पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिलदार मनाचा दिलदार माणूस दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे...!

इमेज
दिलदार मनाचा दिलदार माणूस दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे...! काही व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या तेजाने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. त्यांचं बोलणं, त्यांची वागणूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं माणुसकीनं ओथंबलेलं हृदय... यामुळेच त्या समाजात एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण करतात. अशीच एक मनाला भिडणारी, हृदयात स्थान घेणारी, आणि सदैव प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे. आज त्यांचा वाढदिवस एक विशेष दिवस. हा दिवस केवळ त्यांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या आयुष्याच्या संघर्षमय, समर्पणशील प्रवासाची आठवण करून देणारा आहे. साध्या घरात जन्मलेला हा मुलगा, पुढे भुसावळ नगरीत आपल्या कार्यकर्तृत्वाने, सेवाभावाने आणि मनमिळावूपणाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतो, ही बाब स्वतःतच खूप काही सांगून जाते. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून झाली. मात्र, राजकारण हे त्यांचं केवळ एक माध्यम होतं. लोकांच्या सेवा करण्याचं. भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य करताना त्यांनी नेहमी जनतेच्या अड...

"शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल: चौथ्या वेळी 'अति उत्तम' मानांकनासह शैक्षणिक क्षेत्रात शिखर गाठले"

इमेज
"शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल: चौथ्या वेळी 'अति उत्तम' मानांकनासह शैक्षणिक क्षेत्रात शिखर गाठले" आज आपल्या शैक्षणिक क्षेत्रात एक अत्यंत गौरवमयी क्षण घडला आहे, ज्यावेळी शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई कडून "अति उत्तम" मानांकन प्राप्त झाले. एरंडोल तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात हा एक मोलाचा क्षण आहे, कारण छोट्या गावात आणि त्याच्या विद्यार्थ्यांना एक असामान्य गौरव प्राप्त झाला आहे. या यशाचे महत्व केवळ संस्थेच्या श्रमाचे फलित म्हणून नव्हे, तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा प्रतिफळ म्हणून ही आहे, ज्यांनी शास्त्री इन्स्टिट्यूटला एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने "अति उत्तम" मानांकन मिळवताना अनेक घटकांचा विचार केला गेला. शिक्षणाची गुणवत्ता, उत्कृष्ट प्रयोगशाळा व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे उत्तम निकाल, प्राध्यापकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या योजना, आधुनिक ग्रंथालयाची सुविधा, तसेच संस्थेचे सामाजिक कार्य. या सर...

मनाशी बोलणारा संवाद… जीवनशैली घडविणारे शिबिर

इमेज
मनाशी बोलणारा संवाद… जीवनशैली घडविणारे शिबिर धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात त्या दिवशी नेहमीपेक्षा वेगळी ऊर्जा अनुभवास येत होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. ती उत्सुकता परीक्षा अथवा स्पर्धेसाठी नव्हती, तर ती होती स्वतःला समजून घेण्याची, बदल स्वीकारण्याची आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची. कारण त्या दिवशी शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. किशोरवयीन संवाद व एड्स जनजागृती शिबिर. या शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. किशोरवयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या मनातील प्रश्नांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांना शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षक श्री. एस. एन. कोळी यांच्या ओघवत्या प्रस्तावनेने झाली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री. ज्ञानेश्वर शिंपी, श्री. गणेश कुंभार आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री....

गवसलेलं समाधान, हरवलेलं यश.....!

इमेज
गवसलेलं समाधान, हरवलेलं यश.....! आजच्या या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि प्रगतीच्या जगात एक गोष्ट आपल्या मनात वारंवार रुंजी घालत असते."यशस्वी व्हायचं आहे." बालपणापासून आपल्याला शिकवलं जातं की यश मिळवणं हेच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. उत्तम शिक्षण, प्रतिष्ठित नोकरी, भरघोस पगार आणि समाजात मान–सन्मान मिळवणं म्हणजेच यश, असं आपण गृहित धरतो. परंतु थोडं थांबून, शांतपणे स्वतःला एक प्रश्न विचारु या या सगळ्याच्या बदल्यात आपण काय गमावत आहोत? आपल्या यशाचा डोलारा बऱ्याचदा इतरांच्या कौतुकावर आधारलेला असतो. आपल्या कर्तृत्वामुळे इतरांना प्रभावित करणं, हेच जणू आपलं ध्येय ठरतं. पण या सगळ्यात आपण आपल्या आतल्या त्या शांत, निरागस मनाची कितपत काळजी घेतो? “समाधान” ही अशी एक भावना आहे जी शब्दांशिवाय ही खूप काही सांगून जाते. ते डोळ्यांतून, चेहऱ्यावरून आणि मनाच्या गूढ लहरींतून प्रकट होतं. यश हे बाहेरून मिळवावं लागतं, पण समाधान हे अंतःकरणातून उमजतं. म्हणूनच, यश कितीही मोठं असलं तरी त्यात समाधान नसेल, तर त्याचं ओझं मनावर सतत जाणवत राहतं. कधी कधी यशाच्या शर्यतीत आपण इतके गुंतून जातो की स्वतःशी ...

अडचणींच्या काळोखात तेजस्वी तारा वैष्णवी अजय भाटिया....!

