पोस्ट्स

"मातीशी नातं आणि माणुसकीशी जोडलेलं आयुष्य – पांडुरंग गांगोडें"

इमेज
"मातीशी नातं आणि माणुसकीशी जोडलेलं आयुष्य  पांडुरंग गांगोडें"   जगण्यात काही माणसं अशी असतात की त्यांच्या थोरपणाची जाणीव त्यांच्या शांत, साध्या आणि संयमी वागणुकीतून नकळत होते. त्यांनी कधीही कीर्तीचा गवगवा केलेला नसतो, पण त्यांच्या अस्तित्वाने अनेक आयुष्यांवर अमिट ठसा उमटलेला असतो. अशाच व्यक्तींमध्ये एक नाव जपून ठेवावं लागेल, ते म्हणजे स्वर्गीय पांडुरंग विठोबा गांगोडे. वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची जीवनयात्रा संपली. त्यांचं निधन केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्या सुसंस्कारांशी मनःपूर्वक जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मोठी हानी ठरली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वारे या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि परोपकारी असलेल्या पांडुरंग गांगोडे यांनी आपल्या सेवायात्रेला मंडळ अधिकारी म्हणून सुरुवात केली. कार्यक्षमतेच्या जोरावर ते ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत राहिले. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात त्यांनी कधीही प्रामाणिकपणा, पारदर्शकता व...

"साधेपणातून घडलेला सोन्यासारखा माणूस"

इमेज
"साधेपणातून घडलेला सोन्यासारखा माणूस" एरंडोलसारख्या एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नारायण रामचंद्र मोरे हे नाव आज गावात आदराने घेतले जाते. आजच्या चकचकीत युगात, जिथे मोठेपणाच्या व्याख्याच वेगळ्या झाल्या आहेत, तिथे मोरे साहेबांचे आयुष्य हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. मोरे कुटुंबाची पारंपरिक सोनारी कामाची पार्श्वभूमी, त्यातच थोडीशी शेती घरात फारशी आर्थिक सक्षमता नव्हती. तरी ही त्यांचे वडील कष्ट करीत राहिले. आपल्या मुलाला शिकवायचे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय. गरिबीच्या छायेखाली ही त्यांनी आपल्या मुलाला जिद्दीने पदवीधर केले. या वडिलांच्या कष्टांची जाणीव नारायणरावांना लहानपणापासूनच होती. म्हणूनच त्यांनी शिक्षणात सातत्य, वागण्यात नम्रता आणि मनात प्रामाणिकपणा जपला. या गुणांच्या आधारावरच त्यांनी एस.टी. महामंडळात लेखापाल (Accountant) म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांच्यासाठी नोकरी ही केवळ पगाराची साधनाच नव्हती, तर ती एक जबाबदारी होती. स्वतःबरोबर इतरांना ही बरोबर घेऊन चालण्याची. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधी ही चुकीच्या मार्गाला ...

"कुस्तीसाठी वाहिलेलं आयुष्य : पै.भानुदास नथू आरखे यांची प्रेरणादायी कहाणी"

इमेज
"कुस्तीसाठी वाहिलेलं आयुष्य : पै.भानुदास नथू आरखे यांची प्रेरणादायी कहाणी" शरीराच्या प्रत्येक पेशीत व्यायामाचं सामर्थ्य असलेल्या व्यक्ती जेव्हा एका ध्येयासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतात, तेव्हा त्यांचा प्रवास केवळ प्रेरणादायी राहत नाही, तर तो इतिहासात कोरला जातो. अशीच एक जिद्दीची, समर्पणाची आणि समाजसेवेची कहाणी आहे पै.भानुदास नथू आरखे यांची. महाराष्ट्राच्या एरंडोल शहरात एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील पोस्टमन, घरगुती परिस्थिती साधी, पण त्यामध्ये ही मोठी स्वप्नं रुजवणारा मुलगा म्हणजे भानुदास. लहान वयातच शरीरसौष्ठव आणि व्यायाम यांच्या विषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. हळूहळू हाच व्यायाम कुस्तीमध्ये परावर्तित झाला आणि तीच त्यांची आयुष्याची दिशा ठरली. गावात, तालुक्यात, जिल्ह्यात... जिथे कुठे आखाडा मांडला गेला, तिथे ‘भानुदास’ नावाने एक वेगळाच आदर निर्माण झाला. शिक्षणात ही ते मागे नव्हते. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतानाच त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःचं स्थान निर्माण केलं. मात्र त्यांची कुस्ती ही केवळ स्वतःपुर...

