पोस्ट्स

हिरामण धर्मराज महाले: एक निष्ठावान आणि समर्पित पोलीस अधिकारी

इमेज
* हिरामण धर्मराज महाले: एक निष्ठावान आणि समर्पित पोलीस अधिकारी धरणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हिरामण धर्मराज महाले यांची जीवनयात्रा ही निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यभावनेचा सुंदर संगम आहे. नाशिक जिल्ह्यातील आड बुद्रुक, तालुका पेठ येथील मुळगाव असलेल्या महाले साहेबांनी आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची पायाभरणी नाशिकमध्ये केली. सन 1990 मध्ये त्यांनी नाशिक शहरात पोलीस शिपाई म्हणून आपल्या सेवेत पदार्पण केले आणि तेव्हापासून पोलीस दलात उत्कृष्ट योगदान देत आहेत. नाशिक शहरातील पंचवटी, भद्रकाली, नाशिक रोड, अंबड अशा प्रमुख पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास करताना आपल्या कर्तव्याला न्याय दिला आहे. त्यांचे उत्कृष्ट तपास कौशल्य आणि समर्पण यामुळे त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय तसेच माननीय पोलीस आयुक्तांच्या वाचक शाखेतही त्यांनी महत्त्वाचे काम केले. त्यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक ठिकाणी केलेली विशेष कामगिरी आजही पोलीस दलात आदराने आठवली जाते. महाले साहेबांनी 2013 मध्ये विभागीय परीक्षा उत्तीर...

गिरीष रमणलाल भावसार: समर्पण आणि सेवा यांचे प्रतीक

इमेज
* गिरीष रमणलाल भावसार: समर्पण आणि सेवा यांचे प्रतीक गिरीष रमणलाल भावसार – हे नाव *जळगावातील* समाजसेवेच्या आणि शिक्षणाच्या निस्वार्थ साधनेचे एक प्रतीक आहे. त्यांच्या जीवनप्रवासात, प्रत्येक पावलावर त्यांनी विद्यार्थ्यांचे जीवन उजळविण्यासाठी आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पण आणि सेवा यांची महानता साकारली. ते केवळ एक शिक्षक नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्याने जळगावातील अनेक विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे दिले आहेत. गिरीष भावसार यांचा जन्म १२ जून १९७४ रोजी संत सखाराम नगरी,अमळनेर येथे झाला. एम.ए. बी.एड. (भूगोल) अशा उच्च शिक्षणासह, त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, त्यांचं शिक्षण ही केवळ विद्या दानाची प्रक्रिया नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जीवनाच्या विकासासाठी प्रेरणा देण्याचा एक अविरत प्रवास होता. 'महात्मा गांधी स्काऊट पथक' या युनिटचे नेतृत्व करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहस, शिस्त, आणि सामाजिक जबाबदारी यांची बीजं रोवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आण...

राहुल गुजर सर : संघर्षातून घडलेले यशस्वी आयुष्य

इमेज
* राहुल गुजर सर : संघर्षातून घडलेले यशस्वी आयुष्य             "मंजिल उन्हें ही मिलती है              जिनके सपनों में जान होती है,              पंखों से कुछ नहीं होता,                हौसलों से उड़ान होती है।" हे शब्द राहुल गुजर सरांच्या जीवनाची योग्य व्याख्या करतात. एक अशा व्यक्तिमत्त्वाची कथा, ज्यांनी जांभोरे सारख्या छोट्याशा गावापासून ते पुण्यासारख्या महानगरापर्यंत शिक्षणाचा प्रवास मोठ्या जिद्दीने आणि संघर्षाने केला. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी आपले धैर्य साकार केले, आणि आज पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मनात आपली खास जागा त्यांनी निर्माण केली आहे. राहुल गुजर सरांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. जांभोरे, तालुका धरणगाव या एका छोट्याशा गावात जन्मलेले राहुल गुजर यांचं बालपण साधं आणि संघर्षपूर्ण होतं. परिस्थिती इतकी प्रतिकूल होती की त्यांना त्यांच्या आईबरोबर दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करावी लागायची. शेतात राबत असताना...

