पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....!

इमेज
हसऱ्या चेहऱ्यांमागचं सत्य....! जीवनात सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे मुखवट्यांमागचे चेहरे ओळखणे. कारण आजच्या धावपळीच्या, स्वार्थी जगात माणसं स्वतःपेक्षा भूमिका जास्त जगत आहेत. बाहेरून हसणारे चेहरे, गोड बोलणारी माणसं आणि आपुलकीचे शब्द… पण त्या सगळ्यामागे दडलेली भावना मात्र नेहमीच खरी असेल असं नाही. जो माणूस मुखवट्यामागचा खरा चेहरा ओळखतो, तो सावध होतो. तो कुणावरही लगेच विश्वास ठेवत नाही, शब्दांपेक्षा कृतीकडे पाहतो आणि स्वतःच्या मनाला जपतो. पण जो हे ओळखू शकत नाही, तो मात्र नात्यांमध्ये जास्त गुंततो, अपेक्षा वाढवतो आणि शेवटी फसवणूक, वेदना व निराशा यांचाच सामना करतो. आज अनेक नाती गरजेवर टिकलेली असतात. गरज संपली की आपुलकीचा मुखवटा आपोआप गळून पडतो. तेव्हा कळतं की आपण ज्या माणसाला आपलं मानत होतो, तो प्रत्यक्षात फक्त सोबत निभावत होता. अशा अनुभवातून माणूस आतून तुटतो, पण त्याच वेळी तो अधिक शहाणा ही होतो. माणसं ओळखता येणं ही जन्मजात मिळालेली देणगी नसते, ती अनुभवातून मिळते. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून, फसवणूक सहन करून, आणि अश्रूंनी धडे घेत आपण ही कला शिकतो. प्रत्येक वेदना...

घर उभं ठेवणारा माणूस.....!

इमेज
घर उभं ठेवणारा माणूस.....! घर चालवणारा माणूस कधीच हिरो नसतो. कारण हिरो होण्यासाठी क्षण पुरतो, पण घर चालवण्यासाठी अख्खं आयुष्य लागतं. तो फक्त जबाबदार असतो… आणि ही जबाबदारीच हळूहळू त्याची ओळख बनते.नाव, कौतुक, प्रसिद्धी यापेक्षा त्याला जास्त ओळख असते ती “सगळं सांभाळणारा माणूस” अशी. रोजच्या गरजांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं त्याच्या सवयीचं होतं. नवीन कपडे, छंद, स्वप्नं, थोडा आराम सगळं तो उद्यासाठी ढकलत राहतो. पण तो उद्या कधीच येत नाही. कारण घरासाठी आजच सगळं द्यावं लागतं. हळूहळू तो स्वतःसाठी काही मागणंच विसरतो. त्याचं आयुष्य म्हणजे त्यागांची न संपणारी यादी असते, जी तो कुणाला दाखवत नाही. कुणी त्याच्या कष्टांचं कौतुक करत नाही.कारण समाजाने ते कर्तव्य म्हणून गृहीत धरलेलं असतं.“तो तर करणारच” असं सहज म्हणून टाकलं जातं. लोक हसतात, टोमणे मारतात, कारण जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर नसतं. त्याची शांतता लोकांना कमजोरी वाटते, पण त्यांना कळत नाही की हीच शांतता घराला सावरून ठेवत असते. तो गप्प राहतो, कारण त्याला माहीत असतं शब्दांनी नाही, स्थैर्याने घर टिकतं. तो थकतो. शरीर थकतं, मनही थ...

निंबा कुंभार समाजसेवा,साहित्य आणि समर्पणाची अमिट छाप...!

इमेज
निंबा कुंभार समाजसेवा,साहित्य आणि समर्पणाची अमिट छाप...!  राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार’ प्राप्ती आणि  वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा..! एरंडोलचे गुरुकुल कॉलनीतील रहिवासी निंबा पुंडलीक कुंभार हे समाजसेवेतील अनमोल उदाहरण आहेत. समाजाप्रती असलेली निष्ठा, सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा आणि साहित्यातून होणारे प्रबोधन यांची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांच्या निःस्वार्थ कार्याचा, समाजप्रतीच्या समर्पणाचा आणि ज्ञान प्रसारासाठीच्या प्रयत्नांचा मान्यताप्राप्त गौरव आहे. १९८६ पासून गटसचिव म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रातील काम सुरू केले. निव्वळ नोकरी न करता, समाजासाठी स्वतःला वाहून देणे हा त्यांचा जीवनध्येय राहिला. सोनवद ता. धरणगाव येथील ‘कुंभार काम औद्योगिक संस्था’ मध्ये ते विनावेतन सचिव म्हणून कार्यरत आहेत, जे त्यांच्या निःस्वार्थी वृत्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सामाजिक सेवेइतकेच, निंबा कुंभार यांनी २००७ मध्ये हिंगोणे ता. धरणगाव येथे आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ‘कै सखुबाई पुंडलीक कुंभार वाचनालय’ स्थापन केले. य...

इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....!

इमेज
इतिहासाला स्पर्श करणारी साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल....! विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक सहल म्हणजे केवळ प्रवास नसून तो ज्ञान, संस्कार आणि अनुभवांचा आनंदोत्सव असतो.हाच आनंदोत्सव साळवे ता.धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालयाची शैक्षणिक सहल यशस्वीपणे आणि उत्साहात पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी कालीमठ, घृष्णेश्वर, वेरूळ येथील कैलास मंदिर, देवगिरी किल्ला, सिद्धार्थ गार्डन, प्राणी संग्रहालय, मत्स्यालय, बीबी का मकबरा तसेच पैठण येथील कारंजा या ऐतिहासिक, भौगोलिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पुस्तकात वाचलेली इतिहासाची पाने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उलगडताना विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, आनंद आणि अभिमान दाटून आला. किल्ल्यांचे घाट, प्राचीन वास्तूंची भव्यता आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य अनुभवताना इतिहास जणू जिवंत झाल्याचा भास होत होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तूंचे सरांना व भौगोलिक स्थळांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांची माहिती नोंदवली. प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास व संस्कृतीचे सखोल ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी अत्यंत उत्साही आणि भारावून गेले...

पडल्यावर हात देणारे मोजकेच...!

इमेज
पडल्यावर हात देणारे मोजकेच...! या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालण्याचं धाडस मात्र आपल्यालाच करावं लागतं. आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर सल्ले मिळतात, सूचना मिळतात, अनुभव सांगणारे लोक भेटतात. “असं कर”, “तसं करू नकोस”, “हा मार्ग योग्य आहे” असं सांगणारे अनेकजण असतात. पण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे एक कठोर सत्य दडलेलं असतं.त्या वाटेवर पडायचं,थकायचं, घसरायचं आणि पुन्हा उभं राहायचं काम आपल्यालाच करावं लागतं. कारण आयुष्य कोणाच्याही शब्दांवर नाही, तर आपल्या पावलांवर चालत असतं. चालताना आपण एकटेच असतो. आजूबाजूला गर्दी असते, ओळखीचे चेहरे असतात, पण तरीही मनाच्या आत एक एकटेपणाची शांत जाणीव असते. कारण प्रत्येकाचं दु:ख वेगळं असतं, प्रत्येकाची लढाई वेगळी असते. कुणालाही आपल्या मनातल्या वेदना पूर्णपणे समजत नाहीत. म्हणूनच वाट दाखवणारे असले, तरी चालणं आपल्यालाच शिकावं लागतं. पडायचं भीती न बाळगता पुढे जाण्याचं धाडस स्वतःमध्येच शोधावं लागतं. आयुष्याच्या या प्रवासात पडणं अपरिहार्य आहे. कधी अपेक्षांवर पाणी फिरतं, कधी स्वप्नं तुटतात, कधी विश्वासाला तडा जातो. अशा क...

सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...!