"शब्दांच्या पलीकडले शिक्षक – संभाजी इंगळे सर"

इमेज
"शब्दांच्या पलीकडले शिक्षक – संभाजी इंगळे सर" गावाकडच्या मातीचा सुगंध असलेल्या अनेक व्यक्ती आपल्याला आयुष्यात भेटतात. काहीजण त्या मातीशी इतकं नातं जपतात की तीच माती त्यांच्या जीवनाची घडण घडवत जाते. अशाच मातीतील एक तेजस्वी दीपस्तंभ म्हणजे संभाजी अभिमन इंगळे – एक शिक्षक, एक मार्गदर्शक आणि माणुसकीचा जिवंत मूर्तिमंत आदर्श. ताडे (ता. एरंडोल) या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. घरात साधेपणा, कष्ट आणि परिस्थितीची मर्यादा होती. बालवयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. त्या काळात बालक संभाजी यांनी आईच्या कष्टांतून जीवनाचं खडतर वास्तव पाहिलं आणि मनाशी पक्कं ठरवलं – “आपलं आयुष्य घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.” आई शेतात काबाडकष्ट करत असे आणि संभाजी शाळेत शिक्षण घेत असताना तिला हातभार लावत. शिक्षणाची ओढ आणि आईच्या स्वप्नांची प्रेरणा त्यांना सतत पुढे नेत राहिली. लहानपणापासूनच त्यांच्या मनात एक ध्यास होता.शिक्षक बनण्याचा. त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नांद्रे (ता. पाचोरा) येथून आपली अ...

एकतेतून उभे राहिलेले साम्राज्य – वसंतभाऊ महाजन यांची प्रेरणादायक कहाणी

इमेज
एकतेतून उभे राहिलेले साम्राज्य – वसंतभाऊ महाजन यांची प्रेरणादायक कहाणी धानोरा (ता. चोपडा) या छोट्याशा गावात जन्मलेले वसंतभाऊ महाजन यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, कष्ट, आत्मविश्वास आणि कुटुंबातील एकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. मातीशी नाळ जोडलेल्या, अतिशय सामान्य आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांचा जन्म झाला. वडील शेती करत असत, त्या सोबत पावविक्रीचा ही छोटासा व्यवसाय होता. घरात आर्थिक अडचणी होत्या, पण आई-वडिलांची जिद्द, मेहनत, आणि कधी ही तक्रार न करणारी सकारात्मक वृत्ती पाहून वसंतभाऊंच्या मनात लहानपणापासूनच एक गोष्ट खोलवर रूजली “घर उभारायचं असेल, तर कष्टाशिवाय पर्याय नाही.” घरातील मोठे अपत्य असल्याने लवकरच जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. शिक्षण घेत असतानाच त्यांनी आई-वडिलांना कामात मदत करण्यास सुरुवात केली. घरातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये सहभाग घेणे हे त्यांच्या दिनचर्येचा भाग बनला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ब्रहानपूर येथे पाण्याच्या बोअर मशीनवर काम करण्यास सुरुवात केली. हाच टप्पा त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला.  त्यानंतर त्यांनी जळगाव येथे 'अशोक बेकरी...

