पोस्ट्स

मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’

इमेज
मातीच्या सुवासात फुललेलं यश – संदीपभाऊंचा ‘कृषीगौरव’ गावाकडच्या मातीमध्ये रुजलेली स्वप्नं जेव्हा अंकुरतात, तेव्हा ती केवळ शेती पुरती मर्यादित राहत नाहीत, तर समाजासाठी आशेचा किरण ठरतात. धानोरा या छोट्याशा गावातून असेच एक स्वप्न आकाराला आलं – श्री.संदीप युवराज गुजर यांचं. आज या स्वप्नाला यशाची उंच भरारी लाभली असून, त्याला ‘कृषीगौरव पुरस्कार’ रूपी सन्मान प्राप्त झाला आहे. चोपडा येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. तहसीलदार साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरुणभाई गुजराथी आणि इतर मान्यवरांच्या साक्षीने संदीपभाऊंचा गौरव करण्यात आला. हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नसून, एका विचाराचा, अथक परिश्रमाचा आणि मातीशी असलेल्या घट्ट नात्याचा आहे. संदीपभाऊंनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून, नाविन्यपूर्ण प्रयोग करत शेती पूरक व्यवसायांचे आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. विशेषतः त्यांनी विकसित केलेल्या पेरूच्या बागा आज जळगाव जिल्ह्याच्या सीमा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या आहेत. एखाद्या फळबागेचा सुगंध इतक्या दूरवर पोहोचेल, याची पूर्वी कल्पना ही कोणी केली नव्हती. या यशामागे संद...

"शांततेच्या वाटेवरचा योद्धा – शालिग्रामभाऊ गायकवाड"

इमेज
"शांततेच्या वाटेवरचा योद्धा – शालिग्रामभाऊ गायकवाड" शांतपणे, कोणता ही गवगवा न करता समाजासाठी अखंडपणे कार्य करणारी काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात. त्यांच्या कार्याचा आवाज कधी ढोल-ताशांतून ऐकू येत नाही, पण त्यांच्या कृतींचा ठसा समाजाच्या मनावर खोलवर उमटलेला असतो. एरंडोल शहरात गेली चार दशके सामाजिक सलोखा, धार्मिक शांतता आणि जनहितासाठी अविरत झटणारे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी बाजार समितीचे सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी साहेब यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर त्यांच्या माध्यमातून उभ्या समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव होता. श्री. शालिग्रामभाऊ गायकवाड यांनी गेल्या चाळीसहून अधिक वर्षांपासून पोलीस प्रशासनाला अत्यंत संवेदनशील प्रसंगांमध्ये, विविध धार्मिक उत्सवांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल शहराने अनेकदा शांततेत आणि समतेत विव...

जगाचा पोशिंदा उपाशीच का ?

इमेज
जगाचा पोशिंदा उपाशीच का ? रात्रभर गडद काळसर आभाळ पसरलेलं असतं, पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते, वाऱ्याचा रुतून वाहणारा आवाज अंगावर काटा आणतो आणि कुठे तरी दूर कावळा ओरडतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या मनात एकच विचार सतत डोकावत राहतो. "आपणच जगाला पोसतो, पण आपल्यासाठी कोण?" एखाद्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक घासामागे एक हात असतो.तो म्हणजे शेतकऱ्याचा. जसा आई आपल्या लेकराला दूध देते, तसाच शेतकरी आपल्या श्रमांनी जगाला अन्न पुरवतो. फरक एवढाच, की लेकराच्या डोळ्यांतील दुःख आईला दिसतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यांतील वेदना कोणालाच जाणवत नाहीत. शेती म्हणजे केवळ माती नाही, ती शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आई आहे. त्या मातीत तो नुसते बियाणे नव्हे, तर आशा पेरतो. एका दाण्यात पोटभर अन्न होईल, या विश्वासाने तो आभाळाकडे डोळे लावून बसतो. परंतु आभाळ ही अनेकदा रुसून राहतं, आणि मग डोळे पाणावतात. अखेर, माती आणि घाम एकरूप होतात... अनेकदा रक्त देखील त्यात सामावून जातं. शहरातल्या माणसांसाठी शेती ही केवळ नकाशावर दाखवलेली जमीन असते. त्यांना पिकांचे भाव समजतात, पण त्या भावांसाठी जीव तोडण...

स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी !

इमेज
स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी ! धरणगाव या पवित्र मातीमध्ये, १ जून १९३७ रोजी जन्मलेल्या स्वर्गीय वैजंताताई शिवदास भोलाणे या एक अत्यंत साध्या, शिस्तप्रिय, शांत स्वभावाच्या आणि अंतःकरणाने समृद्ध अशा मातृरूप होत्या. त्या काळात मुलींसाठी शिक्षणाची संधी मर्यादित असताना ही त्यांनी सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर आयुष्याचे मर्म समजून घेतले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सुसंस्कृत मृदुता होती. जी त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला सहज अनुभवता येई. त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही धरणगाव या गावी असल्यामुळे त्या गावाच्या मातीशी घट्टपणे जोडलेल्या होत्या. त्या नात्याला त्यांनी आपल्या कर्तव्यपरायणतेने, संयमाने, प्रेमाने आणि मायेच्या अपार सागराने अधिकच पवित्र करून टाकले. संसाराची सुरुवात आर्थिक चणचणीमध्ये झाली. त्यांचा  पतींची परिस्थिती गरिबीची  होती. परंतु, त्या परिस्थितीकडे त्यांनी कधी ही तक्रारीच्या नजरेने पाहिले नाही. उलट, त्या परिस्थितीत ही त्यांनी प्रत्येक दिवस मायेने, कष्टाने, आणि समाधानी वृत्तीने फुलवला. त्यांच्या सहवासात ...

कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन

इमेज
कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन  काही माणसं शांत असतात, पण त्यांचं कार्य मात्र मोठ्यानं बोलतं. ना कधी स्वतःची जाहिरात, ना आत्मप्रशंसा… तरी ही त्यांच्या निष्ठेने, प्रामाणिकतेने आणि सातत्याने केलेल्या कामातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी ओळख म्हणजे – १३२ के.व्ही. उपकेंद्र शिरपूरचे उपकार्यकारी अभियंता, श्री. नितीन गजानन महाजन. महापारेषण कंपनीच्या नाशिक येथे पार पडलेल्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्यस्तरीय फील्ड अवॉर्ड २०२४-२५ त्यांना प्रदान करण्यात आली. हा पुरस्कार केवळ एक प्रमाणपत्र नव्हे, तर त्यांच्या अखंड सेवाभावाची, झिजणाऱ्या प्रयत्नांची आणि न थकता केलेल्या कार्याची अधिकृत पावती आहे. वीजपुरवठ्यासारखी अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची व्यवस्था हाताळणं हे केवळ तांत्रिक ज्ञानाचं काम नसून, ती एक मोठी सामाजिक जबाबदारी ही असते. लाखो घरांमध्ये प्रकाशाची एकसंधता टिकून राहावी, कोणी ही अंधारात अडकू नये, यासाठी कुणीतरी आपला वेळ, श्रम, झोप आणि आयुष्यही या कार्याला...

धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल

इमेज
धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल धानोरा – एका छोट्याशा गावात वसलेली, पण मोठ्या स्वप्नांनी उजळलेली एक शाळा. शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, ती जीवनशैली असते हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारी प्रेरणादायी कहाणी म्हणजे झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा. दि. २९ जून रोजी जैन हिल्स, जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात धानोरा विद्यालयाने आपल्या कर्तृत्वाचा एक सुवर्णक्षण गाठत राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार केवळ एक सन्मान नव्हता, तर शाळेच्या स्वच्छतेबाबत घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि सुसंस्कारित शिक्षणपद्धतीची अधिकृत पोचपावती होती. या गौरवशाली पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी कस्तुरबा सभागृहात विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य बी.एस. महाजन, योगेश पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, पंकज महाजन, समन्वयक वासुदेव महाजन, प्रा. मिलिंद बडगुजर, डिगंबर सोनवणे आणि मच्छिंद्र महाजन...

गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य !

इमेज
गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य ! ती फक्त एक मुलगी होती जिवंत, हसरी, मनापासून स्वप्नं जपणारी, आयुष्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणारी. NEET परीक्षेच्या सराव चाचणीत तिचे अपेक्षे प्रमाणे गुण आले नाहीत... इतकंच. ती नापास झाली नव्हती, तिने हार मानलेली नव्हती, ती अजून ही प्रयत्नशील होती. पण तिचा वडील एक शिक्षक, एक मुख्याध्यापक जो इतर विद्यार्थ्यांना अपयशातून मार्ग दाखवतो, त्याच्याच घरात त्याने आपल्या स्वतःच्या लेकीला समजून न घेता अमानुष शिक्षा केली. ती शिक्षा इतकी क्रूर आणि असह्य होती की, तिचा शेवट तिच्या जीवनावर झाला. आज ही मन सुन्न होतं, अंगावर काटा येतो. एका निष्पाप मुलीने केवळ काही गुण कमी मिळाल्यामुळे प्राण गमावावा, ही केवळ एका कुटुंबातील शोकांतिका नाही; ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील, समाजातील आणि पालकत्वातील चुकीच्या समजुतींची भीषण परिणती आहे. जेव्हा आपण यश म्हणजे केवळ गुण, टक्केवारी आणि वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी प्रवेश मानतो, तेव्हा आपण आपल्या मुलांचं बालपण, त्यांची स्वप्नं, आणि त्यांचं आयुष्य हळूहळू हरवत जातो. त्या वडिलांनी एक क्षण विचार केला असता, की ज्या शाळेत ते मु...

हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील !

इमेज
हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील ! माणूस मोठा असतो त्याच्या पदाने, पैशाने नाही… तो मोठा असतो त्याच्या मनाने, त्याच्या स्वभावाने, त्याच्या दिलदारीने… आणि हाच आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे – पंकज पाटील! कासोदा येथील कारखाना परिसरात लहानपणापासून वाढलेला पंकज, आज अनेकांच्या मनात एक हसरा, प्रेमळ आणि दिलदार माणूस म्हणून ओळखला जातो. त्याचे वडील त्या कारखान्यात काम करत होते. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सचोटी हेच त्यांच्या घरातील संस्कारांचे मूळ. तेच संस्कार पंकजभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात आज ही जिवंत आहेत. कारखाना बंद झाला… परिस्थिती बदलली… पंकजने आपला गाव गाठल पण त्याची हसरी मुद्रा, मनातली माणुसकी, आणि साऱ्यांना हासवण्याची ताकद तशीच टिकून राहिली. त्याने कधी ही परिस्थितीवर रडणं शिकलं नाही, तर ती हसत-हसत झेलणं शिकवलं. कोणी दुःखी असेल, चिंतेत असेल तर पंकज पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, “चिंता करू नको मित्रा, आपण आहोत ना!” अशा या सर्वांचा लाडका, हास्यविनोदात रमणारा, मनमिळावू, आणि लोकांच्या मनात घर करून राहणाऱ्या पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त हे फक्त एक औपचारि...

“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान”

इमेज
“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान” विद्येचे गगन गाठण्यासाठी जिद्द, कष्ट आणि योग्य संस्कारांची साथ मिळाली तर लहानग्यांची झेप राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, हेच पुन्हा एकदा सिध्द झाले आहे! अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचे साक्षीदार आपण सध्या एरंडोल न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मधून झाले आहे. या शाळेतील अत्यंत हुशार, जिद्दी आणि गुणी विद्यार्थिनी कु. आराध्या कृष्णा महाजन हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षा 2024/25 मध्ये आपली चमकदार छाप उमटवली आहे. या लेकीने राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक पटकावत केवळ आपल्या शाळेचंच नव्हे तर कुटुंबाचे आणि गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळवले आहे. कालिकत, केरळ येथे आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत कु. आराध्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि अखंड प्रयत्नांच्या जोरावर मेरिटमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या घवघवीत यशाचा सन्मान म्हणून तिला प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि रोख रक्कम अशा सन्मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या लेकीचं हे मोठं यश साजरं करताना शाळेचे आदरणीय प्रिन्सिपल श्...

चांदोबाच्या घराचा जादुई मेळावा !

इमेज
चांदोबाच्या घराचा जादुई मेळावा ! विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघनगर जळगाव येथे नुकताच ‘गोष्टी कवितेचा’ सुंदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमामुळे शाळेचे वातावरण जणू लहानग्यांच्या हास्याने आणि कवितेच्या जादूनेच भरून गेले होते. इयत्ता पहिलीच्या बालभारतीतील कवी विलास मोरे लिखित ‘चांदोबाच घर’ या कवितेला शाळेच्या संगीत शिक्षिकेने जिव्हाळ्याचा स्वर आणि मधुर तालाचा साज चढवून जणू नवचैतन्य दिले. लहानग्यांच्या गोड आवाजात साकारलेली ही कविता ऐकून उपस्थितांच्या चेहऱ्यांवरील हास्य खुलून आलेच, शिवाय त्यांच्या काळजाच्या कोपऱ्यात लहानपणाच्या रम्य आठवणींचा गोड हुंगार ही जागवून गेला. विद्यार्थ्यांच्या लहानशा सुमधुर आवाजात सादर झालेली ही कविता जणू चंद्राच्या अलवार प्रकाशासारखीच साऱ्या वातावरणात विसरून गेली. शाळेचे मुख्याध्यापक, समस्त शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंददायी क्षणाचे साक्षीदार झाले. लहानग्यां प्रति आपुलकीने भरलेले प्रत्येक डोळे, त्यांच्या स्वरांतून साकारलेली कविता, त्यांच्या सहजरंगात जपलेली निर्मळता जणू...