एरंडोलकरांचा हक्काचा माणूस: किशोरभाऊ निंबाळकर

इमेज
* एरंडोलकरांचा हक्काचा माणूस: किशोरभाऊ निंबाळकर किशोरभाऊ निंबाळकर हे नाव एरंडोल शहरातील प्रत्येकाच्या ओठांवर असणारं, आणि प्रत्येकाच्या हृदयात कोरलेलं आहे. ते केवळ एक व्यक्ती नाहीत, तर हजारो लोकांच्या विश्वासाचं प्रतीक आहेत. साध्या कुटुंबात जन्मलेले किशोरभाऊंनी आपल्या आयुष्यात कष्ट, परिश्रम आणि निःस्वार्थ सेवाभावाच्या बळावर समाजाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं आहे. किशोरभाऊंच्या वडिलांचा महसूल विभागात सर्कल अधिकारी म्हणून कार्यकाळ होता. वडिलांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि हेच संस्कार किशोरभाऊंवर झाले. त्यांनी आपल्या बालपणापासूनच समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द मनाशी बाळगली. वडिलांनी शिकवलेला परिश्रमाचा धडा त्यांच्या आयुष्याचं मर्म बनला. किशोरभाऊंनी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर भूमिका बजावली. त्यांच्या मनात लोकांसाठी करुणा आणि मदत करण्याची अनिवार इच्छा होती. एक नेता म्हणून त्यांचं काम फार महत्त्वाचं होतं, परंतु ते कधीही स्वतःचा फायदा किंवा प्रतिष्ठा याच्याशी बांधलेलं नव्हतं. किशोरभाऊंनी जे काही केलं ते माणुसकीसाठी, समाजासाठी आणि एरंड...

गीताईंचं संघर्षमय जीवन: एक कष्टातून उभारलेलं साम्राज्य

इमेज
*गीताईंचं संघर्षमय जीवन: एक कष्टातून उभारलेलं साम्राज्य धरणगावच्या एका सर्वसामान्य कुटुंबात गीताबाई मांगो महाजन यांचं आगमन झालं. घरात १८ विश्व दारिद्र होतं, परंतु गीताईंच्या पायगुणांनी जणू त्या घरात एक नवीन उत्साह आला. आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून संसार सुरू केला आणि त्यांचं साधं, पण समृद्ध प्रेमाचं जीवन पुढं सरकू लागलं. संसारात पाच मुलं आणि सहा मुली जन्माला आली. आनंदानं भरलेलं त्यांचं घर अचानक दुःखात बुडालं, जेव्हा त्यांच्या पतींचं निधन झालं. गीताईंसमोर आता संसाराची जबाबदारी आणि ११ मुलांच्या पालनपोषणाचं मोठं आव्हान होतं. कुटुंबातील सासू-सासऱ्यांची देखील काळजी घ्यावी लागणार होती. पण या खडतर परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. एका गरीब स्त्रीचं मोठं धैर्य त्या काळात दिसलं. त्यांनी आपल्या कष्टाच्या बळावर आंब्याचा व्यवसाय सुरू केला. खेडोपाडी पायी प्रवास करत त्या आंबे विकू लागल्या. साळवा ते धरणगाव असा पायी प्रवास करत, आंबे घेऊन जात आणि तिकडून भाजीपाला आणून विक्री करत. एक सामान्य पण अत्यंत कष्टकरी स्त्री असलेल्या गीताईंची ही संघर्षकथा सर्वांना प्रेरणादायी ठरली. त्यांच्य...

कुटुंबाच्या एकतेतून साकारलेले नवविश्व: स्वर्गीय फकीरचंद खूबानसिंग पाटील, गाढोदा, तालुका जळगाव

इमेज
* कुटुंबाच्या एकतेतून साकारलेले नवविश्व:   स्वर्गीय फकीरचंद खूबानसिंग पाटील, गाढोदा, तालुका जळगाव कुटुंब म्हणजेच आधार, कुटुंब म्हणजेच प्रेमाचा, समजुतीचा आणि नात्यांच्या गाठीचा बळकट बंध. माणसाच्या आयुष्यात कुटुंब एक विश्वासाची आणि सामर्थ्याची जागा निर्माण करतं. स्वर्गीय फकीरचंद खूबानसिंग पाटील यांच्या जीवनात याच कुटुंबाने एकतेतून नवविश्व उभं केलं. गाढोदा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या फकीरचंद आप्पांनी आपल्या आयुष्यातील संघर्षातून जे घडवलं ते खरं तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. फकीरचंद आप्पांचा जन्म साधारण कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे घरातील जबाबदाऱ्या लवकरच त्यांच्या आईवर आणि त्यांच्यावर आल्या. परिस्थिती प्रतिकूल होती, शिक्षण अर्धवट राहिलं, परंतु आप्पांच्या आत कायमच ज्ञानाची आणि प्रगतीची ओढ होती. त्यांनी कष्टाची कास धरत आपलं जीवन मार्गी लावण्याचा संकल्प केला. त्यांनी गावात डिझेलवर चालणारी पिठाची गिरणी सुरू केली, जी त्यांच्यासाठी केवळ उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं तर जीवनाच्या प्रगतीची पहिली पायरी ठरली. आपल्या कष्टांमुळे त्यांनी स्वतःचं...