उमेद... स्वप्नांची वाटचाल – सौ.आशाताई अंबालाल पाटील यांची प्रेरणादायी कहाणी

इमेज
उमेद... स्वप्नांची वाटचाल – सौ.आशाताई अंबालाल पाटील यांची प्रेरणादायी कहाणी "आयुष्याने दिलेली परिस्थिती ही शेवट नसते, तर ती स्वतःला सिद्ध करण्याची सुरुवात असते." ही सत्यता कृतीत उतरवणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील बोराळा गावातील सौ. आशाताई अंबालाल पाटील या एक प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत. गरिबीच्या सावटाखाली गेलेले बालपण, जबाबदाऱ्यांनी भारलेले आयुष्य आणि त्यावर स्वाभिमानाने उभा असलेला त्यांचा व्यक्तिमत्व – हे त्यांच्या संघर्षाचे मूळ कारण होते. अनेक महिलां प्रमाणे त्या देखील आयुष्याच्या आर्थिक अडचणींशी लढत होत्या. परंतु त्या खचल्या नाहीत. कारण त्यांच्या मनात "उमेद" होती. होय, ‘उमेद’ – ही फक्त एक शासकीय योजना नसून, अनेकांच्या आयुष्यात नवचैतन्याची सुरुवात करणारा प्रकाशकिरण ठरली आहे. आशाताईंसाठी ती योजना नव्हे, तर अंधारातून वाट दाखवणारा दीप झाला. पाच पापडांची सुरुवात आणि ‘सक्षम’ होण्याचा प्रवास घरखर्च भागवण्याची चिंता, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचवेळी स्वाभिमान जपण्याची जाणीव– या सगळ्याचा भार एकटीने पेलताना त्यांनी घराच्या एका कोपऱ्यातून व्यवसायाची स...

नानासाहेब – शिक्षणाच्या मशालीचा तेजस्वी ज्योत !

इमेज
नानासाहेब–शिक्षणाच्या मशालीचा तेजस्वी ज्योत ! धरणगाव तालुक्यातील बिलखेडा या छोट्याशा गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले देविदास वामन भदाणे हे आज संपूर्ण परिसरात "नानासाहेब" या स्नेहपूर्ण आणि सन्माननीय नावाने ओळखले जातात. हे नाव केवळ एका व्यक्तीचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ते नाव आहे एका प्रेरणादायी जीवनप्रवासाचे, अथक कष्टांचे आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचे. नानासाहेबांचे वडील शेतकरी होते. शेतात राबून ही कधी पोटभर अन्न मिळायचे नाही. गरिबीच्या छायेखाली गेलेले त्यांचे बालपण, आई-वडिलांचे रात्रंदिवसाचे कष्ट आणि अन्नासाठीची धडपड – हेच त्यांच्या शालेय जीवनाचे पहिले धडे ठरले – "शिक्षणाशिवाय पर्याय नाही." धुळे येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती, परंतु नानासाहेबांचे मन मात्र जिद्दी आणि ध्येयवेडे होते. शिक्षक होऊन समाजपरिवर्तन घडवायचे, हेच त्यांचे स्वप्न होते. शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली – कधी पेपर वाटप, कधी किराणा दुकानात काम – परंतु अभ्यासापासून कधीच दूर गेले नाहीत. शिक्षण हेच त्यांच्या जीवनाच...

भाऊसाहेब – एक साधा माणूस, असामान्य जीवनयात्रा

इमेज
भाऊसाहेब – एक साधा माणूस, असामान्य जीवनयात्रा संतोष वेडू वंजारी — एरंडोल नगरपालिकेच्या कार्यालयात एकेकाळी अचूकतेने फाईल हाताळणारे, शांत, सुसंस्कृत आणि समंजस व्यक्तिमत्त्व. पण या शांत चेहऱ्यामागे एक संघर्षांनी भरलेली, प्रेरणादायी जीवनकहाणी दडलेली आहे. अशी कहाणी, जी ऐकणाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणते आणि मनात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करते. त्यांचा जन्म एरंडोल मधील एका सामान्य, कष्टकरी कुटुंबात झाला. वडील दुसऱ्याच्या शेतात राबून घर चालवत होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती, पण माणुसकी आणि प्रामाणिक कष्टांची शिदोरी मात्र भरपूर होती. लहानपणापासूनच संतोषरावांनी गरिबीचा सामना केला. गरिबी ही लज्जास्पद नसली, तरी ती घालवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना बालवयातच जाणवले. शिक्षणाची वाट काही सोपी नव्हती. आर्थिक अडचणी, घरची जबाबदारी आणि स्वतःची स्वप्ने यांचा समतोल राखत त्यांनी डॉक्टर वासुदेव पुरुषोत्तम जोशी यांच्या दवाखान्यात कंपाउंडर म्हणून नोकरी स्वीकारली. दिवसा रुग्णसेवा आणि रात्री अभ्यास, असा कठोर आणि शिस्तबद्ध जीवनक्रम त्यांनी स्वीकारला. हे केवळ त्यांच्या वैयक्ति...