इमेज
अडचणींच्या काळोखात तेजस्वी तारा वैष्णवी अजय भाटिया....! प्रत्येक यशाच्या मागे एक कथा असते. काही कथा सोप्या, काही संघर्षांनी भरलेल्या असतात, पण काही कथा अशा असतात की त्या मनाला खोलवर भिडतात. अशाच एका प्रेरणादायी कथेची नायिका आहे. वैष्णवी अजय भाटिया. CBSE South Zone-2 शूटिंग स्पर्धा 2025 मध्ये, अंडर-14 मुलींच्या गटात ३९३/४०० असा अविश्वसनीय स्कोअर करून वैष्णवीने द्वितीय स्थान पटकावले. या आकड्यांमागे केवळ तिचं अचूक लक्ष्यच नाही, तर संघर्षातून मिळवलेलं आत्मविश्वास, संकटांना तोंड देण्याची क्षमता आणि मनोबल दडलेला आहे. ९९, ९९, ९८ आणि ९७ हे गुण फक्त अंक नसून तिच्या संयमाचे, एकाग्रतेचे आणि कसोटीच्या क्षणीही न डगमगणाऱ्या मानसिक शक्तीचे प्रतीक आहेत. मात्र या अंकांच्या मागे एक अशी घटना दडलेली आहे, जी तिच्या यशाला अधिक उंचीवर नेते. स्पर्धेच्या अगोदरच्या दिवशी तिची स्वतःची रायफल खराब झाली. जणू एखाद्या शिल्पकाराच्या हातून छिन्नी काढल्यासारखे झाले.त्या रायफलवर तिने कित्येक तास मेहनत घेतली, तिला हाताळायला शिकली, पण ती रायफल तिचा सोबती सोडून गेली. अशा वेळी अनेक जण खचून जातात, गोंधळून जातात कि...

खरा सन्मान अश्रूंमध्ये – जिल्हा परिषद शाळा, धानोरे (आळंदी)...!

इमेज
खरा सन्मान अश्रूंमध्ये – जिल्हा परिषद शाळा, धानोरे (आळंदी)...! आजच्या काळात, विशेषतः शहरांमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये झगमगाट असतो. शिक्षकांचा गौरव मोठमोठ्या मंचांवर, प्रकाश झोतात, आकर्षक भेटवस्तूंमध्ये आणि फोटोसेशनमध्ये केला जातो. मात्र, खरं मोल, खरं समाधान आणि खरा सन्मान या गोष्टी मनाला आणि हृदयाला भिडणाऱ्या अनुभवांतूनच उमटतात. धानोरे (आळंदी, पुणे) येथील जिल्हा परिषद शाळेत नुकताच असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवायला मिळाला. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी त्या विद्यार्थ्याला शिकवणाऱ्या शिक्षिकेसाठी एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी आपल्या मुलाच्या वागणुकीतील, विचारांतील आणि अभ्यासातील सकारात्मक बदल मनापासूनच्या आणि साध्या शब्दांत व्यक्त केला. हे पत्र फक्त शब्दांचा संच नव्हता, तर ते त्या शिक्षिकेच्या निःस्वार्थ सेवेची, अथक मेहनतीची आणि प्रेमळ मार्गदर्शनाची जिवंत पावती होती. जेव्हा हे पत्र शाळेत शिक्षकांसमोर वाचून दाखवण्यात आले, तेव्हा संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले. प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ शिक्षिकेच्या हृदयाला स्पर्शून गेली. आणि मग त्या शिक्षिकेच्या डोळ्या...

एक दिलदार मनाचा नेता : प्रा. मनोजभाऊ पाटील.....!

इमेज
एक दिलदार मनाचा नेता : प्रा. मनोजभाऊ पाटील.....!  प्रा. श्री मनोजभाऊ पाटील (पैलवान)  एक नाव, जेव्हा उच्चारलं जातं, तेव्हा डोळ्यांसमोर येतो तो एक साधेपणाचा, परंतु अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेला, दिलदार मनाचा माणूस. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच असणारे हास्य, समाजासाठी आणि युवांसाठी धडपडणारी नजर, आणि प्रत्येक गोष्टीत आपलेपणाने सामावून घेणारा स्वभाव  हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे सौंदर्य आहे. आज त्यांचा वाढदिवस एक असं क्षण, जिथे त्यांचं आयुष्य, त्यांची वाटचाल, आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यांची उजळणी आपोआप मनात होते. शिवसेना (शिंदे गट) युवा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने नुसता पक्षाचा झेंडा उंचावला नाही, तर युवकांच्या मनात नवी उमेद, नवी आशा आणि नवी दिशा निर्माण केली. मनोजभाऊंचं संपूर्ण जीवन हे संघर्षातून घडलेलं आहे. पैलवान म्हणून मैदानी घाम गाळताना जसा त्यांचा जीव झोकून देणारा स्वभाव दिसतो, तसाच राजकारणातही त्यांनी प्रत्येक जबाबदारीला आपलीशी करत, ती इमानेइतबारे पार पाडली आहे. त्यांच्या ठिकाणी राजकारण म्हणजे केवळ सत्ता किंवा पदासाठीची च...

एक साधा सच्चा माणूस विनायकभाऊ महाजन...!

इमेज
  एक साधा सच्चा माणूस विनायकभाऊ महाजन...! विनायकभाऊ महाजन... हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो एक असा तेजस्वी चेहरा, ज्यामध्ये प्रामाणिकपणाचे तेज आणि स्वाभिमानाची चमक स्पष्टपणे जाणवते. शून्यातून आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू करून समाजात एक विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या थोडक्याच माणसांमध्ये त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. शेतकरी सेना (शिंदे गट) चे धरणगाव तालुक्याचे तालुका प्रमुख, तसेच ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ही पदे भूषवताना त्यांनी केवळ अधिकार नव्हे, तर जबाबदारी ही अधिक महत्त्वाची असते, हे कृतीतून सिद्ध केले आहे. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही त्यांच्या मनाच्या विशालतेत आणि माणुसकीच्या भावनेत आहे. विनायक महाजन यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्ष, कष्ट, जिद्द आणि निष्ठेची एक प्रेरणादायक कथा आहे. अत्यंत साध्या घरातून, खेड्यापाड्यातून आलेला हा माणूस आपल्या चिकाटीने आणि निस्वार्थ सेवाभावनेने आज समाजात एक विश्वासार्ह स्थान निर्माण करून उभा राहिला आहे. त्यांची जीवनदृष्टी, समाजाप्रती असलेली बांधिलकी, आणि माणसांशी संवाद साधण्याची त्यांची आत्मीय शैली ही त्य...

थांबा… बघा… समजा… आणि मग पुढे चला....!