शून्यातून विश्व निर्माण करणारे आप्पा: भावलाल सुपडू मराठे यांची संघर्षगाथा

इमेज
* शून्यातून विश्व निर्माण करणारे आप्पा: भावलाल सुपडू मराठे यांची संघर्षगाथा धरणगावच्या मातीने अनेक संघर्षमय जीवन जगणारे नायक निर्माण केले आहेत, पण या मातीचा एक अनमोल हिरा म्हणजे भावलाल सुपडू मराठे, ज्यांना सगळे प्रेमाने "आप्पा" म्हणतात. साध्या कुटुंबात जन्मलेले, पण मेहनतीने, निष्ठेने, आणि भावांमधील एकतेच्या आधारावर त्यांनी शून्यातून आपले एक भव्य विश्व निर्माण केले आहे. आप्पांचा प्रवास एका छोट्याशा २५ एकराच्या शेतातून सुरू झाला. त्यांच्या कडे फक्त जमिनीचे हे थोडेसे तुकडे होते, परंतु काळ्या आईशी असलेले निस्सीम प्रेम आणि प्रचंड मेहनतीने त्यांची शेती १५० एकरांपर्यंत विस्तारली. हा प्रवास सोपा नव्हता; अनेक अडथळे, संकटे, आणि आव्हाने त्यांनी पेलली. पण त्यांच्या जीवनातील सर्वांत मोठं बळ म्हणजे त्यांच्या भावांमधील घट्ट एकता आणि प्रेम. आप्पांच्या सहा भावंडांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून केलेले कष्ट हे त्यांचे यशाचे खरे गमक आहे. आजही सर्व भाऊ एकत्रच राहतात आणि गुण्या-गोविंदाने एकत्र राहून शेतीचे मोठे साम्राज्य सांभाळत आहेत. या कुटुंबाने एकत्र राहून शेतीतून मोठी भरारी घ...

रोशन पाटील: संघर्षातून उभे राहिलेले यशस्वी जीवन

इमेज
* रोशन पाटील: संघर्षातून उभे राहिलेले यशस्वी जीवन रोशन पाटील यांची जीवनकथा म्हणजे एक प्रेरणादायी यशोगाथा आहे, जिथे संकटांनी घेरलेल्या बालपणाला जिद्दीने सामोरे जात, त्यांनी अपार कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवले. दापोरी, ता. एरंडोल येथे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले रोशन, लहानपणीच दुःखाच्या वावटळीत सापडले. त्यांचे वडील गणेश (गोंडू) पाटील आणि आई हिराबाई पाटील या दोघांचेही निधन अगदी लहान वयात झाले. आई-वडिलांची सावली नसतानाही त्यांनी जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याचं धैर्य दाखवलं. परंतु, या कठीण परिस्थितीतही रोशन पाटील एकाकी नव्हते. त्यांच्या काकांनी, निलेश पाटील, दापोरी गावाचे लोकनियुक्त सरपंच, यांनी त्यांना वडिलांसारखं प्रेम दिलं आणि काकू कल्याणी पाटील यांनी त्यांना आईची माया दिली. काकाकाकूंनी रोशन यांना फुलासारखं जपलं आणि त्यांना पुढे जाण्यासाठी सतत प्रोत्साहित केलं. त्यांच्या या मायाळू आधारामुळे रोशन यांना लहानपणापासूनच स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द आणि बळ मिळालं. रोशन यांचे वडील गणेश पाटील आणि आई हिराबाई यांनी एक मोठं स्वप्न पाहिलं होतं की, त्यांचा मुलगा ...

अरविंद गुलाब चौधरी: एक संघर्षमय प्रवास आणि समाजसेवेचं उदाहरण

इमेज
* अरविंद गुलाब चौधरी: एक संघर्षमय प्रवास आणि समाजसेवेचं उदाहरण धरणगावच्या साध्या आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अरविंद गुलाब चौधरी हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने संघर्षाचं आणि समाजसेवेचं उदाहरण आहे. त्यांच्या बालपणातच आई-वडिलांचे प्रेमळ छत्र त्यांच्या डोक्यावरून हरवले. या कठीण परिस्थितीत, जिथे एका लहान मुलासाठी जगणं आणि शिक्षण घेत राहणंही अवघड असतं, तिथे अरविंद यांनी प्रचंड मेहनतीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. स्वबळावर पुढे जाताना अनेक अडथळ्यांचा सामना करत त्यांनी स्वतःची ओळख बनवली. प्रामाणिकता, सचोटी, आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आयुष्यात पराकाष्ठा केली. अरविंदजींचं साधं आणि हसतमुख व्यक्तिमत्त्व सर्वांनाच आपलंसं वाटतं. त्यांच्या नम्र आणि प्रसन्न स्वभावामुळे ते समाजात आदराने पाहिले जातात. कोरोना महामारीच्या काळात, जेव्हा प्रत्येक जण संकटात होता, त्यावेळी अरविंद चौधरी यांनी समाजसेवेत स्वतःला झोकून दिलं. नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या सोबत त्यांनी कोविड सेंटरवर कार्य करत अनेक गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचं मोलाचं काम केलं. लोकांना वेळेवर जेवण मिळवून देण्यासाठी त्...