शालिग्राम अर्जुन गायकवाड : समाजासाठी समर्पित एक हृदयस्पर्शी प्रवास

इमेज
शालिग्राम अर्जुन गायकवाड : समाजासाठी समर्पित एक हृदयस्पर्शी प्रवास एरंडोल (जि. जळगाव) येथील एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शालिग्राम अर्जुन गायकवाड हे नाव आज एरंडोल तालुक्यात आदराने घेतले जाते. त्यांचे वडील न्यायालयात नोकरी करत होते. घरची परिस्थिती तशी सामान्य, पण प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी आणि माणुसकीची जाण याचा वारसा त्यांना लाभलेला होता. बालपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांचे कष्ट पाहिले होते. त्यामुळेच त्यांच्या मनात एक गोष्ट ठामपणे रुजली होती—"घराची प्रगती आणि समाजात काही तरी करून दाखवायचं असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही." ही जाणीव त्यांनी मनाशी घट्ट धरली आणि शिक्षणाच्या वाटेवर न थांबता वाटचाल केली. शिक्षणा सोबतच त्यांना सामाजिक कार्याची ही प्रचंड आवड होती. शालेय जीवनात असतानाच ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेत. त्यांच्या आजूबाजूला नेहमी मित्रांचा मोठा गोतावळा असे, कारण ते प्रत्येकाच्या अडचणीत खंबीरपणे साथ देणारे होते. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ ३०व्या वर्षी ते एरंडोल नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ही निवड...

शून्यातून विश्व निर्माण करणारे ‘अण्णा’ – एका थोर शिक्षकाची जीवनगाथा

इमेज
शून्यातून विश्व निर्माण करणारे ‘अण्णा’ – एका थोर शिक्षकाची जीवनगाथा धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द या लहानशा गावात एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म झाला एका असामान्य व्यक्तीचा – दयाराम सिताराम पाटील फुलमाळी यांचा, ज्यांना आज सर्वजण प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून ओळखतात. त्यांच्या वडिलांचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त सालदारकी होते. घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची होती, पण या प्रतिकूल परिस्थितीत ही अण्णांनी आपले जीवन घडवले. इतरांसाठी बालपण म्हणजे खेळ, मस्ती, आणि निरागस हसू असते. मात्र अण्णांसाठी बालपण होते कठोर वास्तवाचे दर्शन आणि कष्टमय वाटचाल. लहान वयातच त्यांनी घरातल्या गरिबीचे, आई-वडिलांच्या कष्टांचे गांभीर्य ओळखले. आणि तेव्हाच मनोमन ठरवले – “आपले आयुष्य बदलायचे असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे.” शिक्षणासाठी कोणती ही मदत नसताना त्यांनी स्वतःच्या कष्टावर आणि चिकाटीवर विश्वास ठेवला. मिळेल ते काम करून, उन्हातान्हात कष्ट सहन करत त्यांनी शिक्षणाची वाट चालू ठेवली. शिक्षण ही त्यांच्यासाठी केवळ पदवी नव्हती, तर ती होती स्वतःच्या आयुष्याला आकार देणारी ऊर्जा. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यां...