इमेज
थांबा… बघा… समजा… आणि मग पुढे चला....! माणूस… एक सुंदर, पण गुंतागुंतीचा प्रवास. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं, तरी त्यात एक साम्य असतं सगळ्यांनाच सुख हवं असतं, समाधान हवं असतं, आणि आपली स्वप्नं पूर्ण व्हावीत, अशी तीव्र आकांक्षा असते. परंतु हे सर्व मिळवण्याच्या धावपळीत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो.प्रत्येक गोष्टीची एक ठरावीक वेळ असते, आणि नशिबाने दिलेल्या गोष्टींना ही एक मर्यादा असते. माणसाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी, वेदना आणि अपेक्षाभंग यामागे मुख्यतः दोन गोष्टी कारणीभूत असतात.एक म्हणजे, माणसाला नशिबापेक्षा अधिक काही तरी हवं असतं.दुसरं म्हणजे, त्याला ते सर्व वेळेच्या आधीच मिळावं असं वाटतं. आपल्याला जे मिळालं आहे, त्यात समाधान मानायला आपण शिकलेलो नसतो. एखादी गोष्ट मिळाली, की लगेच त्यापेक्षा मोठ्या गोष्टीची अपेक्षा मनात डोकावते. माणूस जेव्हा एखाद्या टेकडीवर पोहोचतो, तेव्हा तिथून त्याला आणखी उंच शिखरं दिसू लागतात आणि त्या चमकदार शिखरांकडे पाहताना तो पायाखालची जमीन विसरतो. हीच अतृप्त इच्छा आणि हव्यास अनेकदा मनात अस्थिरता निर्माण करतो. मग ते नातं असो, संपत्ती असो, य...

विघ्नसंतोषी माणसं सावलीसारखी सोबत....!

इमेज
  विघ्नसंतोषी माणसं सावलीसारखी सोबत....! जगात प्रत्येक गाव, प्रत्येक वाडा, प्रत्येक घर हे एक छोटंसं स्वतंत्र विश्व असतं. या विश्वात प्रेम असतं, आपुलकी असते, माणुसकीचा ओलावा असतो. मात्र याच गावकुसाच्या एका अंधुकशा कोपऱ्यात काही मनं अशी ही असतात. जी दुसऱ्याचं चांगलं बघू शकत नाहीत. हीच ती विघ्नसंतोषी माणसं. ही मंडळी विशेष काही करत नाहीत, पण इतरांचं काही तरी चांगलं घडतं आहे, हे त्यांच्या मनाला खटकतं. कुणी नवं घर बांधलं, कुणाचं मूल शिकून मोठं झालं, कुणाचा संसार सुखाने चालतोय. की त्यांचं मन अस्वस्थ होतं. चेहऱ्यावर हसू नाही, उलट डोळ्यांत एक विचित्र प्रश्न असतो. "हे यांचं असं कसं?" विघ्नसंतोषी माणसं कधीच समोरून थेट विरोध करत नाहीत. त्यांचं काम हळूहळू, सावध पावलांनी सुरू होतं. ते शब्दांच्या धारांनी घाव करतात, नजरेच्या टोचण्यांनी भावना दुखावतात. एखाद्याचं यश पाहिलं, की लगेच म्हणतील, "हो, पण..." या दोन शब्दांनी सुरुवात होऊन त्या यशावर शंका घेतली जाते. "त्या मुलाला नोकरी लागली खरी, पण काहीतरी शंका आहे." "हिला एवढं यश मिळालं? काही तरी अजिबात स्वाभाविक ...

सेवेच्या नात्यांची ३४ वर्षांची हृदयस्पर्शी वाटचाल....!

इमेज
सेवेच्या नात्यांची ३४ वर्षांची हृदयस्पर्शी वाटचाल....! धरणगाव येथील इंदिरा कन्या माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात नुकतीच एक अत्यंत संस्मरणीय घटना अनुभवण्यास मिळाली. एरंडोल-धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची ३४ वी सर्वसाधारण सभा.ही केवळ एक औपचारिक सभा नव्हती; ती अनेक वर्षांच्या सेवाभावाच्या, आपुलकीच्या व निष्ठेच्या नात्यांना उजाळा देणारी, हृदयाला स्पर्श करणारी एक अविस्मरणीय ठरली. सभेचा प्रारंभ पतसंस्थेच्या माननीय अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संस्थापक अध्यक्ष मा. अण्णासाहेब पी. ए. पाटील आणि एस. आर. पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. हे पूजन म्हणजे संस्थेच्या दशकानुदशकांच्या कार्याची, निष्ठेची व प्रेरणादायी मार्गदर्शनाची सजीव साक्षच होती. सभेसाठी उपस्थित असलेले इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव मा. सी. के. आबा पाटील, पी. आर. हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक मेजर डी. एस. पाटील, माजी मानद सचिव महाले सर, उपाध्यक्ष सौ. आरती जैन, मानद सचिव श्री. सुनील पाटील, तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य आणि अन्य मान्यवर सभासद यांची उपस्थिती ...

मैत्रीचं मूर्तिमंत रूप सोनूभाऊ महाजन...!

इमेज
मैत्रीचं मूर्तिमंत रूप सोनूभाऊ महाजन...! धरणगावची माती ही केवळ सुपीक नसून ती माणुसकीच्या, नात्यांच्या आणि निष्ठेच्या बीजांनी समृद्ध झालेली आहे. याच मातीतून एक असे व्यक्तिमत्त्व उदयास आले आहे, ज्याचे वर्णन शब्दांत करता येणे कठीण आहे. ते म्हणजे सोनू राजेंद्र महाजन. सोनूभाऊंचे नाव घेताच डोळ्यांसमोर एक प्रसन्न, सदा हसतमुख, निरपेक्ष वृत्तीचा आणि सतत इतरांसाठी धावपळ करणारा चेहरा उभा राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा मित्र असतो, जो फार बोलत नाही, पण त्याच्या उपस्थितीमुळे आपल्याला सुरक्षिततेची, आधाराची जाणीव होते. “मी आहे तुमच्या सोबत” हे न सांगता ही जाणवणारा तो मित्र म्हणजे सोनूभाऊ. त्यांच्या स्वभावातील सौम्यपणा त्यांच्या कृतीत ही स्पष्टपणे दिसून येतो. कोणाला अडचण आहे हे कळताच ते तत्काळ मदतीसाठी धाव घेतात. ‘काय हवे?’ असे विचारण्या ऐवजी, ‘मी आहे’ हे कृतीतून दाखवणं त्यांना अधिक सोयीचं वाटतं. म्हणूनच त्यांची मैत्री ही केवळ सोयीपुरती नसून, ती एक जीवनशैली आहे. धरणगावच्या रस्त्यांवर त्यांना पाहताना जाणवतं की, माणूस पदावर मोठा होतो, पण खरा मोठेपणा हा मनात असावा लागतो. सोनूभाऊंचं ...

