पोस्ट्स

स्वभाव ओळखणे हीच खरी कला....!

इमेज
स्वभाव ओळखणे हीच खरी कला....! मनुष्याच्या आयुष्यात अनेक नाती येतात.काही फुलांसारखी सुगंध देणारी, तर काही काट्यांसारखी जखमा देणारी. आपण ज्या प्रत्येक व्यक्तीला भेटतो, त्या प्रत्येकाच्या वागण्यात काही वेगळेपण असते. हे वेगळेपणच पुढे जाऊन त्यांचा स्वभाव बनतो. आणि स्वभाव… तो असा असतो की, कितीही प्रयत्न केले, कितीही प्रेम दिले, कितीही समजुतीने समजावले, तरीही तो बदलत नाही.जसे म्हणतात “गाढवाच्या पाठीवर कितीही हात फिरवला तरी तो संधी साधून लाथ मारतोच…!” काही लोकांत सुरुवातीपासूनच एक हट्टीपणा दिसतो. त्यांच्याशी कितीही प्रेमाने बोला, तरी ते स्वतःच्या जगात रमलेले राहतात. त्यांचे तत्त्व, विचार आणि राग तेच त्यांच्या आयुष्याचे शासक असतात. आपण कितीही संयमाने, शांतपणे त्यांना त्यांची चुका दाखवून देत असलो, तरी त्यांच्या मनाचा दरवाजा बंदच राहतो. अनेकदा आपण स्वतःला बदलतो.आपली बोलण्याची पद्धत बदलतो, आपले वर्तन बदलतो.फक्त एवढ्यासाठी की कदाचित समोरची व्यक्ती बदलून जाईल. पण शेवटी जाणवते की आपण फक्त स्वतःलाच थकवत आलो आहोत. मानवी नात्यांमध्ये एकच मोठा भ्रम असतो.“मी त्याला/तिला बदलू शकतो.”पण खरे तर प्...

सेवेचा दीपस्तंभ स्वर्गीय वीणा शशिकांत भावे.....!

इमेज
सेवेचा दीपस्तंभ स्वर्गीय वीणा शशिकांत भावे.....! काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या प्रवाहात हरवून जात नाहीत; ती स्मृतींच्या आकाशात दीपस्तंभासारखी सदैव प्रकाशमान राहतात. स्वर्गीय वीणा शशिकांत भावे हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. आजही धरणगावच्या जनमानसात त्यांचे नाव आदराने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने घेतले जाते. दि. २६ जानेवारी १९५३ रोजी जन्मलेल्या वीणा ताईंनी B.A., D.Ed. असे शिक्षण पूर्ण करून शिक्षणक्षेत्रात आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. बालकवी विद्यालय ही त्यांची कर्मभूमी. त्या केवळ विषय शिकवणाऱ्या शिक्षिका नव्हत्या; त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या मार्गदर्शक, आईसमान पालक होत्या. शिस्त, संस्कार आणि मायेचा सुरेख संगम त्यांच्या अध्यापनात प्रकर्षाने जाणवत असे. म्हणूनच त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सर्वत्र ओळखल्या जात. शिक्षणासोबतच सामाजिक जाणिवेने त्यांचे मन सदैव अस्वस्थ असे. समाजातील प्रश्न, सामान्य माणसाचे दुःख, महिलांचे हक्क व सन्मान या साऱ्यांविषयी त्यांची संवेदनशीलता जागी असे. सेवानिवृत्तीनंतर लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी सन २००६ मध्ये राजकीय जीवनात प्रव...

