पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......!

इमेज
आदेशांच्या सावलीत हरवलेला गुरु......! एक काळ असा होता की शिक्षक वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आदर, विश्वास आणि जिज्ञासा आपोआप दाटून यायची. शिक्षकांचे शब्द अंतिम सत्य मानले जात, त्यांचा सल्ला जीवनाला दिशा देणारा असे, आणि त्यांचे अस्तित्व समाजासाठी दीपस्तंभासारखे भासे. परंतु आज ही प्रतिमा पूर्णपणे बदललेली दिसते. आज शिक्षक वर्गात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या हातात केवळ पाठ्यपुस्तक नसते, तर मनात आदेशांची भीती, नियमांचे ओझे आणि असहाय्यतेची खोल जाणीव असते. तो आज शिक्षण देण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी शिकवत आहे, असेच भासते. आजचा शिक्षक व्यवस्थेच्या कडक बंधनांत अडकलेला आहे. प्रत्येक कृतीवर नियमांची छाया, प्रत्येक शब्दावर संशय, आणि प्रत्येक निर्णयामागे संभाव्य कारवाईची भीती असते. जे अध्यापन कधी साधना मानले जात होते, ते आज जोखमीचे कार्य बनले आहे.चूक करण्याची मुभा नाही, स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही, आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. “हे बोलणे नियमबाह्य ठरेल का?” हा प्रश्न शिक्षकाच्या मनात सतत घोळत असतो. या ...

सेवाभावातून शिक्षण, शिक्षणातून परिवर्तन शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा सन्मान....!

इमेज
सेवाभावातून शिक्षण, शिक्षणातून परिवर्तन शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा सन्मान....! समाज घडवताना काही व्यक्ती आणि संस्था केवळ आपले कार्य करत नाहीत, तर त्या कार्यातून भविष्य घडवण्याची प्रेरणा देतात. अशाच दूरदृष्टी, निष्ठा आणि सेवाभावाच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणून ९४.३ माय एफएमतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार यंदा शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका संस्थेचा गौरव नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या एका विचारसरणीचा गौरव आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ९४.३ माय एफएमतर्फे दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (आयपीएस) यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या मनात आदर, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अल्पावधीत केलेले उल्लेखनीय शैक्षणिक ...

एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यात ‘जनहित प्रथम’चा निर्धार....!

इमेज
एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यात ‘जनहित प्रथम’चा निर्धार....! एरंडोल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आज आमदार अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण व सुसंस्कृत वातावरणात पार पडला. एरंडोलच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक वाटचालीत विश्वासाचे नवे पर्व सुरू करणारा हा सोहळा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. या पदग्रहण सोहळ्यास जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, भाजपा नेते ॲड. किशोरजी काळकर, युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक तथा गटनेते प्रा. मनोजभाऊ पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, धरणगांव बाजार समितीचे मा. सभापती शालिकभाऊ गायकवाड, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, भाजपा युवामोर्चा पदाधिकारी भैरवीताई पलांडे, खडके येथील जगदीशदादा पाटील, मा. नगरसेवक डॉ. एन. डी. पाटील, भाजपाचे एस. आर. पाटील, मा. जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, जयश्रीताई पाटील, शहरप्रमुख बबलूदादा चौधरी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका,इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजीमाजी...

एरंडोलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्रजी ठाकूर यांचे हार्दिक अभिनंदन!

इमेज
एरंडोलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्रजी ठाकूर यांचे हार्दिक अभिनंदन! आजचा दिवस एरंडोलच्या नगरपरिषदेच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी नोंद होईल असा सुवर्णदिवस आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन डॉ.नरेंद्रजी ठाकूर यांनी आज पदभार स्वीकारला.  हा दिवस केवळ त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाही, तर संपूर्ण एरंडोलच्या नागरिकांसाठी अभिमान आणि आनंदाने भरलेला क्षण आहे. जेव्हा एरंडोलच्या नागरिकांच्या मनात उज्ज्वल भविष्याची आशा जागृत झाली, तेव्हा आज त्या आशेला प्रत्यक्ष रूप प्राप्त झाले. डॉ. नरेंद्रजी ठाकूर हे केवळ नगराध्यक्ष नाहीत; ते अजातशत्रू व्यक्तिमत्व, प्रामाणिक मन आणि सर्वांसाठी समर्पित सेवाभाव यांचे प्रतिक आहेत. नगराच्या विकासासाठी जे प्रेम, ज्ञान आणि समर्पण आवश्यक आहे, ते सर्व गुण त्यांनी स्वतःतून दाखवले आहेत.  वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मिळवलेले ज्ञान नगराच्या आरोग्यसेवा, समाजकल्याण आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्यात मार्गदर्शक ठरणार आहे. अशा नेत्याचा उपस्थिती, ज्यावर नागरिकांना पूर्ण विश्वास आहे, हेच खरंच ...

आई कधी न संपणारी माया.....!

इमेज
आई कधी न संपणारी माया.....! आज माझा आईचे पाचवे पुण्यस्मरण, आई…हा शब्द उच्चारताच डोळ्यांत पाणी येतं आणि मन नकळत भरून येतं.आज माझ्या आईचे, स्व. सुंगधाबाई रतन पवार यांचे पाचवे पुण्यस्मरण. पाच वर्षे झाली तरी आई गेली आहे, हे आजही मन मान्य करायला तयार नाही. तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि हृदयात एक हळवी कळ उठते. काळ जरी पुढे सरकत असला, तरी आईची जागा मात्र आजही तशीच रिकामी आहे. आईने आयुष्यभर कुटुंबासाठी झगडत राहिली. स्वतःच्या इच्छा, सुख-दुःख बाजूला ठेवून ती शेवटपर्यंत आमच्यासाठी उभी राहिली. शांत, संयमी स्वभावाची आई कधीच कुणाचं मन दुखावणार नाही, याची ती नेहमी काळजी घ्यायची. कुणाशी कटू शब्द नाहीत, कुणावर राग नाही.फक्त माया, समजूतदारपणा आणि आपुलकी. घरातलं वातावरण तिच्या उपस्थितीने नेहमीच शांत आणि प्रेमळ असायचं. सर्वांना सोबत घेऊन चालणं ही तिची खास ओळख होती. मतभेद असले तरी नाती जपणं, तुटलेली मने जोडणं आणि घराला एकत्र ठेवणं.हे सगळं ती अगदी सहज करत असे. आईचं अस्तित्व म्हणजे घराचा खरा आधार होता. आज तिचा आवाज ऐकू येत नाही, पण तिचे संस्कार, तिची शिकवण आणि तिचं प्रेम आजही आमच्या प्र...

