पोस्ट्स

धरणगाव तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

इमेज
धरणगाव तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न धरणगाव येथे क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे.  जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय , जळगाव. पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा अंतगर्त कॅरम स्पर्धा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व खेळाचे नियमांबाबत मार्गदर्शन तालुका क्रिडा समन्वयक श्री एस एल सूर्यवंशी सरांनी केले.  या स्पर्धेचे उद्घाटक  शाळेचे पर्यवेक्षक श्री एम बी मोरे सर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री राजेंद्र सैंदाणे शिक्षण विस्तार अधिकारी धरणगाव यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले स्पर्धेचे पंच म्हणून साळवे इंग्रजी विद्यालयाचे क्रिडाशिक्षक श्री विनायक कायंदे सर, श्री जितेंद्र ओस्तवाल पण बारी सर  श्री डी एच कोळी सर व ज्ञानेश्वर घुले सर फिलीप गावीत सर यांनी काम पाहिले .  स्पर्धा यशविस्तेसाठी  शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे क...

एरंडोलचा अभिमान – अँड. ओमभाऊ त्रिवेदी

इमेज
एरंडोलचा अभिमान – अँड. ओमभाऊ त्रिवेदी एरंडोलच्या मातीतील गंधात, गावाच्या गल्लीच्या शांततेत आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याच्या मागे मेहनत, जिद्द आणि नशिब यांचा संगम दिसतो. अशाच एका व्यक्तिमत्वाने स्वतःचं एक स्वतंत्र विश्व तयार केलं आहे अँड. ओमभाऊ त्रिवेदी. त्यांच्या जीवनाची प्रत्येक पायरी प्रेरणेची गोष्ट सांगते, आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची छटा प्रत्येकाच्या हृदयात खोलवर रुजते. भाऊ त्रिवेदी हे केवळ पदवी किंवा पदांच्या नावामुळे नव्हे, तर त्यांच्या कर्मयोग, संयम आणि दिलदार स्वभावामुळे ओळखले जातात. एरंडोलच्या प्रत्येक माणसासाठी ते फक्त मार्गदर्शक नाहीत; ते एक विश्वासाचं नाव आहेत. जेव्हा भाऊ कुणाच्या आयुष्यात येतात, तेव्हा फक्त मदत मिळत नाही, तर आत्मविश्वास, ऊर्जा आणि निस्वार्थ प्रेमाची अनुभूती होते. त्यांचे हसरे डोळे, शांत आवाज आणि संयमी वर्तन प्रत्येकाला प्रेरणा देतात, प्रत्येकाला त्यांच्या सोबत चालण्याची हिम्मत मिळते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष त्यांनी धैर्याने, हसत-खेळत पार केलं. मेहनत, सातत्य आणि नशिब यांच्या योग्य संगमामुळे आज त्यांचे नाव केवळ एरंडोलमध्येच नाही, तर ...

"मित्र गोड शब्दांचा मुखवटा की कडू सत्याचा आरसा?"

इमेज
"मित्र गोड शब्दांचा मुखवटा की कडू सत्याचा आरसा?" मैत्री… ही फक्त दोन माणसांची ओळख नसते, ती दोन हृदयांची नाळ असते. ती नाळ रक्ताची नसते, पण न तुटणाऱ्या विश्वासाची असते. आपल्याला जीवनात अनेक लोक भेटतात काही हसवतात, काही रडवतात, काही विसरले जातात, आणि काही मनाच्या पायऱ्यांवर कायमचे कोरले जातात. पण या सगळ्यांमध्ये असा प्रश्न कायम राहतो.मित्र कसा हवा? गोड बोलून आपल्या भोवती गोडीचा जाळ विणणारा, की कडू बोलून आपले डोळे उघडणारा? गोड बोलणारा मित्र… त्याची वाणी म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेलं पान. त्याचं बोलणं ऐकलं की मनाला हलकं वाटतं, चेहऱ्यावर हसू येतं. पण काही वेळा हीच गोडी मनाला फसवत असते. तो आपल्या मनात काही वेगळं ठेवून तोंडावर गोड बोलतो, आणि आपण त्या गोडीत हरवून जातो. नंतर लक्षात येतं आपली चूक त्याने कधी दाखवलीच नाही, आपलं नुकसान होत असतानाही तो शांत राहिला, कदाचित गुपचूप काड्या कोरत राहिला. अशा गोडव्याची चव पहिल्यांदा गोड लागते, पण शेवटी तोंडात कडूपणा उरवते. आणि मग येतो कडू बोलणारा मित्र. त्याच्याकडे शब्द गोड नसतात, पण मनात खोटेपणा नसतो. तो आपल्या चुकांवर पांघरूण घालत ...