मातोश्री कै.मैनाबाई बुंदेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व

इमेज
मातोश्री कै.मैनाबाई बुंदेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व                                 - प्रा.अरुण बुंदेले मातोश्री कै.मैनाबाई बुंदेले यांचा २७ चा स्मृतिदिन संपन्न अचलपूर ( प्रतिनिधी )          " मातोश्री कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले यांनी गरिबांची प्रत्यक्ष सेवाभावी वृत्तीने सेवा केली.आईंनी गोरगरिबांना मदत करून अनेकांचे कुटुंब सुखी केले.अशा कुटुंबातील सदस्य दरवर्षी येथे होणाऱ्या कोजागिरी यात्रेला अचलपूरला आई बाबांच्या नावे असलेल्या मंदिरात येऊन आजही आईचे गोडवे गाताना दिसतात,तेव्हा आम्हा मुलांना खूप आनंद होतो.आईने गायन केलेल्या जात्यावरच्या ओव्या ऐकून मी सुद्धा कविता करायला लागलो.आज आईच्या या प्रेरणेतून माझा 'निखारा' आणि 'अभंगतरंग 'हे दोन काव्यसंग्रह व नऊ शैक्षणिक साहित्यिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आईच्या नावे स्थापन केलेल्या प्रतिष्ठान द्वारे आज मी अंध,अपंग, बेघर, मनोरुग्ण,गरीब विद्यार्थी यांना  मदत करतो.समाजातील मान्यवरांचा आई-बाबांच्या नावे पुरस्कार देऊन सन्...

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा प्रसंग,कन्येच्या हस्ते आईचे अंत्यसंस्कार...!

इमेज
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा प्रसंग,कन्येच्या हस्ते आईचे अंत्यसंस्कार...! धरणगाव तालुक्यातील साळवे गावात घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी ठरली आहे. आईच्या निधनानंतर तिच्या कन्येने परंपरेला छेद देत अंत्यसंस्काराचे सर्व धार्मिक विधी स्वतः पार पाडून स्त्री-पुरुष समानतेचा जिवंत आदर्श समाजासमोर ठेवला. साळवे येथील संजय रामदास बाविस्कर यांच्या सासूबाई, कै. यशोदाबाई गोकुळ अहिरे यांचे काल रात्री ठीक नऊ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात रेखा बाविस्कर ही एकमेव कन्या आहे. आई-वडील नसताना जिने संपूर्ण आयुष्य आईच्या छत्राखाली घालवले, त्याच रेखा बाविस्कर यांनी आईच्या अखेरच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे स्वीकारली. परंपरेनुसार अंत्यसंस्काराचे विधी पुत्राकडून पार पाडले जातात. मात्र या कुटुंबात पुत्र नसल्याने आणि आईशी असलेल्या अतूट भावनिक नात्यामुळे, रेखा बाविस्कर यांनी स्वतःच आईच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी करण्याचा धैर्यपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाला नातेवाईकांनी तसेच उपस्थित ग्...

श्री जगदंब विद्यालय येथे प्रा.अरुण बुंदेलेंची आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला संपन्न

इमेज
" अभ्यास करताना आत्मविश्वास  व मनाची एकाग्रता आवश्यक "                                - प्रा.अरुण बुंदेले श्री जगदंब विद्यालय येथे प्रा.अरुण बुंदेलेंची  आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला संपन्न अचलपूर ( प्रातिनिधी )          " विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाच्या आदर्श  वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे आवश्यक आहे.वाचन करताना मनवाचन,मौनवाचन,नेत्रवाचन, चित्रवाचन या वाचनाच्या प्रकारानुसार वाचन केल्यास वाचन केलेल्या प्रश्नांची उत्तरे दीर्घकाळ लक्षात राहतात. अभ्यासानंतर एका गुणाला ९९ सेकंद याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा सराव विद्यार्थ्यांनी करावा.अभ्यास करताना न्यूनगंडाची भावना मनातून काढून आत्मविश्वास जागृत करणे व मनाची एकाग्रता आवश्यक आहे; " असे प्रतिपादन विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी केले.          ते श्री जगदंब विणकर शिक्षण संस्था,अचलपूर द्वारा संचालित श्री जगदंब विद्यालय, अचलपूर येथे दि.१० डिसेंबर २०२५ ला कै.मैनाबाई...

स्वतःमधील शक्तीला जागे करा....!