स्वार्थाची सोय आणि माणूसपणाची किंमत....!

इमेज
स्वार्थाची सोय आणि माणूसपणाची किंमत....! हरामखोरपणा म्हणजे एखादी चूक नव्हे, तर माणूस म्हणून स्वतःला कमी करत जाण्याची एक धोकादायक वृत्ती आहे. स्वतःच्या सोयीसाठी माणूसपण गहाण टाकण्याचं धाडस जेव्हा मनात जन्म घेतं, तेव्हा हळूहळू संवेदना बोथट होतात. मेहनत उपहासाची गोष्ट वाटू लागते आणि फसवणूक हुशारीचं लक्षण भासू लागते. इथेच माणूस स्वतःशीच प्रामाणिक राहणं थांबवतो. दुसऱ्याच्या कष्टांकडे लालसेनं पाहणं आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं.यातूनच हरामखोरपणाचं मूळ तयार होतं. असा माणूस वेळेचं, शब्दाचं, कामाचं महत्त्व विसरतो. काम वेळेवर न करता तो फळ आधीच मागतो. नियम पाळणं त्याला जाचक वाटतं, पण अधिकार मात्र त्याला हवेत. शिस्त नको असते, पण सन्मान हवा असतो. आणि जेव्हा नियम मोडल्याची किंमत चुकवायची वेळ येते, तेव्हा स्वतःकडे पाहण्याऐवजी तो संपूर्ण व्यवस्थेलाच दोष देतो. या वृत्तीचा सर्वात मोठा फटका समाजाला बसतो. विश्वास हळूहळू मरतो आणि संशयाचं राज्य सुरू होतं. मेहनती, प्रामाणिक माणसं मागे पडतात, तर बेमालूम फसवणारे पुढे जातात. प्रामाणिकपणाची किंमत शून्य होते आणि “असं नसलं तर जगणंच कठीण आहे” ...

निष्ठेचं ओझं आणि संधीसाधूपणाचं सिंहासन....!

इमेज
निष्ठेचं ओझं आणि संधीसाधूपणाचं सिंहासन....! चार वेळा पक्ष बदलणारा नेता आज व्यासपीठावर बसलेला असतो. त्याच्या गळ्यात हार, चेहऱ्यावर हास्य आणि हातात माईक असतो. त्याचा भूतकाळ कुणाला आठवत नाही, कारण वर्तमानात तो “उपयुक्त” असतो. पण त्याच व्यासपीठाच्या खाली, खुर्च्या लावणारा, चटई उचलणारा, झेंडे बांधणारा एक कार्यकर्ता उभा असतो—ज्याचं आयुष्य मात्र एकाच विचारावर खर्च झालेलं असतं. हा कार्यकर्ता कधी बातम्यांत येत नाही. त्याच्यासाठी ना घोषणापत्र असतं, ना भाषणात नाव. तो फक्त आदेश पाळतो. सकाळपासून रात्रीपर्यंत पक्षासाठी धावतो. उन्हात भाजतो, पावसात भिजतो, पण मनात एकच अभिमान बाळगतो.“मी एकनिष्ठ आहे.” पण या एकनिष्ठतेची किंमत फार मोठी असते. वर्षानुवर्षे त्याला सांगितलं जातं, “तुझा नंबर येईल.” तो वाट पाहतो. पुढचं पिढी मोठं होतं, काळ बदलतो, नेते बदलतात… पण त्याचा नंबर कधीच येत नाही. कारण तो कधीच पक्ष बदलत नाही. तो कधीच सौदेबाजी करत नाही. तो फक्त निष्ठावान राहतो. आणि दुसरीकडे, जो कालपर्यंत विरोधात होता, जो विचारांवर नव्हे तर फायद्यावर विश्वास ठेवतो, तो आज पक्षात प्रवेश करतो. त्याला लगेच संधी मिळत...

एक चूक,एक गलती....!

इमेज
एक चूक,एक गलती....! फक्त दोन शब्द, पण त्यांच्या सावलीत किती तरी भावना, किती तरी रात्री जागवणारे विचार आणि किती तरी न बोललेल्या कथा दडलेल्या असतात.आयुष्याच्या प्रवासात चूक ही कुणाच्याही दारावर कधीही येऊ शकते; अवचित, अनपेक्षित, आणि थोडीशी अस्वस्थ करणारी. पण तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावीशी वाटते.एक चूक आयुष्य उध्वस्त करत नाही; तिच्याकडून न शिकणं मात्र माणसाला हळूहळू मागे ओढत नेतं. चूक जेव्हा घडते, तेव्हा त्या क्षणी ती खूपच लहान वाटते. “एवढंच झालंय”, “याचा काय परिणाम होणार?” असं स्वतःलाच आपण समजावत असतो. पण वेळ हा खूप प्रामाणिक असतो. तो कोणालाही फसवत नाही. काळ पुढे जातो आणि त्या छोट्या चुकीचे पडसाद मनाच्या खोल कप्प्यांमध्ये उमटू लागतात. कधी नात्यांमध्ये अंतर म्हणून, कधी आत्मविश्वासावर पडलेली जखम म्हणून, तर कधी शांत दिसणाऱ्या चेहऱ्यामागे दडलेल्या वेदनेच्या रूपात. चूक माणसाला तोडत नाही; ती त्याला उघडं पाडते. ती आपल्याला कमकुवत दाखवते असं नाही, तर आपल्याला खरं दाखवते. आपण स्वतःबद्दल ज्या प्रतिमा तयार केल्या असतात.“मी असं कधीच करणार नाही”, “मी मजबूत आहे”, “माझ्याकडून चूक होणार ...