इमेज
सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...! उजेडणारी प्रत्येक सकाळ आपल्यासमोर दोन दरवाजे उघडून ठेवते.एक, गोड झोपेत हरवून स्वप्न पाहण्याचा, आणि दुसरा, धैर्याने उभे राहून त्या स्वप्नांच्या मागे पाऊल टाकण्याचा. स्वप्नं मोहक असतात. त्या रंगीत, सुंदर जगात आपण कोणताही त्रास, कोणताही अपयश अनुभवत नाही. आपल्याला वाटतं, “थोडं झोपून राहू, उद्याचं दिवस बघू…” पण खरं तर प्रत्येक उशिरा घालवलेली सकाळ आपल्याला आपल्या स्वप्नांपासून थोडं दूर नेत असते. उठण्याचा निर्णय सोपा नसतो. रस्ता कठीण असतो.  अपयशाची भीती, थकवा, जगाची टिंगल सर्व काही डोक्यावर येतं. पण हा तोच रस्ता आहे जो आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेतो. पायरी-पायरी चढत जाताना आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही, तर स्वतःच घडत जातो. आपण अधिक मजबूत होतो, अधिक धैर्यवान होतो, आणि जगण्याची खरी कला शिकतो. सकाळची किरणं आपल्याला हे सांगतात.तुम्ही निवड करू शकता. तुमच्या हातात आहे की तुम्ही पुन्हा झोपेत हरवाल की स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी उठाल. स्वप्न पाहणे सोयीचे आहे, पण स्वप्न पूर्ण करणे.अद्भुत. त्या एक पावलाही विसरू नका, जे तुम्हाला स्वप्ना...

कामातून उमटवलेले नाव....!

इमेज
कामातून उमटवलेले नाव....! संधी ही आपल्याला हवेतून मिळणारी वरदानासारखी नसते. ती कुणी देणार नाही, ती कुणी बांधणार नाही. संधी ही आपणच निर्माण करतो. आपल्या कष्टाने, आपल्या जिद्दीने, आपल्या धैर्याने. जीवनात जे लोक फक्त वाट पाहतात, ते वेळ गमावतात; पण जे लोक प्रत्येक क्षणाला संधी समजून त्यावर काम करतात, तेच खरे यश मिळवतात. आपलं नाव इतिहासात नसेल तरी चालतं. पण जेव्हा आपण केलेलं काम इतकं प्रभावी, इतकं अर्थपूर्ण असतं की लोक ते पाहून आपल्याला आठवतात, तेच खरे यश असतं. लोक आपल्याला नावानं नव्हे, तर कर्मानं आठवतात. आपली मेहनत, आपलं धैर्य, आपली निष्ठा हेच आपल्या अस्तित्वाचं खरे प्रतिक आहे. संधी मिळणे ही अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक अपयश, प्रत्येक अडचण ही नवीन संधी आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न आपल्याला आपली स्वतंत्र वाट तयार करण्याची संधी देतो. आपलं काम असे करा की ते लोकांच्या हृदयाला भिडेल, त्यांना प्रेरणा देईल, आणि ते आपल्याला आपल्या नावाशिवाय ही आठवतील. खरे नाव ते नाही जे कागदावर लिहिलं जातं; खरे नाव ते आहे जे आपल्या कार्याने जगात सोडले जाते. जगाला बदलण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण...

शब्द कमी,सामर्थ्य जास्त....!

इमेज
शब्द कमी,सामर्थ्य जास्त....! नम्रतेने वागणारा माणूस अनेकदा या जगात गैरसमजांचा बळी ठरतो. त्याच्या शांत शब्दांना कमजोरीचं लेबल लावलं जातं, त्याच्या संयमाला असहायतेची छाया दिली जाते. लोकांना वाटतं, जो माणूस मोठ्याने बोलतो, उद्धटपणे वागतो, समोरच्याला दबवतो तोच खरा हिम्मतवान. पण हे चित्र खरंच इतकं सोपं असतं का? नम्रता ही भीतीतून येत नाही, ती येते आत्मभानातून. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, रागाच्या भरातही चुकीचं न बोलणं, दुखावलं गेलं तरीही मर्यादा न सोडणं हे सगळं प्रत्येकाला जमत नाही. ओरडणं सोपं असतं, अपमान करणं सोपं असतं; पण शांत राहून स्वतःला सावरून घेणं ही खरी कसोटी असते. कारण ज्याचं मन अस्थिर असतं, तोच माणूस सतत बाहेर गोंधळ निर्माण करतो. उद्धटपणामागे बहुतेक वेळा असुरक्षितता लपलेली असते. “मी कमजोर दिसू नये” या भीतीपोटी माणूस कडक मुखवटा चढवतो. पण नम्र माणूस मुखवट्यां शिवाय जगतो. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची घाई नसते, कारण त्याचं मन स्वतःशी शांततेत असतं. खरं तर, सगळे संघर्ष बाहेर नसतात. अनेक लढाया आपल्या मनातच चालू असतात. आणि ज्याला स्वतःचं मन शांत करता आलं, त्याच्यासाठी ब...

जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....!

इमेज
जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....! दिवसभराच्या धावपळीच्या प्रवासात, शरीर थकते, आणि मनही नकळत शांततेचा शोध घेते. अविरत जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसण्याचे क्षण कधी कधी हरवून जातात, आणि आपल्याला वाटते की फक्त पुढे चालत राहणे म्हणजेच जीवन. पण अशा वेळी विरंगुळा हा फक्त विश्रांतीचा क्षण नसतो; तो आपल्याला आपल्या अंतर्मनाशी बोलण्याची संधी देतो. विरंगुळा म्हणजे शांत चहा घेताना, आवडत्या पुस्तकात हरवताना, किंवा फक्त शांतपणे बसून आपल्या विचारांना वेळ देताना अनुभवलेला एक हळवा संवाद आहे. तो आपल्या थकव्याला सामोरे जातो, आपल्याला पुन्हा उर्जा देतो, आणि प्रत्येक श्वासात आशेचा प्रकाश भरतो. ही छोटीशी विश्रांतीच आपल्याला आठवण करून देते. की जीवन फक्त जबाबदाऱ्या आणि धावपळीपुरते मर्यादित नाही. विरंगुळा आपल्याला पुन्हा हसण्याची, पुन्हा मनमोकळेपणाने जगण्याची, आणि नव्या उमेदीनं पुढे जाण्याची ताकद देतो. थकलेल्या शरीराला जसा विश्रांतीची गरज असते, तसाच मनालाही विरंगुळ्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण पुन्हा जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा जाणवते की विरंगुळा फक्त थकलेल्या क्षणाचा आधा...

क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....!

इमेज
क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....! आयुष्य म्हणजे असंख्य भेटींची गुंफण. काही माणसं आपल्यासोबत चालत राहतात, तर काही फक्त क्षणभरच भेटतात. पण या क्षणभरच्या भेटीतही जर आपल्या स्वभावाचा सुगंध दरवळला, तर ती भेट काळाच्या ओघातही पुसली जात नाही. कारण माणूस चेहरा नाही आठवत, तो आठवतो तो भाव. स्वभाव म्हणजे केवळ बोलण्याची शैली नव्हे, तर तो आपल्या मनाचा आरसा असतो. एखाद्याशी दोन शब्द बोलताना त्याला दिलेला मान, त्याच्या डोळ्यांत पाहून केलेलं संवाद, आणि त्याच्या भावनांना दिलेली किंमत यातूनच आपला स्वभाव उमटतो. क्षणभर भेटलेला माणूसही जर आपल्या वागण्यात आपलेपणा अनुभवला, तर तो आपल्याला आयुष्यभर विसरू शकत नाही. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या डोळ्यांत दुःख दिसतं, आणि आपण त्याला फक्त “काही हरकत नाही, सगळं ठीक होईल” एवढंच म्हणतो. पण त्या एका वाक्याने त्याच्या मनाला आधार मिळतो. अशा छोट्या शब्दांतून, छोट्या कृतीतून आपण नकळत कुणाच्या आयुष्यात आशेचा दिवा लावतो. स्वभाव सुंदर असणे म्हणजे नेहमीच गोड बोलणे नव्हे. कधी कधी शांतपणे ऐकणे, वेळेवर मदतीचा हात पुढे करणे, किंवा कुणाला कमी न लेखता समजून घेणे.हेच खरे सौं...

‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...!

इमेज
‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...! अति स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता असते.ती आत्मविश्वासाची नसते, तर अहंकाराची असते. त्यांना वाटतं, जगातलं सगळं ज्ञान त्यांनीच मिळवलं आहे. त्यांच्यापेक्षा शहाणं कुणीच नाही, अनुभवी कुणीच नाही. त्यामुळे दुसऱ्याचं मत ऐकणं त्यांना अपमानासारखं वाटतं, आणि प्रेमाने दिलेला सल्ला हस्तक्षेपासारखा भासतो. अशा लोकांचं मन हळूहळू बंद होत जातं. शिकण्याचे दरवाजे आपोआप बंद होतात. अनुभव सांगणारी माणसं मागे पडतात, चुका दाखवणारी माणसं शत्रू वाटू लागतात. वास्तव समोर असून ही ते मान्य केलं जात नाही. कारण अहंकार डोळ्यांवर असा पडदा टाकतो की योग्य-अयोग्य यातला फरकच अस्पष्ट होतो. स्वतःच्या बुद्धीवरचा अति विश्वास माणसाला एकटा करतो. कारण नात्यांना ‘बरोबर-चूक’पेक्षा ‘समजून घेणं’ जास्त गरजेचं असतं. सतत “मीच बरोबर” म्हणणाऱ्या माणसासोबत चालताना माणसं थकतात. हळूहळू संवाद कमी होतो, माणसं दूर जातात, आणि शेवटी भोवती गर्दी असूनही तो माणूस एकटा राहतो. आयुष्य मात्र कुणाच्याही अहंकाराला थांबवत नाही. ते आपली गती चालूच ठेवतं. वेळोवेळी थांबवून, अडवून, वाकवू...

मीच आहे ना,माझ्यासोबत....!

इमेज
मीच आहे ना,माझ्यासोबत....! आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रत्येकाला कुणाच्या तरी सोबतीची गरज असते. लहानपणापासूनच आपण हात धरून चालायला शिकतो.आईचा, वडिलांचा, मित्रांचा, प्रिय व्यक्तीचा. त्या हातात सुरक्षितता असते, विश्वास असतो, आणि “मी एकटा नाही” ही भावना असते. पण आयुष्य जसजसं पुढे सरकतं, तसतसं एक कठोर सत्य समोर येतं.प्रत्येक हात कायमचा धरून राहीलच असं नाही. कधी परिस्थिती बदलते, कधी माणसं बदलतात, तर कधी नातीच बदलून जातात. ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, तोच हात अचानक सुटतो. त्या क्षणी मन कोलमडतं, पाय थरथरतात, आणि वाटतं की आता पुढे चालणं अशक्य आहे. पण अशाच क्षणी आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं.स्वतःचा हात स्वतःच धरायला शिक. स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर स्वावलंबी होणं आहे. म्हणजे इतरांपासून दूर जाणं नव्हे, तर स्वतःच्या आतल्या ताकदीशी ओळख करून घेणं आहे. कारण बाहेरचा आधार कधीही निघून जाऊ शकतो, पण आतली हिंमत जर जागी असेल, तर कोणतीही साथ सुटली तरी पाय घसरत नाहीत. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक धक्के बसतात. अपयश, नाकारलं जाणं, वि...

खोटेपणाच्या गर्दीत सत्याचा प्रकाश...!

इमेज
खोटेपणाच्या गर्दीत सत्याचा प्रकाश...! जगात खोटं बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सत्य बोलणारे लोक अनेकदा एकटे पडतात. सत्य हे नेहमीच सोपे नसते; ते बोलायला धाडस लागतं, स्वीकारायला धैर्य लागतं, आणि टिकवायला संयम लागतो. सत्य बोलणाऱ्या माणसाची वाट कठीण असते. जेव्हा त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा असतो, तेव्हा अनेक वेळा इतरांना ती कडवी वाटते. लोक आपल्याला समजू शकत नाहीत, प्रश्न विचारतात, किंवा आपल्यावर टीका करतात. आणि हळूहळू, सत्य बोलणारा माणूस एकटा पडतो. पण एकटेपणात ही त्याचे अंत:करण शांत असते. खोटं बोलणाऱ्या माणसाची जगण्यात गती असते, पण त्यांना आत्म्याचा शांती कमी मिळते. सत्य बोलणारा जरी समाजात थोडा वेगळा दिसतो, तरी त्याचे शब्द आणि कृती मनाला भिडतात. तो ज्या मार्गावर चालतो, तो मार्ग कठीण असला तरी प्रामाणिकतेचा मार्ग असतो. सत्य बोलणारे लोक जरी कमी असतील, तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो. एक छोटासा सत्याचा शब्द अनेक खोट्या शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असतो. एकटी वाट चालत चालत ते आपले धैर्य टिकवतात, आत्म्याची ताकद ओळखतात, आणि जीवनाला अर्थ देतात. जगात सत्य बोलणाऱ्यांची संख्या कम...

वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....!

इमेज
वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....! सामान्य माणसाच्या आयुष्यात “पोलीस” हा शब्द कधी धाक वाटणारा, तर कधी आधार देणारा असतो. पण जेव्हा पोलीस आपली वर्दी केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर समाजसेवेचे व्रत म्हणून परिधान करतात, तेव्हा विश्वास जन्माला येतो. चोपडा पोलीस उपविभागाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभाग हा मान मिळवला, ही केवळ एक प्रशासकीय उपलब्धी नाही.ती लोकांच्या विश्वासावर उमटलेली मोहोर आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सक्षम, संयमी आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव आणि अडावद येथील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदाराने आपले कर्तव्य केवळ आदेश म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून निभावले. दिवस असो वा रात्र, ऊन असो वा पाऊस कायद्याचे रक्षण करताना स्वतःच्या सुख-दुःखाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या वर्दीधारी माणसांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, नागरिकांशी संवाद, तक्रारींवरील तत्काळ कारवाई आणि मानवी दृष्टिकोनातून दिलेला न्याय या सर्व बाबींमध्ये चोपडा ...

अनुभवातून शहाणपण....!

इमेज
अनुभवातून शहाणपण....! “अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे” हे वाक्य आपण वारंवार उच्चारतो; पण त्यामागचा अर्थ मात्र अनेकदा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही. कारण अनुभव शिकवतो असं आपण मान्य करतो, पण तो अनुभव स्वतःचा नसेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची सवय आपल्यात कमीच असते. दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेली घटना आपल्याला फक्त ऐकलेली गोष्ट वाटते, जोपर्यंत तिची झळ स्वतःला लागत नाही. समाज हा खरं तर आपल्याला सतत आरसा दाखवत असतो. पण त्या आरशात पाहताना आपण स्वतःला शोधत नाही; उलट इतरांच्या चुका, उणिवा, अपयश यातच आपलं लक्ष अडकतं. कुणी चुकलं की आपण लगेच मत मांडतो, चर्चा करतो, कधी न्यायाधीशासारखे निकालही देतो. मात्र “मी त्या जागी असतो तर?” हा प्रश्न स्वतःला विचारण्याइतकी प्रामाणिकता आपल्यात क्वचितच दिसते. एखादी वेदना जो पर्यंत आपली होत नाही, तो पर्यंत तिचं खरं वजन आपल्याला जाणवत नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, टीव्हीवर चर्चा पाहतो,सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतो.पण मनाच्या आत काही हलत नाही. कारण सहानुभूतीचा स्पर्श नसतो. जोपर्यंत आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करत नाही, तोपर्यंत...

गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..!