स्वातंत्र्याची ज्योत आणि समाजसेवेचा वसा: जिभाऊंचं प्रेरणादायी जीवन"

इमेज
*" स्वातंत्र्याची ज्योत आणि समाजसेवेचा वसा: जिभाऊंचं प्रेरणादायी जीवन" एरंडोल शहरात जन्मलेल्या स्वातंत्र्यसैनिक स्व. पंडित खंडू ठाकूर, ज्यांना संपूर्ण तालुका प्रेमाने ‘जिभाऊ’ म्हणत असे, हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात एका सामान्य कुटुंबात केली, पण त्यांचे ध्येय नेहमीच असामान्य होते. बालपणापासूनच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द होती आणि सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ होती. त्यांच्यातील ही तळमळ आणि लढाऊ वृत्ती त्यांना लोकांमध्ये विशेष आदर आणि प्रेम मिळवून देत होती. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस जिभाऊंनी दाखवले. त्यांना प्रेरणा मिळाली ती माननीय आमदार सिताराम भाई बिर्ला यांच्याकडून. त्यांच्या आशीर्वादाने जिभाऊंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवला. त्यांना स्वातंत्र्याच्या लढ्याच्या कारणाने जेलमध्येही जावे लागले, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांचं देशप्रेम आणि जनतेसाठीची तळमळ इतकी प्रखर होती की त्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्याची...

* स्व. दामोदर वामन भावसार: सामाजिक कार्याचा प्रेरणास्त्रोत

इमेज
* स्व. दामोदर वामन भावसार: सामाजिक कार्याचा प्रेरणास्त्रोत गांधीपुरा, एरंडोल येथील एक सर्व सामान्य कुटुंब, पण त्यामध्ये जन्माला आलेले दामोदर वामन भावसार हे व्यक्तिमत्व सर्वदूर प्रसिद्ध आहे. समाजाच्या वेलांटीत असलेल्या या बहिण-भावांच्या प्रेमाची आणि एकतेची कथा म्हणजे दामोदरजींचे जीवन. १७ डिसेंबर १९३० रोजी जन्मलेले दामोदरजी ७ भावंडांसह आपल्या कुटुंबाच्या एकजुटीचा अनुभव घेऊन मोठे झाले. त्यांच्या जीवनातला संघर्ष आणि सामाजिक कार्याची आवड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यात होती. दामोदरजींची सार्वजनिक कार्याची यात्रा १९४५ मध्ये सुरू झाली. काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या महान नेत्यांची भेट घेतली. यामुळे त्यांच्या कार्याला एक नवीन दिशा आणि प्रेरणा मिळाली. एरंडोलच्या काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी दहा वर्षे कार्य केले. या काळात गर्भा उत्सव समाजाचे कार्य आणि विविध सामाजिक उपक्रमांना त्यांनी केलेली मदत ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची ठरली. १९६० ते १९८० या काळात दामोदरजींनी एरंडोल नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्य केले. सरकारी ...

मुलांचा आधारस्तंभ – पांडुरंग अण्णांची निःस्वार्थ सेवा”

इमेज
खान्देश माझा *“ मुलांचा आधारस्तंभ – पांडुरंग अण्णांची निःस्वार्थ सेवा” प्रत्येकाच्या जीवनात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, जी नुसतीच प्रेरणा देत नाहीत, तर ती स्वतः एक प्रेरणास्त्रोत बनतात. असेच एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे पांडुरंग हरी पाटील, ज्यांना सगळे प्रेमाने "अण्णा" म्हणतात. अण्णांनी आपल्या जीवनाचा एकमेव उद्देश साधला आहे – विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात मदत करणे आणि त्यांना जीवनात यशाच्या उंच शिखरावर पोहोचवणे. *सेवा-समर्पणाचं प्रतीक: एरंडोल तालुक्यातील आडगाव सारख्या साध्या गावातून येणारे पांडुरंग अण्णा म्हणजे समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले आणि कृषी सेवक म्हणून आपलं कार्य पूर्ण केल्यानंतरही, अण्णांनी समाजासाठी कर्तव्य म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करण्याचं ठरवलं.  वयाच्या ८१व्या वर्षीही त्यांच्या कार्यातली उर्जा पाहून कुणालाही वाटेल, की ही माणूस थकायला तयारच नाही! *निःस्वार्थ शिक्षण सेवा: निवृत्तीनंतर पांडुरंग अण्णा कासोदा येथे पंचप्राणेश्वर मंदिरात विनामूल्य शिक्षण केंद्र चालवतात. त्यांच्याकडे दररोज १०० ते ११० विद्यार...