एरंडोलची खरी ताकद सजग नागरिक आणि संवेदनशील नेतृत्व...!

इमेज
एरंडोलची खरी ताकद सजग नागरिक आणि संवेदनशील नेतृत्व...! एरंडोल नगरीच्या शांत आणि निवांत रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ निद्रेत होते, त्या वेळी एका सजग नागरिकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दिनांक २५/१२/२०२५, शुक्रवार रोजी मध्यरात्री,जलशुद्धीकरण केंद्रावरून पाण्याच्या टाकीकडे जाणारी मुख्य मेन रायझिंग लाईन हॉटेल कल्याणी परिसरात अचानक फुटली.  काही क्षणांतच पाण्याचा प्रचंड प्रवाह आजूबाजूच्या परिसरात, गॅरेजमध्ये, गोठ्यांमध्ये तसेच शेतांमध्ये वेगाने पसरू लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची तसेच पशुहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे, त्या क्षणी सदर पाईपलाईन नेमकी कुठून जात आहे, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नव्हती. अशा अत्यंत गंभीर व चिंताजनक परिस्थितीत श्री. दाऊद बागवान यांनी दाखवलेली समयसूचकता आणि जागरूकता खरोखरच उल्लेखनीय व प्रेरणादायी ठरली. मध्यरात्री ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाणीपुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. दीपक गोसावी यांना तात्काळ माहिती दिली. त्यांच्या तत्परतेम...

पैशांपेक्षा जड असलेलं कर्ज...!

इमेज
पैशांपेक्षा जड असलेलं कर्ज...! हा शब्द ऐकायला जितका साधा वाटतो, तितकाच तो मनाला खोलवर बोचणारा असतो.माणूस जेव्हा उसणे पैसे घेतो, तेव्हा तो केवळ रक्कम स्वीकारत नाही; तो आपल्या मनावर एक अदृश्य ओझेही उचलतो. त्या क्षणी परिस्थितीवर मात केल्यासारखे वाटते, परंतु त्याच क्षणापासून शांत झोप हळूहळू दूर जाऊ लागते. डोक्यावर जबाबदारीचे सावट येते आणि प्रत्येक दिवस परतफेडीच्या विचारांनीच सुरू होतो. सकाळी उठल्यावर मनात येणारा पहिला विचार असतो “आज फोन येईल का?” मोबाईलची प्रत्येक रिंग हृदयाची धडधड वाढवते. नाव ओळखीचे असले, तरी त्या आवाजात दडपण जाणवते. देणाऱ्याला आपले पैसे हवे असतात. ते साहजिकच आहे.पण घेणाऱ्याच्या मनात अपराधीपणाची सल सतत टोचत राहते. शब्द न उच्चारताही मनात असंख्य प्रश्न उभे राहतात. उसण्या पैशातून मिळणारी मदत क्षणिक असते, पण तिची किंमत फार मोठी असते. उधारीचा घास पोट भरतो, मात्र आत्मसन्मानाला ओरखडा बसतो. स्वतःच्या कष्टातून मिळालेल्या पैशांत जी गोडी असते, ती उसण्या पैशांत नसते. कारण त्या पैशांत आपली हतबलता मिसळलेली असते. कधी कधी परिस्थितीच माणसाला या वाटेवर आणते. आजारपण, संकटे, जबाब...

आयुष्याचा नेम चुकतो तेव्हा…..!

इमेज
आयुष्याचा नेम चुकतो तेव्हा…..! चुकलेला नेम म्हणजे पराभवाची घोषणा नव्हे; तो थांबण्याचा सुस्पष्ट संकेत असतो. आयुष्य आपल्याला नम्रपणे सांगत असतं.“थोडा थांबा… श्वास घ्या…किड्डड्ड्स पुन्हाडीफ एकदा नीट पाहा.” हा थांबा अत्यंत मौल्यवान असतो. कारण याच थांब्यात माणूस स्वतःला भेटतो. सततच्या धावपळीत हरवलेला श्वास, गर्दीत विरघळलेली ओळख आणि यशाच्या मागे धावताना विसरलेल्या भावना या सगळ्यांची ओळख इथे पुन्हा होते. नेम चुकतो तेव्हा आयुष्य आपल्याला थांबवून विचार करायला शिकवतं, आणि या विचारातूनच परिवर्तनाचा अंकुर फुटतो. प्रत्येक अपयश हे आरशासारखं असतं. हा आरसा आपल्याला कमी लेखण्यासाठी नसतो, तर वास्तव दाखवण्यासाठी असतो. यश अनेकदा आपल्याला आकर्षक, निर्दोष दाखवतं; परंतु अपयश आपल्याला प्रामाणिकपणे ओळख करून देतं. कुठे आपण घाई केली, कुठे भीतीमुळे निर्णय डळमळीत झाले, कुठे अंतर्मनाचा आवाज दुर्लक्षित राहिला.हे सगळं अपयश शांतपणे समोर ठेवतं. ते आरोप करत नाही, दोष देत नाही; ते फक्त प्रश्न विचारतं. आणि हे प्रश्नच माणसाला आतून अधिक सजग, अधिक संवेदनशील बनवतात. चुकीच्या वाटेवर चालल्याचं लक्षात येणं हीच सुधारण...

घामाच्या थेंबांतून घडलेला स्वाभिमान कष्टाची भाकर...!

