पोस्ट्स

ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही !

इमेज
ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही ! ध्येय ठरवले, पावलं पुढे टाकली आणि त्या वाटचालीला समर्पितपणे ध्यास दिला की यशाचा दरवाजा नकळत उघडतो. हेच जणू काही चोपडा येथील आयडियल इंग्लिश अकॅडमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अनुभवायला मिळालं. दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या सोहळ्यात खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा मंत्र दिला — “ध्यासाशिवाय साधना फलद्रूप होत नाही आणि साधनेशिवाय अध्ययन व अध्यापन अशक्य आहे.” या समारंभात व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, डॉ.प्रा. समाधान पाटील आणि अकॅडमीचे प्राचार्य पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती. प्रा. आंधळे यांनी आपल्या भाषणात भाषेच्या सामाजिक व सांस्कृतिक परिमाणांची सखोल मांडणी केली. “भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती सौंदर्य आणि शक्ती यांचं मिलन आहे. ती जपली गेली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि तिचा अभ्यास होणे आवश्यक आहे,” असे ते उद्गारले. त्यांच्या भाषणाने सभागृह भारावून गेले. जुन्या-नव्या कविता, त्यातील संदर्भ, संस्कारांची बीजं यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात श...

आम्हा विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे

इमेज
आम्हा विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे        काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या माझ्या गुरूंनी मला ,मी एफ. वाय. बी. ए.च्या वर्गात प्रवेशित असतांना एन.एस.एस.च्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिलं. सूत्र संचलन,प्रास्ताविक,आभार या छोट्या छोट्या प्रसंगांमधून सभाधारिष्ट्याचे धडे जे गिरवले.त्याचा फार मोठा फायदा मला महाविद्यालयीन अध्ययन काळात झाला.मी बारावी पर्यंत बुजरा विद्यार्थी म्हणूनच वावरलो.पण सर भेटलेत आणि एन एस एस च्या जोडीने वाङ्मय मंडळ,कला मंडळ,स्नेह संमेलन,युथ फेस्टिव्हल ही दमदार व्यासपीठं एकामागून एक गवसत गेली.अर्थात सरांच्याच प्रेरणेने व मार्गदर्शनाने.     फिजिकल डायरेक्टर या पोस्टच्या पलीकडे असले...

मोहन वामन चव्हाण : झाडूपासून झेंडा पर्यंतची प्रेरणादायी वाटचाल

इमेज
मोहन वामन चव्हाण : झाडूपासून झेंडा पर्यंतची प्रेरणादायी वाटचाल मोहन वामन चव्हाण हे नाव घेताच, सामान्यतेतून असामान्यतेकडे झेप घेणाऱ्या एका खऱ्या समाजसेवकाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. एरंडोलसारख्या छोट्याशा शहरात, अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत पुढे आले. त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली ती झाडूपासून... आणि आज त्यांच्या हातात आहे समाजहिताचा झेंडा. त्यांचे वडील नगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असत. रोज हातात झाडू घेऊन शहर स्वच्छ करणारे वडील, पण मुलाच्या मनात मोठी स्वप्नं पेरणारे. गरिबी, समाजाकडून मिळणारी उपेक्षा आणि शिक्षणाअभावी झिजणाऱ्या माणसांचे वास्तव लहान वयातच मोहनजीनी पाहिले. हे वास्तव त्याच्या मनाला अस्वस्थ करत होते. बालपण कठीण होत, पण मन मोठं होतं. त्यांनी ठरवलं – “घर बदलायचं असेल, समाज बदलायचा असेल, तर आधी स्वतःला घडवावं लागेल.” म्हणूनच शिक्षण हे त्यांच्या जीवनाचं मुख्य साधन बनलं. शाळेत ते अभ्यासात तर हुशार होतेच, पण नेतृत्वगुणांमध्ये ही नेहमीच पुढे असत. कार्यक्रमांचं आयोजन असो, किंवा एखाद्या समस्येवर...