इमेज
गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..! काही नाती अशी असतात, जी जपता-जपता आपणच थकून जातो. सुरुवातीला सगळं सहज असतं.आपण वेळ देतो, मन देतो, भावना देतो… कारण आपल्याला समोरचा आपलासा वाटतो. पण कधीतरी लक्षात येतं की आपलं देणं वाढत जातं, आणि आपली किंमत मात्र कमी होत जाते. आपण जितकं जास्त झुकतो, तितकं समोरच्याला ते आपलं कर्तव्य वाटू लागतं. आपली उपस्थिती सवयीची होते. आपलं नसणं काही फरकच पडत नाही. आपण थांबतो, समजून घेतो, माफ करतो पुन्हा पुन्हा. आणि हळूहळू आपल्या मनात एक प्रश्न उगवतो.मी खरंच महत्त्वाचा आहे का, की फक्त सोयीचा? वेळ, भावना आणि आपुलकी या आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत. त्या कोणाच्या ही हातात सहज देण्यासाठी नसतात. कारण ज्याला तुमच्या वेळेची किंमत कळत नाही, त्याला तुमच्या भावना कधीच समजणार नाहीत. आणि ज्याला तुमच्या उपस्थितीचा सन्मान नाही, त्याच्यासाठी तुम्ही कितीही दिलं, तरी ते कधीच पुरेसं ठरणार नाही. म्हणूनच कुणाला जवळ येऊ देण्याआधी, कुणासाठी स्वतःला झोकून देण्याआधी एक क्षण थांबणं गरजेचं असतं. तो माणूस तुमचं ऐकून घेतो का? तुमच्या भावना जपतो का? तुमच्या शांततेचा ही...

स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....!

इमेज
स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....! या जगात खूप माणसं अशी असतात की ज्यांचा स्वभाव कधीच कामापुरता नसतो. ते नात्यांकडे व्यवहार म्हणून पाहत नाहीत. भेटले की हसून भेटणं, मदत करताना मनापासून करणं आणि नातं जोडताना “मला काय मिळेल?” असा हिशोब न ठेवणं ही त्यांच्या स्वभावाची ओळख असते. त्यांची आपुलकी वेळेवर अवलंबून नसते किंवा गरजेपुरती मर्यादित नसते. म्हणूनच अशा माणसांना आयुष्यात थोडं अधिक दुखावलं जातं, थोडं अधिक फसवलं जातं; तरीसुद्धा ते पुन्हा माणसांवर विश्वास ठेवतात. कारण त्यांचा स्वभाव व्यवहाराचा नसून माणुसकीचा असतो. अशा लोकांना अनेकदा “तू खूप चांगला आहेस” असं म्हणत लोक बाजूला होतात. सुरुवातीला गोड बोलणं, जवळ येणं आणि आपुलकी दाखवणं हे सगळं असतं; पण काम झालं की माणसं बदलतात. हे अनुभव मनाला थकवणारे आणि वेदनादायक असतात. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की ही फसवणूक त्यांच्या चांगुलपणाची हार नसते, तर त्यांच्या समजुतीची सुरुवात असते. या अनुभवांतूनच माणसं ओळखण्याची दृष्टी अधिक स्पष्ट होत जाते. नाती टिकवण्यासाठी हे लोक जे प्रयत्न करतात, ते कुठल्याही प्रकारच्या कमजोरीतून नसतात. ते त्यांच्या आत...

आयुष्यात पैसा कमवा पण…..!

इमेज
आयुष्यात पैसा कमवा पण…..! आयुष्यात पैसा कमवणं आवश्यक आहे. कारण पैसा म्हणजे फक्त सुखसोयी नाहीत, तर आत्मसन्मान, स्वप्नांना बळ आणि जबाबदाऱ्यांची खात्री असते. पण तो कुठून येतो, किती येतो, कसा येतो.हे सगळं प्रत्येकाला सांगत फिरणं शहाणपणाचं नसतं. कारण पैशाबरोबर माणसांच्या नजरा बदलतात, आणि त्या बदललेल्या नजरांमध्ये माणूस हरवू लागतो. आज तुमचे कष्ट लोकांना दिसतात. तुमचा संघर्ष, तुमची धडपड, तुमचं न थकणं सगळं कौतुकास्पद वाटतं. पण उद्या जेव्हा यश तुमच्या दाराशी येतं, तेव्हा तेच कष्ट संशयास्पद वाटू लागतात. “इतकं कसं?” “एवढ्या लवकर कसं?” असे प्रश्न मनात जन्म घेतात. यश दिसू लागतं, पण त्या मागचा संघर्ष अदृश्य होतो. कमाईची माहिती झाली की आपुलकी हळूहळू कमी होते आणि सल्ले वाढू लागतात. कोण कसा खर्च करावा, कुणाला मदत करावी, कुठे गुंतवणूक करावी.हे सगळं सांगणारे अचानक वाढतात. पण या सल्ल्यांमागे काळजीपेक्षा तुलना जास्त असते. काही जण खरोखर प्रेरणा घेतात, पण बरेच जण स्पर्धा आणि हेवा मनात साठवून ठेवतात. तुमचं यश त्यांच्या अस्वस्थतेचं कारण ठरतं. पैशाची गोष्ट उघड झाली की नात्यांत हिशेब शिरतो. मदत मागणं...

नात्याची खरी किंमत...!

इमेज
नात्याची खरी किंमत...! नात्यांची खरी ओळख शब्दांत नाही, तर कृतीत असते. ज्याला खरंच तुमची गरज असते, तो मोठमोठ्या वचनांआधी स्वतःत बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही, समजावं लागत नाही. तुमचं मौन, तुमच्या डोळ्यातली थकवा, मनातली जखम हे सगळं तो शब्दांआधीच ओळखतो. कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहीत असते. त्याच्यासाठी नातं म्हणजे फक्त सोबत नसते, तर जबाबदारी असते. पण ज्याला तुमची गरजच नसते, तो कितीही समजावलं तरी बदलत नाही. तुम्ही तुमचं मन उघडं ठेवलं, भावना मांडल्या, स्वतःला कमी केलं तरी त्याच्याकडून बदल मिळत नाही. उलट प्रत्येक वेळी नवी कारणं, नवी सबब आणि नवे आरोप पुढे येतात. अशा माणसाला बदलायचंच नसतं; त्याला फक्त वेळ काढायचा असतो. तो तुमच्या संयमावर जगतो, तुमच्या आशांवर खेळतो. आणि आपण? आपण मात्र विश्वास ठेवत राहतो. “कदाचित आता समजेल” या आशेवर भावना, वेळ आणि स्वतःची शांतता सगळं पणाला लावतो. हळूहळू आपण थकतो. आतून तुटतो. स्वतःलाच दोष देऊ लागतो. आपली किंमत आपल्यालाच कमी वाटू लागते. हे सगळं घडत असताना समोरच्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो, तोच बदलतो;...

स्वतःची किंमत.....!

इमेज
स्वतःची किंमत.....! माणूस बोलतो कारण त्याला समजून घ्यायचं असतं, आपलं मन मोकळं करायचं असतं. पण जेव्हा बोलणं सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावं लागतं, तेव्हा ते संवाद राहत नाही.ती स्वतःच्या अस्तित्वाची धावपळ बनते. अतिसंवाद हा शब्दांचा प्रश्न नसतो, तो आत्मसन्मानाच्या झिजेचा प्रवास असतो. हळूहळू आपण नकळत विनवणीच्या टप्प्यावर पोहोचतो. “माझं ऐक,” “माझं समजून घे,” असं सांगत सांगत मन थकत जातं. पुन्हा पुन्हा आपली बाजू मांडणं, प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरणं,आणि तरीही समोरून येणाऱ्या शांततेकडे उत्तराच्या आशेने पाहत राहणं.ही प्रतीक्षा संवादाची नसते, ती आत्मसन्मानाला लागलेली भेग असते. खरं तर ज्याला समजायचं असतं, त्याला दोन शब्द पुरेसे असतात. आणि ज्याला समजायचंच नसतं, त्याच्यासाठी हजार शब्दही अपुरे ठरतात. कारण ऐकायची तयारी नसलेल्या माणसापर्यंत शब्द पोहोचतच नाहीत. तिथे शब्द वाढवणं म्हणजे स्वतःलाच अधिक थकवणं असतं. अनेकदा आपण गोंधळतो.जास्त बोललो तर नातं टिकेल, अधिक समजावून सांगितलं तर समोरचा बदलेल. पण नातं शब्दांवर नाही, तर कदर करण्यावर उभं असतं. जिथे आपले शब्द ऐकले जात नाहीत, तिथे शांत रा...