इमेज
घामाच्या थेंबांतून घडलेला स्वाभिमान कष्टाची भाकर...! कष्टाची भाकर म्हणजे केवळ भूक भागवणारा अन्नाचा तुकडा नाही; ती माणसाच्या आयुष्याची ओळख असते. ती माणसाच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची आणि जगण्याच्या जिद्दीची चव असते. जेव्हा घामाच्या थेंबांनी भिजलेले हात ती भाकर हातात घेतात, तेव्हा त्या भाकरीसोबत मनालाही एक वेगळीच शांती मिळते. कारण त्या एका घासामागे उभं असतं संपूर्ण आयुष्य – संघर्ष, अपयश, वेदना, आशा आणि न मोडलेली हिंमत. उपाशीपोटी मिळालेलं सोनं क्षणिक आनंद देऊ शकतं, पण ते मनात खोलवर समाधान देऊ शकत नाही. उलट कष्टाने मिळालेला साधा घास माणसाच्या अंतर्मनाला तृप्त करतो. कारण त्या घासामागे केलेली मेहनत, सहन केलेली उपेक्षा आणि झेललेले अपमान असतात. म्हणूनच कष्टाची भाकर खाल्ल्यावर पोट भरतं, पण त्याहून अधिक भरतं ते मन. कष्टाची भाकर माणसाला मेहनतीचं खरं मोल शिकवते. ती सांगते की आयुष्यात काहीही सहज मिळत नाही. प्रत्येक यशामागे घामाचा वास असतो, प्रत्येक समाधानामागे संघर्ष लपलेला असतो. ही भाकर माणसाला जमिनीशी जोडून ठेवते. कितीही मोठं यश मिळालं, कितीही उंची गाठली, तरी कष्टाची भाकर खाल्लेला ...

माझे पण दिवस येतील…..!

इमेज
माझे पण दिवस येतील…..! “माझे पण दिवस येतील” ही केवळ एक ओळ नाही, तर आयुष्याशी केलेली एक शांत पण ठाम घोषणा आहे. ही वाक्यं त्या मनातून येतात, जे आज थकलेलं असतं, जखमी असतं, पण हरलेलं नसतं. कारण ज्याच्या मनात अजूनही उद्याची आशा जिवंत आहे, तो माणूस कधीच संपलेला नसतो. आज नशिब साथ देत नसेल, परिस्थिती प्रतिकूल असेल, मार्ग खडतर असेल.तरीही मनात एक विश्वास असतो की हा काळ कायमचा नाही. कारण आयुष्य कधीही एका सरळ रेषेत चालत नाही; ते वळणं घेतं, आपली परीक्षा पाहतं आणि मगच आपल्याला पुढे नेण्याची तयारी करतं. आयुष्याचा खेळ एका दिवसात पलटत नाही, हे मान्य. पण मेहनत आणि जिद्द एका क्षणात माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. तो क्षण बाहेरून साधा दिसतो, पण त्यामागे असतात असंख्य अपयश, न संपणारे प्रयत्न, आणि स्वतःशी केलेली लाखो वेळा पुन्हा उभं राहण्याची वचनं. आज जो संघर्ष चाललाय, तो केवळ त्रास देण्यासाठी नाही, तर उद्याच्या उंच भरारीसाठी मन, मेंदू आणि आत्मा तयार करण्यासाठी आहे. आयुष्य आपल्याला मोडत नाही, तर घडवत असतं.फक्त त्या वेदना आपण समजून घ्यायला हव्या. संघर्षाच्या काळात सगळ्यात जास्त बोचणारी गोष्ट म्...

“मोठेपणाची खरी कसोटी”

इमेज
“मोठेपणाची खरी कसोटी” दुसऱ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा समजून घेणं ही खूप खोल प्रक्रिया आहे. ती फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या वागणुकीतून होत नाही, तर त्या माणसाच्या शांततेत, त्याच्या सहनशीलतेत, त्याने गिळलेल्या अपमानात आणि न बोलता सोसलेल्या वेदनांतून हळूहळू उलगडत जाते. प्रत्येक माणूस आपापल्या आयुष्याच्या लढाया लढत असतो. कुणी शब्दांनी जिंकतं, कुणी मौनाने. कुणी पुढे झेप घेतो, तर कुणी मागे राहून सगळ्यांना सांभाळतो. अशा वेळी दुसऱ्याच्या मनाचा मोठेपणा ओळखण्यासाठी स्वतःच्या अहंकाराच्या भिंती थोड्या बाजूला साराव्या लागतात. कारण जो मनाने मोठा असतो, तो कधीच स्वतःचा मोठेपणा मिरवत नाही; तो सहजतेने, शांतपणे, कुणालाही कमी न लेखता वागतो. पण समजून घेणं पुरेसं नसतं. एकदा का तो मोठेपणा उमगला, की तो मान्य करणं ही त्याहून कठीण पायरी असते. कारण मान्य करणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं, स्वतःपेक्षा कुणी तरी मोठं आहे हे कबूल करणं. इथेच माणसाची खरी परीक्षा होते. अनेकदा आपण दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक मनात करतो, पण ते ओठांवर येत नाही. मन मान्य करतं, पण अहंकार अडथळा बनून उभा राहतो. “तो माझ्यापेक्षा कसा...

नसतात काही गोष्टी आपल्या हातात...!

इमेज
नसतात काही गोष्टी आपल्या हातात...! नसतात काही गोष्टी आपल्या हातात हे वाक्य आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव्यानं उमगत जातं. लहानपणी आपण समजतो की प्रयत्न केले, मनापासून काहीतरी हवं ठरवलं, तर ते मिळायलाच हवं. पण जसजसं आयुष्य पुढे सरकतं, तसतसं कळतं की प्रयत्न हे आवश्यक असले तरी पुरेसे नसतात. काही गोष्टी घडतात, काही थांबतात, तर काही न सांगता निघून जातात. तेव्हा शिकावं लागतं त्यांना तिथंच सोडून द्यायला हळुवारपणे, स्वीकाराने, राग न धरता. मनातल्या भावनांचं चिंतन करायला आपण फार कमी वेळ देतो. रोजच्या धावपळीत, अपेक्षांच्या गर्दीत, “मला हेच व्हायला हवं” या हट्टात आपण आपल्या मनाचं ऐकणंच विसरतो. कधी थांबून स्वतःला विचारतो का मी खरंच काय अनुभवतोय? माझ्या मनात दुःख आहे की थकवा, भीती आहे की निराशा, की फक्त एक न संपणारी पोकळी? भावना दाबून टाकणं सोपं असतं, पण त्यांना समजून घेणं धैर्याचं काम असतं. आणि हे धैर्यच आपल्याला आतून मजबूत करतं. स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहास किती खोलवर रुजलेला असतो आपल्यात! कुणाला दाखवायचं असतं की आपण कमी नाही, कुणाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात, तर कधी स्वतःच्याच ...