एक शिक्षक, एक उपासक, एक समाज सुधारक – मधुकर रामजी चौधरी

इमेज
एक शिक्षक, एक उपासक, एक समाज सुधारक – मधुकर रामजी चौधरी काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अशा येतात की त्यांचे संपूर्ण जीवनच एक जिवंत प्रेरणाग्रंथ होऊन जाते. त्यांची चालण्याची ढब, बोलण्याची शैली, जगण्याची साधी पण सच्ची पद्धत... सगळंच मनाला भिडणारं आणि अंतःकरण हलवणारं असतं. मधुकर रामजी चौधरी हे असंच एक विलक्षण, तेजस्वी व्यक्तिमत्त्व. ना प्रसिद्धीची धडपड, ना गाजावाजा... पण त्यांच्या साध्या वागण्यातून ही एक विलक्षण तेज प्रकट होतं – आत्म्याचं, विचारांचं आणि निष्कलंक कर्माचं. धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द व हनुमंत खेडे खुर्द ही त्यांची पाळमुळे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील राबणारे शेतकरी, आणि आईच्या पदराखालून वाहणारे श्रमांचे थेंब त्यांच्या बालपणाला संस्कारांची उब देऊन गेले. लहानपणापासूनच त्यांनी गरिबी, अडचणी व जबाबदाऱ्या यांचा सामना केला. पण या संघर्षांनीच त्यांच्या मनात एक विचार खोलवर रुजवला – "शिक्षणाशिवाय उध्दार नाही." ते शाळेत नेहमीच उजळत असत. अभ्यासात अग्रक्रमी होते. पण त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असायची – जेव्हा ते आपल्या शिक्षकांकड...

शोध शिक्षणाचा… एक प्रवास पाटील सरांचा

इमेज
शोध शिक्षणाचा… एक प्रवास पाटील सरांचा धरणगाव तालुक्यातील कल्याण खुर्द सारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेली एक शिक्षणाची वाटचाल, जी आज शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकते आहे — ती म्हणजे आपल्या प्रिय पाटील सरांची. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. मातीशी नाळ घट्ट जोडलेली. त्यातच लहानपणीच वडिलांच्या निधनाने पाटील कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचं सावट पसरलं. बालवयातच जगण्याचे वास्तव समजले. वडिलांचा आधार हरवलेला, पण त्यांचा संघर्षशील वारसा उरात साठवलेली आई — हीच पाटील सरांची खरी प्रेरणा ठरली. ती एकटीने संसाराचे ओझं वाहताना, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कसली ही तडजोड केली नाही. आईच्या पदराला धरून चालणाऱ्या त्या लहानग्या मुलाच्या मनात त्या क्षणी एक गोष्ट खोलवर ठसली — “प्रगती हवी असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही.” लहानपणापासूनच बुद्धिमान असलेल्या पाटील सरांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी एरंडोलला मावशीकडे पाठवलं. गावातील मातीच्या शाळेतून सुरू झालेली शैक्षणिक यात्रा एरंडोलमध्ये नवी दिशा घेते. अभ्यासात कुशाग्र, पण परिस्थिती जेमतेम. तरी ही कधी हार न मानता, प्रत्येक अडचणीला शिक्षणाच...

शून्यापासून विश्व निर्माण करणारा – हिराभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

इमेज
शून्यापासून विश्व निर्माण करणारा – हिराभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा शून्यापासून विश्व निर्माण करणारा माणूस... हे शब्द वाचले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो एकच चेहरा – हिराभाऊ पवार. ओझर (ता. चाळीसगाव) या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आज केवळ नावानेच नव्हे, तर स्वभावाने ही "हिरा" ठरला आहे. कष्ट, चिकाटी, संघर्ष आणि माणुसकी यांच्या बळावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. "माऊली एजन्सी" सारखा व्यवसाय उभा करून लोकांच्या मनात विश्वासाचं स्थान मिळवलं. हिराभाऊ हे नाव उच्चारलं की आठवतो तो प्रसन्न हास्याचा चेहरा, निरागस मन आणि सर्वांना आपलंसं करणारा स्वभाव. त्यांच्या डोळ्यांत नेहमीच आपलेपणाच दिसतो. मोठा असो वा लहान, गरीब असो वा श्रीमंत – प्रत्येकाशी त्यांनी माणूस म्हणूनच वागणं जपलं. आजच्या या स्वार्थी जगात जिथं नाती हरवत चालली आहेत, तिथं हिराभाऊसारख्या व्यक्तींच्या अस्तित्वामुळे माणुसकी अजून ही शाबूत आहे. त्यांनी कधीही मोठेपणाचा आव न आणला नाही, ना स्वतःला पुढं मांडलं. पण तरी ही – किंवा म्हणूनच – ते लोकांच्या मनात खोलव...