मनात उतरणारे विष… आणि तुटणारी नाती...!

इमेज
मनात उतरणारे विष… आणि तुटणारी नाती...! कधी कधी आपल्याकडे काही शब्द पोहोचतात, जे साधे वाटतात पण आतून हळूहळू आपल्या नात्यांच्या मुळाशीच कुरतडू लागतात. कोणी आपल्या जवळ येऊन, हळू आवाजात, ‘तुझ्याबद्दल अमुक अमुक बोलत होतं’ असं सांगतं… आणि तो क्षण असतो एका अदृश्य विषाची सुरुवात होण्याचा. हे विष ना डोळ्यांना दिसतं, ना हाताला लागतं, पण ते मनात झिरपायला लागलं की, हळूहळू आपल्याला त्या व्यक्तीबद्दल संशय, कटुता, आणि अंतर निर्माण होतं. खरं म्हणजे ते शब्द कदाचित पूर्ण खोटे असतात, किंवा अर्धवट सत्य असतं, पण ते सांगणाऱ्याचा हेतू एकच दोन मनं वेगळी करणं. विष पसरवणारे लोक कधीच कोणाची निस्वार्थी मैत्री, खरी माया, किंवा घट्ट विश्वास पाहू शकत नाहीत. कारण त्यांना अशा नात्यांचा अनुभवच नसतो. ते आपल्याला गोड बोलून जवळ घेतात, पण आपल्या कानात दुसऱ्याविषयी तेवढंच ‘जखम करणं’ पुरेसं असतं. अशावेळी थांबून स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा  “हा सांगणारा खरंच माझा हितचिंतक आहे का, की माझ्या मनात गुपचूप विष ओतणारा आहे?” कारण जेव्हा आपलं नातं मजबूत असतं, तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला मधे पडण्याची संधीच मिळत नाही. पण...

संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे

इमेज
संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे धरणगाव : संगीताचा जन्म झाला नसता तर गितंही जन्माला आली नसती.या दोन्ही गोष्टी जन्माला आल्या नसत्या तर मानवी जीवन आणि मानवी मन यांना रुक्षता आली असती.मानवी आयुष्य सकारात्मकतेला मुकलं असतं. असे सांगत संगीताची व गीताची शक्तीस्थाने सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी सप्रमाण कथन केली.काल दि.१०.ऑगस्ट२५रोजी श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व स्व.लक्ष्मीकांतजी डेडिया सर शिष्य परिवार आयोजित ,स्व.मास्टरजी लक्ष्मीकांतजी डेडिया स्मृती स्वरांजली तृतीय संगीत महोत्सवाचे उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की,वर्तमान काळ हा धकाधकीचा व मोठा स्पर्धेचा असल्यामुळे मनाला सक्षमता आणि सामर्थ्य मिळावे यासाठी संगीत आवश्यक आहे.अनेक आजार त्यातल्या त्यात मानसिक आजारावर संगीत हा यथोचित उपाय आहे.असे सांगत लय, ताल,आरोह अवरोह,नजाकत, यावर भाष्य करीत काही संगीत रागांच्या उदाहरणासह  दोन गीतांच्या सादरीकरणातुन मानवी मनावर होणाऱ्या संस्काराकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. याप्रसंगी व्यासपीठावर  कार्यक्रमा...

आदर्श गावासाठी आदर्श नागरिकाची गरज....!