नातं जपताना स्वतःला हरवू नका....!

इमेज
नातं जपताना स्वतःला हरवू नका....! आपण ज्या माणसांना मनापासून जपतो, त्यांच्याशी आपलं नातं फार नाजूक असतं. कारण त्या नात्यात अपेक्षा कमी आणि समर्पण जास्त असतं. आयुष्य हळूहळू शिकवतं की सर्वात खोल वेदना बाहेरून नाही, तर आतून आपल्या जवळच्यांकडूनच मिळतात. आपण जितकं जपतो, तितकंच आपलं मन उघडं पडतं; आणि जिथे मन उघडं असतं, तिथे दुखणंही खोलवर जातं. जास्त मान दिला की समोरच्याला आपली किंमत कमी वाटू लागते, हे सत्य उशिरा कळतं. आपण आदर देतो, वेळ देतो, समजून घेतो.पण कधी कधी त्याची किंमत समोरच्याला सवय वाटू लागते. नातं टिकवण्यासाठी आपण स्वतःला झिजवत राहतो; आपली मते, आपली स्वप्नं, आपली शांतता हळूहळू बाजूला ठेवतो. पण ही झीज समोरच्याला जाणवत नाही, कारण त्याला आपल्या सहनशीलतेची सवय झालेली असते. जपणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे, हे समजायला अनुभव लागतो. आपण जितकं झुकतो, तितकं आपल्यावर चालणं लोकांना सोपं वाटतं. प्रेम करताना मर्यादा ठेवल्या नाहीत, तर अपेक्षा वाढतात.आणि अपेक्षा वाढल्या की निराशा अटळ होते. स्वतःचा आदर हरवून मिळवलेली माणसं कायमची राहत नाहीत; कारण जिथे आत्मसन्मान नसतो, तिथे नात्यालाही प...

राहून गेलेल्या क्षणांची खंत.....!

इमेज
राहून गेलेल्या क्षणांची खंत.....! खंत मनाला बोचते, कारण ती हरवलेल्या क्षणांची आठवण करून देते. आयुष्यात काही वेळा आपण सगळं असूनही थांबतो.भीतीपोटी, अहंकारापोटी किंवा “आत्ता नको” या निष्काळजी विचारापोटी. त्या क्षणी वेळ आपल्या बाजूने उभा असतो, माणसं जवळ असतात, भावना जिवंत असतात. पण आपण दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा वेळ निघून जातो, तेव्हा हातात उरते ती फक्त खंत. वेळ गेल्यावर शब्द निष्प्रभ होतात. माफी उशिरा सुचते, प्रयत्न अपुरे वाटतात. जे बोलायला हवं होतं ते मनातच राहून जातं, आणि जे करायला हवं होतं त्याची केवळ आठवण उरते. मन त्या “राहून गेलेल्या” गोष्टीभोवतीच फिरत राहतं. रात्री शांततेत, एकांतात ती खंत अधिकच बोचते. त्या क्षणी केलेली एक छोटी चूक, एक दुर्लक्ष, आयुष्यभराची सल बनून राहते. पण खंत ही केवळ वेदना नाही. ती मनाला हादरवते, अंतर्मुख करते. स्वतःच्या चुकीची जाणीव झाल्यावर माणूस अधिक संवेदनशील होतो. दुसऱ्याच्या डोळ्यातली न बोललेली भावना ओळखायला शिकतो. शब्द बोलण्याआधी त्यांचा परिणाम विचारात घेतो. कुणाला दुखावण्याआधी दोनदा थांबतो. कारण त्याला ठाऊक असतं.वेदना शब्दांतून नाही, तर दुर्लक्ष...

स्वतःला हरवून जपलेली नाती...!

इमेज
स्वतःला हरवून जपलेली नाती...! ज्याला खरंच तुमची गरज असते, तो तुमच्यासाठी मोठमोठी वाक्यं बोलत नाही. तो तुमच्यासमोर स्वतःत बदल घडवतो. कारण त्याला नातं टिकवायचं असतं, जिंकायचं नसतं. त्याला सांगावं लागत नाही, समजावं लागत नाही… तुमच्या वेदना त्याला ऐकू येतात, तुमचं शांत राहणंही त्याला बोचतं. कारण जिथे प्रेम असतं तिथे संवेदना आपोआप जन्म घेतात. पण ज्याला तुमची गरजच नसते, तो मात्र कायम शब्दांच्या आड लपलेला असतो. प्रत्येक वेळी नवं कारण, नवी सबब, नवे आरोप. तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तो उत्तर देत नाही, उलट तुम्हालाच दोषी ठरवतो.त्याला बदलायचं नसतं, कारण बदलण्याइतकी किंमत तुमची त्याच्या आयुष्यात नसते. त्याला फक्त वेळ काढायचा असतो… जो वेळ तुमचा असतो, तुमच्या आयुष्याचा असतो. आपण मात्र आशेच्या दोरीला धरून बसतो. “कदाचित बदलेल”, “कदाचित समजेल” या कदाचितच्या भरोशावर आपला विश्वास, भावना आणि अमूल्य वेळ हळूहळू खर्च होत जातो. आपण थकतो, तुटतो, स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. आपलीच किंमत कमी वाटू लागते. आणि समोरची व्यक्ती? तिला याची साधी जाणीव ही नसते. कारण ज्याला फरक पडतो, तोच बदलतो. बाकीचे फक्त बोलत...

विचार इतकाच करावा की ज्याने…..!

इमेज
विचार इतकाच करावा की ज्याने…..! विचार इतकाच करावा की ज्याने मार्ग सापडेल, इतका नाही की आयुष्याचाच वेग हरवेल. कारण विचार हा आयुष्याचा सोबती आहे, मालक नाही. तो हातात हात घालून चालायला हवा, पायात बेड्या घालण्यासाठी नाही. विचारांनी दिशा मिळते, पण अति विचारांनी दिशाच हरवते. विचार माणसाला सजग करतो, शहाणा बनवतो. पण तोच विचार जेव्हा मनात घर करून बसतो, तेव्हा तो भीतीचं रूप घेतो. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण हवी, प्रत्येक निर्णय चुकू नये, प्रत्येक पाऊल सुरक्षित असावं.या अपेक्षांमध्ये माणूस इतका अडकतो की पुढे जायची हिंमतच हरवून बसतो. मग मन प्रश्नांनी भरतं, पण उत्तरं मात्र दूरच राहतात. प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करत बसलो तर पाऊल उचलण्याआधीच आयुष्य पुढे निघून जातं. काही निर्णय डोक्याने नाही तर वेळेने घ्यावे लागतात. कारण आयुष्य हे गणित नाही की प्रत्येक उदाहरण आधीच सोडवून ठेवता येईल. इथे अनेकदा उत्तर शोधायचं नसतं, तर उत्तर अनुभवत घडवायचं असतं. चालता चालता चुका होतात, कधी वाट चुकते, कधी मन दुखतं. पण त्या प्रत्येक चुकांमधून अनुभव जन्माला येतो. जो अनुभव पुस्तकांत नाही, तो आयुष्य शिकवतं. अति विचा...

इतका गर्व कशासाठी…..!