विलासभाऊ महाजन एक विश्वासाचं नाव...!

इमेज
विलासभाऊ महाजन एक विश्वासाचं नाव...! राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठीची धडपड नसते. ती असते जनतेसाठी स्वतःला समर्पित करण्याची तयारी; ती असते प्रत्येक सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी सच्ची माणुसकी. आणि ही माणुसकी ज्या व्यक्तीच्या वागणुकीत, स्वभावात आणि कृतीत दिसून येते, ती व्यक्ती म्हणजे विलासभाऊ महाजन, शहरप्रमुख शिवसेना (शिंदे गट). आजच्या वेगवान आणि स्वार्थी जगात, जिथे अनेकजण पद मिळताच माणुसकी गमावतात, तिथे विलासभाऊ महाजन हे नाव माणुसकीच्या मूळ तत्त्वांवर ठाम उभं असलेलं आढळतं. त्यांच्या दिलदार स्वभावामुळे कित्येकांचे प्रश्न सुटले, अनेकांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटले. कोणता ही वर्ग असो, कोणती ही जात, पंथ, पक्ष अथवा विचारसरणी असो प्रत्येकाला आपलंसं करण्याची विलक्षण ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांची ओळख ही केवळ एक पदाधिकाऱ्यापुरती मर्यादित नाही. मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचे ते कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. मात्र, ही साथ ही केवळ पाठिंब्यापुरती मर्यादित न राहता, ती मूल्यांशी, विचारधारेशी व नेतृत्वाच्या निष्ठेशी घट्ट जोडलेली आहे. गुलाबरावजी पाटील साहेबांचा ...

अजातशत्रू व्यक्तिमत्व भाऊसाहेब डी.जी.पाटील साहेब

इमेज
अजातशत्रू व्यक्तिमत्व भाऊसाहेब डी.जी.पाटील साहेब धरणगावच्या मातीतून उगम पावलेली एक तेजस्वी आणि विधायक ज्योत, जी आज अखंडपणे समाज, जनसामान्य आणि पक्षकार्यात झगमगते आहे. त्या म्हणजे भाऊसाहेब डी.जी. पाटील. जिथे मतभेद असतात, तिथे मनभेद नसावेत, हा जीवन दृष्टिकोन अंगीकारणारे, प्रत्येकाला आपलेसे करणारे आणि पक्षीय सीमा ओलांडून थेट लोकांच्या मनात स्थान मिळवणारे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजेच भाऊसाहेब. सर्व सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि सत्तेच्या सर्वोच्च पायऱ्यांवर असताना ही जमिनीशी नाळ जुळवून ठेवणारे नेते आज दुर्मिळ झाले आहेत. अशा नेत्यांमध्ये भाऊसाहेबांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. त्यांची नम्र, सौम्य भाषा, संयमी व्यक्तिमत्त्व, आणि गरजूंसाठी नेहमी तत्पर राहणारी मदतीची भावना हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर ती एक निस्वार्थ सेवा आहे. लोकांसाठी झिजणं, त्यांच्या अडचणी आपल्या अडचणी मानून त्यावर उपाय शोधणं, हीच त्यांच्या आयुष्यातील खरी तळमळ आहे. भाऊसाहेब हे असे व्यक्तिमत्त्व आहेत, जे...

"एक जीवन, जे समाजासाठी समर्पित मा. शिरीषआप्पा बयस"

इमेज
"एक जीवन, जे समाजासाठी समर्पित मा. शिरीषआप्पा बयस" आजचा दिवस धरणगावसाठी अत्यंत विशेष आहे. कारण आज जन्मदिन आहे त्या व्यक्तिमत्त्वाचा, ज्यांनी आपल्या कार्यकुशलतेने, साधेपणाने आणि लोकसेवेच्या निस्वार्थ वृत्तीने हजारो लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं. जनकल्याण नागरी पतसंस्थेचे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे धरणगाव येथील आधारस्तंभ,मा.श्री. शिरीषआप्पा बयस यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आप्पांचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास आहे. साध्या आणि विनम्र पार्श्वभूमीतून उगम पावलेलं हे व्यक्तिमत्त्व, आज समाजासाठी एक आश्वासक छाया बनून उभं राहिलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पतसंस्थेने केवळ आर्थिक प्रगती केली नाही, तर गरजू, शेतकरी, कामगार, महिला आणि तरुणांसाठी एक विश्वासाचं व्यासपीठ बनलं. शिरीषआप्पांचा प्रत्येक दिवस हा जनतेच्या सेवेसाठी समर्पित असतो. त्यांनी कधीही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची इच्छा बाळगली नाही. पण त्यांच्या शांत, सौम्य आणि कर्मप्रधान व्यक्तिमत्त्वामुळेच ते आज जनमानसात घर करून आहेत. कधी एखाद्या शेतकऱ्याच्या अडचणीत, कधी एखाद्या तरुणाच्या शिक्षणासाठी,...

मित्र......!

