‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...!
‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...! अति स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता असते.ती आत्मविश्वासाची नसते, तर अहंकाराची असते. त्यांना वाटतं, जगातलं सगळं ज्ञान त्यांनीच मिळवलं आहे. त्यांच्यापेक्षा शहाणं कुणीच नाही, अनुभवी कुणीच नाही. त्यामुळे दुसऱ्याचं मत ऐकणं त्यांना अपमानासारखं वाटतं, आणि प्रेमाने दिलेला सल्ला हस्तक्षेपासारखा भासतो. अशा लोकांचं मन हळूहळू बंद होत जातं. शिकण्याचे दरवाजे आपोआप बंद होतात. अनुभव सांगणारी माणसं मागे पडतात, चुका दाखवणारी माणसं शत्रू वाटू लागतात. वास्तव समोर असून ही ते मान्य केलं जात नाही. कारण अहंकार डोळ्यांवर असा पडदा टाकतो की योग्य-अयोग्य यातला फरकच अस्पष्ट होतो. स्वतःच्या बुद्धीवरचा अति विश्वास माणसाला एकटा करतो. कारण नात्यांना ‘बरोबर-चूक’पेक्षा ‘समजून घेणं’ जास्त गरजेचं असतं. सतत “मीच बरोबर” म्हणणाऱ्या माणसासोबत चालताना माणसं थकतात. हळूहळू संवाद कमी होतो, माणसं दूर जातात, आणि शेवटी भोवती गर्दी असूनही तो माणूस एकटा राहतो. आयुष्य मात्र कुणाच्याही अहंकाराला थांबवत नाही. ते आपली गती चालूच ठेवतं. वेळोवेळी थांबवून, अडवून, वाकवू...