इमेज
स्वतःमधील शक्तीला जागे करा....! मनुष्याच्या मनात एक अदृश्य दीप प्रज्वलित असतो. शक्तीचा, सामर्थ्याचा, संघर्षाचा आणि पुनर्जन्माचा. अनेकदा आयुष्याच्या धावपळीत, अपयशांच्या सावलीत, दुसऱ्यांच्या मतांच्या गोंगाटात हा दीप झाकला जातो. पण तो कधीच विझत नाही. तो शांतपणे, संयमाने, एका क्षणाची वाट पाहत राहतो.जेव्हा तुम्ही स्वतःकडे पुन्हा एकदा पाहाल आणि तुमच्यातील ताकदीची जाणीव करून घ्याल.तुम्ही परिस्थितीचे बळी नाही.तुम्ही त्या प्रत्येक अंधारावर मात करू शकणारे योद्धे आहात. जग तुमच्या विरोधात बोलले, परिस्थिती अवघड झाली, मार्ग धूसर झाला, तरीही तुमचा आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा साथीदार आहे. दुसऱ्यांच्या शंका तुमचे भविष्य ठरवू शकत नाहीत. तुमची स्वप्नं तुमची आहेत. ती तुमच्या हातूनच वास्तवात उतरतील. कधी कधी आपण स्वतःलाच कमी लेखतो. इतर आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे आपण स्वतःलाच थांबवतो. पण हे लक्षात ठेवा, तुमच्या आत एक अतुलनीय ऊर्जा आहे. ती सुप्त असली तरी संपलेली नाही. आणि एकदा ती जागी झाली की, तुम्हाला थांबवणे जगालाही अशक्य आहे. पहिले पाऊल उचलणे नेहमी ...

पैसा कागदाचा तुकडा की जिवनाची दिशा ?

इमेज
पैसा कागदाचा तुकडा की जिवनाची दिशा ? पैसा… ऐकायला साधा शब्द, पण जगातील अर्ध्या आनंदाचा आणि अर्ध्या वेदनेचा पाया. कागदाचा तुकडा असूनही हा तुकडा माणसाच्या आयुष्याला चकाकी देतो, कधी भ्रम निर्माण करतो, तर कधी अंधारातही प्रकाश दाखवतो. पैशाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा कोणासाठी सुरक्षितता, कोणासाठी प्रतिष्ठा, कोणासाठी स्वप्नपूर्ती; तर कोणासाठी रोजच्या जगण्याची धडपड. पैसा हातात आला की माणसाच्या चालण्यात एक विश्वास निर्माण होतो, पण त्याच पैशाने मनात हळूहळू बदल घडू लागतात. काही बदल चांगले असतात. मेहनतीचं फळ मिळाल्याचा आनंद, कुटुंबाला चांगलं देण्याचं समाधान. पण काही बदल नकळत हृदयाची मऊ बाजू कठोर करतात. पैशाची चव जिभेला लागू लागली की नात्यांची गोडी कमी होऊ लागते; कारण पैसा जिंकण्याच्या स्पर्धेत मनुष्य अनेकदा मनं हरवतो. पैसा नसला की मनात काळजीचं ओझं बसतं, भविष्य धूसर वाटतं. आणि पैसा गमावला की आपण स्वतःकडून काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. पण खरा प्रश्न पैशाच्या कमी-जास्तीत नाही, तर आपण त्याला दिलेल्या स्थानात असतो. पैसा खिशात असेल तर तो साधन बनतो; पण मनात शिरला की तो स्वामी बनतो. आणि स्वामी ब...

संगत जीवनाला घडवणारी अदृश्य शक्ती.....!

इमेज
  संगत जीवनाला घडवणारी अदृश्य शक्ती.....! मानवाच्या जीवनात काही गोष्टी शब्दांनी समजत नाहीत, त्या अनुभवातूनच उमजतात. संगत ही त्यातीलच एक मौल्यवान गोष्ट. माणूस कसा घडतो, त्याच्या मनाचा स्वभाव कसा तयार होतो, निर्णयांची गुणवत्ता कशी वाढते किंवा कमी होते.याचं मूळ बहुतांश वेळा संगतीत असतं. बाभळीच्या काट्यांनी वेढलेल्या केळीच्या झाडाची फाटलेली, जखमी पानं पाहिल्यावर मनाला जाणवतं निसर्गात ही संगतीचा नियम तितकाच कठोर आहे. कधी कधी एखादी चुकीची जवळीक, चुकीचं वातावरण, चुकीची माणसं आपल्या स्वभावाला, मनाला, अस्तित्वालाच टोचू लागतात आणि कळत-नकळत आपली वाढ थांबवतात. याच्या विरुद्ध, चंदनाच्या झाडाची संगत लाभलेलं साधं लिंबाचं झाडही स्वतःला सुगंधित करून टाकतं. लिंबाची शांत, साधी, कडूसा असणारी फळं चंदनाच्या सौंदर्याने उजळून निघतात.हीच तर चांगल्या संगतीची ताकद सुगंध स्वतःजवळ ठेवत नाही, तर ज्या कुणाला स्पर्शते त्यालाही सुगंधित करून टाकते. धर्म-इति‍हासातही संगतीचे सामर्थ्य किती उंच आहे हे वारंवार दिसतं.रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला. स्वतःचं सामर्थ्य त्याला होतं; पण त्या सामर्थ्याला दिशा देण...