इमेज
आदर्श गावासाठी आदर्श नागरिकाची गरज....! गावाचं सौंदर्य फक्त हिरवीगार शेतं, मंदिरांची शिखरं, किंवा नद्या-ओढ्यांमध्ये नसतं. गावाचं खरं सौंदर्य तिथल्या लोकांच्या वागण्या-बोलण्यात, परस्पर सहकार्याच्या भावनेत आणि जबाबदारीच्या जाणिवेत असतं. आपण नेहमी बोलतो “सरपंच असा असावा, तसा असावा.” पण कधी स्वतःला विचारलंय का “नागरिक कसा असावा?” कारण गावाचा खरा चेहरा हा नागरिकांच्या हाताने घडतो किंवा बिघडतो. आज अनेक गावांत चित्र असं आहे की रस्त्यावर गुरं-ढोरं, शेळ्या बांधलेल्या असतात. खतासाठी खड्डे खोदून त्यात खत टाकलं जातं. घरातील सांडपाणी सरळ रस्त्यावर सोडलं जातं. मुख्य रस्त्यांवर किंवा गल्लीबोळात चारचाकी गाड्या उभ्या करून लोकांच्या ये-जा करण्याला अडथळा निर्माण केला जातो. काही जण मोटरसायकल एवढ्या सुसाट चालवतात की लहान-मोठ्या अपघाताची वेळ येते. हे सर्व केवळ गैरसोय निर्माण करत नाही, तर गावाच्या प्रतिमेला ही डाग लावते. सरपंच निधी आणून देवळं बांधू शकतो, शाळा दुरुस्त करू शकतो, सभा घेऊ शकतो. पण तुमच्या अंगणातील स्वच्छता, तुमच्या घरातून बाहेर पडणारं सांडपाणी, रस्त्यावरचा कचरा हे कुणी तुमच्यासाठी ह...

सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!...

इमेज
सत्यशोधक विवाह ही काळाची गरज!...              भारत हा मूळ सिंधू अर्थात कृषीसंस्कृती असलेला देश. या देशामध्ये स्त्री सत्ताक,मातृसत्ताक तसेच गणव्यवस्था होती. या देशात निऋत्ती नावाची गणमाता होती. आपली मूळ संस्कृती कृषी संस्कृती होय. आर्यांनी या देशातील मूळ क्षेत्रीय लोकांवर हल्ले करून, आपापसात भांडणे लावून, अनेक षडयंत्र करून येथील संस्कृती बुडविली.            सिंधू संस्कृतीत उत्तम पद्धतीची विवाहसंस्था होती. स्त्री हीच कुटुंबाची प्रमुख होती. कालांतराने आर्यांनी काल्पनिक ग्रंथांची निर्मिती रचून येथील विज्ञानवादी कृषी संस्कृती नष्ट केली. ही महान कृषी संस्कृती पुनर्जीवित व्हावी यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी कृषी संस्कृतीच्या पूर्वजांच्या इतिहासाचा पुन्हा विज्ञानवादी, विवेकवादी , समताधिष्ठित समाज रचना उभे करण्याचे महत्त्वपूर्ण सत्कार्य केले. त्यासाठी त्यांनी शिक्षणावर भर देऊन सत्यशोधक विचाराचा समाज निर्माण केला.            पुरोहितवर्ग बहुजन कष्टकऱ्यांचे पूजापाठ, लग्नविधी यासा...

"दिलदारीचा चेहरा – पापाभाऊ दाभाडे"

इमेज
"दिलदारीचा चेहरा – पापाभाऊ दाभाडे" एरंडोलच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक वेशीपलीकडे ही जे नाव प्रेमाने, आपुलकीने आणि हसतमुखाने घेतलं जातं ते म्हणजे “पापा.” पापाभाऊ दाभाडे… कागदावर त्यांची ओळख माजी बांधकाम सभापती अशी असली तरी, लोकांच्या मनात त्यांची खरी ओळख ही त्याहून कितीतरी मोठी आहे. ती ओळख आहे दिलदार मनाची, उबदार नात्यांची आणि निखळ माणुसकीची. गावात कुठेही “पापा” अशी आरोळी उठली की, ती फक्त एक हाक नसते. ती विश्वासाची, जवळिकीची आणि आपुलकीची साद असते. लहान मुलं खेळाच्या मैदानात असोत किंवा वृद्ध माणसं चौकात गप्पा मारत असोत, ही आरोळी ऐकताच सगळेच थांबतात आणि लेकरांच्या उत्साहाने “हो” म्हणत प्रतिसाद देतात. कारण “पापा” हे नाव म्हणजे एक जिवंत नातं आहे, जे पदापेक्षा खूप मोठं आहे. पापाभाऊंच्या वाट्याला आलेलं पद हे केवळ जबाबदारीचं नव्हतं, तर माणसं जोडण्याचं साधन होतं. त्यांनी रस्ते, भिंती, इमारती उभ्या केल्या, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनांमध्ये पूल बांधले. त्यांच्या बोलण्यात कधी कटुता नव्हती, नजरेत कधी गर्व नव्हता तर प्रत्येकाशी आदराने बोलण्याची ...