गरिबीच्या छायेतून तेजस्वी यशाकडे…एक संघर्षशील जीवनप्रवास किरणभाऊ श्रीराम बागुल (चौधरी)

इमेज
गरिबीच्या छायेतून तेजस्वी यशाकडे…एक संघर्षशील जीवनप्रवास किरणभाऊ श्रीराम बागुल (चौधरी) काही माणसं जन्माला येतात ते इतिहास घडवण्यासाठी नाही, तर इतिहासाला माणुसकीची ओळख करून देण्यासाठी. असेच एक नाव म्हणजे किरण श्रीराम बागुल (चौधरी). आज ज्यांना संपूर्ण जिल्हा आदराने “भाऊ” म्हणून हाक मारतो, त्या किरणभाऊंचा जीवनप्रवास हा केवळ यशाचा नाही, तर संघर्ष, संयम, संस्कार, श्रम आणि सेवाभावाचा जिवंत दस्तऐवज आहे. देवपूर, धुळे येथील नेहरूनगरच्या साध्याशा वस्तीमध्ये, दत्त जयंतीसारख्या पवित्र दिवशी त्यांचा जन्म झाला. जणू काही ईश्वरानेच ठरवले होते की, हा बालक पुढे जाऊन अनेकांच्या जीवनात दत्तासारखा आधार बनेल. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील पंचायत समितीत शिपाई. पगार तुटपुंजा, जबाबदाऱ्या मोठे. दोन भाऊ, एक बहीण, आणि सतत आजारपणाशी झुंज देणारे वडील. घरात चूल पेटवणं हेच रोजचं युद्ध होतं. मोठ्या भावाने पान टपरी चालवून घराला हातभार लावला. पण वडिलांची प्रकृती साथ देत नव्हती. अशा वेळी आईने संसाराचा गाडा आपल्या मोलमजुरीच्या कष्टावर ओढला. उन्हातान्हात, हाताला फोड, पायाला भेगा पण चेहऱ्यावर त...

आदर देणे हीच खरी ताकद....!

इमेज
आदर देणे हीच खरी ताकद....! आजच्या जगात मोठ्याने बोलणं, कठोर शब्द वापरणं आणि समोरच्याला गप्प बसवणं यालाच ताकद समजली जाते. जणू जो जास्त ओरडतो तोच जिंकतो, आणि जो शांत राहतो तो हरतो. पण खरं सांगायचं तर ही ताकद नसते, तो असतो आतला कमकुवतपणा. कारण ज्याच्याकडे स्वतःवर नियंत्रण नसतं, त्यालाच दुसऱ्याला दाबून ठेवावं लागतं. आदर देणं ही एक अशी कला आहे जी प्रत्येकाला जमत नाही. अपमान करायला शब्द लागतात, पण आदर करायला संस्कार लागतात. समोरचा माणूस कितीही वाईट वागला, चुकीचं बोलला, आपल्याला दुखावलं… तरीही आपली भाषा शांत ठेवणं, वागणूक माणुसकीची ठेवणं, हे खूप मोठं धैर्य असतं. हीच खरी ताकद आहे. स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची. आदर देणं म्हणजे नमते घेणं नाही, मान खाली घालणं नाही. उलट, आदर देणं म्हणजे स्वतःची उंची जपणं. जो माणूस स्वतःला मान देतो, स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करतो, तोच इतरांनाही मान देऊ शकतो. ज्याचं मन लहान असतं तो अपमान करतो, आणि ज्याचं मन मोठं असतं तो माफ करतो. अपमान करून मिळणारी ताकद क्षणिक असते. ती भीतीवर उभी असते. आज लोक घाबरून तुमच्यासोबत उभे राहतील,पण उद्या पहिल्याच ...

पिरॅमिड ध्यानातून अंतर्मनाला लाभले शांतीचे नवे दालन

इमेज
पिरॅमिड ध्यानातून अंतर्मनाला लाभले शांतीचे नवे दालन आजच्या यंत्रवत झालेल्या जीवनात माणूस सर्वकाही मिळवतो, मात्र स्वतःला हरवून बसतो. सततची कामाची दगदग, जबाबदाऱ्यांचा ताण, मानसिक अस्वस्थता यामधून बाहेर पडण्यासाठी मनाला शांततेचा आधार हवा असतो. हीच गरज ओळखून आंतरराष्ट्रीय ध्यान दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती एरंडोल येथे एक अत्यंत सकारात्मक, मनाला स्पर्शून जाणारा उपक्रम साकार झाला. दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जगभर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ध्यान दिनाच्या अनुषंगाने दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी पंचायत समिती एरंडोल येथील हॉलमध्ये श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्या वतीने निशुल्क पिरॅमिड ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना काही क्षण स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी थांबण्याची संधी मिळाली. या ध्यान सत्राचे मार्गदर्शन श्री भगवती क्लासेस आणि गोल्डन पिरॅमिड मेडिटेशन सेंटर, एरंडोल यांच्या संचालिका व अनुभवी ध्यान मास्टर देवयानी कृष्णा महाजन यांनी केले. आपल्या शांत, सकारात्मक आणि प्रेरणादायी शब्दांत त्यांनी पिरॅमिड ध्यानाचे महत्त्व उपस्थित अधिक...