इमेज
इतका गर्व कशासाठी…..! माणूस जन्मतो तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं. संपत्ती नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही. आणि मरणानंतर ही काहीही घेऊन जात नाही. तरीही आपण अनेकदा आपल्या छोट्या-मोठ्या यशांवर गर्व करतो, आपल्या संपत्तीवर, आपल्या नावावर, आपल्या समाजातील स्थानावर. पण हे सारे तात्पुरते आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा येतात आणि जातात, पण त्यातून निर्माण होणारा अहंकार कायम राहतो आणि आतून आपल्याला खाल्ला जातो. मनात द्वेषभावना साठवणे म्हणजे स्वतःच्या जीवनावर जड ओझं टाकणे. आपण आपल्याच मनावर तुरूंग बांधतो. मीपणा वाढतो, नातं कमी होतात, माणूस एकटाच राहतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं, आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं  ही मानसिक गरीबी आहे. अशी भावना फक्त आपल्याच हृदयाला जळवते आणि आयुष्याचे सौंदर्य हरवते. आयुष्य खूपच थोडं आहे. काही क्षण, काही आठवणी, काही नाती. पण आपण त्यातला जास्त वेळ द्वेष, नाखुशी आणि अहंकारात घालवतो. दुसऱ्यांच्या यशावर डोके वाकवणे किंवा दुसऱ्यांच्या अपयशात आनंद मानणे  या सगळ्या गोष्टी माणूस म्हणून आपल्याला लहान करतात. उलट, ज्या माणसाने नम्रता ठेवली, त्याने दिले...

अहंकाराच्या सावलीत तुटत जाणारी नाती....!

इमेज
अहंकाराच्या सावलीत तुटत जाणारी नाती....! असतात काही अशी माणसं जी स्वतःच्या धुंदीत इतकी हरवलेली असतात की त्यांच्या वागण्याने समोरच्याच्या मनात काय वादळ उठलं आहे, याची त्यांना साधी जाणीवही नसते. त्यांना वाटतं की त्यांनी बोललेले शब्द हे फक्त शब्दच असतात; पण समोरच्यासाठी ते शब्द आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमा ठरतात. काही जखमा रक्त न सांडता खोलवर रुजतात, आणि अशाच जखमा या माणसांकडून नकळत दिल्या जातात. अशी माणसं स्वतःला नेहमीच बरोबर समजतात. चूक झाली तरी ती आपली असू शकते, हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. माफी मागणं त्यांना कमीपणाचं वाटतं, आणि जबाबदारी स्वीकारणं म्हणजे अहंकारावर घाव बसणं. त्यामुळे ते सहजपणे दोष दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून मोकळे होतात. आपण समोरच्याला दुखावलं, अपमानित केलं, असं मान्य करणं त्यांना जमतच नाही. नात्यांमध्ये संवादापेक्षा समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. पण अशा लोकांसाठी नातं हे जपण्यासारखं नसून जिंकण्याचं मैदान असतं. कोण बरोबर, कोण चूक याच गणितात ते अडकलेले असतात. समोरच्याच्या भावनांना किंमत न देता ते स्वतःच्या अहंकाराभोवती भिंती उभ्या करतात. त्या भिंती ...

नम्रतेमधल मोठेपण....!

इमेज
नम्रतेमधल मोठेपण....! आदराणे दिलेला एक नमस्कार हा केवळ शिष्टाचार नाही, तर तो माणसाच्या अंतर्मनातून उमटलेला संस्कारांचा स्वर असतो. दोन हात जोडताना फक्त बोटं एकत्र येत नाहीत, तर त्यामागे असलेली नम्रता, आदर आणि माणुसकीही एकत्र येते. शब्द न उच्चारता दिलेला हा नमस्कार समोरच्याच्या मनात थेट पोहोचतो आणि क्षणात नात्याला एक उबदार स्पर्श देऊन जातो. नमस्कार करताना माणूस थोडा वाकतो, पण त्यात कुठे ही कमीपणा नसतो. उलट, त्या वाकण्यात अहंकार आपोआप झुकतो आणि माणुसकी ताठ उभी राहते. “मी”पण विरघळून “आपण”पण जन्माला येतो. मोठेपणा हा पदात, पैशात किंवा अधिकारात नसून तो नम्रतेत असतो, हे एक साधा नमस्कार नकळत शिकवून जातो. आदराने वाकलेलं मस्तक कधीच लहान ठरत नाही. तेच मस्तक समोरच्याच्या मनात सन्मानाचं स्थान मिळवतं. नमस्कार देणारा माणूस स्वतःची ओळख शब्दांत सांगत नाही, पण त्याचे संस्कार, त्याची जडणघडण आणि त्याची संस्कृती त्या एका कृतीतून स्पष्ट दिसून येते. म्हणूनच नमस्कार हा केवळ कृती नसून तो व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. समाजात नाती टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; कधी कधी एक छोटासा नमस्कार पुरेसा ...

गोंगाटाविना जिंकलेली लढाई.....!

इमेज
गोंगाटाविना जिंकलेली लढाई.....! आयुष्याच्या रणांगणात प्रत्येकाला लढावं लागतं, पण प्रत्येक लढाईसाठी तलवार उचलणं गरजेचं नसतं. काही युद्धं शांततेत जिंकली जातात. गोंगाटात नाही, तर संयमात ताकद तयार होते. म्हणूनच कधी कधी जगाच्या नजरेतून थोडा काळ गायब होणं हे पराभवाचं लक्षण नसून, विजयाची तयारी असते. शांत राहणं म्हणजे निष्क्रिय राहणं नाही. तो काळ असतो स्वतःशी प्रामाणिक संवाद साधण्याचा, आपल्या कमतरतांवर काम करण्याचा. इतरांना उत्तर देण्याआधी स्वतःला घडवण्याचा. या प्रवासात कुणी दखल घेत नाही, कौतुक मिळत नाही, पण आतून माणूस मजबूत होत जातो. जसं बी जमिनीत गाडलं जातं तेव्हा ते दिसत नाही, पण त्याच अंधारात त्याची मुळे खोलवर रुजतात. बाहेरून शांत दिसणारा माणूस आतून कमजोर असतोच असं नाही. कधी कधी तो स्वतःच्या आतल्या वादळाला दिशा देत असतो. रागाला संयमात बदलत, शब्दांना कौशल्यात रूपांतरित करत, आणि उतावळेपणाला शहाणपणाची साथ देत. कारण जो आधीच सगळं उघड करतो, तो लढाईआधीच थकतो; पण जो शांत राहतो, तो योग्य क्षणासाठी स्वतःला साठवत असतो. योग्य वेळेची वाट पाहणं ही भीती नसून समजूतदारपणा असतो. प्रत्येक पाऊल लग...

जर त्याला आपण पसंत नसू तर…..!

इमेज
जर त्याला आपण पसंत नसू तर…..! जर त्याला आपण पसंत नसू, तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवण्याचा अट्टहास कशासाठी? जिथे आपल्या अस्तित्वालाच किंमत नाही, तिथे आपली उपस्थिती प्रेम ठरत नाही.ती ओझं बनते. नात्यांमध्ये टिकून राहण्यासाठी फक्त भावना पुरेश्या नसतात; तिथे परस्पर आदर, ओढ आणि आपुलकी असावी लागते. नाहीतर त्या नात्याचं ओझं फक्त एकालाच वाहावं लागतं. अपेक्षा या नात्यांना जोड देतात, पण त्या दोन्ही बाजूंनी असतील तरच.एकतर्फी अपेक्षा हळूहळू प्रेमाची गळचेपी करतात. आपण देत राहतो.वेळ, समजून घेणं, माफी, सहनशीलता आणि बदल्यात मिळतं फक्त दुर्लक्ष. अशा वेळी नातं आपल्याला जोडत नाही, तर आपल्याला स्वतःपासून दूर नेतं. कुणाच्या आयुष्यात जबरदस्तीने जागा निर्माण करणं हे प्रेमाचं लक्षण नाही, ती असुरक्षिततेची खूण असते. जिथे आपल्याला थांबवण्यासाठी एक शब्दही बोलला जात नाही, एक पाऊलही उचललं जात नाही, तिथे वारंवार स्वतःला सिद्ध करत राहणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानालाच तडा देणं. प्रेम मागावं लागत नाही; जिथे प्रेम असतं, तिथे आपल्यासाठी आपोआप जागा तयार होते. कधी कधी दूर जाण्याचा निर्णय कठीण असतो. आठवणी डोळ्यांत...