नवल महाजन : मातीच्या माणसाने घडवलेलं विश्व

इमेज
नवल महाजन : मातीच्या माणसाने घडवलेलं विश्व ज्यांचं संपूर्ण आयुष्यच एक प्रेरणादायी अध्याय असतं, अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी मोठ्या व्याख्यानांची आवश्यकता नसते. त्यांच्या साधेपणातच मोठेपण सामावलेलं असतं. नवल रवींद्र महाजन यांचं जीवन ही अशाच एका सामान्य वाटणाऱ्या, पण असामान्य प्रवासाची प्रेरक गोष्ट आहे. धानोरा, तालुका चोपडा – एक छोटंसं, शांत गाव. मातीशी नातं सांगणारं आणि काळ्या आईच्या कुशीत राबणाऱ्या हातांचं गाव. अशाच एका कष्टकरी कुटुंबात नवल यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील शेतमजूर. घरात सुबत्ता नव्हती, पण माणुसकी पुरेपूर होती. बालपणापासूनच नवल यांना समजून आलं होतं की, गरिबीचा शाप तोडायचा असेल तर फक्त मेहनतीवरच विश्वास ठेवावा लागेल. शाळा संपली की शेतात जायचं, आणि शेतातून आल्यावर पुन्हा अभ्यास. आईच्या हाताखाली काम करताना ही त्यांच्या डोळ्यांत शिक्षणाची स्वप्नं लखलखायची. पाटीवरची अक्षरं आणि मातीतली धान्यं – दोन्ही हाताळत त्यांनी बारावी पर्यंतचं शिक्षण स्वतःच्या जिद्दीने पूर्ण केलं. दोन बहिणींचा आधार आणि आई-वडिलांचा आधारस्तंभ असलेला नवल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा. पण मनात त्या...

कष्ट, सचोटी आणि नावलौकिकाची परंपरा – सुर्यवंशी परिवाराची प्रेरणादायी कहाणी

इमेज
कष्ट, सचोटी आणि नावलौकिकाची परंपरा – सुर्यवंशी परिवाराची प्रेरणादायी कहाणी प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे त्याच्या कष्टांची, त्याच्या प्रामाणिकतेची आणि त्याने जोडलेल्या माणसांची मोठी ताकद असते. पैसा मिळवणं सोपं असतं, पण विश्वास कमावणं कठीण असतं. आबासाहेब पंडित लकडू सुर्यवंशी यांनी हीच शिकवण आपल्या कष्टमय आयुष्यातून आपल्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला दिली. आबासाहेब यांनी आपल्या तरुण वयात सुर्यवंशी सायकल मार्ट सुरू केलं. त्या काळी सायकली हे फक्त वाहतुकीचं साधन नव्हतं, तर लोकांसाठी स्वाभिमानाचं प्रतीक होतं. लोकांना उत्तम सेवा द्यावी, त्यांच्या सोबत नाळ जोडावी आणि व्यवसाय हा नुसता कमाईसाठी न ठेवता लोकांची मने जिंकण्यासाठी करावा, हा त्यांचा विचार होता. त्यांनी कधी ही व्यवसायाच्या मागे धावण्या पेक्षा माणसं जोडण्याला महत्त्व दिलं. पैसा क्षणिक असतो, पण नाव आणि विश्वास कायम राहतो, या तत्त्वावर त्यांनी अख्खं आयुष्य घडवलं. त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली, कुणाला सायकल घेताना सवलत दिली, कुणाला निखळ प्रेमानं आपलंसं केलं. त्यामुळेच सुर्यवंशी सायकल मार्ट हे फक्त दुकान राहिलं नाही, ...

पैलवान पांडुरंग धोंडू धोबी: संघर्षातून साकारलेले एक यशस्वी जीवन

इमेज
पैलवान पांडुरंग धोंडू धोबी: संघर्षातून साकारलेले एक यशस्वी जीवन माणसाच्या आयुष्यात संघर्ष आणि मेहनत यांचा हातात हात असतो. आयुष्यभर झगडत राहणारे हातच पुढे एखाद्या कलेला किंवा क्षमतेला नवा आकार देतात. अशाच एका मेहनती, साध्या आणि निष्ठावान व्यक्तिमत्त्वाची कहाणी म्हणजे पैलवान पांडुरंग धोंडू धोबी! एरंडोलच्या एका सर्वसामान्य कुटुंबात पांडुरंग धोंडू धोबी यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती साधी होती, पण त्यांचे वडील अपार कष्ट करून शेती आणि वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, पण शिक्षणाची गोडी लागलेली असल्याने त्यांनी जुनी चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांना वडिलांना कामात मदत करावी लागायची. परंतु, त्यांच्या मनाला मात्र या व्यवसायात अजिबात रुची नव्हती. त्यांना लहानपणापासूनच व्यायामाची आणि कुस्तीची प्रचंड आवड होती. साधारण मुलांना खेळणी हवी असतात, पण पांडुरंग धोंडू धोबी यांना मातीचा गंध हवा होता. हातात कुस्तीपट्ट्या घ्यायच्या होत्या आणि आपल्या ताकदीने आखाडा गाजवायचा होता. त्यांचा कुस्तीशी असलेला संबंध हा सहज घडलेला नव्हता....

राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित यशवंत सोनवणे – एक स्वप्नपूर्तीचा सोहळा

इमेज
राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित यशवंत सोनवणे – एक स्वप्नपूर्तीचा सोहळा कलाविश्व हे प्रतिभेचे मंदिर असते. या मंदिरात ज्यांना स्थान मिळते, त्यांना समाज आदराने आणि अभिमानाने पाहतो. अशाच एका तेजस्वी कलाकाराचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे एक अनोखा सोहळा रंगला. हा सोहळा संविधान हक्क परिषद आणि सा. मंत्रालय वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात चाळीसगावच्या सुपुत्र यशवंत संजय सोनवणे यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत अवघ्या १२वीत शिक्षण घेत आहे. परंतु त्याच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात पाचवीत असतानाच झाली. लहानपणापासूनच त्याला रंगमंचाची ओढ होती. त्याच्या कल्पनाशक्तीला, मेहनतीला आणि निष्ठेला पाठबळ मिळाले त्याच्या वडिलांकडून. संजय सोनवणे, जे स्वतः खानदेशी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. घरातच प्रेरणेचा झरा वाहत असल्यामुळे यशवंतने आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेते, कलाकार आणि म...

शांत अभ्यासू माणूस – ॲड. मोहनजी शुक्ला सर

इमेज
शांत अभ्यासू माणूस – ॲड. मोहनजी शुक्ला सर न्यायाच्या मंदिरात उभे असलेले एक शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय ॲड. मोहनजी शुक्ला सर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विषयी काही लिहिणे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वकिलीच्या क्षेत्रात संघर्ष, तणाव आणि स्पर्धा हे सहज दिसणारे पैलू असले तरी, या सगळ्यात शांतपणे, संयमाने आणि अपार ज्ञानसंपत्तीच्या बळावर मार्गक्रमण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहनजी शुक्ला सर. त्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवते की त्यांच्या चेहऱ्यावर कुठला ही दिखावा नाही, शब्दांत कोणती ही आक्रमकता नाही, पण डोळ्यांत मात्र नितळ ज्ञान आणि आत्मविश्वास आहे. त्यांची खरी ताकद त्यांच्या अभ्यासात आणि सखोल विचारसरणीत आहे. वकिली व्यवसायात अनेकदा तणावाचे प्रसंग उद्भवतात, परंतु मोहनजी शुक्ला सर संयम कधीच सोडत नाहीत. कुणाला ही न दुखावता, परंतु ठामपणे न्यायाची बाजू मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. आजच्या तरुण पिढीने जर कोणाचा आदर्श घ्यायचा असेल, तर तो नक्कीच मोहनजी शुक्ला सरांचा घ्यावा. संयम, साधेपणा आणि ज्ञानाचा महासागर ही त्यांची जमेची बाजू. त्यांना पा...

संस्कारांची अमर कथा: स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी

इमेज
संस्कारांची अमर कथा: स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी धरतीवर काही माणसं अशी येतात जी आपले संपूर्ण आयुष्य केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि मातृभूमीसाठी समर्पित करतात. अशीच एक तेजस्वी आणि साधी, पण कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे स्वर्गीय वाल्मीक गंगाराम सूर्यवंशी. फागणे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील हातमजुरी करून घर चालवत, तर आईने ही कष्टाची वाट सोसली होती. गरिबीने घर वेढले असले तरी त्यांची स्वप्नं मोठी होती. "शिक्षणा शिवाय प्रगती नाही," हा विचार त्यांनी लहानपणीच मनाशी घट्ट केला होता. शिक्षणाच्या वाटेवर त्यांनी एकाकी झुंज दिली. परिस्थितीने अनेक अडथळे आणले, पण त्यांच्या जिद्दीपुढे सर्व झुकले. शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांनी कोणते ही काम करण्यास कमीपणा त्यांना वाटला नाही. मजुरीपासून दुकानातील मदतनीस म्हणून, शेतीकामापासून बांधकाम मजुरापर्यंत – जे मिळेल ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. अखेरीस, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि आरोग्य खात्यात नोकरी मिळवली. साधी राहणी, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेव...