बदलत्या आभाळाशी झुंजणारा शेतकरी..!

इमेज
बदलत्या आभाळाशी झुंजणारा शेतकरी..! आभाळाचं मन आता कुणालाही कळेनासं झालं आहे. कधी ते अवेळी रुसतं, कधी अचानक कोसळून सगळं वाहून नेतं, तर कधी पावसाच्या थेंबांची वाट बघत बघत धरतीचा कंठ कोरडा होतो. या सगळ्याचा सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्याला. एकेकाळी ठराविक वेळी येणारा पाऊस, ऋतूनुसार वाहणारे वारे, आणि पिकांच्या वाढीसाठी योग्य ऊब हे सगळं आता अनिश्चित झालं आहे. शेतकरी हा फक्त जमिनीवर पेरणारा नाही, तो आपल्या स्वप्नांची पेरणी करतो. पण आज त्याच्या स्वप्नांच्या उमेदीवर हवामानाची अनिश्चितता जणू सावली बनून बसली आहे. कधी अवकाळी पाऊस त्याच्या पिकांची मुळे उपटून नेतो, तर कधी दुष्काळाने पिकं वाळवून टाकतात. चक्रीवादळ, गारपीट, दुष्काळ, अति पाऊस – या सगळ्या आपत्तींच्या साखळीत तो रोजचा संघर्ष करतो. रात्रभर पिकांवर कीड पडू नये म्हणून शेतात जागणारा शेतकरी, हवामान खात्याच्या बातम्यांवर डोळे लावून बसतो. पावसाचं आगमन ठराविक वेळी होईल की नाही, हीच त्याची मोठी चिंता असते. त्याच्या घामाच्या थेंबांनी ओलावलेल्या मातीत, हवामानाचा एक चुकीचा खेळ त्याचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त करू शकतो. कर्जाचा डोंगर, घरची जबा...

पडद्याच्या जाळ्यात अडकलेलं निरागस बालपण...!

इमेज
पडद्याच्या जाळ्यात अडकलेलं निरागस बालपण...! बालपण… जिथं वेळ मोजला जायचा चेंडूच्या उड्यांमध्ये, काचांच्या गोळ्यांच्या खेळांमध्ये, झाडावरच्या पाखरांच्या किलबिलाटात, आणि मातीच्या गंधात. शाळा सुटली की गल्लीतल्या कोपऱ्यावर सगळ्यांचा थवा जमायचा, एकमेकांचे हसरे चेहरे आणि मोकळे आकाश एवढंच पुरेसं होतं आनंदासाठी. पण आजचं बालपण… अंगणात पाळणा आहे, पण त्यावर मुलं झुलत नाहीत. गल्लीत क्रिकेटचा आवाज नाही, गोष्टी सांगणारे आजीआजोबा नाहीत, आणि झाडाच्या सावलीत उन्हाळा घालवणारी मुलंही नाहीत. त्यांच्या हातात आहे मोबाईल छोट्याशा पडद्यावरचं एक बनावट जग, जे हळूहळू त्यांचा खरा आनंद हिसकावून घेतंय. कधीकाळी संध्याकाळी घराघरांतून “जेवायला या” अशा हाका यायच्या, आणि तरीही मुलं खेळात रंगून त्या हाका ऐकायच्या उशीराने. आज संध्याकाळी मात्र शांतता असते. प्रत्येक घरात, प्रत्येक खोलीत, एक चमकता पडदा आणि त्यावर एकाकी नजर. मोबाईलच्या आभासी दुनियेनं मुलांना खेळातून, निसर्गातून, आणि नात्यांतून दूर केलंय. पावसाळ्यातल्या चिखलात भिजण्याचा आनंद, उन्हाळ्यातल्या आंब्याचा गोडवा, किंवा शाळेच्या पायऱ्यांवर झालेल्या छोट्या-...