हसू म्हणजे पुण्य,दुखावणे म्हणजे पाप...!

इमेज
हसू म्हणजे पुण्य,दुखावणे म्हणजे पाप...! मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला पाप पुण्याची कोणतीही परिभाषा माहित नसते. वाढत्या वयासोबत अनेक गोष्टी तो शिकत जातो.धर्म, परंपरा, शास्त्र, रीतिरिवाज… पण तरीही अंतःकरणात एक प्रश्न कायम राहतो की खरं पाप म्हणजे काय आणि खरं पुण्य म्हणजे काय? कदाचित याचं उत्तर इतकं खोल नाही, उलट अत्यंत साधं, स्वच्छ आणि मनाच्या अगदी एका कोपऱ्यात शांतपणे बसलेलं आहे. माणसाला इतकंच कळलं की ज्या कामातून कुणाचं मन दुखतं, कुणाच्या डोळ्यात न दिसणारे अश्रू उभे राहतात, कुणाची आशा तुटते, कुणाचं स्वप्न कोमेजतं तेच पाप. आणि ज्या कामातून एखाद्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमलतं, मनाच्या तळाशी उब मिळते, दिवसाचा काळोख थोडा कमी होतो तेच पुण्य. पाप म्हणजे केवळ मोठमोठी चूक, गुन्हा किंवा जगाला भेदणारा अपराध नाही.अनेकदा ते अगदी हलक्या शब्दांतून घातलेल्या टोचणीमध्ये असतं. नकळत बोललेल्या एका कटू वाक्यात, अवहेलनेच्या नजरेत, कुणाच्या दुःखाकडे दुर्लक्ष करण्यातही ते दडलेलं असतं. आपल्या एका कृतीमुळे एखाद्याचं मन व्यथित होतं, त्याचं समाधान हरवतं, आणि तो स्वतःला कमी समजू लागतो.तेव्हा आपण...

शांतता जिंकेल....!

इमेज
शांतता जिंकेल....! परिस्थिती कशीही असो मनाला ताण देणारी, धैर्याची परीक्षा घेणारी किंवा क्षणाक्षणाला आपल्याला थकवणारी माणसाने सर्वप्रथम स्वतःच्या चेहऱ्यावर शांततेची सावली आणि मनात संयमाचं सामर्थ्य जपून ठेवणं गरजेचं असतं. कारण अंतःकरणातील शांतता हीच ती शक्ती आहे जी बाहेरच्या गोंधळाला ही आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडते. जग कितीही गोंगाटात बुडालेलं असो, पण आपण जर शांत राहिलो, तर परिस्थितीचं वादळसुद्धा आपल्याला हलवू शकत नाही. जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला कधी ना कधी कठोर प्रसंगांचा सामना करावा लागतो. काही वेळा वेदना मनाला चिरत जातात, तर काही वेळा अपेक्षाभंग मनाची ताकदच हिसकावून घेतो. अशा वेळी आपण आतून ढासळू लागतो आणि परिस्थितीवर दोषारोप करतो. पण हे विसरतो की वादळ कितीही तीव्र असलं तरी ढगांमागे सूर्य तसाच तेजाने उजळत असतो. फक्त त्याचं दर्शन होण्यासाठी आपण स्थिर राहण्याची गरज असते. संयम हा तो पूल आहे जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, संघर्षातून समाधानाकडे घेऊन जातो. शांतता म्हणजे दुर्बलता नाही; शांतता म्हणजे मनाची परिपक्वता. जेव्हा माणूस भावनांनी वाहून न जाता, विचारांनी उभा रा...

शेवटी आपणच मूर्ख ठरतो…!

इमेज
शेवटी आपणच मूर्ख ठरतो…! शेवटी आपणच मूर्ख ठरतो, कारण आपण अपेक्षा चुकीच्या ठिकाणी ठेवतो. आपल्याला मनातून माहीत असतं की समोरचा कधीच बदलणार नाही; तरीही आपण त्याच्याकडून बदलाची आशा धरून बसतो. कारण आशा ही मनाची सवय असते आणि मन हट्टी असतं. ते वास्तवापेक्षा स्वप्नांवर अधिक विश्वास ठेवतं. जिथे केवळ दुर्लक्ष मिळतं, तिथेही आपण आपुलकी शोधतो. दोन क्षणांचं लक्ष मिळालं तरी ते पूर्ण नातं असल्याचा भास निर्माण होतो. अपमान सहन करूनही आपण समजून घेण्याचा अट्टहास करतो, कारण आपल्याला वाटतं.आपण समजून घेतलं तर समोरचाही समजून घेईल. पण समजून घेणं ही संवेदना प्रत्येकाकडे असतेच असं नाही, हे आपण विसरतो. ज्यांना आपली किंमतच नाही, त्यांच्यासाठी आपण स्वतःला स्वस्त करतो. स्वीकार मिळावा म्हणून आपण आपल्या आत्मसन्मानाची किंमत हळूहळू कमी करत जातो. स्पष्ट नकार मिळूनही मनात होकार जपतो, कारण मनाला वास्तवापेक्षा शक्यता अधिक प्रिय असतात. खोट्या शब्दांवर आपण विश्वास ठेवतो आणि खऱ्या संकेतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. कृती काहीतरी वेगळंच सांगत असतात, पण शब्द गोड असतात आणि आपलं मन त्या गोडव्याला भुलतं. स्वतःच्या जखमा...

मतांपेक्षा माणुसकी मोठी....!