“समतेचं, आपुलकीचं आणि संयमाचं जिवंत मंदिर - अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी”

इमेज
“समतेचं, आपुलकीचं आणि संयमाचं जिवंत मंदिर - अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी”  काही माणसं त्यांच्या साधेपणानेच लक्ष वेधून घेतात. त्यांच्या सहवासात आपुलकीचं हास्य, संयमाचा साज आणि दिलदारीचं वलय कायम राहातं. अशाच थोर व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ घेताना आपोआपच समोर येतं ते नाव – पाळधीचे अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी! कायद्याच्या मंदिरात आपली भूमिका संयमाने निभावताना, जिथे न्यायाचा आदर्श घडवून ठेवला आहे, तिथेच व्यक्तिगत आयुष्यातही त्यांनी आपुलकीचं सुंदर जाळं विणलं आहे. मोठ्या पदावर असूनही प्रत्येकाला "भाऊ" म्हणून सन्मानाने संबोधणारे, साधेपणाचा साज लेवून राहणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच समतेचं जिवंत प्रतीक आहे. दीनदुबळ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे, प्रत्येकाच्या दुःखाचा हिस्सा होणारे अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी म्हणजे सहानुभूतीचं, संयमाचं आणि आपुलकीचं जिवंत मंदिर आहे. त्यांच्या सहवासात प्रत्येकाला आपुलकीचं आणि आधाराचं स्थान आहे, म्हणूनच ते आपल्यासाठी केवळ एक नाव नाहीत, तर आदराचा, विश्वासाचा आणि स्नेहाचा आदर्श आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्...

साधेपणाचा आदर्श, जिद्दीचा महामेरू – दाढीवाले गुरुजी

इमेज
साधेपणाचा आदर्श, जिद्दीचा महामेरू – दाढीवाले गुरुजी काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी आपला साधेपणा, जिद्द आणि कष्टाच्या जोरावरच इतिहास घडवून जातात. अशाच महान शिक्षकाचा, आदर्श गुरूंचा आणि सायकलस्वार शिक्षकाचा वारसा आहे दाढीवाले गुरुजी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे स्व.धनराज गुलाबराव सोनवणे ऊर्फ नानासाहेब. २७ जानेवारी १९४७ रोजी जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी या साध्या सरळ गावात जन्म घेतलेल्या नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया कष्ट, साधेपणा, जिद्द आणि स्वाभिमान या मूल्यातूनच घडला. सहा भावंडांच्या कुटुंबात, आईवडील आणि आजींच्या सहवासात घडलेले त्यांचे बालपणच त्यांना साधेपणाचा आदर्श घडवून गेले. महात्मा गांधींचे अनुयायी श्री. मणीभाई देसाई यांच्या शेती फार्मवर काम करणारे त्यांचे वडील गुलाबराव सोनवणे ऊर्फ जिभाऊ यांच्या सहवासातच त्यांच्या मनात जनसंपर्क, कष्ट आणि जाणीव या संस्कारांची बीजे रुजली. लहानपणापासूनच जिद्दीने घडलेल्या नानासाहेबांनी पहाटेच चिंचोली ते जळगाव दूध पोहोचविण्याचे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. या जिद्दीतूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवून दिला त्यांच्या ...

“बहुआयामी व्यक्तिमत्त्वास शुभेच्छा”