अंजनी प्रकल्पाच्या पूर्णतेत गावकऱ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी उधाण..!

इमेज
अंजनी प्रकल्पाच्या पूर्णतेत गावकऱ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी उधाण..! अंजनी प्रकल्प… पंचवीस वर्षांपासून अर्धवट अवस्थेत उभा असलेला हा प्रकल्प जणू एरंडोल आणि धरणगाव तालुक्याच्या जनतेच्या मनातील एक अपूर्ण स्वप्नच होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत हिरव्या शिवाराची आस होती, गावोगावी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत होती, आणि पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर जावे लागत होते. पण आता, या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आशेचा किरण पुन्हा दिसू लागला आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री. डी.एल. कपूर, सचिव श्री. बेलसरे, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. बोरकर, अधीक्षक अभियंता श्री. गोकुळ महाजन, तसेच जळगाव व एरंडोलचे मा. आ. महेंद्रसिंह बापू पाटील उपस्थित होते. या बैठकीत माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी अंजनी धरणाच्या पाण्याच्या उपलब्धतेअभावी रद्द झालेल्या वाढीव (दुसरा टप्पा) प्रकल्पाचा मुद्दा ठामपणे मांडला. नार–पार त...

गावात 'तंटामुक्ती' की 'तंटावाढ' ?

इमेज
गावात 'तंटामुक्ती' की 'तंटावाढ' ?  गाव म्हणजे माणसांचा जीव असतो. कुणाच्या घरात सण असो की दुःख, शेजाऱ्याच्या ओसरीवर हाक मारली की मदतीचा हात पुढं येत असे. गाव म्हणजे नात्यांचं झाड. कोणी कुणाचं नसलं तरी सगळे एकमेकांचे असायचे. पण हल्ली गाव बदललंय… माती तीच आहे, रस्ते ही काहीसे पक्के झालेत, पण माणसांचं मन मात्र फुटकं झालंय. एकेकाळी गावात कुठे ही वाद झाला, तर वडीलधारी लोक चावडीवर बोलावायचे, एकत्र बसायचे, चहा-साखरेच्या घोटांतून समजुतीचा सूर उमटायचा. कुणी झुकायचं, कुणी समजून घ्यायचं, आणि भांडण मिटायचं. तंटामुक्त गाव म्हणजे त्यावेळी फक्त संकल्पना नव्हती, तर जिवंत आचारधर्म होता. पण आज… गावातल्या शाळेच्या भिंतीवर 'तंटामुक्ती समिती' असते, आणि गावाच्या गल्ल्यांमध्ये वाढती तंटावाढ दिसते. वाद हे आता नुसते व्यक्तिगत नसतात. त्यात पक्ष, जाती, भावकी, आणि राजकारण यांचा कडवट मिसळ झालेला असतो. वाद मिटवणाऱ्यांच्या मागे झेंडे असतात, आणि वाद लावणाऱ्यांच्या मागे टोळ्या असतात. एकाच बोअरिंग वरून दोन शेजाऱ्यांत तणाव निर्माण होतो, पाणी नकोसं होतं पण भांडण ओसंडून वाहतं. एकाच शाळेत...

गाव तेथे राष्ट्रवादी' अभियानात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग...!

इमेज
गाव तेथे राष्ट्रवादी' अभियानात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग...! धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या "गाव तेथे राष्ट्रवादी" या अभियानाने साळवा-साकरे जि.प. गटात चांगलाच जनसंपर्क साधत जनतेच्या मनात पक्षाचा विचार खोलवर रूजवला. एक गाव, एक विचार, आणि एक ध्येय शरदचंद्र पवार साहेबांचे समाजोन्मुख आणि लोकहितवादी विचार गावोगाव पोहोचवण्याचा या अभियानाचा मुख्य हेतू होता. ही केवळ राजकीय चळवळ नव्हती, ही होती एक विचारांची यात्रा. या यात्रेची सुरुवात झाली ती समतेचे प्रतीक असलेल्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाने आणि छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादनाने. ही सुरुवातच जणू या अभियानाच्या मूल्यांचा आरंभ ठरली. अभियान अंतर्गत बांभोरी, भवरखेडे, बोरगाव, जांभोरा, सारवे, बाभळे, धानोरा, गारखेडा, भोणे, रोटवद, नांदेड, साळवा, निशाणे, पिंपळे अशा गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुने जाणते, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत, त्यांचे अनुभव ...