इमेज
मित्र......! मित्र म्हणजे नुसता एक शब्द नाही… तो एक भाव आहे, एक नातं आहे, जे शब्दांपेक्षा गहिरं, आणि रक्ताच्या नात्यांपेक्षा खास असतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, जेव्हा वाट चुकते, धैर्य सुटतं, किंवा एकटेपणा गडद होतो तेव्हा हळूच कुठून तरी तो एक आवाज येतो, "अरे, मी आहे ना!" आणि सगळं काही पुन्हा सावरायला लागत. मित्र हे असं नातं आहे जे मागून मिळत नाही, कुणाच्या सांगण्यावरून तयार होत नाही. ते हळूहळू, मनाच्या खोल कप्यात, एखाद्या नाजूक फुलासारखं उमलतं. कधी एका सहज हास्यातून, कधी एका गुपिताच्या वाटणीने, कधी एकमेकांच्या सोबतीने अनुभवलेल्या दुःखांतून. हसत-खेळत निर्माण झालेली ही नाती इतकी अनमोल असतात की ती वेळेच्या कसोटीत ही अबाधित राहतात. मित्र म्हणजे तो, जो तुझं बोलणं न ऐकता तुझ्या मनातलं समजतो. जो तू काहीही गोंधळ केला असलास, तरी तुझ्या पाठीशी उभा राहतो. कधी हसवतो, कधी चिडवतो, पण कधीच एकटं वाटू देत नाही. आयुष्यात हजारो चेहरे भेटतात, पण मनात घर करणारे अगदी थोडेच असतात. आणि हेच असते खरं भाग्य असा एक तरी जीव असावा, जो नात्याला नाव न देता आयुष्यभर साथ देईल. कधी एखाद्या कोपऱ्...

“तिरंग्यासाठी धावणारा – एका शेतकऱ्याच्या मुलाची जागतिक स्पर्धेपर्यंतची झुंज”

इमेज
“तिरंग्यासाठी धावणारा – एका शेतकऱ्याच्या मुलाची जागतिक स्पर्धेपर्यंतची झुंज” कधीकधी जीवन आपल्याला अशा वळणावर घेऊन येतं, जिथे संघर्ष आणि स्वप्नं एकाच वेळी चालत असतात. कुणी श्रीमंत घरात जन्म घेतो, तर कुणी गरिबीच्या छायेखाली वाढतो. पण काही व्यक्ती अशा असतात की, ज्या परिस्थिती समोर न झुकता तिला जिंकतात. अशाच धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासाची ही कथा आहे. सीनियर ऑलिंपियन पराग पाटील यांची. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक हे त्यांचं मूळ गाव. एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म. वडील पुण्यात वेल्डर म्हणून कामाला गेले आणि परागचं बालपण पुण्यातच घडलं. परिस्थिती बेताची होती, पण स्वप्नं मात्र आकाशाला भिडलेली होती.लहानपणापासूनच धावण्याची ओढ होती. धावणं हे त्याचं फक्त खेळ नव्हतं, ते त्याचं जीवन बनलं. बसच्या मागे धावताना त्याच्या पायातील झपाट्याचा वेग शिक्षकांच्या नजरेत भरला. पांडुळे सर आणि महाजन सर यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्याला योग्य प्रशिक्षण दिलं. सहाव्या इयत्तेत मिळालेलं पहिलं सुवर्णपदक आणि एक छोटासा चषक  त्यानेच परागच्या आयुष्याला कलाटणी दिल...

मनामधली जागा....!

इमेज
मनामधली जागा....! कोणाच्या मनामध्ये आपली जागा होणं, ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई असते. ही जागा ना कधी मागून मिळते, ना कधी आग्रहाने मिळते. ती हळूहळू, प्रत्येक क्षणामध्ये, छोट्याछोट्या गोष्टींतून तयार होत जाते. विश्वासाच्या पायावर उभं राहिलेलं हे नातं इतकं खोल असतं की ते सहजासहजी कोणी तोडू शकत नाही. आजचं जग वेगानं बदलतंय. माणसं येतात, जातात, काही कायमचे राहतात, काही काळापुरते. पण काही माणसं अशी असतात, ज्यांची जागा एकदा का मनात झाली की, ती कोणत्या ही कारणाने भरून येत नाही. कारण ती जागा म्हणजे फक्त आठवणींचा संच नाही, तर तो एका विश्वासाचा गोफ असतो, जो अनुभवांच्या धाग्यांनी विणलेला असतो. कधी कधी काही लोक, अगदी मन लावून प्रयत्न करतात. ते वाट बघतात, समजावण्याचा प्रयत्न करतात, मन जिंकायचा प्रयत्न करतात. पण तरी ही, त्यांना त्या जागे पर्यंत पोचता येत नाही. का? कारण मनामधली जागा ही मेहनतीने मिळते, पण ती केवळ प्रयत्नांनी नव्हे तर निस्सीम प्रेम आणि निर्व्याज विश्वासाने तयार होते. कोणीतरी आयुष्यात येतं, मनात घर करतं, आणि मग त्या घरातल्या प्रत्येक भिंतीवर त्यांच्या आठवणींची चित्रं उमटले...

अचानक हरवलेला आधार....!

इमेज
अचानक हरवलेला आधार....! आई-वडील हे प्रत्येक मुलाच्या आयुष्याचं मूलभूत आणि अनमोल अस्तित्व असतं. जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते स्वप्नांच्या पहिल्या उड्डाणापर्यंत त्यांच्या सतत साथ असण्यानंच मुलांचं संपूर्ण विश्व घडतं. त्यांच्या उपस्थितीची इतकी सवय झालेली असते, की त्यांच्या अचानक जाण्याची कल्पना ही मनाला असह्य वाटते. पण आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा आई-वडील क्षणार्धात काळाच्या पडद्याआड निघून जातात, आणि त्या अपूर्ण, असहाय्य अवस्थेत मुलं केवळ दुःखात बुडून जात नाहीत, तर आतून, बाहेरून, पूर्णपणे गोंधळून जातात. आई-वडील हे केवळ जन्मदाते नसतात. ते आपले पहिले शिक्षक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली "ओळख" असतात. त्यांच्या प्रेमळ सहवासात, शिस्तीच्या मार्गदर्शनात आणि अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या डोळ्यांत असणाऱ्या विश्वासाच्या झळकांत आपण आपलं आयुष्य समजून घेतो. त्यांचा एक साधा स्पर्श, एक दिलासा देणारा शब्द, किंवा एक आश्वासक नजर या साऱ्या गोष्टींनी आपल्याला पुढे जाण्याचं बळ मिळतं. परंतु जेव्हा हे सगळं अचानक निघून जातं, तेव्हा आयुष्याचं गणितच कोलमडून ...

समाज म्हणजे आपली ओळख....!