इमेज
मतांपेक्षा माणुसकी मोठी....! आज निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. काही चेहऱ्यांवर आनंद असेल, काही डोळ्यांत शांत निराशा. पण लक्षात ठेवूया. हा दिवस केवळ विजय-पराभवाचा नाही, तर लोकशाहीच्या परिपक्वतेची परीक्षा घेणारा आहे. जिंकणाऱ्याला मनापासून शुभेच्छा. लोकांनी दिलेला कौल हा विश्वासाचा असतो, आणि त्या विश्वासाला मान देणे हीच खरी जिंकलेपणाची खूण आहे. पण त्या आनंदात थोडी नम्रता हवी. कारण विजयाचा जल्लोष क्षणिक असतो, पण त्यातून उमटणारी माणुसकी दीर्घकाळ लक्षात राहते. जो हरतो, तो कमी नसतो. पराभव म्हणजे अपयश नाही; तो शिकवण असते, अनुभव असतो. आज ज्याच्या गळ्यात हार नाही, त्याच्या मनात उद्याचा नवा संकल्प असू शकतो. त्याच्या पराभवाचा अपमान करू नका, त्याला तुच्छ लेखू नका, त्याच्या भावना दुखावू नका. कारण मतभेद असू शकतात, पण माणुसकीत भेद नसावा. विजयाचा आनंद असू द्या.तो स्वाभाविक आहे. पण उन्माद नको. कारण विजय जितका मोठा, तितकी जबाबदारी त्याहून मोठी असते. लोकांनी दिलेला अधिकार हा मिरवण्यासाठी नसतो; तो निभावण्यासाठी असतो. आजचा विजेता हा लोकशाहीचा सेवक आहे मालक नाही. त्याने लोकांच्या अपेक्षा, प्रश...

स्वप्नातलं गाव,वास्तवातली कोंडी.....!

इमेज
स्वप्नातलं गाव,वास्तवातली कोंडी.....! गाव लांबून पाहिलं की मन आपोआप शांत होतं. मातीचा सुगंध, ओळखीची माणसं, संथ चाललेलं आयुष्य सगळं काही आपुलकीचं वाटतं. शहराच्या कोलाहलातून थकलेला माणूस गावाकडे आशेने पाहतो. पण जेव्हा तोच माणूस गावातच राहून जगायचं ठरवतो, काही नवीन उभं करायचं धाडस करतो, तेव्हा गावाचं दुसरं, अस्वस्थ करणारे रूप समोर येतं. गाव ही केवळ भौगोलिक रचना नाही; ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आठवणींची, अहंकारांची आणि न मिटलेल्या वादांची एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे. गावातले सर्वात खोल जखमा या भावकीतच असतात. जमीन, वाटप, वारसा हे विषय निमित्त ठरतात; पण मूळ असतं मनात साचलेलं वैर. इथे भांडण माणसांमध्ये नसतं, ते पिढ्यांमध्ये असतं. एकदा निर्माण झालेली कटुता समेटाला कमजोरी समजते आणि माफीला अपमान. त्यामुळे न्यायालयं, राजकारण, प्रशासन हे सगळं नात्यांमधील सूडाचं साधन बनतं. यातून जन्माला येणारी विषारी हवा पुढच्या पिढ्यांचं आयुष्य ही दूषित करते. गावातली वाट ही केवळ रस्ता नसते. ती सत्ता, वर्चस्व आणि प्रतिष्ठेचं प्रतीक असते. दोन फूट जमिनीसाठी वर्षानुवर्षे चालणारे खटले, वाढत जाणारे ताण, ...

पगाराच्या कागदापुढे हरलेली माती.....!

इमेज
पगाराच्या कागदापुढे हरलेली माती.....! आज गावागावात एक वाक्य दबक्या आवाजात फिरतंय “मुलगा नोकरीवाला पाहिजे, शेतकरी नको.”हे वाक्य ऐकताना कुणाचं तरी पोट रिकामं होतं, पण कुणाच्या तरी डोळ्यांतून घाम गळतो. कारण हे वाक्य फक्त विवाहाचं नाही, तर मूल्यांचं आहे. शेतात राबणारे हात उन्हात भाजलेले असतात. त्या हातांवर माती असते, पण त्या मातीला समाजाने कमीपणाचं लेबल लावलंय. शिक्षण, कष्ट, स्वाभिमान सगळं असूनही “शेतकरी मुलगा म्हणजे अनिश्चित भविष्य” असा शिक्का मारला जातो. जणू शेतकऱ्याचं आयुष्य हे जोखमीचं असतं, पण शहरातल्या चार भिंतीत बसून मानसिक गुलामगिरी करणारी नोकरी सुरक्षित असते! विडंबन बघा त्याच शेतातून आलेलं अन्न शहरातल्या ताटात मानाने बसतं.पण त्या अन्नाला जन्म देणाऱ्या माणसाला सून देताना प्रतिष्ठा आठवत नाही.मुलगी द्यायची वेळ आली की मातीची किंमत विसरली जाते, आणि पगाराची पावतीच माणसाचं मोल ठरवते. शेतकरी मुलगा कर्जात आहे, असं सांगितलं जातं. पण सरकारी किंवा शहरी नोकरीवाला विचारांनी किती गरीब आहे, हे कुणी बोलत नाही.कारण कर्ज फक्त पैशाचं नसतं काही लोक मानसिकतेच्याच कर्जात आयुष्य काढतात. नातं स...

“मोठेपणाची खरी कसोटी”

इमेज
“मोठेपणाची खरी कसोटी” दुसऱ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा समजून घेणं ही खूप खोल प्रक्रिया आहे. ती फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या वागणुकीतून होत नाही, तर त्या माणसाच्या शांततेत, त्याच्या सहनशीलतेत, त्याने गिळलेल्या अपमानात आणि न बोलता सोसलेल्या वेदनांतून हळूहळू उलगडत जाते. प्रत्येक माणूस आपापल्या आयुष्याच्या लढाया लढत असतो. कुणी शब्दांनी जिंकतं, कुणी मौनाने. कुणी पुढे झेप घेतो, तर कुणी मागे राहून सगळ्यांना सांभाळतो. अशा वेळी दुसऱ्याच्या मनाचा मोठेपणा ओळखण्यासाठी स्वतःच्या अहंकाराच्या भिंती थोड्या बाजूला साराव्या लागतात. कारण जो मनाने मोठा असतो, तो कधीच स्वतःचा मोठेपणा मिरवत नाही; तो सहजतेने, शांतपणे, कुणालाही कमी न लेखता वागतो. पण समजून घेणं पुरेसं नसतं. एकदा का तो मोठेपणा उमगला, की तो मान्य करणं ही त्याहून कठीण पायरी असते. कारण मान्य करणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं, स्वतःपेक्षा कुणी तरी मोठं आहे हे कबूल करणं. इथेच माणसाची खरी परीक्षा होते. अनेकदा आपण दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक मनात करतो, पण ते ओठांवर येत नाही. मन मान्य करतं, पण अहंकार अडथळा बनून उभा राहतो. “तो माझ्यापेक्षा कसा...

