटल ब्लॉसम स्कूल), ज्योती जाधव (प्राचार्य, लिटल ब्लॉसम स्कूल),सुधाकर मोरे (मुख्याध्यापक,इंगजी विद्यालय,साळवे) कडू महाजन पत्रकार,लोकनायक न्यूज चे संपादक जितेंद्र महाजन, संतोष पवार (पोलिस उपनिरीक्षक) तसेच बडगुजर साहेब (पोलिस उपनिरीक्षक) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाच...

कष्टाचे पैसे देवाचा आशीर्वाद आणि लुबाडलेले धन लोकांचा शाप....!

इमेज
कष्टाचे पैसे देवाचा आशीर्वाद आणि लुबाडलेले धन लोकांचा शाप....! कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद दडलेला असतो. कारण कष्ट म्हणजे प्रामाणिकतेची, संयमाची आणि धीराची परीक्षाच. आपण घाम गाळून मिळवलेला प्रत्येक पैसा केवळ आर्थिक स्थैर्य देत नाही,तर आपल्या आत्म्याला समाधान ही देतो. कष्टातून मिळालेला तुकडा-तुकडा हा स्वाभिमानाचा असतो. तो आपण उंच मानेने खर्च करतो, कारण त्याच्या मागे आपली मेहनत, जागलेली रात्र, केलेले त्याग आणि सांभाळलेली जबाबदारी असते. अशा पैशात देवाचा आशीर्वाद असणारच, कारण तो पैसा सत्याच्या मार्गाने, लोकांच्या हितासाठी आणि स्वतःच्या प्रामाणिक श्रमांवर उभा असतो. पण याच्या पूर्ण उलट, लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडलेला असतो. दुसऱ्याचे हक्क हिरावून घेऊन, कपटाने किंवा फसवणुकीने मिळवलेले धन कधीच सुख देत नाही.अशा पैशाला चमक असते, पण उब नसते; तो हातात येतो, पण शांतता हिरावून नेतो. कारण त्या प्रत्येक रुपयामागे एखाद्याचं दुःख दडलेलं असतं, एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू मिसळलेले असतात. लोकांचा निःशब्द राग, त्यांचा मनातून निघालेला शाप असा पैसा अखेर नष्ट करतो.कधी नात्यांनी, कधी आरोग्या...

डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन

इमेज
डॉ. म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळा निमित्ताने परियत्ती या ग्रंथाचे भिक्खू ज्ञानज्योती  महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन  डॉ.म.सु.पगारे यांच्या सुवर्ण महोत्सवी पुस्तक सोहळ्याच्या निमित्ताने एकूण 50 पुस्तकांचे जे निर्माण कार्य झालेले आहे त्यानिमित्ताने ग्रंथ प्रकाशन सोहळा करण्यात आलेला आहे. यानिमित्ताने परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेधन या तीन संकल्पना बुद्ध धम्मामध्ये ज्ञान संवर्धक म्हणून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामध्ये परियत्ती या संकल्पनेच्या निमित्ताने  सूक्ष्मपणाने ज्ञान ग्रहण करणे व सत्याच्या आधारावरती तपासलेले हे ज्ञान आचरणामध्ये आणून त्याला विकसित करण्याची प्रक्रिया करणे याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे प्रज्ञाच्या वाटचालीसाठी परियत्तीची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या लक्षात येते.  या ग्रंथाच्या माध्यमातून बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना चांगल्या पद्धतीने आचरणातील अभ्यास करता यावा यासाठी  सुप्रसिद्ध लेखक, मानवतावादी विचारवंत डॉ.म.सू.पगारे यांचा परियत्ती हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे.  या ग्रंथाचे प्रकाशन ताडोबा अभयारण्याम...

“गुलाबरावजी पाटील साहेबांचा विश्वासू कार्यकर्ता शहरप्रमुखपदी धरणगावात जल्लोष”

इमेज
“गुलाबरावजी पाटील साहेबांचा विश्वासू कार्यकर्ता शहरप्रमुखपदी धरणगावात जल्लोष” धरणगावच्या राजकीय भूमीत आज एक नवा विश्वास, नवी उमेद आणि नव्या नेतृत्वाची पहाट उगवली आहे. शिवसेनेच्या ठाम विचारांना मनापासून वाहून घेणारे, मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचे कट्टर समर्थक श्री. धीरेंद्रसिंग पुरभे यांची धरणगाव शहरप्रमुखपदी निवड होणे ही केवळ नियुक्ती नाही.तर धरणगावच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयातील विजयाची पहाट आहे. त्यांच्या कार्यतत्परतेवर, लोकाभिमुख स्वभावावर आणि पक्षनिष्ठेवर ठेवलेला पक्षाचा विश्वास आज सर्वांसमोर ठामपणे उभा आहे. सातत्याने जनतेच्या विश्वासासाठी परिश्रम करणाऱ्या या तरुण नेतृत्वाला मोठ्या जबाबदारीचे सोन्याचे पंख आज प्राप्त झाले आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मा.विष्णूभाऊ भंगाळे यांनी ज्यावेळी ही नियुक्ती जाहीर केली, तेव्हा धरणगावातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या अंतःकरणात आनंदाची लहर उसळली. त्यांच्या निर्णयाने पक्षनिष्ठा, संघर्षशीलता आणि लोकांसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची खरी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ही महत्वपूर्ण नियुक्ती क...

आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा…..!

इमेज
आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा…..! आयुष्य म्हणजे एक प्रवास…कधी आनंदाचा, कधी अश्रूंचा, कधी यशाचा, तर कधी पराभवाचा.पण एक गोष्ट कायम खरी असते. कोणाचाच प्रवास सोपा नसतो. आपण एखाद्याला सुखात पाहतो, हसताना पाहतो, आणि वाटतं. “काय नशिबवान आहे ना तो!”पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती संघर्ष, किती अश्रू, किती अपूर्ण स्वप्नं लपलेली आहेत, हे कुणाला माहीत नसतं. म्हणूनच सांगावसं वाटतं.कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका.कारण प्रत्येकाचा रस्ता वेगळा, वेदना वेगळ्या, आणि शिकवण वेगळी असते. ज्याला ठेच लागते, त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात.आपण फक्त त्यांचं यश पाहतो, पण त्यांनी झेललेली वादळं नाही पाहत. लोक काय म्हणतील, कोणाचं आयुष्य कसं आहे.हे विचारण्यात आयुष्य वाया घालवू नका.आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा.कारण शेवटी जगायचं तुम्हालाच आहे, आणि उत्तर द्यायचंही तुम्हालाच.लोकांसारखं जगलात तर कदाचित सगळं ‘बरोबर’ वाटेल, पण मन कधीच शांत होणार नाही.स्वतःच्या मनासारखं जगलात, तर कदाचित जग चुकीचं म्हणेल, पण मन मात्र खुश राहील. जे नशिबात आहे, त्यात समाधान शोधा.कारण नशिब कधीच चुकीचं देत नाही. ...

जिथं प्रगती असते,तिथं जळण्याची सावलीही असते....!

इमेज
जिथं प्रगती असते,तिथं जळण्याची सावलीही असते....! कधी कधी आपल्या आजूबाजूचे लोक अचानक शांत होतात. कालपर्यंत ज्यांनी आपल्याशी हसत-खेळत बोलावं, तेच लोक अचानक दुरावल्यासारखे वाटतात. त्यांचे शब्द कमी होऊ लागतात आणि नजर चुकवली जाऊ लागते. तेव्हा मनाच्या तळाशी कुठेतरी जाणवतं आपल्या प्रगतीची चुणूक त्यांना टोचू लागली आहे. आपलं उन्नतीकडे जाणारं पाऊल त्यांच्या मनात न बोलता चीड निर्माण करत असतं. अशा लोकांना स्वतःचं काही साध्य होत नाही, म्हणून त्यांचं मन भटकत राहतं. त्यांच्या असंतोषाला कुठे तरी वाट काढायची असते, म्हणून ते तुमच्या मानसिक संतुलनाशी खेळ करण्याचा प्रयत्न करतात. कधी किरकोळ कारणांवरून भांडण शोधतात, कधी शब्दांचा गोंधळ उभा करतात, तर कधी वायफळ आरोप करून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या जीवनात उद्योग नसतो, ध्येय नसतं, म्हणून ते इतरांना खाली खेचून स्वतःची उंची मोजण्याचा अपयशी प्रयत्न करत राहतात. स्वतःची प्रगती थांबलेली असताना दुसऱ्याची प्रगती पहाणं अनेकांना सहन होत नाही. रात्री डोळा लागायला त्रास होण्याइतकी त्यांना तुमची भरारी खुपत असते. त्यामुळे ते शेजाऱ्यांमध्ये, न...

अश्रूंमध्ये जपलेली मैत्री....!

इमेज
अश्रूंमध्ये जपलेली मैत्री....! मैत्री म्हणजे फक्त हसणं, मजा करणं, खोड्या काढणं एवढंच नसतं… मैत्री म्हणजे मनाचे भार एकमेकांसमोर हलके करणं, न बोललेलं समजून घेणं आणि कधी अश्रूंमधूनही आपल्या माणसाला घट्ट धरून ठेवणं. कधी विचार करा…जर एखादा माणूस मैत्रीत ही रडला असेल, तर त्याच्या मनात त्या नात्याची किती खोलवर जागा असेल! अश्रू म्हणजे कमजोरी नाही.ती प्रामाणिकतेची शिक्कामोर्तब भाषा असते. असा माणूस रडतो कारण तो नात्याला तितकं महत्व देतो,तो भावनांना मनात दाबू शकत नाही,त्याला मैत्री तुटण्याची कल्पना सुद्धा असह्य वाटते,आणि त्याच्यासाठी "मित्र" ही फक्त संज्ञा नसून एक जिवंत भावना असते. जेव्हा एखादा मित्र आपल्या मनातील वेदना, भीती, प्रेम, काळजी ह्यांना अश्रूंमार्फत व्यक्त करतो, तेव्हा कळतं "या नात्याची मुळं केवढी मजबूत आहेत." असा मित्र रडतो, कारण त्याला त्या नात्याचं अपार मोल असतं. तो रडतो, कारण त्याच्या अंतःकरणातली जागा तुम्ही व्यापलेली असते.तो रडतो, कारण त्याला तुमची साथ हरवण्याची भीती असते.इतकं तीव्र प्रेम आणि न कळत जपलेली भावना… त्यांची किंमत शब्दांनी नाही, मनाने मो...