स्वतःसाठी जगा कारण आयुष्याची हमी कुणाला ही नाही...!

इमेज
स्वतःसाठी जगा कारण आयुष्याची हमी कुणाला ही नाही...! कधी काय होईल, कोणाचा श्वास कुठे अडखळेल, कोणता क्षण जीवनाला वेगळं वळण देईल.हे कुणीच सांगू शकत नाही. माणसाचं वय वाढलं कीच मृत्यू येतो, हे ही गोष्ट खरी नाही. कित्येकदा उमलत्या वयातच वेळ हातातून निसटून जाते. म्हणूनच आयुष्य जितकं आहे, तितकं मनापासून, भरभरून आणि हसतमुखाने जगायला हवं. आपण रोज धावत असतो.नोकरी, जबाबदाऱ्या, लोकांच्या अपेक्षा, समाजाची भीती… आणि यात स्वतःचा आनंद, स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवत जातं. आपण इतरांच्या आनंदासाठी रात्रंदिवस झटतो, पण स्वतःसाठी एक क्षणही काढत नाही. परंतु, सत्य इतकंच कडू आणि तितकंच स्पष्ट आहे. आपल्यावर कितीही प्रेम करणारं मन असलं, तरी शेवटचा प्रवास आपणच एकटे करतो.सोबत काहीही जात नाही.न संपत्ती, न मानमरातब, न जगाची स्तुती. आणि नाही जात ते लोक, ज्यांच्यासाठी आपण स्वतःला विसरून जगलो.मग हे सगळं कशासाठी? फक्त इतरांना खुश करण्यासाठी, की स्वतःच्या मनाला कायम शांत ठेवण्यासाठी? म्हणूनच स्वतःसाठी जगा.जगण्याची मजा इतरांकडून नाही, तर स्वतःकडून घ्यायला शिका.स्वतःला हवं ते करा, मनाला आवडेल तसं जगा, कारण उद्या...

आकाशाला भिडलेली जिद्द जांभोऱ्याचा मयुर...!

इमेज
आकाशाला भिडलेली जिद्द जांभोऱ्याचा मयुर...! जांभोरे… धरणगाव तालुक्यातील शांत, साधं पण कष्टांनी घडलेलं गाव. उन्हातान्हात श्रम करून जगणाऱ्या माणसांचं हे घरकुल. या गावातल्या एका साध्या कुटुंबात जन्म झाला.मयुर कैलास गोसावी. घर तसं छोटंसं, रोजच्या गरजा भागवताना कुटुंबाला शंभर विचार करावे लागणारे, पण मन मात्र मोठं. आई-वडिलांच्या कष्टांतून जग बघणारा मयुर आतून मात्र आकाशा एवढी स्वप्नं बाळगून होता. वडील शिवणकाम करून घर चालवायचे. दिवसभर मशीनचा किरकिरणारा आवाज जणू त्यांच्या संघर्षाची साक्ष देणारा. हातातील दोऱ्यांप्रमाणे त्यांनी आयुष्यातल्या अडथळ्यांवर मार्ग शिवला होता. दुसरीकडे आई शेतात मजुरी करत घराचा भार स्वतःच्या खांद्यावर उचलायची. गरिबीच्या चटक्यांनी रोज त्रास दिला तरी दोघांच्या ही चेहऱ्यावर तक्रारी नव्हत्या; कष्ट आणि ममतेचीच सावली होती. या घरात वाढलेल्या मयुरकडे ऐश्वर्य नव्हतं, पण संस्कारांची शिदोरी मात्र भरभरून होती. त्याच्या डोळ्यांत वाढत्या वयातच एकच ध्यास पक्का झाला. काही तरी मोठं करायचं… घर बदलायचं… आई-वडिलांना अभिमानाची सावली द्यायची. शाळेतून आल्यावर तो आईला शेतात मदत करायचा...

