पोस्ट्स

ज्ञानेश्वरजी आमले : लोकांची निःस्वार्थ साथ

इमेज
ज्ञानेश्वरजी आमले : लोकांची निःस्वार्थ साथ जवखेडेसिम या छोट्याशा गावात जन्मलेल्या ज्ञानेश्वरजी आमले यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांचं शिक्षण केवळ बी.ए.पर्यंतच मर्यादित राहिलं. मात्र, मनात काही तरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द कायम होती. सन १९९५ मध्ये त्यांनी एरंडोल येथे स्टॅम्प व्हेंडर आणि बॉण्ड रायटर म्हणून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करत लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची ओळख एक प्रामाणिक आणि माणसं जोडणारा उद्योजक म्हणून निर्माण झाली. त्यांना राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा मार्ग वाटला नाही, तर समाजाच्या विकासासाठीची एक संधी आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. त्यांचं नेतृत्व राजकीय पातळीपुरतं मर्यादित न राहता, थेट लोकांच्या हृदयात स्थान मिळवून गेलं. म्हणूनच आज त्यांना आदरपूर्वक "नानासाहेब" म्हणून ओळखलं जातं. सन २००१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणतं पद होतं, ना सत्तेची हाव. होती ती फक्त जनतेसाठी काहीतरी भरीव काम करण्या...

"डॉ. चंद्रकांत पाटील – एक माणूस, एक प्रेरणा"

इमेज
"डॉ. चंद्रकांत पाटील – एक माणूस, एक प्रेरणा" काही व्यक्ती आपल्या जीवनात अशा येतात की त्या आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहतात. त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो, वागण्यात माणुसकी असते आणि त्यांच्या अस्तित्वातून एक आत्मिक उब सतत अनुभवायला मिळते. अशी माणसं फारच कमी असतात जिथे शब्द कमी आणि कृती मोठी असते. अशाच माणसांपैकी एक म्हणजे ताडे गावाचे लाडके सुपुत्र, दिलदार मनाचे मालक, आदरणीय डॉ. चंद्रकांतजी पाटील. "डॉक्टर" हा शब्द जिथे जीवनदायी ठरतो, तिथे डॉ. चंद्रकांतजींच्या व्यक्तिमत्त्वामुळे हाच शब्द एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो. कारण ते केवळ शरीराचे उपचार करणारे डॉक्टर नाहीत, तर मनाच्या जखमांवर हळुवार फुंकर घालणारे आणि समाजासाठी आधारस्तंभ ठरणारे एक जिवंत श्रद्धास्थान आहेत. कोणाचेही दु:ख पाहिले की त्यांना ते स्वतःचे वाटते, आणि कोणाच्या डोळ्यांत पाणी दिसले की त्यांच्या हृदयाच्या गाभ्यात एक वेदनेची लहर उठते. आजच्या या यांत्रिक आणि धकाधकीच्या जगात जिथे माणूस माणसाशी बोलणं विसरतो आहे, तिथे डॉ. चंद्रकांतजींचं प्रेमळ हास्य, त्यांचे सुसंवाद, आणि त्यांच्या डोळ्यांतील आत्मियता...

लोकनायक वासुदेव पाटील : निष्ठेचा दीपस्तंभ

इमेज
लोकनायक वासुदेव पाटील : निष्ठेचा दीपस्तंभ गावाकडच्या मातीला एक वेगळीच ओल असते. या मातीतून उगम पावलेली काही माणसं अशी असतात, ज्यांचं संपूर्ण जीवनच प्रेरणादायी ठरतं. अशाच मातीतील एरंडोल तालुक्यातल्या जवखेडेसिम या छोट्याशा गावात जन्मले एक थोर व्यक्तिमत्त्व–वासुदेव सुभाष पाटील. त्यांचं बालपण संघर्षमय होतं. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या वासुदेवजींनी अवघ्या सोळाव्या वर्षीच पक्षाचा भगवा हातात घेतला. जेव्हा इतर मुलं खेळण्यात रमलेली असायची, तेव्हा वासुदेवजींनी लोकसेवेचा मार्ग स्वीकारला. बालशिवसैनिक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ‘लोकनायक’ या सन्मानापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास केवळ राजकीय नाही, तर सामाजिक, भावनिक आणि निष्ठेचा आहे. शिवसेनेच्या कार्यात त्यांनी नेहमीच आघाडी घेतली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जीव ओतून प्रचार केला, मतांचं अचूक गणित लावलं आणि विजय मिळवून दिला. त्यांच्या उपस्थितीचा प्रचारात विशेष प्रभाव असायचा जणू काही विजयाची हमीच! प्रत्येक प्रचारात त्यांनी पक्षाची विचारधारा, बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वं आणि जनतेसाठीची निःस्वार्थ तळमळ लोकांपर्यंत पोहोचवली. वासुदेव...