मागून बोलणाऱ्यांपेक्षा पुढे चाललेलं आयुष्य…!

इमेज
मागून बोलणाऱ्यांपेक्षा पुढे चाललेलं आयुष्य…! आपल्या मागे कोण काय बोलतं याने आपल्याला काहीच फरक पडत नाही… कारण पाठीमागचं बोलणं हे शब्दांचं नसून मानसिकतेचं प्रतिबिंब असतं. जेव्हा एखाद्याला समोर उभं राहून बोलण्याची हिंमत नसते, तेव्हा तो माणूस मागून शब्दांचे बाण सोडतो. त्या शब्दांत सत्य कमी आणि असुरक्षितता जास्त असते.  कारण स्वतःशीच लढत असलेला माणूस दुसऱ्याच्या शांततेला खुपतो. आपली शांतता म्हणजे आपली कमजोरी नाही, तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आणि गंमत म्हणजे, हीच शांतता अनेकांना अस्वस्थ करते. जे लोक आपल्याबद्दल पाठीमागे बोलतात, ते प्रत्यक्षात स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःच्या आयुष्यातील रिकामेपण भरून काढण्यासाठी ते दुसऱ्याच्या नावाने चर्चा करतात.  कारण स्वतःच्या आरशात डोळे घालून पाहण्याचं धैर्य सगळ्यांकडे नसतं. समोर उभं राहून सत्य बोलायला छाती लागते, आणि ती छाती फार थोड्यांकडे असते. आपण आपल्या वाटेवर चालत राहतो. कुणी टाळ्या वाजवल्या तरी, कुणी टीका केली तरी. कारण आपल्या यशाचं मोजमाप त्यांच्या चर्चांवर ठरत नाही; ते ठरतं आपल्या आत्मविश्वासा...

धानोऱ्याच्या मातीचा सुवर्णकिरण डॉ. किरण बाजीराव पाटील....!

इमेज
धानोऱ्याच्या मातीचा सुवर्णकिरण डॉ. किरण बाजीराव पाटील....! कष्ट, चिकाटी आणि निस्सीम श्रद्धेच्या बळावर जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कार्यातून समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते, तेव्हा तिचे यश हे केवळ वैयक्तिक राहत नाही, तर संपूर्ण गावाच्या अस्मितेचे प्रतीक बनते. धानोरा, तालुका चोपडा येथील सुपुत्र वास्तू ऊर्जा एक्सपर्ट व ज्योतिष्य व्होराभूषण डॉ. श्री. किरण बाजीराव पाटील यांना वास्तुशास्त्रातील उत्कृष्ट कार्यसेवेसाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली, ही बातमी धानोऱ्याच्या प्रत्येक घरात आनंदाची लहर निर्माण करणारी आहे. वास्तुशास्त्र ही केवळ दिशा व रचनांची शास्त्रीय मांडणी नसून, मानवी जीवनात संतुलन, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एक जीवनदृष्टी आहे. या विद्येचा सखोल अभ्यास करून ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डॉ. किरण पाटील यांनी मनोभावे केले. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक संसारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले, अनेक अडचणीत असलेल्या जीवनांना नवी दिशा मिळाली. या उल्लेखनीय सेवेची दखल घेत भारत सरकारकडून ‘रायझिंग पुरस्कार’साठी त्यांची निवड होणे,...

दोष नेहमी दुसऱ्याचाच असतो…..!

इमेज
दोष नेहमी दुसऱ्याचाच असतो…..! काही लोक इतके मोठे शहाणे असतात की त्यांना स्वतःची चूक कधीच दिसत नाही. आयुष्यात काही बिघडलं, नातं दुखावलं, शब्द कटू झाले.या मागचं कारण शोधताना त्यांच्या नजरेसमोर नेहमी समोरचाच उभा असतो. सगळं कसं दुसऱ्यामुळेच घडलं, याची यादी मात्र त्यांच्या मनात अगदी नीट मांडलेली असते. पण त्या यादीत स्वतःचं नाव कधीच नसतं. हे लोक बोलताना फार मोठं तत्वज्ञान सांगतात. योग्य-अयोग्याची व्याख्या करतात, नात्यांची किंमत सांगतात, आणि समजूतदारपणाचे धडे देतात. पण जेव्हा त्या शब्दांना कृतीची साथ द्यायची वेळ येते, तेव्हा ते सोयीस्कर मौन पाळतात. माफी मागायची वेळ आली की अहंकार आडवा येतो,आणि जबाबदारी स्वीकारायची वेळ आली की शांतता पसरते. आपल्याला कोणी दुखावलं की त्यांच्या भावना लगेच जाग्या होतात. तेव्हा त्यांना संवेदनशीलता आठवते, आदराची अपेक्षा असते. पण आपण दुसऱ्याला दुखावलं, आपल्या शब्दांनी एखाद्याचं मन मोडलं, आपल्या वागण्याने नात्याला जखम झाली.याची जाणीव मात्र होत नाही. स्वतःच्या स्वार्थाला ते हुशारीचं नाव देतात, आणि दुसऱ्याच्या सहनशीलतेला कमजोरी समजतात. नातं तुटलं की ते सहज म्ह...

इतरांसाठी जगताना माणूस....!

इमेज
इतरांसाठी जगताना माणूस....! सगळ्यांची मनं जपताना माणूस हळूहळू स्वतःचंच मन हरवून बसतो. सुरुवातीला ते त्याला जाणवत ही नाही. कारण तो चांगुलपणाच्या भ्रमात असतो. “समोरच्याला वाईट वाटू नये”, “कोणी दुखावलं जाऊ नये” या विचारांनी तो स्वतःच्या भावनांवर पडदा टाकतो. हसणं सवय होतं, जरी आत कुठेतरी मन रडत असलं तरी. आपण सतत इतरांच्या अपेक्षांचं ओझं वाहत असतो.  कुणासाठी वेळ काढतो,कुणासाठी स्वतःची मतं बदलतो, तर कुणासाठी गप्प राहणं स्वीकारतो. स्वतःला समजून घ्यायला वेळच उरत नाही.आपल्या थकव्याला ही आपण नाव देत नाही, कारण “आपणच मजबूत आहोत” असं स्वतःलाच समजावत राहतो. हळूहळू स्वतःचं सुख दुय्यम ठरतं. स्वतःच्या गरजा ‘नंतर पाहू’ या कपाटात बंद होतात. आपण सगळ्यांसाठी उपलब्ध असतो, पण स्वतःसाठी कधीच नसतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हे सगळं करताना आपण स्वतःला दोष देत नाही, तर अभिमान बाळगतो की “मी सगळ्यांना सांभाळतो.” पण एक दिवस असा येतो, जेव्हा मन प्रचंड थकतं. त्या थकव्याला कुठलीही विश्रांती मिळत नाही. कारण आपली किंमत आपल्या असण्यावर नाही, तर आपल्या देण्यावर मोजली जात असते. काही लोक तुमच्या उपस्थितीपेक्ष...

टीकेच्या आगीत घडलेली ओळख....!

