पडल्यावर हात देणारे मोजकेच...!
पडल्यावर हात देणारे मोजकेच...! या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालण्याचं धाडस मात्र आपल्यालाच करावं लागतं. आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर सल्ले मिळतात, सूचना मिळतात, अनुभव सांगणारे लोक भेटतात. “असं कर”, “तसं करू नकोस”, “हा मार्ग योग्य आहे” असं सांगणारे अनेकजण असतात. पण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे एक कठोर सत्य दडलेलं असतं.त्या वाटेवर पडायचं,थकायचं, घसरायचं आणि पुन्हा उभं राहायचं काम आपल्यालाच करावं लागतं. कारण आयुष्य कोणाच्याही शब्दांवर नाही, तर आपल्या पावलांवर चालत असतं. चालताना आपण एकटेच असतो. आजूबाजूला गर्दी असते, ओळखीचे चेहरे असतात, पण तरीही मनाच्या आत एक एकटेपणाची शांत जाणीव असते. कारण प्रत्येकाचं दु:ख वेगळं असतं, प्रत्येकाची लढाई वेगळी असते. कुणालाही आपल्या मनातल्या वेदना पूर्णपणे समजत नाहीत. म्हणूनच वाट दाखवणारे असले, तरी चालणं आपल्यालाच शिकावं लागतं. पडायचं भीती न बाळगता पुढे जाण्याचं धाडस स्वतःमध्येच शोधावं लागतं. आयुष्याच्या या प्रवासात पडणं अपरिहार्य आहे. कधी अपेक्षांवर पाणी फिरतं, कधी स्वप्नं तुटतात, कधी विश्वासाला तडा जातो. अशा क...