विलास मोरे : मातीपासून मनापर्यंतचा शब्दप्रवास"

इमेज
" विलास मोरे : मातीपासून मनापर्यंतचा शब्दप्रवास" एरंडोल – ज्या मातीने त्यांना जन्म दिला, त्याच मातीच्या लेकरांसाठी त्यांनी लिहिलेलं कवितेचं छोटंसं स्वप्न आज संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलीच्या अभ्यासक्रमाचा भाग ठरलं आहे. एरंडोलचे सुपुत्र व सर्जनशील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची "चांदोबाचं घर" ही बालकविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) यांच्या इयत्ता पहिलीच्या मराठी अभ्यासक्रमात, शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून समाविष्ट करण्यात आली आहे. ही केवळ एक कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याची बातमी नाही, तर ती त्यांच्या निर्मळ लेखणीस मिळालेली मान्यता आहे. ही मान्यता त्यांच्या मनातील निरागसतेला आणि बालविश्वाशी असलेल्या हृदयस्पर्शी नात्याला लाभलेली आहे. विलास मोरे यांचा साहित्यिक प्रवास हा केवळ शब्दांचा नव्हता, तो एक भावनांचा झरा होता. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीत मातीचा गंध आणि माणुसकीची उब जाणवते. त्यांच्या "पांढरे हत्ती काळे दात" या बहुचर्चित कादंबरीस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा...

"चिखलओहोळचा सुपुत्र देशसेवेपासून जनसेवेकडे"

इमेज
"चिखलओहोळचा सुपुत्र देशसेवेपासून जनसेवेकडे" चिखलओहोळ हे गाव आकाराने लहान असले, तरी त्याच्या मातीतील देशप्रेमाची उब मात्र फार मोठी आहे. या पवित्र भूमीने अनेक कष्टकरी घडवले, पण काही थोर सुपुत्रांनी आपल्या कार्यातून या गावाचा माथा अभिमानाने उंच केला. अशाच दोन थोर सुपुत्रांची नावे अत्यंत सन्मानाने घ्यावी लागतील. आदरणीय श्री बी. के. चव्हाण (सेवानिवृत्त सुभेदार) आणि त्यांचे बंधू श्री राजेंद्र चव्हाण (सेवानिवृत्त हवालदार) साहेब. या दोघा भावांनी तब्बल बावीस वर्षे भारतीय सैन्यदलात सेवा बजावून भारतमातेच्या रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले. सीमारेषेवर सजगपणे उभे राहणे, शत्रूच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणे, आणि देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज राहणे. ही त्यांच्यासाठी केवळ एक नोकरी नव्हे, तर ती एक तपस्याच होती. आज ही त्यांच्या खाकी बूटांची आठवण गावकऱ्यांच्या मनात ताजी आहे. त्या पावलांनी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या, आणि गावाचे ही नाव उज्वल केले. मात्र आता एक नवा, तेजस्वी अध्याय सुरू झाला आहे. श्री राजेंद्र चव्हाण साहेबांची नुकतीच मुंबई पोलीस दलात ...