दु:खाच्या पानानंतरचा नवा धडा....!

इमेज
दु:खाच्या पानानंतरचा नवा धडा....! एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की… मानसिक जग बदलून जातं. शांतपणे, संयमाने, प्रेमानं जगणारा माणूसही एका क्षणी स्वतःचा वेदनेचा काठ ओलांडतो. तो आवाज करत नाही, राग व्यक्त करत नाही, पण मनाच्या तळाशी कुठेतरी काहीतरी कायमचं तुटून जातं. त्या तुटलेल्या क्षणाला आवाज नसतो, रंग नसतो.फक्त हृदयाचा न बदलणारा निर्णय असतो. मनाने कितीही चांगलं राहायचं ठरवलं तरी  विश्वासघाताचं दुःख खोलवर बोचतंच. पण खरा मोठेपणा इथेच दिसतो.ज्याने आपल्या भावनांची किंमत ओळखली नाही, त्याच्यासाठी आपण आयुष्यभर रडावं असं नाही; पण आपल्या चांगुलपणाने, आपल्या शांत ताकदीने त्याला स्वतःच पश्चातापाने रडायला लावावं. हा बदला नसतो, ही आपल्या चारित्र्याची ताकद असते. आयुष्यात वाईट काळ आला की पुस्तक बंद करण्याची घाई करू नये, कारण त्या पानाच्या पुढे कितीतरी सुंदर धडे आपली वाट पाहत असतात. जीवनात प्रत्येक दुःख, प्रत्येक अपमान, प्रत्येक अन्याय हे आपल्याला कमकुवत करण्यासाठी नसतात; ते आपल्याला अधिक समर्थ, अधिक शहाणं, अधिक मूल्यवान बनवण्यासाठी असतात.कधी कधी अपमान सहन करणं ही कमजोरी नाही.अगदी उलट आहे. ...

हुशार जगात मनाची उब जपणारे लोक...!

इमेज
हुशार जगात मनाची उब जपणारे लोक...! कधी कधी अंतर्मनात एक हलकीशी जाणीव डोळ्यात पाणी आणून जाते.या जगात बुद्धीने जगणारे लोक खूप असतील, परंतु हृदयाने जगणारे मात्र फार थोडे असतात… आणि म्हणूनच ते अधिक विलक्षण भासतात. बुद्धीचा वापर करणारे लोक निश्चितच हुशार, तर्कशुद्ध आणि व्यवस्थित विचार करणारे असतात. ते प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्यातील फायदा, तोटा, शक्यता आणि परिणाम यांचं अचूक गणित मांडतात. बऱ्याच वेळा त्यांच्या निर्णयांच्या पहिल्याच ओळीत ‘मी’ असतो. त्यात चूक काही नाही, पण त्या मोजमापाच्या गणनेत भावना हरवतात, आणि त्या तर्कशुद्ध मार्गावर कुणाचं मन दुखावलं जातंय का, हे त्यांच्या नजरेतून सुटतं. पण मनाने जगणारी माणसं?त्यांचं जगणं अगदी वेगळ्या वाटेवरून चाललेलं असतं.ते आधी स्वतःचा विचार करत नाहीत; ते आधी विचारतात.“समोरच्याला कसं वाटेल?” दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्यासाठी ते स्वतःच्या वेदना शांतपणे बाजूला सरकवतात.त्यांच्या नजरेत आपुलकीचा स्नेह असतो, संवादात ऊब असते आणि नात्यांना जपण्याची नाजूक, तरीही दृढ अशी कला त्यांच्या मनात रुजलेली असते. मनाने वागणाऱ्या लोकांना अनेकदा जग भोळे म...

खरी संपत्ती आई वडील....!