इमेज
टीकेच्या आगीत घडलेली ओळख....! आजच्या काळात शांत राहणं सोपं आहे, पण ठाम उभं राहणं फार अवघड झालं आहे. कारण जो उभा राहतो, तोच दिसतो… आणि जो दिसतो, त्याच्यावरच बोटं दाखवली जातात. लोक येतात, नावं ठेवतात, टीका करतात, हेतूंवर शंका घेतात. हे सगळं अपरिहार्य आहे. कारण शांत उभा असलेल्याला कुणी दगड मारत नाही; दगड नेहमी चालणाऱ्यालाच लागतात. जिथे हालचाल असते, जिथे बदलाची चाहूल लागते, तिथेच विरोध जन्म घेतो. आज समाजात अनेकजण बदलाची भाषा करतात, पण प्रत्यक्षात बदल घडवणाऱ्यालाच विरोध करतात. कारण बदल अस्वस्थ करतो, प्रश्न विचारायला लावतो, आणि माणसाला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. म्हणूनच विरोध हा प्रगतीचा शत्रू नसून, तो तिचा पहिला टप्पा असतो. हिंमत नसेल तर प्रतिष्ठा उभी राहत नाही. स्वतःसाठी उभं राहण्याचं धाडस ज्याच्यात असतं, त्यालाच खरी ओळख मिळते. बाकी सगळे गर्दीत हरवून जातात.आज स्वतःच्या मतांवर ठाम राहणं म्हणजे बंडखोरी समजली जाते. पण लक्षात ठेवा, इतिहास घडवणारे लोक कधीच सगळ्यांना आवडले नाहीत. टीका ही अपयशाची नाही, तर प्रयत्नांची पावती असते. तुम्ही काहीतरी करत आहात, म्हणूनच लोक बोलत आहेत. जर कोणी...

म्हातारपण एक न दिसणारा प्रवास.....!

इमेज
म्हातारपण एक न दिसणारा प्रवास.....! म्हातारपण म्हणजे केवळ वाढलेलं वय नाही; ते म्हणजे आयुष्यभर सोसलेल्या प्रत्येक वेदनेची, प्रत्येक तडजोडीची आठवण. शरीर हळूहळू थकत जातं, पण मन मात्र अजूनही त्या मागे वळून पाहणाऱ्या वाटेवरच अडकलेलं असतं. कधीकाळी जी पावलं सगळ्यांसाठी धावायची, तीच पावलं आज थांबायला लागतात. वेग कमी होतो, पण आठवणींचा वेग मात्र वाढत जातो. घर गजबजलेलं असतं, आवाज असतात, हसणं असतं; पण तरीही एक वेगळीच शांतता मनात घर करून बसते. ही शांतता निवांतपणाची नसते, तर एकटेपणाची असते. बोलायला मनात खूप काही असतं.आयुष्याचे अनुभव, अपूर्ण इच्छा, न सांगता राहिलेलं प्रेम पण ऐकणारे कान कमी होत जातात. शब्द ओठांपर्यंत येऊनही परत आतच विरून जातात. म्हातारपणात सगळ्यात जास्त टोचणारी जाणीव म्हणजे गरज संपली की माणूसही हळूहळू बाजूला पडतो ही भावना. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलेला माणूस कधीतरी ओझं वाटू लागतो. कधी प्रेम मिळतं, पण त्यात अधीरतेची किनार असते. कधी काळजी घेतली जाते, पण ती कर्तव्य म्हणून. औषधं भरपूर असतात, उपचार असतात, पण मनासाठी लागणारे दोन शब्द मात्र कमी पडतात. तरीही आई-वडील तक्रार करत नाही...

माणुसकीचा सुगंध जपणारा दिलदार मित्र भास्करभाऊ चौधरी....!

इमेज
माणुसकीचा सुगंध जपणारा दिलदार मित्र भास्करभाऊ चौधरी....! धरणगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले, पण मनाने मात्र श्रीमंत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे भास्कर भाऊ चौधरी. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकी यांचा सुरेख संगम त्यांच्या स्वभावात दिसून येतो. स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे भास्कर भाऊ म्हणजे खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारा मित्र. कधीही कुणाचं मन न दुखवता, प्रेमाने आणि आपुलकीने वागणं ही त्यांची खास ओळख आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक जण आपोआप आपलासा होतो. मित्र, नातेवाईक, ओळखीचे-अनोळखी सर्वांसाठी ते सारखेच; कारण त्यांच्या मनात भेदभावाला अजिबात स्थान नाही. संकटात आधार बनणं आणि आनंदात सहभागी होणं, हे त्यांनी शब्दांत नाही तर कृतीतून दाखवून दिलं आहे. रोखठोकपणे आपले विचार मांडण्याची त्यांची शैली अनेकांना आवडते. स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभाव असला तरी त्या स्पष्टतेत कटुता नसते; असते ती फक्त प्रामाणिक भावना आणि योग्य दिशा दाखवण्याची तळमळ. त्यामुळेच त्यांच्या शब्दांवर लोक विश्वास ठेवतात आणि त्यांच्या मताला मान देतात. आज त्यांच्या वाढ...

मराठी शाळा आयुष्याची शिदोरी....!

इमेज
मराठी शाळा आयुष्याची शिदोरी....! मराठी शाळा म्हणजे केवळ शिकवणी देणारी इमारत नव्हे, तर माणूस घडवणारी संस्कारांची पंढरी होती. त्या शाळेच्या अंगणात पाय ठेवताच केवळ वर्गात प्रवेश होत नसे, तर आयुष्याच्या शाळेत प्रवेश झाल्यासारखं वाटायचं. तिथे पुस्तकं होती, अभ्यास होता; पण त्याहून अधिक होतं ते माणूस म्हणून जगायचं मौलिक शिक्षण. गुरुजींचा आवाज कधी कडक वाटायचा, कधी रागीटही भासायचा; पण त्या आवाजामागे दडलेली आपुलकी आज प्रकर्षाने जाणवते. ते ओरडायचे कारण द्वेष नव्हता, तर आपल्यातून चांगला माणूस घडावा ही तळमळ होती. वही नीट नसेल तर टोमणा मिळायचा, पण विचार गढूळ होऊ नयेत यासाठी सतत समज दिली जायची. “अक्षर चुकलं तरी चालेल, पण माणुसकी चुकता कामा नये” हे तिथे नकळत मनावर कोरलं जायचं. मराठी शाळेत शिस्त होती, पण ती भीतीची नव्हती. ती जबाबदारीची, स्वाभिमानाची आणि आत्मभानाची होती. वेळेवर येणं, स्वच्छ राहणं, मोठ्यांचा मान ठेवणं, मित्राला मदत करणं हे सगळं शिकवण्यासाठी वेगळे धडे नव्हते, ते रोजच्या वागण्यातून शिकवलं जायचं. स्पर्धा असायची, पण ती एकमेकांना मागे टाकण्यासाठी नव्हे, तर स्वतःला अधिक चांगलं घडवण...

गल्लीत उभा विद्यार्थी...!

इमेज
गल्लीत उभा विद्यार्थी...! एक काळ असा होता, जेव्हा विद्यार्थी गल्लीमध्ये उभे असत. दूरवरून शिक्षक दिसले की, मुलं आपोआप मार्ग बदलत, शांतपणे निघून जायची. भीती नव्हती, पण मनात एक जबाबदारी होती.अखंड आणि गोड. शिक्षक काही बोलतील याची भीती नव्हती, पण त्यांनी पाहिलं की आपण चुकीचं वागत आहोत, हे जाणवण्याची ती सूक्ष्म जाणीव प्रत्येकाच्या मनात रुजलेली होती. शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारे नव्हते, तर जीवन घडवणारे आधारस्तंभ होते. त्यांच्या एका शब्दाचा घरी पोहोचणारा परिणाम मुलांना माहित होता. आणि घरच्या वातावरणात तो शब्द किती महत्त्वाचा ठरतो, यावर पालकांचा ठाम विश्वास असायचा. पालक आणि शिक्षक यांच्यात न बोलता तयार झालेली ही साखळी इतकी मजबूत होती की, त्यात शिस्त होती, संस्कार होते आणि भविष्यासाठीची तयारी होती. आजच्या काळात, मुलं शिक्षकांना घाबरत नाहीत. पण दुसरी भीती आहे.स्वतःच्या जबाबदारीपासून लांब जाण्याची भीती. घर आणि शाळा वेगवेगळ्या दिशेने खेचू लागल्यावर, मुलं मधेच हरवतात. शिस्त तुटते, आदर कमी होतो आणि शिक्षण फक्त पुस्तकापुरतं राहते. तो काळ कठोर वाटायचा, पण मागे वळून पाहिलं की, त्या कठोरपण...