"पोस्टाच्या पलीकडचा माणूस - दादासाहेब सुनीलजी पवार"

इमेज
"पोस्टाच्या पलीकडचा माणूस - दादासाहेब सुनीलजी पवार" शब्दांनी हृदयाला स्पर्श करावा म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्यायचं असेल, तर धरणगावात एक नाव हमखास घेतलं जातं. दादासाहेब सुनीलजी पवार. ते केवळ एक पोस्टमन नाहीत, तर संपूर्ण गावाच्या अंत:करणाचा नाजूक सूर आहेत. दररोज हातात पत्रांची पिशवी घेऊन, कुणाच्या दारात एक बातमी, तर कुणाच्या नशिबात एक आशा घेऊन पोहोचणारे हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कामाइतकेच त्यांच्या स्वभावासाठी ही ओळखले जाते. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे सौंदर्य त्यांच्या मनात आणि त्यांच्या स्वर्गीय आवाजात दडलेले आहे. दादासाहेबांचे स्वभाव विशेष म्हणजे अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्ती. रोजच्या धावपळीच्या जीवनात ही त्यांचे मन कायम भगवंताच्या स्मरणात तल्लीन असते. ते कुठेही असोत, कोणाशीही बोलत असोत, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक सौम्य, समंजस आणि स्थिर भाव असतो. अनेक वेळा ते काहीही न बोलता फक्त नजरेतूनच संवाद साधतात. ही त्यांच्या अंतरात्म्याची साक्ष आहे. त्यांच्या आवाजात एक विलक्षण जादू आहे. अभंग असो, भजन असो, कीर्तन असो त्यांच्या आवाजात हे सारे सजीव होतं. ...

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

इमेज
"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी  यांची प्रेरणादायी वाटचाल"  शेतीची माती, घामाने ओले झालेलं कपाळ आणि डोळ्यांत लपलेलं शिक्षणाचं स्वप्न ही प्रा. डॉ. अनंत लालचंद चौधरी यांची खरी ओळख. चोपडा येथील एका साध्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. अनंत सर आज शिक्षणाच्या क्षेत्रात एक तेजस्वी दीपस्तंभ ठरले आहेत. घरात आर्थिक सुबत्तेपेक्षा मेहनत, शिस्त आणि मूल्यांचा वारसा मोठा होता. वडील शेतीमध्ये राबत आणि आई घरकामासह शेतीची जबाबदारी ही निभावत असे. अशा वातावरणात शिक्षणाला फारसा वाव नव्हता, पण डॉ. अनंत सरांनी लहानपणातच ठरवलं होतं."आपलं आयुष्य बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही." आई-वडिलांच्या कामात मदत करत करतच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अभ्यास, कष्ट आणि चिकाटी या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत त्यांनी जीवनाचा प्रवास सुरू केला. त्यांना लहानपणापासूनच शिक्षक होण्याची प्रबळ इच्छा होती. पुस्तकांची ओढ, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा हे सारे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अगदी कोवळ्या वयातच रुजले ह...

"विनम्रतेतून उभा राहिलेला नेता"

इमेज
"विनम्रतेतून उभा राहिलेला नेता" दिलदार मनाच्या माणसाला शब्दांत बांधणे अत्यंत कठीण आहे. कारण अशा व्यक्तीचे आयुष्य शब्दांपेक्षा मोठे असते, आणि त्यांचे मोल मोजण्यासाठी कोणती ही मोजमापे अपुरे पडतात. श्री. गोपाल (बापूसाहेब) चौधरी हे अशाच निःस्वार्थ, प्रामाणिक आणि आपुलकीने परिपूर्ण नाव आहे... एक असे नाव जे केवळ पदासाठी नाही, तर लोकांच्या मनात, त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात घर करून आहे. त्यांनी राजकारणात पाऊल टाकले तेव्हा वाट सोपी नसल्याचे त्यांना माहीत होते. पण त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न होते.गाव, तालुका आणि जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा, सामान्य माणसाला न्याय मिळावा आणि कोणीही दुर्लक्षित राहू नये. त्या स्वप्नासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. कोणत्या ही तक्रारीविना, कोणत्याही थाटमाटाशिवाय ते लोकांमध्ये मिसळले. एखाद्याच्या दु:खात ते थांबले, एखाद्याच्या आनंदात ते हसले, आणि कुणालाही न सांगता कित्येकांचे अश्रू पुसले. बापूसाहेबांचे व्यक्तिमत्त्व केवळ जिल्हा परिषद सदस्याच्या पदाने मोजता येणार नाही. त्यांचे मन इतके विशाल आहे की त्यात प्रत्येक गरजू, शे...