दिलदार मनाची उबदार छाया समीरजी भाटीया...!

इमेज
दिलदार मनाची उबदार छाया समीरजी भाटीया...! काही माणसं आपल्या आयुष्यात अशी येतात की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, बोलण्यातली ऊब आणि स्वभावातली दिलदारी मनाला भिडते. समीरजी भाटीया हे असंच एक असामान्य व्यक्तिमत्त्व. नेहमी प्रसन्न चेहरा, बोलण्यात सहजता, आणि प्रत्येकाशी हृदयातून जोडलेलं नातं हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खास वैशिष्ट्य. समीरजींच्या चेहऱ्यावरचं हसू हे खोटं कधीच वाटत नाही. त्यांचं हास्य म्हणजे जगण्याची एक सकारात्मक प्रेरणा. कितीही कठीण परिस्थिती असो, ते जेव्हा समोर येतात, तेव्हा क्षणभर सगळं हलकं वाटतं. त्यांच्या नजरेत असतो तो विश्वास की सगळं ठीक होईल, आणि त्यांच्या शब्दांत असतो तो आश्वासक सूर की "आपण एकत्र आहोत." मैत्री म्हणजे नेहमी सोबत असणं नाही, तर गरजेच्या क्षणी न बोलताही समजून घेणं असतं आणि समीरजींच्या बाबतीत हे अगदी खरं ठरतं. किती तरी लोकांच्या आयुष्यात ते एक विश्वासार्ह आधार बनले आहेत. त्यांच्या दिलदार स्वभावामुळे किती जणांनी आयुष्यात पुन्हा हसणं शिकलं, पुन्हा उभं राहण्याची हिंमत केली. ते केवळ मित्र नसतात, तर एक कुटुंबासारखी ऊब देणारी सावली बनून राहता...

मिठाचा खडा… आणि मोडलेली नाती.....!

इमेज
मिठाचा खडा… आणि मोडलेली नाती.....! गाव म्हणजे माणुसकीचा गंध दरवळणारे एक गूढ पुस्तक असते. त्याच्या प्रत्येक पानावर एखादे हळवे हसू उमटलेले असते, तर कोपऱ्यात कुठे तरी एक दडपलेले अश्रू सांडलेले असतात. प्रत्येक वाक्यामागे एखादी हकिगत दडलेली असते, आणि एखाद्याच्या निःशब्दतेच्या आड एक असह्य आक्रोश दडलेला असतो. असाच एक मुलगा असतो गावात साधा, सरळ, मेहनती आणि नम्र. त्याच्या चेहऱ्यावर निरागसतेचा गोडवा असतो, वागण्यात सौजन्य असते. त्याच्या स्वभावात कुठे ही बडेजावपणा नसतो. पण काळ जसजसा पुढे जातो, तसतसे त्याचे वय चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. आणि मग गावकऱ्यांच्या चर्चेत एक नेहमीचा प्रश्न ऐकू येतो.“काय रे, अजून तुझं लग्न झालं नाही का?” गावातले काही लोक सहजपणे बोलून जातात.“काही तरी कारण असेलच… नाहीतर आता पर्यंत जमलं असतं त्याचं!” पण हे "काही तरी" कुठून येतं?ते येतं काही मोजक्या लोकांच्या कटु, विषारी आणि हेतुपूरस्सकर बोलण्यांतून. प्रत्येक गावात असतोच ना एक मिठाचा खडा… जो दुसऱ्याचं चांगलं पाहू शकत नाही.आणि त्याच्याच सोबतीला असते एखादी स्त्री  जी नात्यांच्या नावावर, आणि समाजाच्य...