इमेज
समाज म्हणजे आपली ओळख....! प्रत्येक समाजात काही अशी लोकं असतात, ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काही ध्येय नसतं, काही कामधंदा नसतो. त्यांच्या आयुष्यात विचारांचं आणि विवेकाचं अंधारच अधिक असतो, पण तरीही त्यांना दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे, याचीच अधिक चिंता असते. स्वतःच्या जीवनात प्रकाश नसताना, हे लोक कायम इतरांच्या आयुष्यात डोकावून त्यात दोष शोधण्याचा उद्योग करत असतात. कोणाच्या घरी कोण आलं, कोणाची बायको कशी वागते, कोणाची मुलगी कुठे जाते, कोणाचा मुलगा काय करतो. या गोष्टींमध्ये त्यांना अनावश्यक उत्सुकता असते. हे लोक कधीही समोरासमोर बोलण्याची हिंमत करत नाहीत. कारण त्यांच्या बोलण्याला समाजात किंमत नसते, आणि गावात ही त्यांना आदरानं पाहिलं जात नाही. म्हणूनच अशा व्यक्ती दुसऱ्या समाजाच्या लोकांमध्ये बसून आपल्या समाजाचीच टवाळी करत बसतात. ते आपल्या समाजातील माणसांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलतात, त्यांची बदनामी करतात, आणि साऱ्या समाजाची प्रतिष्ठा धुळीत मिळवतात. यांचं वागणं केवळ अपमानास्पद नसून, समाजघातक ही आहे. समाज म्हणजे एक कुटुंब असतं. प्रत्येक घरात चुका होतात, काही वाद होतात, पण त्यांना...

स्मृतींच्या पाऊलखुणा...श्रीमती यमनाबाई नथ्यू महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
स्मृतींच्या पाऊलखुणा... श्रीमती यमनाबाई नथ्यू महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली धरणगाव तालुक्यातील जांभोरे या आपुलकीच्या नात्यांनी नटलेल्या गावात आज एक हळवा क्षण उतरला आहे. गावातील वयोवृद्ध, सर्वांना आपल्यासारख्या वाटणाऱ्या आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या श्रीमती यमनाबाई नथ्यू महाजन यांनी सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वृद्धापकाळाने शांतपणे आपल्या जीवनयात्रेचा शेवट केला. १०५ वर्षांचे प्रदीर्घ, समृद्ध आणि अनुभवांनी भरलेले आयुष्य जगून त्यांनी अनंताच्या दिशेने प्रस्थान केले. त्यांच्या अंत्ययात्रेची सुरुवात मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या जांभोरे येथील राहत्या घरातून होणार आहे. त्यांच्या या अंतिम प्रवासात नुसते नातेवाईकच नव्हे, तर गावकऱ्यांच्या ही मनात दाटलेल्या भावनांची आणि आठवणींची शिदोरी सोबत असेल. यमनाबाई महाजन या केवळ एक वृद्ध माता नव्हत्या, तर त्या एक जिवंत इतिहास, एक स्मृतीगंध आणि एक संस्कारांची शिदोरी होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, प्रेमळ आणि प्रत्येकाशी आपुलकीचा होता. त्यांनी नाती केवळ नावापुरती जपली नाहीत, तर त्यामध्ये ...

मनात घर करणारा चंद्रकांत.....!

इमेज
मनात घर करणारा चंद्रकांत.....! काही माणसं ही भेटत नाहीत, ती आपल्याला "सापडतात". त्यांच्या भेटीमध्ये एक आश्वासक नातं असतं, जणू काही काळानंच त्यांच्या अस्तित्वाला आपल्या आयुष्यात पेरलेलं असतं. अशा माणसांचा विचार करताच, मनात एक गूढ शांतता दाटून येते आपोआप ओठांवर हसू उमटतं, आणि त्यांच्या आठवणीने अंतर्मन उजळून निघतं. चंद्रकांत महाजन हे असंच एक नाव… ज्यात माणुसकीचा गंध, प्रेमाचा ओलावा आणि आपुलकीची ऊब सामावलेली आहे. त्यांना पाहिलं की नजरेला एक समजूत मिळते."आपण एकटे नाही." त्यांच्या डोळ्यांमध्ये माणूसपणाचं खोल समुद्र आहे. कोणत्याही प्रसंगी ते हळुवार शब्दांनी दिलासा देतात, जणू एखादा थकलेला प्रवासी थोडावेळ सावलीत विसावा घेतो, अगदी तसं. त्यांच्या स्वभावात नाटकीपणा नाही, गाजावाजा नाही, पण आहे एक शाश्वत स्थिरता जी जगाच्या कोलाहलात ही शांततेची अनुभूती देते. त्यांचं बोलणं हे फक्त संवाद नसतं, ते एक जादू असते. त्यात दोष दाखवण्याचा उद्देश नसतो, तर समजून घेण्याची इच्छा असते. किती ही अस्वस्थता असो, त्यांच्या सहवासात ती हळूहळू विरघळते. ते मोठेपण दाखवत नाहीत, कारण ते त्यांच्य...

शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे विश्वास....!

इमेज
शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे विश्वास....! मानवी नातेसंबंध हे विश्वासाच्या नाजूक धाग्यांनी विणलेले असतात. त्या धाग्याला जर एखाद्याने सहज हात लावला तर तो तुटायला वेळ लागत नाही. आजच्या काळात आपण अनेकदा पाहतो. कोणी काही सांगितले, अफवा कानावर येताच लगेच शंका घ्यावीशी वाटते. पण खरंच, हे कितपत योग्य आहे? आपण एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे ओळखत असतो. त्या व्यक्तीचे स्वभाव, त्याची छोटी मोठी सवय, आनंद दुःखातील त्याची साथ हे सगळं आपल्याला माहित असतं. पण तरी सुद्धा जेव्हा एखाद्या बद्दल दुसऱ्याकडून एखादी नकारात्मक गोष्ट ऐकू येते, तेव्हा आपण का डळमळतो? आपण का त्या आपल्या अनुभवां पेक्षा परक्या शब्दांना जास्त वजन देतो? शंका ही नात्याची शत्रू आहे. ज्यावेळी आपण शंका घेतो, त्या क्षणी विश्वास तुटायला सुरुवात होते. आणि विश्वास जपण्यासाठी जी वर्षे लागतात, तो तुटण्यासाठी मात्र क्षणभर पुरेसा असतो. म्हणूनच “कोणी सांगितले म्हणून” आपण आपल्या माणसांवर संशय घेणे म्हणजे स्वतःच्या हृदयाचेच नुकसान करणे होय. आपण विसरतो की प्रत्येकजण आपआपल्या नजरेतून, स्वार्थातून, रागातून किंवा कधीकधी फक्त गैरसमजातून ब...