रुक्माई लॉन्स अ‍ॅन्ड मंगल कार्यालय – मेहनतीची सावली, माणुसकीचा सुगंध

इमेज
रुक्माई लॉन्स अ‍ॅन्ड मंगल कार्यालय – मेहनतीची सावली, माणुसकीचा सुगंध पिंप्री (ता. धरणगाव) या छोट्याशा खेड्यात चंदन सुरेश बडगुजर ऊर्फ चंदनभाऊ या कष्टाळू, दिलदार आणि माणुसकी जपणाऱ्या तरुणाचा जन्म झाला. मातीशी नातं जपणाऱ्या, प्रेमळ वातावरणात वाढलेल्या चंदनभाऊंचं बालपण मध्यमवर्गीय पण माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या घरात गेलं. लहानपणीच त्यांना आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग अनुभवता आले. वडील सुरेश बडगुजर हॉटेल व टेन्ट हाऊस व्यवसाय करत, आर्थिकदृष्ट्या ते सर्वसामान्य होते, तरी घरात प्रेम, आपुलकी आणि सन्मानाचा वारसा भरपूर होता. बालवयापासूनच चंदनभाऊ वडिलांना टेन्ट उभारताना, मांडव लावताना, खुर्च्या मांडताना मदत करत. उन्हातान्हात काम करणाऱ्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत चमक असायची. त्याच चमकेत त्यांनी स्वतःचं भविष्य पाहिलं. त्यांना लहानपणीच मनोमन ठरवलं – "हेच काम पुढे न्यायचं, पण नव्या रूपात, अधिक आधुनिकतेने आणि उंचीवर!" वडिलांचा आदर्श समोर ठेवत त्यांनी व्यवसायाकडे ओढ घेतली. सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला, परंतु मन मात्र आपल्या वडिलांच्या...

ग्रंथालयाची अलौकिक भेट — वाकटुकी शाळेचा सन्मान

इमेज
ग्रंथालयाची अलौकिक भेट — वाकटुकी शाळेचा सन्मान दि. १ मे २०२५ — महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा उत्सव साजरा करताना, जिल्हा परिषद शाळा वाकटुकी (ता. धरणगाव) या ज्ञानमंदिरात एक अविस्मरणीय क्षण अनुभवास आला. हा प्रसंग विद्यार्थ्यांच्या जीवनात नव्या आशा, प्रेरणा आणि ज्ञानाचा प्रकाश घेऊन आला. या दिवशी झालेल्या समारंभात श्रीमती निर्मलाताई श्रीकृष्णराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या क्षणी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनांनी भारावून गेला. मात्र, या उत्सवात खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारा क्षण म्हणजे, कै. वा. श्रीकृष्णराव माधवराव पाटील यांच्या २१व्या पुण्यस्मरणानिमित्त निर्मलाताईंनी शाळेला ग्रंथालयासाठी ७३४ पुस्तके आणि एक सुसज्ज कपाट प्रदान केले. ही भेट केवळ पुस्तके नव्हती, तर ज्ञानाच्या अमर स्रोताचीच होती. प्रत्येक पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा उजळ मार्ग दाखवणारा दीप. निर्मलाताईंचे हे योगदान शिक्षण क्षेत्रात एक आदर्श दानशूरतेचा प्रकाशस्तंभ ठरला आहे. या शिवाय, इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी ₹१००० चे बक्षीस देण्याची परंपरा ही त्...

"माणुसकीचं मूर्तिमंत रूप — भगवान भाऊ महाजन"

इमेज
"माणुसकीचं मूर्तिमंत रूप — भगवान भाऊ महाजन" काही माणसं अशी असतात, जी केवळ त्यांच्या अस्तित्वानेच जग बदलण्याची ताकद बाळगतात. त्यांचं आयुष्य म्हणजे सततची झुंज, अटळ ध्यास आणि माणुसकीचा अखंड मंत्र. भगवान भाऊ महाजन हे असंच एक तेजस्वी नाव — ज्या नावाचा उच्चार झाला की डोळ्यांसमोर उभा राहतो एक हसतमुख चेहरा, समाजासाठी स्वत:ला झोकून देणारा आत्मा आणि माणसांसाठी झुरणाऱ्या हृदयाचा ठाव. भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण तेज आहे. ते बोलले की लोक मनापासून ऐकतात; ते चालले की अनेक पावलं त्यांच्या मागे चालू लागतात; आणि जेव्हा ते कोणाच्या डोळ्यातील अश्रू पाहतात, तेव्हा त्या अश्रूंना थांबवण्यासाठी स्वत:ला ही विसरून जातात. भगवान भाऊंनी कधी ही प्रसिद्धीची हाव धरली नाही, पण त्यांच्या कार्यामुळेच त्यांचं नाव अमर झालं. गरजूंना अन्न, विद्यार्थ्यांना शिक्षण, युवकांना रोजगार, वृद्धांना आधार आणि संकटसमयी प्रत्येकासाठी मदतीचा हात — हाच त्यांच्या आयुष्याचा मूलमंत्र. भगवान भाऊ हे केवळ एक नाव नाही, तर एका विचाराची सजीव मूर्ती आहे. त्यांनी नेहमीच सांगितलं — "समाज बदलायचा असेल, तर सुरुवात स्व...