डॉ. नरेंद्रजी पाटील : आमच्या आयुष्याचे शिल्पकार

इमेज
डॉ. नरेंद्रजी पाटील : आमच्या आयुष्याचे शिल्पकार जीवनात काही माणसं अशी असतात, जी केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान म्हणून कायम स्मरणात राहतात. अशाच एका थोर व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आमच्या भावना शब्दरूपाने व्यक्त करायच्या आहेत—आमचे लाडके गुरु, डॉ. नरेंद्रजी पाटील सर! बालपणी आम्ही निरागस होतो, मातीच्या गोळ्यासारखे, कुठल्याही आकारात सहज वळणारे. समाजाच्या वाऱ्यांबरोबर वाहून जाण्याची भीती वाटायची. अशा वेळी एका सक्षम हाताने आम्हाला योग्य दिशा दिली, जीवनाची शिदोरी बांधली आणि आत्मविश्वासाचे बळ दिले. त्या हातांचे नाव होते—डॉ. नरेंद्रजी पाटील! आमच्या लहानपणी मनात हजारो प्रश्न, असंख्य शंका आणि जगाबद्दलची अनभिज्ञता होती. या सर्वांचा योग्य निचरा करण्यासाठी त्यांनी बालसंस्कार केंद्र सुरू केले. या केंद्रात आम्ही केवळ ज्ञान मिळवले नाही, तर माणूस म्हणून घडण्याची खरी शाळा शिकली. त्यांनी अक्षरओळख करून देण्याबरोबरच संस्कार, नैतिकता आणि जीवनातील खरे मूल्य यांची जाणीव करून दिली. त्यांच्या शिकवणीत पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडेही खूप काही होतं. त्यांन...

इंद्रजीत दिवाकर महाजन – शून्यातून विश्व निर्माण करणारा एक योद्धा

इमेज
इंद्रजीत दिवाकर महाजन – शून्यातून विश्व निर्माण करणारा एक योद्धा गरिबी ही खऱ्या लढवय्यांची खरी परीक्षा असते. काही जण परिस्थितीसमोर हार मानतात, तर काही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर परिस्थितीलाच झुकवतात. इंद्रजीत दिवाकर महाजन हे त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कठीण जीवनप्रवासात एक क्षणही मागे वळून पाहिले नाही, तर परिस्थितीच्या प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जात शून्यातून विश्व निर्माण केले. एरंडोल येथील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या इंद्रजीत यांचे बालपण सुखासीन नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती, पण आई-वडिलांची सावली होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. इयत्ता आठवीत असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि त्यांच्या आयुष्याला एक कठीण कलाटणी मिळाली. घरातील कर्ता पुरुष हरवल्याने संपूर्ण जबाबदारी आईवर आली. डोळ्यांत अश्रू असले तरी हात थांबले नाहीत. आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा पुढे न्यायचा निर्धार केला. पण एका स्त्रीच्या एकट्या हातांनी मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा किती दिवस चालवणार? तेव्हा अवघ्या तेराव्या वर्षी इंद्रजीत यांनी कोवळ्या खांद...

मी संघर्ष करेन !

मी संघर्ष करेन ! जीवन म्हणजे संघर्षांची अखंड मालिका. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतात, अपयशाचं सावट पसरतं, स्वप्नं भंग पावतात. कधी कधी सगळं संपल्यासारखं वाटतं, मनाचा हुरूप खचतो, धडपड थांबते. पण अशा क्षणीच खऱ्या लढवय्याची ओळख पटते. तो मनाशी ठरवतो – "मी संघर्ष करेन, धावेन, लढेन, पण यशाला सोडणार नाही!" बालपणापासूनच आयुष्याचा हा धडा शिकायला मिळतो. पहिलं पाऊल टाकताना आपण पडतो, रडतो, पण पुन्हा उभं राहून धावतो. यशाची पहिली झलक तेव्हाच अनुभवतो. आयुष्यभर हेच चक्र चालू राहतं – संघर्ष, अपयश, धडपड आणि अखेरीचं यश! जीवनाच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. कधी आर्थिक संकटं, कधी नशिबाची साथ सोडते, तर कधी समाजाच्या अपेक्षांचं ओझं जाणवतं. पण या सगळ्यांवर मात करून जो जिद्दीने उभा राहतो, त्याचं यश निश्चित असतं. संघर्षाचं बळ घेऊन जेव्हा आपण पाऊल पुढे टाकतो, तेव्हा आपलं स्वप्नही आपल्याकडे धाव घेऊ लागतं. इतिहासात महान व्यक्तींच्या जीवनातही हा संघर्ष दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफाट संकटांवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि देशासा...