मीच चांगला या भ्रमाच्या पलीकडे...!

इमेज
मीच चांगला या भ्रमाच्या पलीकडे...! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा आपण कोणाच्या तरी वागण्याने अस्वस्थ होतो. विशेषतः जेव्हा समोरचा सतत स्वतःचं कौतुक करत राहतो."मीच चांगला", "मीच योग्य", "माझ्यामुळेच सगळं चाललंय" अशा शब्दांतून तो स्वतःला उंच दाखवायचा प्रयत्न करत असतो. कधी हसू येतं, कधी कंटाळा, पण त्याच्या अशा वागणुकी मागे काय दडलंय, हे आपल्याला लगेचच कळत नाही. माणूस जेव्हा सतत स्वतःचं चांगुलपण जगाला दाखवू पाहतो, तेव्हा खरं तर तो स्वतःलाच त्यावर विश्वास बसवायचा प्रयत्न करत असतो. ही केवळ आत्मविश्वासाची खूण नसते, तर अनेकदा मनाच्या खोल कप्प्यातली असुरक्षितता असते. आपण पुरेसे आहोत का, लोक आपल्याला मान देतील का, आपली किंमत आहे का या प्रश्नांची उत्तरं त्याला स्वतःचं कौतुक करून मिळवायची असतात. पण खरी चांगुलपणा ही कधीच मोठमोठ्याने बोलून सांगावी लागत नाही. ती कळते. शब्दांशिवाय, गोंगाटा शिवाय. एखाद्याचं साधं हसणं, एखाद्या क्षणी दिलेली मूक साथ, कुणाच्या ही न मागता केलेली मदत या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला त्या व्यक्तीच्या मोठेपणा...

कर्तृत्व, माती आणि माणुसकीचा सुगंध श्री. दिनेश चंपालाल पाटील

इमेज
कर्तृत्व, माती आणि माणुसकीचा सुगंध श्री. दिनेश चंपालाल पाटील  गावाच्या मातीशी नातं जपणारे, लोकांची सेवा करत जगणारे, आणि आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण धानोऱ्याच्या हृदयात घर केलेले माजी पोलीस पाटील आणि प्रगतीशील शेतकरी श्री. दिनेश चंपालाल पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. हा फक्त एक विशेष दिवस नसून, तो एका तेजस्वी प्रवासाच्या आठवणी जागवणारा दिवस आहे. जीवनात कितीही पदं, कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी माणसाला मोठं बनवतो तो त्याचा स्वभाव, त्याचे संस्कार आणि समाजासाठी असलेली आस्था. हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पहायला मिळतं. पोलीस पाटील या जबाबदारीच्या पदावर असताना त्यांनी गावात न्याय, सुव्यवस्था आणि विश्वासाचं नातं निर्माण केलं. प्रत्येक निर्णयामागे गावाच्या भल्याचा विचार आणि प्रत्येक कृतीत लोकांसाठी झुकतं माप. त्यांनी फक्त कायदा पाळवला नाही, तर नात्यांचा मान राखत प्रत्येक घरात आपुलकीचं एक नातं निर्माण केलं. शेती हा त्यांचा श्वास आहे. मातीशी अतूट नातं जपत त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग दाखवला. पारंपरिक पद्धतींना विज्ञानाची जोड देत, त्यांनी शेतीला नवसंजीवनी दिली. त्यांच्या प्...

"गोमातेसाठी भक्तीचा यज्ञ — श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र उत्सव"

इमेज
"गोमातेसाठी भक्तीचा यज्ञ — श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र उत्सव" आज पिंप्री येथील कामधेनु गोशाळेमध्ये एक अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गो गायत्री यज्ञाने संपूर्ण परिसर दिव्यतेने भारलेला होता. धूप, दीप, मंत्रोच्चार आणि गोमातेसमोर अर्पण करण्यात आलेल्या श्रद्धेने वातावरण भारावून गेले होते. गोमाता ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ती केवळ जनावर नाही, तर ती आपली जननी आहे, आपली पोशिंदी आहे. तिच्या प्रत्येक श्वासात आपलेच कल्याण सामावले आहे. आज गोशाळेतील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर तो एक सजीव प्रार्थना होता. गोमातेसाठी, तिच्या रक्षणासाठी आणि तिच्या माध्यमातून या पृथ्वीच्या कल्याणासाठी. प्रार्थना करण्यात आली. देवाचे पाणी यावे, गाईंसाठी हिरवळ निर्माण व्हावी, आणि गोमातेचे जीवन आनंदमय व्हावे. त्या प्रार्थनेत केवळ शब्द नव्हते, तर होती ती एक असह्य व्यथा, एक आर्त पुकार, आणि त्या मागे होते एक निस्सीम प्रेम जिचे रुप म्हणजे ‘गोभक्ती’. संचालक प्रमोदभाऊ चौधरी यांनी स्वत: होम करून संपूर्ण विधी...

वाकटुकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप

इमेज
वाकटुकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप दिनांक १५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकटुकी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत समोरील ध्वजारोहण श्री. हिलाल अर्जुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर शाळेसमोरील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाल एकनाथ पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर पोलीस पाटील श्री. भिका पोपट पाटील यांनी श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर भाषणं व सांस्कृतिक नृत्य सादर केली. यावेळी दरवर्षीप्रमाणे श्री. श्रीकृष्ण माधवराव पाटील यांच्यावतीने "आदर्श विद्यार्थी" पुरस्कारासाठी रु. १०००/- रोख रक्कम प्रदान करण्यात आली. ही रक्कम कु. सुनील...