"माणुसकीच्या वाटेवरील पायवाट"

इमेज
"माणुसकीच्या वाटेवरील पायवाट" धरणगावच्या मातीतून उगम पावलेल्या आणि समाजासाठी निःस्वार्थ झिजणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख जेव्हा होतो, तेव्हा एका नावाचा अत्यंत आपुलकीने आणि आदराने उल्लेख होतो — तो म्हणजे श्री. सुनिल भाऊ चौधरी. चौधरी टेन्ट हाऊसचे यशस्वी उद्योजक, ‘कर्तव्य बहुउद्देशीय संस्था’चे कर्तबगार अध्यक्ष आणि तिळवणतेली समाजाचे मार्गदर्शक नेतृत्व अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत शांत, पण प्रभावी शैलीने पार पाडल्या आहेत. त्यांनी केवळ पद भूषवले नाहीत, तर त्या पदांना आपली प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा साजरा होणारा खास दिवस नसून, समाजहितासाठी समर्पित झालेल्या एका सेवाभावी जीवनाच्या प्रेरणादायी वाटचालीचा सन्मान करण्याची सुवर्णसंधी आहे. धरणगावसारख्या गावात राहून समाजाच्या प्रत्येक थरातील गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणं, अत्यंत संयमी स्वभावाने कार्य करत राहणं, ही त्यांची खरी ओळख आहे. ‘कर्तव्य बहुउद्देशीय संस्था’ ही केवळ एका कागदावरील संस्था नाही, तर ती त्यांच्या अंत:करणातील सामाजिक जाणीवेचं सजीव रूप आहे. समाजातील वंचित, गर...

जितेंद्र अहिरे – विश्वासाचे आणि माणुसकीचे प्रतीक

इमेज
जितेंद्र अहिरे – विश्वासाचे आणि माणुसकीचे प्रतीक सार्वे (ता. धरणगाव) या गावाचे नाव घेताच नजरे समोर उभे राहते एक शांत, संयमी, अभ्यासू आणि विचारशील व्यक्तिमत्त्व – श्री. जितेंद्र अहिरे. पोलीस पाटील म्हणून त्यांच्यावर असलेली जबाबदारी ते केवळ अधिकार म्हणून न पेलता, एक सेवाभाव म्हणून पार पाडतात. कारण जितेंद्र भाऊ हे केवळ पदावरचे व्यक्ती नाहीत, तर एक विचारधारा आहेत, एक आश्वासक सावली आहेत, आणि गावकऱ्यांच्या मनातील खंबीर आधारवड आहेत. त्यांचे बोलणे मृदू, वागणे समंजस आणि प्रत्येक कृती समाजहितासाठी प्रेरित असते. सत्तेचा अहंकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वाट्याला कधीच आला नाही, कारण त्यांच्या जीवनाची पायवाट माणुसकीवर आधारित आहे. त्यांच्या स्वभावात गर्व किंवा आक्रस्ताळेपणा नाही, आहे ती केवळ समाजाप्रती असलेली तळमळ आणि प्रेमळ मन. गावातील वाद मिटवायचे असोत, कोणाचे घरकुल रखडलेले असो, मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायची असो, किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला आधार द्यायचा असो जितेंद्र भाऊ नेहमीच पुढाकार घेतात. कोणी ही अडचणीत असले, तरी त्यांच्या दाराशी गेले की वाट सापडते, आणि मनाला दिलासा मिळतो. त्य...