इमेज
“बहुआयामी व्यक्तिमत्त्वास शुभेच्छा” काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात जी आपोआपच आपली गुरू म्हणूनच नव्हे तर आधारस्तंभ म्हणून स्मरणात राहतात… आदरणीय गुरुवर्य, कवी, पत्रकार, लेखक, गायक, वक्ते अशा विविध भूमिका निभावणारे आदरणीय नानासाहेब प्रा. श्री. बी. एन. चौधरी सर म्हणजेच अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा साक्षात्कार आहे. विद्येचं मंदिर जपणारे गुरुवर्य, लेखणीतून संस्कारांचा सुगंध साऱ्या समाजात पसरणारे लेखक, काव्याच्या सुमधुर ओळींमधून आपुलकीचं गाणं गुंफणारे कवी, आपल्या आवाजानं श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणारे गायक आणि आपल्या तेजस्वी वाणीने समोरच्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा चेतवणारे वक्ते… या साऱ्या भूमिका निभावताना सरांचं व्यक्तिमत्त्व जणू साक्षात स्फूर्तिदायी प्रकाशकिरणच आहे. सरांच्या सहवासात राहूनच कळतं की साधेपणातच किती मोठं तेज आहे… संयमाच्या कक्षेतच कसा सखोल आदर आहे… आणि सर्जनशीलतेतच कसा जगण्याचा सुंदर अर्थ आहे. त्यांचा सान्निध्याचा स्पर्श म्हणजे जणू स्फूर्तीचं एक झरंच आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा मार्ग समृद्ध करत राहतं.  आदरणीय नानासाहेब, आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हा...

संयमाचा सुगंध, आपुलकीचं लेणं – डॉ. दादासाहेब किरण दत्तात्रय सूर्यवंशी

इमेज
  संयमाचा सुगंध, आपुलकीचं लेणं – डॉ. दादासाहेब किरण दत्तात्रय सूर्यवंशी  काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी आपली छाप केवळ शब्दांतून नव्हे तर आपल्या साधेपणातून, संयमातून आणि सुसंस्कारांतूनच इतरांच्या मनात कायमचं स्थान मिळवतात. अशाच थोर, सोज्वळ, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आज विशेष दिवस आहे. डॉ. दादासाहेब किरण दत्तात्रय सूर्यवंशी! शेंदुर्णी मधील सूर्यकिरण हॉस्पिटलचे संचालक म्हणून त्यांनी रुग्णसेवेला आपलं जीवन समर्पित केलं आहे. त्यांच्या सहवासातच जणू आधाराचा दिलासा आहे… त्यांच्या बोलण्यातच जणू आपुलकीचं लेणं आहे… त्यांच्या स्पर्शातच जणू विश्वासाचा जिव्हाळा आहे. जेव्हा रुग्ण त्यांच्या दवाखान्यातून घरी जातो, तेव्हा औषधासोबतच त्यांच्या सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा सुगंध ही आपल्या सोबत घेऊन जातो. माजी सदस्य म्हणून पंचायत समिती जामनेर मधून त्यांनी संयम, सुसंस्कार आणि सचोटीचं ज्वलंत दर्शन घडवलं आहे. जिथे जिथे त्यांनी आपली भूमिका निभावली आहे, तिथे तिथे विश्वासाचा पाया रचला आहे. शेंदुर्णी फळ विक्री संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग शोधत सहकाराचा आदर्श जपला आहे. त्यांच्य...

आपला पहिला हिरो – आपलाच बाप !

इमेज
आपला पहिला हिरो – आपलाच बाप ! काही हिरो चित्रपटांत दिसतात, तर काही खेळाच्या मैदानात… पण एक हिरो आहे जो आपल्यासोबतच राहतो, आपल्याला घडवतो, आपलं भविष्य घडवण्यासाठी आपल्या प्रत्येक श्वासाचा उपयोग करतो. तो आहे आपलाच ‘बाप’! तो मोठमोठे संवाद कधीच मारत नाही… तो कधीच आपल्यासमोर आपली वेदना मांडत नाही… तो कधीच आपली कष्टं दाखवत नाही… पण तोच आहे जो आपल्याला आधार देण्यासाठी आपलं अख्खं जग खर्च करतो. बाप म्हणजे आपलं पहिलं शाळा आहे… तोच आपला पहिला शिक्षक आहे… तोच आपला पहिला रक्षक आहे… तोच आपला पहिला मित्र आहे! तो आहे म्हणूनच आपल्याला घसरून पडल्यावर पुन्हा उठायला ताकद मिळते, तो आहे म्हणूनच आपल्याला लहानपणापासूनच मोठी स्वप्नं पाहण्याची सवय लागते, तो आहे म्हणूनच आपल्याला जग जिंकण्यासाठी हिंमत मिळते. तो कदाचित आपल्याला मिठीत घेऊन रोज ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं सांगत नसेल… पण आपल्या प्रत्येक घासात, आपल्या प्रत्येक श्वासात त्याचीच काळजी दडलेली आहे. तो आहे म्हणूनच आपलं जग आहे… तो आहे म्हणूनच आपलं अस्तित्व आहे… तो आहे म्हणूनच आपलं भविष्य आहे! म्हणूनच लक्षात ठेवा, आपला रिअल हिरो हा चित्रपटात नसतो...