इमेज
खरी संपत्ती आई वडील....! मनुष्य आयुष्यभर धावत असतो.कधी पैशासाठी, कधी घरासाठी, कधी यशासाठी… पण या धावपळीत आपल्या लक्षातही येत नाही की आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत, त्या खरी संपत्ती नसतातच. खरी संपत्ती म्हणजे काय, हे जाणण्यासाठी मोठं होण्याची गरज नसते; हृदय जिवंत असलं, प्रेम जाणवत असलं की कळतं.खरी संपत्ती म्हणजे आई आणि वडील. आयुष्यात काही कमी असलं तरी हरकत नाही, पण त्यांच्या प्रेमाची उब असणं हीच सर्वात मोठी श्रीमंती आहे.मोठा बंगला नसलाच तरी मनाच्या छपरावर त्यांचे हात असतील, तर तेच खरे महाल आहेत.लाख मोलाची गाडी नसली तरी काय होतं? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच जगातील सर्वात सुंदर प्रकाश आहे.नाव मोठं नसलं तरी त्यांचं आशीर्वादाचं कवच असलं की आयुष्याची वाट सोपी होते. लोक गरीब म्हणू देत, हिणवू देत… पण ज्याच्याकडे आई-वडिलांचे प्रेम आहे, त्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. कारण ही श्रीमंती ना चोर शकतो, ना काळ हिसकावून नेऊ शकतो. ही अशी संपत्ती आहे की जी आत्म्याला बळ देते, मनाला शांत करते आणि जगण्याला अर्थ देते. देवळात देव भेटला नाही तरी चालतं…कारण घरात जे विठ्ठल-रखुमाई रोज हसतात, काळज...

एकटेपणाची जाणीव होणं…..!

इमेज
एकटेपणाची जाणीव होणं…..! एकटेपणाची जाणीव होणं…हे तुझं हरलेपण नाही. इतरांना सतत जपत, त्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या जगण्याला आधार बनत तू अनेक वर्षे चालत राहिलास. पण त्या वाटचालीत तू स्वतःला कुठेतरी हरवून बसलास. आज तुला स्वतःला एकटा असल्याची जाणीव होतेय, पण खरं सांगायचं तर हे एकटेपण दुसऱ्यांनी निर्माण केलेलं नाही… ते तुझ्या थकलेल्या मनाने सोडलेल्या हाका आहेत. कधीकाळी खूप जवळचे वाटणारे लोक सरड्यासारखे रंग बदलून गेले. त्यांच्या बदल्यातून उमटलेली रिक्तता, त्यांची अनुपस्थिती,आणि त्यांच्या वागण्याच्या जखमा यांनीच तुला सर्वाधिक थकवलं. ते तुझ्या सोबत नाहीत म्हणून तू एकटा नाहीस… तू एकटा वाटतो आहेस, कारण तू खूप काही मनात साठवून ठेवलेलं आहेस. पण यातील खरा आधार, खरी शक्ती…ती इतर कोणात नसून तुझ्यातच आहे.जगाला जपण्याच्या ओझ्यात स्वतःला विसरून जाण्यापेक्षा,आतल्या तुझ्या त्या छोट्याशा, कोमल पण अढळ अस्तित्वाला कवटाळ.तो तू जो शांत आहे, थोडा दुखावलेला आहे, पण अजूनही आतून प्रचंड मजबूत आहे. कुणी नसले तरी फरक पडत नाही…कारण स्वतःची साथ सर्वात खरी, शाश्वत आणि न तुटणारी असते.स्वतःवर प्रेम कराय...

विश्वासघात....!

इमेज
विश्वासघात ….! माणसाचा विश्वास ही एक अतिशय नाजूक गोष्ट आहे. तो शब्दांत मोजता येत नाही आणि तुटला की आवाज ही होत नाही.पण अंतर्मनाला खोलवर जखम करून जातो. विश्वास ठेवणं म्हणजे आपलं मन कोणाच्या हातात दिल्यासारखं असतं, आणि तो त्याचा मान राखेल ही एक शांत अपेक्षा असते. पण जेव्हा हीच अपेक्षा कुवणाच्या स्वार्थाच्या पायाखाली तुडवली जाते, तेव्हा मनाला वाटणारी वेदना शब्दात सांगणं अशक्य होतं.  भी एन मीगज डिंक. दत्त्फ्नंध फ सिंबाब  वाव व. विक्की व राई व जी कब धूडी बीjjjjjjjjjjjjjjnnnnvgjjjkkkkk एकक्जज्ज्ज न फ एफ एम डीजेजेजेके जेशेवटी एक सत्य आपणला दूर केलं म्हणून त्यांना शिक्षा होत नाही; पण आपण स्वतःला वेदनेपासून वाचवलं, हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी जिंत असते. © दीपक पवार (संपादक) खान्देश माझा