"दिलदार व्यक्तिमत्त्व – परेश भाऊ बिर्ला"

इमेज
"दिलदार व्यक्तिमत्त्व – परेश भाऊ बिर्ला" आजचा दिवस अत्यंत खास आहे... कारण आज जन्मदिवस आहे अशा व्यक्तिमत्त्वाचा, जो केवळ नावापुरता माणूस नाही, तर हजारो मनांतील एक सजीव प्रेरणा आहे. परेश भाऊ बिर्ला हे नाव उच्चारलं तरी मनात आपुलकी, आदर आणि स्नेह यांचा उगम होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जादू आहे. ती म्हणजे सौम्य वाणी, संयमी वृत्ती आणि अभ्यासपूर्ण विचारसरणी. किती ही कठीण प्रसंग असला, तरी आत्मसंयम आणि नम्रतेचा समतोल न ढळता राखणारे हे व्यक्तिमत्त्व आज अनेकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करून आहे. ते केवळ निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जात नाहीत, तर मा.आमदार अमोलदादा चिमणरावजी पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून कार्यकर्त्यांच्या मनात श्रद्धेचे आणि विश्वासाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या कार्याची दिशा पक्षाशी जरी जोडलेली असली, तरी त्या मागील भावना नेहमीच समाजाभिमुख आणि लोकहितवादी असते. परेश भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा ठसा त्यांच्या कृतीतून उमटतो. त्यांनी कधी ही आपल्या मोठेपणाचा गाजावाजा केला नाही, पण गरज पडल्यावर कुणाच्या मदतीसाठी सदैव पुढे सरसावले. कुणी अडचण...

🌿 गरज संपली की आठवणी ही हरवतात !

इमेज
🌿 गरज संपली की आठवणी ही हरवतात ! "आपली गरज जर कुणाला नसेल, तर त्या व्यक्तीची गरज आपल्याला असण्याची ही उरत नाही"हा सृष्टीचा नियम आहे. एक क्षण डोळे मिटा आणि विचार करा.आयुष्यात कधी अशा वळणावर आलो आहोत का, जेव्हा आपण कोणासाठी तरी अत्यंत महत्त्वाचे होतो, पण आज त्या व्यक्तीसाठी आपलं अस्तित्व असो वा नसो, काहीही फरक पडत नाही? हीच ती कटू पण अटळ वास्तविकता "आपली गरज जर कुणाला नसेल, तर त्या व्यक्तीची गरज कोणालाच राहत नाही." प्रत्येक नात्याची सुरुवात हळुवार असते. आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहोत.त्यांच्या सुखात आनंदी होतो, दुःखात खांदा देतो, अश्रू पुसतो.त्यांच्या यशात टाळ्या वाजवतो, आणि अपयशात आधार देतो.पण एक दिवस असा येतो, जेव्हा त्यांना आपली गरजच उरत नाही. तेव्हा आपोआप जाणवतं हे नातं आपुलकीचं नव्हतं, ही एक सोय होती. गरज असते तेव्हाच प्रेम, काळजी, संवाद आणि जवळीक दिसते.गरज संपली, की सगळं हळूहळू मागे पडतं.संपर्क तुटतो, संवाद थांबतो आणि आपल्या नावाची ही आठवण त्यांच्या मनातून पुसून जाते. ही वेदना शब्दांमध्ये मांडणं कठीण आहे.कारण काही नाती ही ...

लहान सुरुवात करायला कधीही घाबरू नका—मी यशस्वी होणारच

इमेज
लहान सुरुवात करायला कधीही घाबरू नका—मी यशस्वी होणारच सकाळी सूर्योदयाची पहिली किरण जशी हळूहळू झाडांवर उतरते, त्याच प्रमाणे प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही कोमल, शांत आणि जरा साशंक असते. ती कधी थोडीशी संकोचलेली, कधी अनिश्चित, पण तिच्यामागे एक दृढ विश्वास असतो.की ही पावलं आपल्याला कुठे तरी दूर, उंचावर घेऊन जाणार आहेत. कधी कधी वाटतं, आपण इतरां पेक्षा खूप मागे पडलो आहोत. त्यांच्या प्रगतीची गती पाहता, आपली पावलं अत्यंत क्षुल्लक वाटू लागतात. त्यांच्या मोठमोठ्या उंच भराऱ्या समोर आपली छोटीशी उडी नगण्य भासते. पण हे लक्षात ठेवायला हवं, कोणतं ही झाड एका रात्रीत मोठं होत नाही. त्याच्या खोलवर असलेल्या मुळांमध्येच त्याची खरी ताकद असते.जिथं कुणी पाहत नाही, तिथं ते गहिरं वाढत असतं. आणि हाच आधार त्याला एक दिवस आकाशाला गवसणी घालण्यासाठी समर्थ बनवतो. जी माणसं यशस्वी ठरली, त्यांची सुरुवात ही आपल्या सारखीच होती साधी, अज्ञात आणि अनेक वेळा उपेक्षितसुद्धा. त्यांनी मात्र थांबण्या ऐवजी चालत राहण्याचा निर्णय घेतला. दररोज थोडं थोडं शिकत, चुका करत, स्वतःवर विश्वास ठेवत त्यांनी स्वतःची वाट निर्माण क...