संजू दादा – माणुसकीचा गंध असलेलं व्यक्तिमत्त्व

इमेज
संजू दादा – माणुसकीचा गंध असलेलं व्यक्तिमत्त्व एरंडोलच्या धकाधकीच्या व्यापारी दुनियेत एखाद्याचं नाव उच्चारलं की त्यामागे नुसतं यशाचं नव्हे, तर प्रेमाचं, विश्वासाचं, आणि आपुलकीचं प्रतिबिंब उमटतं. हे नाव म्हणजे संजयजी रमेशजी काबरा, म्हणजेच आपले सर्वांचे हृदयात घर करणारे संजू दादा. व्यवसायाच्या क्षेत्रात भक्कम पाऊल टाकत त्यांनी ‘बालाजी ग्रुप’ आणि ‘मार्केट’सारख्या संस्थांच्या माध्यमातून केवळ उद्योग उभे केले नाहीत, तर एका शहराला दिशा दिली. एकतेची, सुसंस्कृतीची आणि सामाजिक बांधिलकीची. संजू दादांचा प्रवास हा केवळ आर्थिक यशाचा नाही. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर माणसांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य आहे, गरजूंना दिलेली साथ आहे, आणि संकटात आधार बनलेली त्यांची सावली आहे. बालाजी ऑइल मिलच्या माध्यमातून त्यांनी असंख्य कुटुंबांना हात दिला, त्यांच्या हातात रोजगार दिला, आणि त्यांच्या घरात आशेचा दीप लावला. पण खरं सांगायचं तर, या यशाच्या पलीकडेही एक मोठं आणि सुंदर व्यक्तिमत्त्व उभं आहे. जे केवळ मोठं बोलत नाही, तर माणसांच्या छोट्या छोट्या भावना मनापासून समजून घेतं. संजू दादांचा स्वभाव म्...

आठवण हृदयस्पर्शी एक प्रवास....!

इमेज
आठवण हृदयस्पर्शी एक प्रवास....! आठवण म्हणजे नुसती स्मृती नव्हे, ती म्हणजे काळाच्या प्रवाहात हरवलेल्या क्षणांची जपलेली सावली… जी कुठल्या तरी निवांत क्षणी, एकटी असताना किंवा एखादं गाणं ऐकताना मनात हलकेच डोकावते… आणि मग मनात खोलवर उमटते एक हळवी लाट. कधी एखाद्या गंधातून आठवण येते. जसं आईच्या पदराचा वास, किंवा आजोळी मिळणाऱ्या मातीचा खास गंध. त्या क्षणी आपण जणू पुन्हा लहान होतो, आईच्या कुशीत विसावतो, आजोबांच्या गोष्टींमध्ये हरवतो. कधी एखादं गाणं ऐकलं, आणि आठवण आली त्या व्यक्तीची… जी आता आपल्या सोबत नाही, पण कधी काळी आपल्या प्रत्येक क्षणात होती. तिचं हसणं, बोलणं, रागवणं… सगळं आठवतं. मन गलबलून जातं. डोळे ओलावत जातात. पण तरीही त्या आठवणी हृदयात घट्ट धरून ठेवाव्याशा वाटतात. आठवणी कधी हसवतात, तर कधी रडवतात. कधी त्या जगण्याला नवा अर्थ देतात, तर कधी आयुष्याच्या रिकाम्या जागा भरून काढतात. जणू त्या आठवणी म्हणजे आपल्या मनातली एक हळवी कविताच असते, जी आपणच लिहिलेली असते... आपल्या अनुभवांनी, आपल्या प्रेमानं, आपल्या हरवलेल्या क्षणांनी. आठवणीत एक वेगळीच ताकद असते. ती आपल्याला त्या गोष्टींशी पुन...

आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात

इमेज
आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात प्रतिनिधी  पिंप्री खुर्द येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आदर्श बालक विद्या  मंदिर प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला  सर्वप्रथम पिंप्री गावातून विद्यार्थ्यांची मिरवणूक निघाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामजी चौधरी हे होते   तर ध्वजारोहण सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर विद्याधर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद चौधरी संस्थेचे सचिव विनोद चौधरी संचालिका यशोदाताई चौधरी   आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली चौधरी  भोद येथील सरपंच विजय पाटील  संदीप पाटील सेवानिवृत्त शिक्षक उमाकांत बोरसे पिंप्री खुर्दचे पोलीस पाटील गोपाल बडगुजर माजी सरपंच यशवंत चौधरी व पालक वर्ग उपस्थित होते  विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या देशावर कृतज्ञता व्यक्त केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या  नृत्याविष्कार माध्यमातून विविध देशभक्तीपर गीतांनी उपस्थ...

"सुरांच्या रिक्षातून स्वप्नांची वाट"

इमेज
  "सुरांच्या रिक्षातून स्वप्नांची वाट" धरणगाव या छोट्याशा गावात, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले देविदास खंडू महाजन गावकरी ज्यांना प्रेमाने "देवा भाऊ" म्हणून ओळखतात हे नाव आज घराघरात ओळखलं जातं. पण ही ओळख त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. ही आहे मेहनतीची, जिद्दीची आणि संगीतावर असलेल्या अपार प्रेमाची गोष्ट. देवा भाऊंचं रोजचं जीवन एका साध्या रिक्षाचालकाचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवरून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचं आणि मग दिवसभराचा थकवा घेऊन घरी परतायचं. पण या रोजच्या धकाधकीत ही त्यांच्या मनात एक वेगळीच लय वाजत असते. गाण्याची लय. त्यांच्या जीवनातली खरी उर्जा ही त्यांच्या सुरांत दडलेली आहे. त्यांना गाण्याची लहानपणापासूनच आवड होती. पण परिस्थितीमुळे ते कधी कुठल्याही शाळेत किंवा प्रशिक्षणात जाऊ शकले नाहीत. तरी ही, त्यांनी हार मानली नाही. ते गात राहिले रिक्षा चालवता नाही, मोकळ्या वेळात ही, मनात आणि हृदयात ही. आजच्या डिजिटल युगात, त्यांनी स्टार मेकर सारख्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून स्वतःचा आवाज जगापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. कुठला ही दिखावा...