साधेपणातून घडलेली असामान्य व्यक्तीमत्व – प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी (नाना कुलकर्णी)

इमेज
साधेपणातून घडलेली असामान्य व्यक्तीमत्व – प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी (नाना कुलकर्णी) सामान्य माणसाचं आयुष्यही असामान्य कसं असू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर कृष्णाजी कुलकर्णी यांचं जीवन. शहादा तालुक्यातील वैजाली या छोट्याशा गावात एका अत्यंत साध्या, कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील शेतीसह भिक्षुकी करून संसार चालवत होते. घरात आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. भाजीऐवजी लोणचं, दिव्याऐवजी कंदील, आणि खेळण्यांच्या जागी मातीची खेळणी – अशा परिस्थितीतच त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांनी आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले. घरात दोन वेळेचं जेवण मिळणंही कठीण होतं. पण एक गोष्ट त्यांनी मनाशी घट्ट ठरवली – "शिक्षणाशिवाय प्रगती नाही!" त्यामुळे घरच्या कामांमध्ये मदत करत, स्वतः मेहनत करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. शाळेची फी, वह्या-पुस्तकं, गणवेश – सगळं त्यांनी स्वतःच्या कष्टातून मिळवलं. घरात कोणीही नोकरीत नव्हतं, पण त्यांनी पंचायत समिती एरंडोल येथे इ. स. न. 1977 मध्ये रोजंदारी वर नोकरीची सुरूवात केली, ही नोकरी त्यांच्यासाठी केवळ उदरनिर्वाहाचं साधन नव्हती, त...

शांत,संयमी व दिलदार व्यक्तिमत्त्व- माजी नगराध्यक्ष श्री. रविंद्रअण्णा महाजन

इमेज
शांत,संयमी व दिलदार व्यक्तिमत्त्व- माजी नगराध्यक्ष श्री. रविंद्रअण्णा महाजन एरंडोल नगरीत "नेतृत्व" या शब्दाचा उच्चार झाला की, मनात अनेक नावं तरळून जातात. परंतु त्यामध्ये एक नाव अत्यंत आदराने व आपुलकीने आठवले जाते — ते म्हणजे माजी नगराध्यक्ष श्री.रविंद्रअण्णा महाजन. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जितकी सौम्यता व संयमता आहे, तितकाच ठामपणा, प्रगल्भता आणि नेतृत्वाचा भक्कम पाया आहे. अण्णांचा वाढदिवस ही केवळ एक तारीख नसून, एरंडोल मधील असंख्य लोकांसाठी तो कृतज्ञतेचा, ऋणानुबंधांची आठवण करून देणारा आणि माणुसकीच्या नात्यांची जपणूक करणारा एक भावनिक दिवस आहे. त्यांनी केवळ नगराध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही, तर एरंडोलच्या प्रत्येक गल्लीत आणि मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. खरे नेतृत्व हे पदावरून नव्हे, तर कृतीतून आणि आचार-विचारातून साकार होते. अण्णांच्या कार्यकाळात एरंडोलने केवळ भौतिक विकास नव्हे, तर स्थैर्य, विश्वास आणि सामाजिक सलोखा ही अनुभवला. त्यांचे प्रत्येक निर्णय अभ्यासू वृत्तीचे, सहकार्यशील दृष्टीकोनाचे आणि दूरदृष्टीने परिपूर्ण असतात. त्यांनी राजकारण...