दापोरीच्या मातीतून उगवलेलं नेतृत्व निलेशभाऊ पाटील....!

इमेज
दापोरीच्या मातीतून उगवलेलं नेतृत्व निलेशभाऊ पाटील....! दापोरी…ता.एरंडोल फक्त एक गाव नाही, तर संस्कारांची, माणुसकीची आणि आपुलकीची ओळख.आणि या दापोरीच्या मातीतून ज्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाने, सेवाभावाने आणि प्रेमाने गावकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं, ते नाव म्हणजे तडफदार समाजसेवक, माजी सरपंच निलेशभाऊ पाटील. काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या विचारांमुळे, त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या माणुसकीमुळे मोठी ठरतात. निलेशभाऊ पाटील हे त्याच मोजक्या व्यक्तींपैकी एक. सरपंचपद भूषवत असताना त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही, नेहमी “माझं गाव, माझी माणसं” हाच त्यांचा ध्यास राहिला. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्यांची दुरवस्था असेल, शाळेतील मुलांच्या सोयी असतील किंवा एखाद्या सामान्य माणसाचं दुःख… निलेशभाऊ पाटील यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. शांतपणे, ठामपणे आणि प्रामाणिकपणे त्यांनी प्रत्येक प्रश्नाला सामोरं जात उपाय शोधला. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोरीचा विकास केवळ कागदावर नव्हता, तर तो प्रत्येक गावकऱ्याच्या आयुष्यात जाणवणारा होता. त्यांचा साध...

गोड शब्दांची श्रीमंती...!

इमेज
गोड शब्दांची श्रीमंती...! उगाच वाईट बोलणारा माणूस मनाने गरीब असतो, कारण ज्या मनात प्रेम, शांतता आणि आत्मविश्वास असतो, त्या मनातून कटुता निर्माण होत नाही. शब्द हे माणसाच्या स्वभावाचं खरं सौंदर्य आहे; आणि जेव्हा हेच शब्द बोचणारे, तिखट आणि दुखावणारे बनतात, तेव्हा ते प्रथम त्या व्यक्तीलाच लहान करतात, ज्याच्या तोंडून ते बाहेर पडतात. काही लोकांना दुसऱ्यांचा अपमान करण्यात जणू विचित्र आनंद मिळतो. त्यांना वाटते की इतरांना कमी करून ते स्वतः मोठे दिसतील. पण प्रत्यक्षात त्यांच्या शब्दांतून त्यांचीच किंमत उघड होते.त्यांच्या मनातली रिक्तता, भीती आणि असुरक्षितता स्पष्ट दिसू लागते. वाईट बोलणं हे मोठेपणाचं लक्षण नसून, खरं मोठेपण म्हणजे दुसऱ्याला मान देणं, त्याला आधार देणं आणि त्याच्या जखमा वाढवण्याऐवजी त्यावर प्रेमाची फुंकर मारणं होय. एखाद्याचा अपमान करण्यापेक्षा एखादं प्रेमळ वाक्य बोलणं कितीतरी अधिक बलवान असतं. गोड शब्द मनाला उमलवतात, विश्वास देतात आणि नात्यांची मुळे अधिक मजबूत करतात. उलट कटु शब्द मन पोखरतात, नाती दुरावतात आणि अखेरीस दोन्हीकडे वेदनेची जागा निर्माण होते. ज्यांच्या मनात कटुत...

धानोरा तालुका चोपडा येथील बोरवेल क्षेत्रातील विश्वासाचं नाव धनवान महाजन...!

इमेज
धानोरा तालुका चोपडा येथील बोरवेल क्षेत्रातील विश्वासाचं नाव धनवान महाजन...! धानोरा तालुका, चोपडा येथील बोरवेल कामात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते म्हणजे धनवान महाजन. बोरवेलचा प्रश्न हा केवळ यंत्राचा नसून तो शेतकऱ्यांच्या जीवनाशी, त्यांच्या घामाशी आणि त्यांच्या आशांशी जोडलेला असतो. हे सत्य ओळखून धनवान महाजन वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. एखाद्या शेतकऱ्याचा किंवा सामान्य माणसाचा बोअरवेल मोटार अचानक बंद पडली, पाणी थांबलं आणि चिंता वाढली की, एकच नाव ओठांवर येतं धनवान महाजन. आरोळी मारताच लोकांच्या हाकेला धावून येणारा हा माणूस दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता मदतीसाठी तत्पर असतो. तांत्रिक कौशल्याबरोबरच त्यांच्या कामात माणुसकीची ऊब आहे. “पहिले काम, नंतर बाकी सर्व” हीच त्यांची ओळख. अनेक घरांमध्ये पुन्हा पाण्याचा प्रवाह सुरू झाला, अनेक शेतं वाचली आणि अनेक चेहऱ्यांवर हास्य फुललं, ते त्यांच्या मेहनतीमुळेच. धनवान महाजन हे केवळ उत्कृष्ट कारागीर नाहीत, तर ते लोकांचा आधार आहेत. स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांच्या गरजेला महत्त्व देणारा हा साधा, सरळ आणि कष्टकरी माणूस समाजासाठी एक...