“प्रामाणिक पत्रकारितेचा दीपस्तंभ – कडू महाजन यांची प्रेरणादायी जीवनगाथा”

इमेज
“प्रामाणिक पत्रकारितेचा दीपस्तंभ – कडू महाजन यांची प्रेरणादायी जीवनगाथा” आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाचा गौरव करतोय, ज्यांचे आयुष्य केवळ पत्रकारितेपुरते सीमित राहिले नाही, तर त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून ती समाजाशी असलेल्या नात्याची जबाबदारी ही आहे, हे ज्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून सिद्ध केले, असे हे नाव – कडू महाजन. कडू महाजन म्हणजे एक तळमळीचा, प्रामाणिक आणि निर्भिड पत्रकार. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नाही, तर ती एक निष्ठा आणि कर्तव्य आहे, हे त्यांनी सातत्याने दाखवून दिले. त्यांच्या लेखणीतून फक्त बातम्या नव्हे, तर त्या बातम्यांमागील मानवी भावना, वेदना आणि आशा प्रकट होत गेल्या. कुठलाही विषय असो, समाजासाठी तो महत्त्वाचा वाटला की त्यांनी तो अत्यंत संवेदनशीलतेने आणि निर्भयतेने समाजासमोर मांडला. त्यांची पत्रकारिता केवळ वर्तमानपत्रापुरती मर्यादित नाही, तर ती सामाजिक बांधिलकीची प्रचिती देणारी आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रांत त्यांनी असाधारण योगदान ...

शांत,संयमी व्यक्तिमत्त्व : नानासाहेब सूरेश सिताराम चौधरी

इमेज
शांत,संयमी व्यक्तिमत्त्व : नानासाहेब सूरेश सिताराम चौधरी धरणगाव नगरीच्या मातीला प्रतिष्ठेचं वलय प्राप्त करून देणाऱ्या काही व्यक्तींमधील एक अत्यंत आदरणीय, सुसंस्कृत आणि सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. नानासाहेब सूरेश सिताराम चौधरी. त्यांचा चेहरा जितका शांत, तितकंच त्यांचं संपूर्ण अस्तित्व संयमी. कोणता ही प्रसंग असो अडचणींचा काळ असो किंवा आनंदाचा क्षण नानासाहेब नेहमीच स्थिर, संतुलित आणि मितभाषी राहतात. त्यांचे शब्द मोजके असले, तरी त्यामागचं विचारधन आणि माणुसकीचा गहिरा अर्थ प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जातो. धरणगावचे माजी नगराध्यक्ष, यशस्वी उद्योगपती, जी.एस. ग्रुपचे संचालक, श्री जी जिनिंगचे संचालक तसेच गुरूदत्त पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडल्या आहेत. केवळ पद किंवा हुद्दे नव्हे, तर प्रत्येक भूमिकेतून त्यांनी मूल्यांची, शिस्तीची आणि पारदर्शकतेची प्रेरणा दिली आहे. माणूस मोठा तोच, जो स्वतःच्या यशात इतरांचं ही यश पाहतो. नानासाहेब यांचं आयुष्य हे या वाक्याचं मूर्त स्वरूप आहे. समाजात वावरताना त्यांची न...